Arul saru - 4 books and stories free download online pdf in Marathi

अरुल सरु... 4

अरुल सरु

भाग ४....

प्रेम... मात्र प्रेम माणसाला काय च काय बनवून टाकतं एक प्रेम कि माणसाला काबिल बनवतं तर तेच प्रेम माणसाला कमजोर हि बनवतं..... प्रेमाला ज्याने समजलं त्याने जग जिंकला ज्यांनी प्रेमाला नाही समजलं त्यांना सर्वश्व भेटून पण त्यांची हार आहे...

अश्या ने हे जाऊन अरुल ला सांगितलं कि सरु आलती... आई बाबा होते म्हणून आत नाही घेऊन आलो पण ती तुला बगून गेली खूप रडत होती... हे ऐकून अरुल ला मनाला शांतता भेटली चेहर्यावर स्मिथ हसी फुटलि... व अरुल ने एक आतुरते सोबत अश्या ला विचारलं कि....

"सरु ठीक आहे ना"...

"हो अरुल, सारु ठीक आहे, ती चेहऱ्यावर ओढणी बांधून लपून आलती घरच्यांकडून गेली तुला बगून".... अश्या बोलला अरुल ला....

अरुल ला आज हॉस्पिटल मधून सुट्टी भेटली आई बाबा व अश्या सोबत घरी आले... अरुल ने अश्या ला सांगितलं.....

"भावा बग ना जरा सरु कुठे आहे कशी आहे घरच्यांन मुळे तर तिची हालत झाली असेल... काय तरी खबर काडून आन ना तिची भाई"....

अश्या बोला..... "हो बगतो मी"...

अश्या गेला व काही वेळ नंतर परत आला... अश्या च्या चेहरा वरून हे स्पष्ट दिसत होत कि खबर चांगली नाहीये व त्याची अरुल ला हि खात्री होती... पन जे अरुल ने ऐकलं ते मात्र अस होईल त्याची अरुल ला ठाऊक नव्हती....

अश्या ने सांगितलं अरुल...... "सरु ला बगायला मुलगा आलता घरी, तिच्या घरचे स्तड शोधताय तिच्यासाठी आणि मला पूजा कडून हे कळलं कि तिला कोण विचारणार नाही कि तिला मुलगा आवडतो कि नाही बस त्याच मूला सोबत तिचे लग्न ठरवणार आहेत घरचे"......

हे ऐकून अरुल च्या पायाखालची जमीन हल्ली... अरुल च्या मनाला धक्का बसला, अगदी शांत रहाणारा अरुल आज मात्र पहिल्यांदा रागात होता... इतका कि राग त्याचा चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता व अरुल अश्या ला बोलला अश्या चल......

अश्या आणि अरुल डॉघही रागात होते अरुल ने ठरवलं कि पूजा कडे जाऊन मात्र एकदा कसहि करून सरु सोबत बोलायचं प्रयत्न करूया... तेव्हाच रातस्टायत अरुल ला निलेश भेटला... तो त्याचा मित्रांसोबत बसला होता व... अश्या ची नजर जशी निलेश वर पडली तो तर रागात काळा निळा झाला... अश्या अरुल ला बोलला......

'अरुल हा बग कुत्रा बोल फक्त इतच कापून टाकूया ह्याला"......

अरुल बोलला.... "अश्या गप चल सध्या काय नाही करायचं, सध्या मला सरु सोबत बोलायचं आहे"......

अरुल पुढे जाऊ लागला... तेव्हा निलेश जागेवरून उठला व बोलला...

"ए भिकाऱ्या बहिणीचं लग्न ठरलाय व्हय, ये हांका लग्नात मोफत मध्ये जेवण पण करून जा"... निलेश अशी अरुल ची खिल्ली उडवत बोलला वया निलेश चे मित्र सगे अरुल वर हसू लागले...

अश्या हे ऐकताच वळून ननिलेश च्या जवळ येऊन बोलला....... "ए बस्स झाला हां गप बस्लोय तर जास्त शांपणा करू नकोस"...

"अरे बापरे घाबरलो हां मी, अबे ए अरुल समजवं आपल्या लाडक्या मित्राला... नाहीतर जशी तुझी हालत कलती ना त्या पेक्षा बेकार हालत ह्याची होईल समजवं ह्याला"..... निलेश अगदी रागात बोलला

हे ऐकून अश्या भडकला पण अरुल बोलला अश्या थांब शांत हो.... अश्या ला बाजूला करून अरुल निलेश जवळ गेला... व अगदी त्याचा समोर थांबून त्याचा डोळ्यात डोळे टाकून एकदम शांत पने बोलला...

"लग्नाचा आमंत्रण दिल्या बदल धन्यवाद....लग्नात तर येणार मी पण लक्षात ठेव, लग्नात येणार पण व नवरी ला घेऊन पण जाणार मी ते हि सगळ्यांन समोर आणि तुला हवं ते कर , राहिली गोष्ट जेवण्याची ते तर मी खाऊन जाणार सासारवाडी ची नाहीतर काय इजत रहाणार कि जावई जेवल्या शिवाय निघून गेला"....

हे ऐकताच निलेश ने अरुल वर हाथ उचला पण अरुल ने हाथ अडत्वत त्याचा हाथ धरला व हाथ झटकत निलेश चा थोबाड पकडून बोलला...

