Jatra - Ek bhaykatha - 8 books and stories free download online pdf in Marathi

जत्रा - एक भयकथा - भाग - ८

    पुन्हा एकदा काळोखात गलका झाला आता पुढची शिकार होणार होती गण्याची किंवा मन्याची ....
पुढे चालु...

       मन्या अजून पुतळ्यासारखा स्थिरच होता . गण्या त्याला ओरडत होता पण काही उपयोग नव्हता .  पण तरीही गण्याने त्याचा हात सोडला नाही घट्ट दाबुन धरला . पण यावेळी गण्या काळोखाकडे खेचला जाऊ लागला .

     आणि अचानक सर्वत्र प्रकाश चमकू लागला .नष्ट झाला काळोख  आणि सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य पसरले . सामान्य माणसाला एवढचं दिसत होतं की जी काही दुष्ट शक्ती होती,  ती नष्ट झाली होती . तिला नष्ट केलं होतं कुणी तरी चांगल्या शक्तीने . पण एका घटनेमागे हजारो वर्षापासून चालत आलेला चांगल्या-वाईटाचा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला होता . त्या संघर्षात समावेश होता मानवाला न समजणाऱ्या गोष्टीचा . फक्त त्याला दिसत होता जय आणि विजय . पडद्यामागच्या घडामोडी त्याला न कळणाऱ्या होत्या .

        आणि हवेत उडालेला गण्या धपकन खाली आपटला तो काळोख गेला होता . ते भुताटकी गाव गेलं होतं . ते पुन्हा जंगलात आले होते . मन्याही हालचाल करू लागला . पण हे सारं झालं कसं  ? कुणी केलं ?

                तेव्हाच त्यांच्या समोर राम्या उभा राहिला . त्याच्या सर्वांगाभोवती पांढर्‍या प्रकाशाचं वलय होतं . चेहऱ्यावरती समाधान होतं .  तो राम्याचा आत्मा होता . राम्याचा मृत्यू झाला . पण त्याने दोघांचाही जीव वाचवला . दोघालाही अश्रू अनावर झाले . दोघेही मिठी मारायला पुढे सरले .  पण शेवटी तो आत्मा होता  .

         "  व्हायचं ते होऊन गेलं आता रडू नका " राम्या म्हणाला

" राम्या लगा माझ्यामुळे तू मेला , खरं म्हणजे मीच मरायला पाहिजे होतं " गण्या

" अरे गण्या घडायच्या असतात त्या गोष्टी घडून जातात स्वतःला दोष देऊ नको " राम्या

" लगा मला तर काहीच आठवत नाही "
मान्या रडत बोलला " गण्याने तुला वाचवायचा तरी प्रयत्न केला पण मी काहीच केलं नाही "

"  असुदे हेच होतं माझ्या नशिबात तुम्ही स्वतःला दोष देऊ नका " राम्या

" अरे पण आपण जिवंतपणी त्याच्याशी सामना करू शकलो नाही , मृत्यूनंतर अशी कोणती गोष्ट घडली की ज्यामुळे त्यांना हरवलं . " गण्या

" अरे मी काहीच केलं नाही ही सगळी शेवंता ची जादू आहे "
राम्या

" काय "   दोघेही एकदम ओरडले " म्हणजेच शेवताचं भूत आहे "

" अरे तुझ्या स्वप्नात आलेली दुसरी तिसरी कोणी नव्हती ती शेवंताच होती " राम्या

"  होय गणेश मीच होते शेवंता "
   गण्याने आवाजाच्या दिशेने पाहिले आणि पाहतच राहिला

" मला काहीच शक्य नव्हतं अरे शेवंता होती म्हणून हे शक्य झालं " राम्या

" मी फक्त तुला मदत केली तीही अगदी थोडीशी .तुझ्या मनात इच्छा होती तुझ्या मित्रांना वाचवायचे . म्हणूनच मी छोटीशी मदत करू शकले .आणखी एक गोष्ट आपण त्यांना नष्ट केलेलं नाही " शेवंता

" म्हणजे पद्रीचं भूत अजुनही आहे " तीघेही एकदमच म्हणाले

" हो अजून सारं काही जिथल्या तिथे आहे . तुम्हाला फक्त काही वेळ मिळालाय येथून जाण्यासाठी . आणि हे सारं काम जॉनचं नाही . " शेवंता

"जॉन म्हणजे ? "

" पाद्री तुमचा . त्याचं नाव जॉन . तो फक्त बाहुल आहे त्या विशाल शक्ती च्या हातातलं . जिचा काहीतरी उद्देश आहे . ज्या उद्देशासाठी मागच्या दीडशे वर्षांपासून मी या जंगलात भूत बनून फिरत आहे . माझी मुक्ती झाली नाही " शेवंता

" पण पादरी तर म्हणत होता की तुमच्या वडिलांनी डांबून ठेवलं होतं तुम्हाला . तुम्ही नंतर अन्नत्याग केला . त्यामुळे तुमचा मृत्यू झाला व तुम्ही मुक्त झाला . त्यानंतर पाद्रीच्या भुताने  तुमच्या वडिलांना मारले . " गण्या

" बरोबर आहे तुमच्या वडिलांनी पाद्रीला मारलं नसतं तर हे सगळं झालं नसतं " मन्या

" कोण म्हणालं तुम्हाला बाबांनी जॉनला मारलं आणि मी आत्महत्या केली . हे सारं खोटं आहे "  शेवंता

" पण मग झालं तरी काय होतं ? कोणी मारलं तुम्हाला नि तुमच्या बाबांना आणि पाद्रीलाही "  गण्या

" मला एवढंच माहिती आहे की मला जॉनने मारलं . पण बाबांना व जॉनला कोणी मारलं हे माहीत नाही " शेवंता

" काय पाद्रीने मारलं तुम्हाला " मन्या

"  हो "

" पण तुमचं प्रेम होतं ना त्याने तुम्हाला का मारलं ? " गण्या
.
.
क्रमशः
तुम्हाला काय वाटतं पाद्रीने शेवंताला का मारलं असेल ?

         

         


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED