TRIP TO FOREST book and story is written by Dilip Bhide in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. TRIP TO FOREST is also popular in थरारक in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अभयारण्याची सहल - कादंबरी
Dilip Bhide
द्वारा
मराठी थरारक
रविवार ची सकाळ होती, सगळं कसं आरामात चाललेलं होतं. सचिन आणि रामभाऊ म्हणजे सचिन चे बाबा, पेपर वाचत होते. दोन्ही मुलं सायली वय वर्षे १० आणि शेखर वय वर्षे ६ आणि साधना बाई म्हणजे सचिन ची आई, ही मंडळी कार्टून नेटवर्क बघत होती. सचिन ची बायको, वर्षा स्वयंपाकघरात रविवारचा नाश्ता बनवत होती. बाहेर सोसायटी च्या छोट्या मैदानात पोरं क्रिकेट खेळत होती.
अशातच एक काही तरी जड वस्तु पडल्याचा धडाम असा आवाज आला. सचिन ने मान वर करून इकडे तिकडे पाहिलं. रामभाऊ नव्हते पण त्यात काही विशेष नाही असं समजून त्याने पुन्हा पेपर मध्ये डोक घातलं. आणि शेजारच्या सुतारकाकांची हाक आली.
“सचिन खाली ये रामभाऊ गच्चीतून पडले. धाव रे”
सचिनला क्षणभर काहीच कळेना पण तो लागलीच खाली धावला. चार चार पायऱ्या उतरून खाली पोचला. रामभाऊ खाली पडले होते आणि भोवती मुलांचा घोळका जमला होता. कोणीतरी त्यांना पाठीवर झोपवून पाणी मारत होतं. रामभाऊ बेशुद्ध होते आणि पाणी मारण्याचा काही उपयोग होत नव्हता. अरे अॅम्ब्युलेन्स बोलवा, कोणीतरी ओरडलं. सचिन जवळ मोबाइल नव्हता, त्यानी सभोवार नजर फिरवली, दीक्षितांच्याकडे मोबाइल होता. त्यांच्या पण लक्षात आलं त्यांनी झटकन फोन लावला. “दहा मिनिटांत येतेय” ते बोलले.
रात्रीचे किती वाजले हे कळत नव्हतं. हाताला घडयाळ असूनही इतका गडद अंधार होता की काटे दिसणं तर दूर, घडयाळ पण दिसत नव्हतं. आपल्याला पंचांग कळत नसल्या मुळे अमावस्या आहे का, हे समजत नव्हतं. अर्थात आता ते समजूनही काही उपयोग ...अजून वाचानसता. संदीप नुसता वैतागलाच नव्हता तर सॉलिड घाबरला पण होता. कारण प्रसंगच तसा होता.
संदीप च्या मित्राचा वाढदिवस होता. त्याच्या ऑफिस मधले काही मित्र मिळून त्याचा बर्थ डे साजरा करण्यासाठी ताडोबा च्या सफरीवर आले होते. तलावाकाठी असलेल्या गेस्ट हाऊस मधे थांबले होते. वाढ दिवस आणि जेवण खाण झाल्यावर, सर्व जणं थोडं जंगल फिरू म्हणत फेर फटका मारण्यासाठी निघाले. गेस्ट हाऊस च्या वाचमनने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण सर्व तरुण, आणि त्यात दोन तीन पेग पोटात गेलेले, सगळेच एकदम शूर वीर झाले होते. मग काय कोणीच ऐकलं नाही. आणि सर्व सात जणं जंगलात शिरले.
भाग १ वरुन पुढे वाचा....
“अनोळखी माणसाला कार मध्ये घ्यायचं?” – नलिनी
“हे बघ इतर वेळी मी थांबलो पण नसतो, पण रात्रीची वेळ आहे, घनदाट जंगला मधे हा माणूस रस्ता शोधत एकटा पायी फिरतो आहे, तू ऐकलसच की याला पण गेस्ट ...अजून वाचाजायचं आहे. जंगलात प्राण्यांचा धोका संभवतो , काही वेडं वाकडं झालं तर आपण स्वत:लाच माफ नाही करू शकणार, बरं चांगला सभ्य दिसतो आहे. काय म्हणतेस?” शशांक म्हणाला.
“तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पटतेय मला. आणि मग मागच्या सीट वर बसलेल्या आपल्या नणदे वळून म्हणाली, शलाका, तुझं काय मत आहे?” – नलिनी.
“घे दादा त्यांना. आपल्याला पण सोबत होईल. वहिनी तू ये मागच्या सीट वर.” – शलाका म्हणाली.
अभयारण्याची सहल भाग ३ भाग २ वरुन पुढे वाचा.... संदीप ज्या झुडपात पडला होता ते निवडुंगाचं बेट होतं आणि त्याच्या शरीरात काटे घुसले होते. चेहऱ्यावर सुद्धा काटे रूतले होते. पंज्याच्या फटकार्याने संदीपचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता, पण संदीपला त्या ...अजून वाचाकाहीच जाणवलं नाही आणि ती वेळ काट्यांची पर्वा करत बसण्याची नव्हती. त्यानी आता खाली पडलेली काठी उचलली आणि पुन्हा एक उरल्या सुरल्या शक्तिनिशी जबरदस्त प्रहार वाघाच्या जबड्या वर केला. वाघ मागे सरकला पण जाता जाता त्याने पंजा मारलाच. संदीप च्या चेहऱ्या वरून आता रक्ताच्या धारा वाहत होत्या. डोळ्यात, नाकात रक्त गेलं होतं त्यामुळे त्याला काही दिसेना. हातानेच त्याने चेहऱ्यावरचे रक्त
अभयारण्याची सहल भाग ४ भाग ३ वरुन पुढे वाचा.... BP, पल्स, मोजून झाल्यावर मेट्रन, आराम करो असं सांगून चालली गेली. आता खोलीत फक्त संदीप आणि शलाका. “खूप कोरड पडली आहे जरा पाणी देता का?” – संदीप “हो देते ...अजून वाचाअरे बापरे थांबा, विचारून येते.” – शलाका “कोणाला?” – संदीप “मेट्रन ला.” आणि असं म्हणून ती पळाली. पांच मिनिटांनी वापस आली. म्हणाली, “चालेल म्हणताहेत. चहा, दूध सुद्धा द्यायला हरकत नाही असं मेट्रन म्हणाली.” मग शलाका ने त्याला चमच्याने थोडं पाणी पाजलं. “अहो असं चमच्याने का देता आहात ? भांडं द्या नं.” संदीप कुरकुरला. “अहो तुम्हाला उठता येणार नाही.
अभयारण्याची सहल भाग ५ भाग ४ वरुन पुढे वाचा.... संदीप ला शुद्ध आलेली बघून त्यांना आनंद झाला. त्याच्याशी किती बोलू आणि किती नाही असं आईला झालं, पण बाबांनी समजावलं. गेले पांच दिवस सगळेच टेंशन मध्ये होते. पण आता ...अजून वाचादूर झालं होतं. “काय ग आई, ही मुलगी इथे का थांबतेय?” – संदीप. “अरे तू जिवाची पर्वा न करता तिला वाचवलं ना म्हणून येतेय तुझी काळजी घ्यायला.” – संदीपची आई. “अग पण आपली ओळख नाही, पाळख नाही, अशी कशी येतेय? तिच्या घरचे सुद्धा काही म्हणत नाहीत? अग ती काल रात्री पण इथेच होती.” – संदीप. “चांगली आहे मुलगी.” आई संदीपला