"माझ्या होणाऱ्या मेव्हणा जेवडी इजत देतोय ना तेवडं इजत मध्ये रहा... नाहीतर तुझ थोबाड मला काय खास आवडत नाही.... तुझा बहिणी मुळे गप आहे मी नाहीतर औकात काय आहे माझी आणि लायकी काय आहे तुझी ह्याची जाणीव तुला आताच झाली असती".... रागात असा म्हणत अरुल ने निलेश ला ढकलं व बोलला.... "येतो जरा नीट काळजी घ्या अजून लग्ना ची तयारी करायची आहे.... आणि ए फुकत्यांनो तुम्हीच आपल्या ताई च्या लग्नाला यायचा हां"..... अरुल अस निलेश व त्याच्या मित्रांना अगदी रागात बोलला आणि पुढे निघुम आला....

व अश्या निलेश ला बोलला..... "काय राव उतरली का हेकडी"...

हे ऐकतच निलेश आणि त्याच मित्रांनी खाली मान टाकली... व अश्या अरुल च्या पाटी निघून आला...

निलेश आणि त्याचे मित्र तितच थांबून होते... अरुल चं असं बोलणं ऐकून निलेश ने काय नाही केलं व निलेश ची हिम्मत तुटली अरुल समोर...

अरुल आणि अश्या पूजा च्या घरी पोचले... तिच्या घरी कोण नव्हत.... पूजा ने दोघांना आत बोलावलं... आणि बसवल... पूजा ने अरुल ला सांगितलं कि.......

"अरुल तिची हालत खूप खराब आहे मी तिच्या घरी गेलती तिचे बाबा नव्हते म्हणून मला तिच्या सोबत बोलायला भेटलं व एव्हडा सग कळलं नाही तर काहीच समजल नसत.... अरुल काय तरी कर नाहीतर तुझी सरु"...

"पूजा काय नय होणार फक्त एक काम कर माझा सरु सोबत माझं बोलणं होईल अस काय तरी कर"...

"हे कस शक्य आहे आता... ह्या situation मध्ये"....

अश्या बोलला..... "सध्या situation नवे पण दोघे एक कसे होतील ते बग"...

हे ऐकून पूजा बोलली.... "थांब मी प्रयत्न करते".....

पूजा ने सरु च्या घरी तिच्या आईला कॉल लावला......

"Hello काकी ऐकाना मी पूजा बोलते, काकी घरी कोण नाहीये आई आणि बाबा बाहेर गेलेत म थोड वेळ सरु ला पाठवता का इथं"...

"नाही ती नाही येणार आता, हवं तर तू ये इथं जेवण वगैरं करून जा"...

"बरं ठीक आहे काकु"... पूजा ने फोन ठेवला....

पूजा बोलली.... "अरुल नाही काकू नही पाठवत तिला... उलटं ते तर मला तिथं बोलवताय"...

"बर ठीक आहे,..... पूजा एक काम कर माझं, तूच जा तिथं मी तुला एक पत्र लिहून देतो ते तिला दे".....

"बरं ठीक आहे जाते मी"...

अरुल ने पूजा च्या हाथी सरु साठी पत्र पाठवलं ......

"सरु.... माझी शोना घाबरू नकोस मी आहेना सोबत तू ठीक आहेस ना, नाहीयेस ना ठीक माहित आहे पण थोडे दिवस शोना मग सग ठीक होईल माझा वर भरोसा ठेव शोना तू काळजी करू नकोस मी आहे नेहमी तुझा सोबत तुझा जवळ, काय नाय होणार शोना बस्स हिमत हारू नकोस, तुझे बाबा पण ऐकतील आणि होईल सग ठीक आपल्याला लांब कोण नाही करणार माझा promise आहे तुला शोना.... love uhhh सो much शोना"......

हे पत्र वाचून सरु च्या डोळ्यातून पाणी आला... आणि सरु पूजा ला चिपकून खूप रडली.....

"पूजा सांग ना ग काय करू मी कोणाचा ऐकू कोणाला समजवू, कोणाला मनऊ मी, आई बाबा ची बाजू घेतली तर प्रेमाचा विश्वास तुटेल आणि प्रेम ची बाजू घेतली तर आई बाबा चा विश्वास तुटेल, बोल ना तूच काय करू मी... कोणाला सांगू सगे माझेच आहे यार प्रेमाला हि नाही गमवायचं मला आणि आई बाबा ला पण काय करू काय कळत नाही..... मी अरुल ला भरोसा दिला आणि आता हे सग काय होतंय काय कळत नाहीये मला".......

"ऐक जास्त विचार करू नकोस सध्या थोडं डोकं थंड ठेवून विचार कर कि तुला काय करायचं आहे जे तुझ्या मनाला वाटेल कि बरोबर आहे तेच कर"...... पूजा ने सरु ला खूप समजवलं....

"पूजा अरुल कसा आहे ठीक आहे ना... आता त्याची तबेत कशी आहे ठीक आहे ना तो".....

"हो ग राणी तो ठीक आहे काळजी करू नकोस"...

