जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 3 vaishali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 3

आपल्या ही आयुष्यात अशी मैत्रीअसा वी असे प्रत्येकाला वाटते. पण मैत्री करणे सोपे आहे पण ठिकवने खुप अवघड असते.. आणि अशी काही मैत्री सुद्दा पहिली आहे ही ती अयुषभर निभावतात. खरंच मला आत्ता आठवल आमच्या गावात दोन मुलींची खुप छान मैत्री होती. जवळ जवळ आम्ही एकाच वयाच्या होतो. पहिली ते सातवी आम्ही एकत्र होतो. एक आमच्या गावची आणि दुसरी रंजना ही आमच्या गावी मामा कडे शिक्षणासाठी होती. दोघींची खुप मैत्री होती. अगदी पहिली पासून ती आमच्या गावी होती. मामी च्या हाताखाली दिवस काढणे तेवढे सोपे नव्हते. तत्यामुळे ती जास्त मैत्रिणी सोबत असे. एकत्र अभ्यास करायच्या. जिकडे जाईल तिकडे दोघी असायच्या.. त्या नंतर रंजना पुण्याच्या मामाकडे गेली. त्या नेहमी एकमेकींना पत्र पाढवयच्या. मी शिक्षणा साठी बाहेर गावी गेली. नंतर खुप वर्षा नी समजले. कि रंजना चे लग्न झाले. तीला एक छोटा मुलगा झाला. एका आजारामुळे तिचे निधन झाले. पण तिने आपल्या मैत्रिणीला सगळे संगितले होते. तीला मरताना कुठला त्रास होऊ नाहे म्हणुन तिच्या संसाराला व मुलाला सांभाळायची जबाबदारी तिने घेतली. मैत्रीच्या साठ विरोध असून ही तिने रंजना च्या पति शी लग्न केले...... खरं तर हे मैत्रीच जिवंत उदारण माझ्या समोर होते. हे सगळे आठवून माझ्या डोळ्यातून अश्रू आले. अशा या दोस्ती ला नकीच सलाम करावासा वाटतो. या कहाणी मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या......... ......... ... ... सई आणि साहिल ची असच काही होत. सई नेहमीच हट करायची .एकदा शेतात खेळता खेळता ती पलीकडे असलेल्या शेतात तीला कैऱ्या दिसल्या .सई..!!!!! मला कैरी. हवी असा हट्ट केला. साहिल ने कशी तरी कैरी काढली. तेव्हा कुठे सई शांत झाली. सई आणि साहिल दुसऱ्या म्हणजे, शेजारच्या गावात शाळेत जाऊ लागले. आता ती आठवीत गेली होती. तिथे ही त्याची मैत्री टिकून होती. सायकल वर दोघे जात होते. सईच्या प्रतेक वाढदिवसाला साहिल कहितरि भेट देत असे. ती वस्तु ती जीवापाड जपून ठेवत असे. साहिल ही तसेच करत असे.आत्ता खेळणे थोडे कमी झाले. सई आई ला तर साहिल वडिलांना शेतात मदत करत असे. अभ्यासात ही दोघे हुशार होते. त्यामुळे शिक्षक ही चांगली मुले म्हणत असे. शाळेत ही सगळ्यांना त्याची मैत्रीण माहीत होती. . .. . ..... .सई म्हणते....''चला ग मधली सुट्टी आपण जेवण करू मला खुप भूक लागली.'' तीला खरच खुप भूक लागली. अगदी भुकेने व्याकुळ झाली होती. जाता जाता तिने साहिल आवज दिला. साहिल ना नू करु लागला. खरं तर त्याला पण भूक लागली. पण तो डबा विसरला. हे जेव्हा तीला कळले तेव्हा तिने सगळा डबा सहीला दिला. '' तु ही घेणा सई साहिल म्हणला.तिने आग्रह खातिर दोन घास खाले .त्याला खाताना पाहुन तिची भूक पळून गेली. ते सगळ तिच्या बरोबर असणारी मुलगी पाहत होती. ''सई खरंच तु ग्रेट आहे. तु तुझी भूक बाजूला ठेऊन त्याची भूक भागवली. ''आणि हे त्याला कळू दिलें नाही. तूझ्या मैत्रीला सलाम!!!!!!??सई घरी अभ्यास करत होता. मधुकर ऑपीस वरून येतो. का सई ,काय चलाय?-काही नाही हो बाबा,, आत्ता आमची फायनल परीक्षा आली आहे. त्याची तयारी बस!!! बाकी काही नाही... मधुकर...... अग सई,साहिल!!!???? ...सई.....हो बाबा तो ही खुप अभ्यास करतो... बाबा... बाबा.. आम्ही चांगले मार्कस पाडले,तर आम्हाला फिरायला नेहनार का?? हो नकीच. मधुकर सईला म्हणतो. सुमन हातात चहा व पाणी घेऊन येते. अरे, कोण कुठे चाललय,सई...... ''बाबा फिरायला नेहनर'' सुमन..... सई आता तु मोठी झाली असा हट्ट बरा न्हवे!!!?? मधुकर.......'' असू दे ग, मुलीची जात, परक्या घरी जाणार.