तितक्यात सरु चे बाबा आले... व पूजा तिथून निघून आली.... अरुल पूजा ची वाट बगत थांबला... होता जशी पूजा आली... अरुल ने एकदम प्रसणांची बरसात केली...

"काय झाला कशी आहे सरु ठीक आहे ना काय बोलली सरु रडत होती ना ती येडी सांग ना पूजा काय बोलली सरु"...

पूजा ने विस्तार पूर्वक जे काय घडलं ते अरुल ला नीट समजवून सांगितलं व पूजा बोलली...... "बग अरुल आता तुझवर सग depend आहे कि तुला काय करायचा आहे".... आणि पूजा तिथून निघून गेली...

अश्या बोलला.... "काय करायचा आहे म्हणजे अरुल जास्त विचार करू नको, भेंडी त्या टाकल्याला काय घाबरायचं सरु ला पळून आनुया अपूण, अरे मी आहे ना"..... अश्या अस बोलत रहायला व अरुल हे सग काय ऐकतच नव्हता आपल्याच विचारात गुंथला होता तो..... अरुल काय न बोलता तिथून जाऊ लागला... अश्या त्याला थांबवतोय पण तो काय थांबत नाहीये... अरुल तिथून निघून आला....

अरुल आणि अश्या दोघ कट्यावर येऊन बसले होते..... तेव्हा अश्या ने बघितल कि सरु चे बाबा जात होते, अश्या बोलला......

"अरुल ते बग सरु चे बाबा चायला या डोकऱ्या मुळेच सग होतंय या ला मी सोडणार नाही"..... अश्या खूप रागात बोला....

अरुल बोलला..... "हो भेंडी थांब मी बगतो"... म्हणत अरुल आणि अश्या सरु च्या बाबांचा पाठलाग करू लागले... पाठलाग करत ते लोक थेट एक सामसूम रस्त्या वर आले... तेव्हा अरुल ने सरु च्या बाबा ला थांबवलं...

"ओ काका... थांबता का जरा".... सरु च्या बाबांनी वळून बघितलं अरुल हाक मारतोय... ते थांबले व रागात विचारलं "काय रे काय झालं"...

अरुल बोलला..... "थोडं बोलायचं आहे तुमचा सोबत".....

"काय बोलायचं आहे आता तुला".....

"काका तुम्ही सरु चं लग्न ठरावताय असं कळलं मला...... तुम्ही सरु चे बाबा आहेत तिचा साठी जे काय ठरवणार चांगलच ठरवणार मुलगा पण चांगला शोधला असेल तुम्ही.... आज भले सरु खुश नाही पण पुढे जाऊन ती खुश रहाणार... माझी पण तीच इच्छा आहे कि तू खुश रहावी".......

"काका माझा सरु वर खूप प्रेम आहे मी हि तिला खूप खुश ठेवणार मला एक मौका द्या फक्त सरु ला खूप चांगला ठेवणार तुम्ही बोला काय करू मी, मी जातोय कामाला चांगला शिकलोय... तिला खुश ठेवेन बस सरु सोबत लग्न होऊद्या माझे... तुमचे हाथ जोडतो, हाथ जोडतो काका ... तिला सोडून मी नाही राहू शकत... एकूनती एक मुलगी आहे तुमची अस का करता तिचा मर्जी ने हौउद्या ना"......

सरु च्या बाबांनी सग ऐकून घेतलं व रागात अरुल ला उत्तर दिलं..... "निर्लज कुटल्या, मला शिकवू नकोस कि मी काय केलं पाहिजेल... माझा समोर कितीही बोल काय नाही होणार आणि या पुढे जर सरु चा नाव कधी तोंडावर आलं तर जीव घेईन तुझा, कळलं ना माझी मुलगी आहे मी काय पण करेंन... चल हट्ट".....

अरुल त्यांना हाथ जोडत होता.... "काका please ऐका मी खरच खूप खुश ठेवेन तिला ऐका ना काका"... पण सरु चे बाबा काय ऐकत नव्हते अरुल गुडग्यांवर बसून हाथ जोडत बोलत होता पण तरी सरु चे बाबा काय ऐकत नव्हते... अश्या ने अरुल ला उभं केलं... अरुल च एव्हड बोलणं ऐकून पण सरु चे बाबा काय ऐकत नव्हते व रागात बोलले.....

"माझ्या पोरी च लग्न मी तुझा सोबत नाही करणार नाहीच करणार जे करायचं आहे ते कर हव तर मारून टाक मला पण सरु चे लग्न मी तुझा सोबत नाही करणार, प्रेम वगैरे हे सगे फालतू चे नखरे आणि धंदे असतात... आजकाल च्या मुलांचं प्रेम भरपूर बघितलं मी कशे लोकांची पर्वा न करता आपल्या आई बाबांचा नाव घालवतात हर मला चांगलंच माहित आहे आणि तुझा काय म्हणं आहे कि माझ्याच पोरीचं आयुष्य बरबाद करू तुझासोबत लग्न करून टाकू कसं ठेवशील तिला किती कमावतो तू माहित आहे मला बोलली माझी मुलगी मला ती पण असंच समजवत होती मला काय माहित तू काय भरवलं आहे तिला कि ऐकत नाही माझी मुलगी किती गुणी किती हुशार होती पण तुझ्या पाटी पण नाय मी जे ठरवलं आहे तेच होणार".....

"काका असं नाहीये... सरु वर माझा खूप प्रेम आहे मी होईल successfull मोठा माणूस बनून दाखवेल तुम्हाला, सरु ला खरच खूप खुश ठेवणार".....

"तू काय मोठा होशील आणि जेव्हा होशील ना तेव्हा ये माझा कडे विचार करेंन मी तेव्हा, आहे तुझा कडे महिनाभर कर काय करू शकतो ते"...... हे असं अगदी रागात म्हणत सरु चे बाबा तिथून निघून गेले.....

हे ऐकून अरुल एकदम शांत होऊन तिथंच थांबला.... अश्या त्याला जसा तसा घरी घेऊन आला.... आज नंतर अरुल ने अश्या समोर सरु चा नाव कधी काढला नाही व अश्या ने हि विषय जर कधी मांडला तर अरुल फक्त ऐकायचा... जणो तो सरु ला ओळखतच नाही आज ५ दिवस झाले संध्याकाळ ची वेळ काय तरी ७:०० वाजले... होते अरुल मैदनात झाडा खाली बसला होता एक दम गुमसुम शांत व काही क्षण नन्तर अरुल स्वस्त झाला व उठून तिथून निघतच होता कि तिथं अश्या आला..

"भावा काय तू इथं एकटा बसलाय काय बोलशील का"... अरुल ने काय उत्तर नाही दिलं.... अश्या थोडा उदास होऊन बोलला.... "अरुल सरु चे लग्न ठरलय पुड्याचा महिनाला तिचं लग्न आहे आणि आता हि जर तू काय केलं नाहीस मग तर गेलाच समज तुझा प्रेम"..... अरुल काहीच नाही बोलला हे ऐकून पण....

अश्या अरुल ला ओरडून बोलला रागात..... "काय चाललेय काय तुझा मनात अरुल तिचा साठी एव्हड केला तू आणि आता जेव्हा वेळ आली आहे तेव्हा तू असा शांत झालाय काय ठरवलंय तू सांगशील काय.... जर असाच रहायला तर सरु तुला कधीच नाही भेटणार अरे सोड ना नाही ऐकत घरचे तर सोड पळवून घेऊन ये तिला भेंडी गेला सग उडत काय एव्हडा विचार करतोय"......

"अश्या खूप केलास यार तू माझा साठी अमच्या साठी... पण यार एव्हडा सोपा नाहीये... कि मी तीला पळून अनु लग्न करू तिचा आई बाबा किंवा माझे आई बाबा ची काय इजत राहणार समाज मध्ये काय नाक रहातील सांग मला भाई"..... अरुल अगदी शांत व हळू स्वरात बोलला

"अरुल तुला काय झालाय तू कधी पासून समाज चा विचार करू लागला यार".....

"अश्या........ प्रेम मात्र प्रेम असतं.... आज कळलं कि प्रेमाला अर्थ असतं"... "आज समजला कि लोक प्रेमात sucide का करतात का आपला जीव इतकं सरल पणे देऊन टाकतात... कारण कि प्रेम मात्र त्यांना कमजोर बनवून टाकतो... विचार नाही करता जमत त्यांना कि कोणाची बाजू घ्यावी... जन्म देणार पालकांची... कि साथ देणार साथीदार ची... कोणाचा विश्वास मोडावं.... कोणाला सांगावा, सरु काय आणि कशात अडकून आहे हे कळतंय मला एका मुली साठी हे सोपं नाहीये कि आपल्या आई बाबा ज्यांनी आपल्याला जन्म दिलं त्यांना एक झटक्यात अस सोडून जाणं नन्तर लोक आपल्या पालकांना खास करून मुलींच्या पालकांना कश्या नजरेने बगतात माहित आहे मला"...

"अश्या.... अश्या काय सांगू यार तुला.... कस समजावू तुला कि.... प्रेम यार अजीब आहे हे... कोणाला बलवान तर कोणाला कमजोर बनवून सोडतं... प्रेमात कोणाची हार होते तर कोण जिंकतो... प्रेमात कोण हसतो तर प्रेमात कोण रडतो... नसीब वाले आहे ज्यांना त्यांचं खरं प्रेम मिळाला... बदनसीब आहे ते लोक ज्यांचा प्रेम अधुरा रहायला..."

"प्रेम मात्र प्रेम असतं पण आज कळलं कि प्रेमाला हि अर्थ असतं"...

"नौकरी शिक्षण जात पैसा .... आज नाही पण आधी पासून प्रेमाची तुलना याच वस्तूंनसोबत लोक करतात...

अर्थ चा विचार करणं व्यर्थ आहे... प्रेम जीवनात भेटला तेच सर्वश्व आहे".....

आज अरुल चे हे विचार त्याचा व्यक्तिमत्व जाणून देत होते....

अरुल बोलला.... "अश्या मला नाही माहित कि पुढे काय होईल सरु आणि माझे लग्न होणार कि नाही, पण हे मात्र मला खात्री आहे कि तिचा वर माझा प्रेम कधी कमी होनार नाही... माझा पहिला प्रेम माझी स्वप्न सुंदरी माझा जीव आहे ती... नाही विसरणार मी तिला"...अश्या ने अगदी शांत पणे ऐकून घेतलं व अरुल ला समजून घेतलं....