त्याचे डोळे भरुन येतात. सई, नाही हा बाबा मी तुम्हा ला सोडून कुठे नाही जाणार. मधुकर--;'' बरं अग वेडा बाई आताच थोड जायच, खुप खुप शिकायचे मोठ व्हायच.'' सुमन-- ''खुप ह लेकीचं कैतुक चला जेवायला.'' ......................एक दिवस रात्री नऊ च्या सुमारास मधुकर च्या फोनची रिंग वाजली, मधुकर ने फोन उचला तिकडून आवाज आला. ''अरे मधु साहिल खुप आजारी आहे.हा आवाज सुदामा चा होता. मधुकर--सई,, ये सई!! सुमन!!???? दोघी बाहेर आल्या .चला, आपल्याला सुदामा कडे जायचे आहे. तसच काही तरी कारण असेल. म्हणुन त्या त्याच्या बरोबर गेल्या. मधुकरला पाहतच सुदामा ला धीर आला. रमा च्या डोळ्यातून पाणी आल .काय झाल?? मधुकर म्हणला सुदामा-- ''अरे,मधु दोन दिवस झाले,साहिला बरे वाटत नाही. डॉक्टर कडे गेली होतो थोडा फरक ही पडला .पण आता खुप ताप आला काय कराव कळत नाही.'' मधुकर--काळजी करू नको मी आहे ना!!!! मधुकर ने लगेच डॉक्टर ला फोन लावला. ते म्हणाले, जे औषध दिले आहे. ते चार -चार तासांनी दया उदया सकाळी मी चेक्प साठी येतो. फरक पडेल. आपण त्याला बरोबर वेळेवर औषध देऊ. सई खुप नाराज होती.
ती म्हणली., ,''बाबा मी थांबू साहिल जवळ '' सई म्हणली. सगळे हो म्हणाले. सई व रमा रात्र भर साहिल जवळ थांबल्या साईने आगदी वेळेवर साहिल ला औषध दिले. आणि सकाळीउठून देवा जवळ पार्थना केली.सळ्याना तिचा खुप अभिमान वाटला. सुदामा म्हणला.-- ''काय रे मधु??? आपली येवढी शी चिमुकली मोठी झाली. बघ कशी काळजी घेतली.'''' नको, ह बाळा काळजी करू होईल बरा ''रमा ने तीला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणली. थोडावेळ असाच गेला. साहिल झोपला होता. थोड्याच वेळात डॉक्टर आले. सहिला चेक केले. व म्हणाले, खूपच छान चांगला रिजल्ट आहे. त्याला आता बरे वाटते. पण हे औषधांच काम कोणी केल. त्या मुळ त्याला बरे वाटते. रमा--ही सगळी हिची कमाल. डॉक्टर सईला जवळ घेतात. आणि बाळा कोण आहे हा.????तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. सुदामा पुढे होऊन म्हणतो. ते मित्र आहेत. डॉक्टर तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि काही औषध नको. मैत्री हेच औषध आहे त्याच्या साठी. ... आठ वाजले असावे साहिल ला जाग आली. तो बरीक आवाजात बोलत होता. साईने आवाज घेतला. आणि तिने रमा ला संगितले. रमा, सुमन लगेच गेल्या.रमा--कस वाटतय. सुमन ही तेच विचारती .साहिल नुसत डोळ्यानी खुणावतो .त्याचे डोळे सई ला शोधतात. तेवढया त सई येती. तिच्या हातात एक सुंदर भेट कार्ड असते. ती सहिला ते देते. त्याच्या चेहऱ्यावर हसू येते. सई....- ''-अरे लवकर बरा हो, फायनल परीक्षा आली. आपल्याला चांगले marks पडायचे आहेत. बाबा फिरायला नेहनार, होय कि नाही बाबा'' अग वेडा बाई marks तर पाड. सगळे हसतात. सई मात्र चिडते.. .. त्या दिवशी सई ना ही तर त्याची सगळी टीम शाळेला सुट्टी घेतात सगळे दिवस भर साहिल जवळ असतात गप्पा गोष्टी करतात, कॉरम खेळतात. रमा पण मुलाच्या आवडीचा खाऊ करते. सगळे खुश होतात. साहिल आत्ता पूर्ण बरा झाला शाळेत जाऊ लागला. सगळी टीम जोरात अभ्यासाला लागली. खेळणे बंद. अखेर परीक्षा दिवस येतो. सई साहिल आई वडिलांचे आशिर्वाद घेतात. सई साहिल नेहमी प्रमाणे शाळेत पोचतात. मैदानावर सगळी टीम हजर असते. एकमेकांना ol the best करतात. व आपापल्या वर्गात जातात. सई साहिल एकाच वर्गात असतात .टीचर येतात. कसे आहात, मुलांनो. ''मुले ko टीचर''