अरुल चे विचार खरच खूप मोठे होते पण मात्र ह्या विचारणं मुले काय सरु भेटेन त्याला...हेच आहे प्रेम मित्रानो प्रेम करणं सोपं आहे पण त्या प्रेमाच्या बंधनाला त्या विश्वास त्या प्रेमाच्या वचनांना पूर्ण करणंच प्रेम आहे... किती love story अशी आहे कि त्यांना आपला प्रियकर नाही भेटत पण मनात मात्र तो पहिला प्रेम राहून जात.....

रात्र दिवस असेच जात होते.... असा वाटत होतं कि अरुल ने सरु चा विचार सोडून दिलाय... आणि इथं सरु ने पण हेच आपल नसीब आहे असा विचार करून जे घरचे सांगताय ते करू लागली....

अरुल रोज वेळेवर कामावर जातोय वेळेवर घरी येऊन जेवण करून आई बाबा सोबत रोज गप्पा गोष्टी करून झोपून जायचा... life अगदी simple... आणि प्रमाणे जगू लागला...

सरु च्या घरी जोर शोर ने लग्नाची तयारी चालू होती... सरु खूप उदास होती मनाला हव तस काहीच होत नव्हत... पण शेवटी काय करू शकते ती हि...

भरपूर दिवसां नन्तर आज पूजा आणि अरुल ची भेट झाली... खरं तर पूजा ला अरुल ला काय तरी महत्वाचा सांगायचं होतं... म्हणून पूजा अरुल ज्या रस्त्या वरून रोज कामावरून यायचा त्याच रस्त्याला पूजा अरुल ची वाट बगत थांबली होती... अरुल कामावरून येत होता तेव्हाच रस्टायत त्याला पूजा भेटली... पूजा ला बगून अरुल थांबला आणि बोलला......

"hiiii... पूजा कशी आहेस"...

पूजा अगदी रागात चिडून बोलली..... "अरुल तू इतका normal कशा राहू शकतो म्हणजे हेच होता का तुमचं प्रेम,..... तिचं लग्नं ठरलंय, आता तरी काय कर"...

"कशी आहे सरु ठीक आहे ना"... अरुल ने अगदी उदास मनाने व प्रेमाने विचारलं

अरुल च्या या प्रश्णाचा पूजा ने काय उत्तर दिला नाही... पूजा शांत होऊन अरुल कडे रागाने पाहू लागली... व काही क्षण नन्तर बोलली.... "अरुल ऐक मी समजते कि तू कोणत्या situation मध्ये आहेस पण विचार कर काय तरी कर"....... व असा अगदी रागात पूजा बाय बोलून तिथून निघून गेली...

अरुल घरी निघून आला.. "आई चाह दे ना".... "हाँ देते बस".... तितक्यात अश्या चा phone आला..

"कुठे आहेस आता लगेच भेट काम आहे"......

"ठीक आहे भेटतो".....

अरुल अश्या ला भेटायला आला... अश्या अरुल ची वाट बगत थांबला होता... व अरुल पोचला तिथे..

"बोल अश्या काय झाला".....

"अरुल, सरुचं लग्न ठरलंय आणि तारिक जवळ येतेय उद्या तिचं साखरपुडा आहे"....

"हो महित आहे मला"...

"म काय ठरवलं आहे तू"...

"काहीच नाही"...?

अरुल खाली मान टाकत बोलत होता... अरुल ला स्वतःची लाज वाटत होती... कि अस कसं तो हरू शकतो सरु ला कसं सोडू शकतो... तेव्हाच अरुल ला आठवलं जेव्हा त्याने हॉस्पिटल मध्ये त्याचाबाबांना सांगितलं होतं कि मला एक प्रयत्न करू द्या... हे आठवून अरुल खूप उदास झाला... अरुल ला सरु चा चेहरा डोळ्यांन समोर दिसू लागला... आणि अरुल ला सगी जुनी आठवणी आठवली प्रेमात ते बोलणं... सरु चा लाजून हसनं, कधी भांडण... तर कधी शायरी बोलून सरु ला मनवनं... व अरुलला आठवलं कि तो सरु ला एक दिवस बोलला होता..... "काहीही झाला तरी कधी मला सोडून जाऊ नकोस मी नाही राहू शकत तुझाशीवाय सरु नाही राहू शकत"......

अश्या ओरडून ओरडून बोलत होता...." अरे भावा बोल काय तरी कुठे हरवलास... ऐकतोय का मी काय बोलतोय".... अरुल तेव्हा एक दम उदास आवाजात बोलला....

"अश्या मला सरु ला भेटायचं आहे आता"...

अश्या बोलला.... "आता बोलास ना भाई तू अरुल सारखा चल मी काय तरी जुगाड लावतो भेट तू सरु ला"...

अश्या आणि अरुल दोघ सरु च्या घरा जवळ गेले... सरु चे आई बाबा बाहेर बसले होते... अश्या बोलला..... "अरुल ऐक पाठच्या रस्त्याने घूस direct घरात काय झाला तर मी आहे बगतो... तिचे आई बाबा बसलेत बाहेर काय झाला तर तुला call करेंन मी म तू निघ लगेच".....

अरुल बोलला ठीक आहे... अरुल पाटाच्या रस्त्याने भिंतुवरून उडी मारून सरु च्या घरात शिरला... लपत लपत तो घरा मध्ये आला.. सरु घरात कुठेच नव्हती... म अरुल ने मांड्यावर बघितलं सरु तिथं झोपली... होती

अरुल ने सरु ला प्रेमाने गालावर हाथ फिरवत उठवलं...

"सरु हे माझी sweet heart... उठ शोना"....

सरु उठली आणि अरुल ला समोर बगून आधी तर shock झाली आणि घाबरून बोलली.... "अरुल तू इथं कोणी बघितल तर अरुल तू जा इथून"...

"सरु सरु शांत हो शांत हो शोना"... अरुल ने सरु चे दोनी हाथ त्याच्या हाथ घेतले व तिला प्रेमाने शांत करून समजवलं...

सरु शांत झाली व लगेच अरुल ला चिपकून रडायला लागली....... "अरुल हे सग काय झाला काय चालू आहे मला नाय काय समजत कि काय करू".....

"सरु शांत हो रडतेस का... अरे मी आहे ना अजून इथं रडू नकोस होईल सग ठीक तू काळजी करू नकोस सग ठीक होईल"..... अरुल अगदी प्रेमाने सरु ला समजवत बोलला...

"कसा ठीक होईल अरुल उद्या साखर पूडा आहे मग काय नाय होऊ शकणार अरुल"...

"सरु होईल भरोसा ठेव माझावर, ऐक शोना तू काय नको करूस घरचे जस सांगताय तस कर... हेच आपलं नशीब होत"....

"अरुल काय बोलतोय तू"....

"हो सरु... जे होईल ते होईल"...

"म्हणजे तू मला सोडून जाशील विसरशील मला"....

"सरु ऐक तुला पळून नाही घेऊन जाऊ शकत मी... तुला हि तसं करायचं नाहीये... आणि तुझे बाबा नाही ऐकत काहीच नाही ऐकत बोल तू मी काय करू"....

"अरुल मनव ना बाबांना sorry बोल माफी मांग काय तरी कर"....

"सरु सग करून झाला पण तुझे बाबा नाही ऐकत आता तूच सांग मारून टाकू का त्यांना".... अरुल अगदी रागात चिडून बोलला... सरु ला

"अरुल हे काय बोलतोय तू"...

"शोना ऐक sorry... तू माझा ऐक नशिबात असेल तर भेटू चल जातो मी".... अरुल जाऊ लागला तिथून

अरुल थांब म्हणत सरु ने अरुल ला मितीत्त घेतला व खूप रडू लागली... आणि अरुल तसाच तिथून निघून आला.... आणि सरु तिथं अरुल, अरुल थांब म्हणत रडत ऱ्हाइलीं

अश्या ने जस अरुल ला बघितलं तसं एकदमच प्रश्नं करू लागला..... "अरुल काय झाला काय बोलली सरु"....

"काय नाय अश्या सोड चल बसूया कट्यावर"... अरुल ला काहीच समजत नव्हता कि काय करावा... अरुल ला राग हि खूप येत होतं कि आपलं प्रेम मिडवण्यासाठी काय करू शकत नाहीये... अरुल चा चेहरा उतरला होता... व त्याची हालत त्याचा चेहऱ्यावरून दिसत होती... अश्या ला हि समजत होतं म्हणून अश्या ने हि पूडे काय विचारलं नाही...डोघ कट्यावर येऊन बसले.... थोड्या वेळ नन्तर अरुल ला त्याचा बाबांचा फोन... आला कि लवकर घरी ये...

अरुल धावत घरी पोचला घरी बगतोय तर सरु चे बाबा येऊन बसले होते... अरुल ला बगताच रागात विचारू लागले कि कुठे आहे माझी मुलगी तिला कुटून पण माझा जवळ आण... अरुल चे बाबा उठले व सरु च्या बाबांना शांत करू लागले.. आणि बोले धीर धरा काय नाय होणार सरु ला, ठीक असणार सरु ठीक असेंल ती... शांत व्हा येईल ती...

सरु चे बाबा काय ऐकत नव्हते... नाही मला माझी मुलगी हवी आहे बस्स... अरुल ला काय समजत नव्हत... कि काय चालू आहे अरुल ने घाबरतच विचारलं कि काय झाला सरु ला... कुठे गेली ती तेव्हा सरु च्या बाबाने खिशातून एक पत्र कडून रागात अरुल च्या तोंडावर फेकलं... अरुलने पत्र उचला व बघितलं...पत्र मध्ये लिहलं होता कि...

"बाबा आई.... माफ करा मला मी सगळ्यांची गुनेहगर आहे आणि अरुल ची पण... मी कोणाला खुश नाही ठेऊ शकली ना अरुल ला ना तुम्हाला आणि म्हणूनच जातेय मी खूप लांब"....... सरु

हे वाचताच अरुल च्या डोळ्यातून पाणी आला अरुल रडत रडत धावत घरा बाहेर आला... आणि अश्या हि अरुल च्या मागे धावत त्याचा पाठलाग करू लागला.... अरुल धावत धावत संगी कडे सरु ला शोधत होता बाजारात रस्त्यात सरु कुठेच दिसत नव्हती... अरुल कसा बसा झालता ... अरुल ची तर अगदी हालत झालती... सरु ला शोधत शोधत तो स्टेशन वर पोचला संगी कडे वेड्या सारखा सरु ला शोधत होता तेव्हा त्याचा लक्ष गेला... एका कोपर्यात एक मुलगी कचेहऱ्यावर ओढणी बांधून बसली आहे... अरुल तिच्या जवळ गेला व हळूच बघितलं व त्याचा मनाला शांती भेटली... ती सुरूच होती, सरु ला बगून अरुल खुश झाला पण अजूनही तो रागात होता... अरुल ला बगताच सरु बोलली.....

"आलास तू जस तस मी स्वतःला मनवून घर सोडून निघाली होती आता का आलास तू"...

अरुल ने रडत डोक्या वर हाथ मारला.... आणि काय विचार न करता रागात सटकन सरु ला चापट मारली... सरु रडू लागली आणि बोलली..... "काय पण कर पण मी नाही येणार.... मार अजून मार मला पण मी नाही येणार... अरुल तू का आला इथं, अरुल मला नाही रहायचा तुझाशीवाय"....

अरुल ने सरु ला जवळ घेतलं आपल्या मितीत्त घेऊन सरु समोर खूप रडला ... सरु पण खूप रडत होती... अरुल बोलला... सरु चल घरी... म्हणत सरु चा हाथ पकडून अरुल सरु ला घरी घेऊन... आला

अरुल सरु ला त्याचा घरी घेऊन आला सरु तिच्या बाबांना बगून घाबरून अरुल च्या मागे लपली... तेव्हा अरुल बोलला....

"हे घ्या काका तुमची मुलगी ... सही सलामत आहे घेऊन जावा तिला म्हणत सरु चा हाथ तिच्या बाबांचा हातात दिला"...

सरु अरुल चा हाथ सोडत नव्हती पण अरुल हि मजबूर होता... तो खाली मान टाकून उभा होता आणि सरु अरुल कडे एक तक बगत होती...

सरु चे बाबा अरुल समोर बगत बसले होते... व नन्तर काय न बोलता सरु चा हाथ पकडून तिला ओळत घरी घेऊन आले.... सरु चे बाबा अगदी शांत पणे सरु ला बोलले.. जा वर माळ्यावर जाऊन बस... उद्याची भरपूर तयारी करायची आहे..... जा"...

अरुल चे बाबा अरुल ला बोलले आज मला गर्व आहे कि तू माझा मुलगा आहेस... अरुल चे आई बाबा नि अरुल चा खूप कौतुक केला...... पण अरुल खूप शांत होता... अरुल ने त्याचा बाबाला मिति मारली... व बोलला... "बाबा मी हारलो, इतके प्रयत्न करून पण सरु ला नाही मिळवू शकलो"....

अरुल च्या बाबांनी अगदी सहज पणे उत्तर दिलं... "अरुल प्रेमात हार, जीत नसते... कोणाला हि समजवायला एक क्षण खूप असतो... आणि प्रेमात बाळा कधी हि काय पण होऊ शकतं.. अजून वेळ गेली नाहीये".....

बाबांन च बोलणं ऐकून अरुल जरा स्वस्त झाला.... आणि बाबा सहित आई ला पण मितीत्त घेतलं... आणि हसत बोलला... "साखर पुड्यात अपूण पण जायचं ना.... काय आई तुझ्या सुने चा साखर पूडा आहे जावा लागणार ना"....

हे ऐकून सरु चे आई बाबा... जोर जोरात हसू लागले... व अरुल ला बोलले... "काय नाय बाळा चल सग ठीक होऊन जाईल"....

अरुल सकाळी पहाटेच उठला... व आईला कामला जातोय सांगून निघून गेलं... खरं तर आज अरुलचं मन नव्हतं अरुल कोणाला... न सांगता एकटा मैदानात येऊन बसला... विचार करू लागला... सुरू बद्दल, व सरु ला आठवत डोळे बंद करून बसला.... खूप वेळ असाच निघून गेला... व काही क्षण नंतर अरुल ने परत डोळे बंद केले... व अरुल ला एक ड्रीश्या दिसला... ज्यात भरपूर लोक जमले होते.... सरु चे आई बाबा, व अरुल ने आपल्या आई बाबा ला हि बघितलं सगे जण खूप खुश होते... आई बाबा पण खुशीने हसत होते आणि stage वर त्या मुलाने सरु ला अंगठी घातली... व सरु ने हि अंगठी त्या मुलाच्या हातात घातली... अरुल ने एकदमच डोळे उघडले... व समोर बगतो तर काहीच नाहीये... ना तो मुलगा ना सरु... ना आई बाबा... संगी कडे खूप शांतता होती... अगदी असा वाटत होतं अरुल ला कि जगात मात्र तो एकटाच आहे... आपल्याच शांतता सोबत भांडत अरुल ने होत उघडले... व शब्द काय अशे फुटले....

"रंग तो तुझा प्रेमाचा अजून ओटावर आहे...

साज तो तुझा अजूनही मनात आहे....

जगे पर्यंत हा स्वाश तुझाच रहाणार....

तू आज भले जीवनात नाही...

पण मी नेहमी तुझाच रहाणार".... अस म्हणत जेव्हा अरुल ने समोर पाहिलं तर बगून एकदम दचकून उठला... समोर सरु थांबली होती... चांगलीच नथुन थटून.. अगदी कुठल्यातरी महाराणी सारखी दिसत होती... पण इथं अरुल च्या मनात वेगच काय तरी चालू होतं अरुल ने घाबरतच विचारलं....

"सरु तू इथं, इथं कशी काय तुझं तर साखरपूडा आहे ना आज... तू इथं कशी आलीस".... अरुल ने थोडं रागवून विचारलं... "सरु तू परत पळून अली आहेस, चल तू घरी चल आधी"... असं म्हणत अरुल ने सरु चा हाथ पकडला... तिला घेऊन जात होता तेव्हाच सरु ने हाथ झटकला... आणि बोलली.....

"हो पळून आली आहे मी"..... सरु ओरडून बोलली... "अरुल कसा झाला आहेस तू स्वतः कडे बग जर देवदास दिसतोय"....

"सरु हि मस्करी ची वेळ नाहीये तू आधी सांग पळून आलीस तू"...

तेव्हाच पाठून अरुल ला ऐकायला आलं.... "पळून नाही आली सरु, मीच तिला पळवून टाकलं घरातून"....

अरुल ने जेव्हा वळून बघितलं तर सरु चे बाबा बोलत बोलत येत होते... व त्यांच्या पाटी सरु ची आई, आई बाबा, अश्या पूजा सगे येत होते....

सगळ्यांना असं समोर एकदम बगून अरुल ला काही कळत नव्हतं कि नेमकं काय चाललेय... अरुल काय विचारेन त्या आधी सरु चे बाबा... एकदम प्रेमाने बोलले...

"अरुल चुकी झाली माझी... मी तुला नीट ओळखलं नाही, मला वाटायचं कि प्रेम हे सग काय नसतं, आज कालच्या पोरांसाठी girlfreind , boyfreind हे सग तर खेळ झाला आहे... मला भीती होती कि माझ्या पोरी सोबत पण तसलं काय घडायला नको.. म्हणून मी तुमच्या प्रेमाच्या खिलाफ होतो... मला वाटायचं कि तू हि इतर मुलांसारखं वागशील आधी अस गोळ बोलून मग.... पण नाही काल जे काय झालं त्यांनतर मला कळलं कि तू चांगला आहेस... व्हाईट नाहीयेस तू... काल जर तुला हवं असलं असत तर तू सरु ला पळवून घेऊन जाऊ शकला असता पण तू असं नाही केलंस... सरु ला तू माझा कडे येऊन सोपलं... हे महित असताना पण कि मी तुझे आणि सरु च्या लागण्याच्या खिलाफ आहे, तेव्हाच मी विचार केला कि सरु साठी जर कोण चांगला मुलगा आहे तर तो तू आहेस... तुझा पेक्षा चांगला मुलगा माझ्या सरु ला जगात कुठे मिळणार नाही".... असं बोलत सरु च्या बाबांनी हाथ जोडले व बोलले... "एक दिवस सरु साठी तू माझ्या समोर हाथ जोडले होते आज मी हाथ जोडतो कि.".... हे बगून सरु च्या डोळ्यातून पाणी आलं...आणि अरुल ने सरूंच्या बाबांचे हाथ पकडले व बोलला....

"हाथ जोडू नका.. तुम्ही मोठे आहात, तुम्ही पण तुमच्या जागेवर बरोबर होते... तुमचं पण काही नाय चुकलं"... व हे ऐकून सरु च्या बाबांनी हासत हासत ख़ुशी कुशी ने... सरु चा हाथ अरुल च्या हातात दिला... व बोलले... "हे घे तुझी सरु कोन पण तुम्हाला वेग नाही करु शकत"....

अरुल ने स्मिथ हास्य सोबत सरु च्या बाबांना बघितलं व आई बाबांना बगून... सरु चा हाथ घट पकडला... आणि प्रेमाने सरु समोर बघू लागला.... तेव्हाच अश्या आला व अरुल च्या पाठी हाथ मारत बोलला... "बग भाई झालं ना"....

तेव्हाच सरु चे बाबा बोलले... "नाही अजून नाही झालं... मी ऐकलं आहे कि तू शायरी खूप चांगली करतो.. बग मला शायरी तर कळत नाय पण... आता सरु भेटली तुला म प्रेमाने एक उखाणा होउदे..... काय बरोबर ना".....

व सगे जण जोर आवाजात बोलले हाँ बरोबर....

अरुल सरु कडे बघत होता व सरु हि लाजत अरुल कडून नजर लपवत त्याला बगत होती आणि अरुल बोलला...

"जीवनात येतो एकदा प्रेमाचा वळू , सरु चा नाव घेतो हाथ जोडून"....

व उखाणा ऐकून सगे जोर जोरात हसू लागले... व सरु ने अरुल चा हाथ पकडलं आणि प्रेमाने बोलली... "Love U So Much अरुल"... आणि अगदी प्रेमाने अरुल ने उत्तर दिलं "Love U To सरु".......

And The Happy Ending ......

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED