कालासगिरीची रहस्यकथा

(23)
  • 28k
  • 4
  • 16.5k

मीरा, बारावीची विद्यार्थिनी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहत होती. तिचे वडील, डॉ. संकते, पुण्यातील एका शासकीय रुग्णालयात प्रख्यात डॉक्टर होते. मीरा लहानपणापासूनच बुद्धिमान, आत्मविश्वासी आणि ताकदवान मुलगी होती. तिला गूढ समस्या सोडवण्याची, प्राचीन ठिकाणांना भेट देण्याची आणि जिज्ञासू बाजूंची माहिती मिळवण्याची आवड होती. ती विशेषतः भयकथा, पौराणिक कथा, रहस्य आणि गूढ गोष्टी वाचण्याची आवड होती. ज्ञानाची तीव्र तहान तिला सभोवतालच्या जगाचा शोध घेण्यास प्रवृत्त करायची. मीराला भुतांच्या गोष्टी, गूढ कथा आणि देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या गोष्टी तिच्या आजीमुळे आवडत होत्या. तिची आजी लहानपणापासून तिला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगायची ज्यामुळे मीराची जिज्ञासा वाढत गेली. तिची आजी नेहमी सांगायची की लहानपणी ती गावात राहत असताना तिला भयावह अनुभव आले होते आणि तिच्या मामाने तिला त्या अनुभवातून बाहेर काढले होते. मीराला या गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. तिची आजी नेहमी सांगायची की देवाची शक्ती या जगात सर्वात मोठी आहे जी तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करण्यास सक्षम बनवते.

1

कालासगिरीची रहस्यकथा - 1

मीरा, बारावीची विद्यार्थिनी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहत होती. तिचे वडील, डॉ. संकते, पुण्यातील एका शासकीय रुग्णालयात प्रख्यात डॉक्टर मीरा लहानपणापासूनच बुद्धिमान, आत्मविश्वासी आणि ताकदवान मुलगी होती. तिला गूढ समस्या सोडवण्याची, प्राचीन ठिकाणांना भेट देण्याची आणि जिज्ञासू बाजूंची माहिती मिळवण्याची आवड होती. ती विशेषतः भयकथा, पौराणिक कथा, रहस्य आणि गूढ गोष्टी वाचण्याची आवड होती. ज्ञानाची तीव्र तहान तिला सभोवतालच्या जगाचा शोध घेण्यास प्रवृत्त करायची. मीराल ...अजून वाचा

2

कालासगिरीची रहस्यकथा - 2

अध्याय ९: भयावह सत्य सकाळ झाली आणि कालासगिरी गावात चैतन्य होतं. सरपंच महेश, श्याम, आणि डॉक्टरांची टीम गावात उभारण्यासाठी व्यस्त होती. गावकरी शाळेत शिबिर उभारण्याच्या तयारीत होते, जे सरपंचांच्या वाड्याच्या समोर होतं. सरपंचांचा वाडा गावाच्या प्रवेशद्वाराजवळचा पहिला वाडा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लहानशा शेतं होती, ज्यामुळे गावाचं दृश्य सुंदर आणि शांत होतं. गावकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण केल्यावर चहा आणि नाश्ता झाला. मीरा, सुप्रिया, अपूर्वा, आणि अन्वी सरपंचाच्या पत्नी नीलिमा आणि त्यांची दहावीत शिकणारी मुलगी सायलीसोबत स्वयंपाकात मदत करत होत्या. स्वयंपाकघरात गजबजाट होता, पण मीराच्या मनात सतत त्या जुन्या, भयावह घराचे विचार होते. तिला सरपंच महेश काकांकडे जाऊन ...अजून वाचा

3

कालासगिरीची रहस्यकथा - 3

अध्याय 12 सायलीच्या खोलीत तणाव जाणवत होता. प्रत्येक मुलगा-मुलगी आपल्या विचारांमध्ये हरवले होते, त्या जुन्या घरात काय घडले ते पचवण्याचा प्रयत्न करत होते. मीराला असं वाटत होतं की तीते त्यानी जे काही बगीतल त्याहूंनि काही दूसर काहीतरी जास्त आहे. "सायली," मीरा शांतता मोडत म्हणाली, "त्या घराबद्दल तुला आणखी काही माहिती आहे का? काहीही?" सायली हळूच डोकं हलवली. "खरं सांगायचं तर नाही. मी फक्त इतर लोकांसारख्या गोष्टी ऐकल्या आहेत. पण माझ्या आजीने त्या घरात राहणाऱ्या कुटुंबाबद्दल काहीतरी सांगितलं होतं. ती गोष्ट पूर्ण करण्याआधीच ती थांबायची तीनी कदिच पूर्ण काही सागीतल नाही." हे ऐकून मीराची कुतूहल अधिकच ...अजून वाचा

4

कालासगिरीची रहस्यकथा - 4

अध्याय 13 दुसऱ्या दिवशी, गावात वैद्यकीय शिबिराच्या गडबडीत गाव गजबजले होते. डॉक्टर आणि परिचारिका स्टेशन्स तयार करत होते, काळजी घेण्यासाठी, तर सरपंच महेश संपूर्ण कारभार पाहत होते. मीरा आणि जयेश यांनी नीलूच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला, अधिक माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने. त्यांना नीलू आणि निलेश यांना सोबत आणायचं होतं, कारण त्यांना जितकी मदत मिळेल तितकी आवश्यक होती. नीलू, मागच्या दिवसाच्या घटनांनी अजूनही हादरलेली होती, सुरुवातीला नाखूश होती पण मीराच्या आग्रहामुळे ती सामील झाली. निलेश, जो कोणालाही धोक्यात घालण्यास विरोध करत होता, शेवटी तयार झाला आणि मागील घटनेबद्दलचा राग बाजूला ठेवून सामील झाला. सरपंचांच्या वाड्यात परत आल्यावर, ...अजून वाचा

5

कालासगिरीची रहस्यकथा - 5

अध्याय 14 दुपारी, सगळ्यांनी जेवण करून आपली कामं पूर्ण केली होती, तेव्हा मुलांना थोडा मोकळा वेळ मिळाला. त्यांनी आईकडून डोंगरावरील मंदिरात जाण्यासाठी परवानगी घेतली. अन्वीने संध्याकाळपर्यंत थांबण्याचा सुचवले, पण मीराने त्यांना लगेचच जाण्याचा आग्रह धरला. सायलीने सांगितले की प्रवासाला सुमारे एक तास लागेल, त्यामुळे ते सूर्यास्तापूर्वी परत येन नाही जमेल . निलीमाने त्यांना त्यांच्या वडिलांना सांगायला सांगितले आणि सायलीने मान डोलावली. सगड़े शाळेकडे गेले, सरपंच आणि त्यांच्या वडिलांकडून परवानगी मिळवण्यासाठी. डॉ. संकेत रुग्ण तपासण्यात व्यस्त होते, डॉ. यश यांच्या सोबत होते . सरपंच काही गावकऱ्यांसोबत आणि श्यामसोबत बसलेले होते. सायलीने सरपंचांना परवानगी मागितली. "खूप उन्ह आहे. तुम्ही ...अजून वाचा

6

कालासगिरीची रहस्यकथा - 6

अध्याय 15 घर, औषधी वनस्पती आणि फुलांनी वेढलेलं, गाव आणि त्याच्या शेतांचं विहंगम दृश्य देत होतं. बाकी मुलं शेळ्या सोबत खेळत होती, तर पंडितजी आणि मीरा त्यांना बघत होते. पंडितजीने स्वत:चं परिचय दिलं, "माझं नाव वासुदेव आहे. तुझ नाव काय आहे?" "मीरा," ती उत्तरली. "मी पुण्याहून आले आहे, माझ्या कुटुंब आणि मित्रांसोबत." पंडितजीने मान डोलावली. "म्हणजे तुम्ही डॉ. संकेत यांची मुलगी आहात. आणि हे डॉ. यश यांची मुलं?" मीराने पुष्टी दिली, "होय, ही सुप्रिया आणि तो जयेश आहे." पंडितजी म्हणाले, "तुमच्या सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे." त्यांनी मग मीराकडे वळून म्हटलं, "मला माहीत आहे ...अजून वाचा

7

कालासगिरीची रहस्यकथा - 7

अध्याय 16 सात वाजता ते सगडे गावात पोहोचलेत. संपूर्ण रस्त्यात मुल सगडे तोच विचार करत होती , मीरा होती कि पंडितजी नि तिला आणि तिचा बाबांना ओडकत होते का ? ते विचार करतच वाड्याचा दरवाजा मध्ये प्रवेश केला. सगडेझन आदीच ओसरीवर बसले होते.सगडे मुले तिते त्यांचा जवड गेली . सरपंच म्हणाले या मुलानो प्रवास कसा झाला, दर्शन झालेत का ? मीरा म्हणाली आम्ही दर्शन घेतलं काका, सूर्यास्त सुद्धा बगीतला आणि तिते आम्हाला पंडितजी सुद्धा भेटलेत, त्यांचाशी बोलन सुद्धा झाला. सुप्रिया म्हणाली मंदिर आणि तो परीसर फार सुंदर आहे बाबा तीतून गाव तर अजूनच सुंदर दिसतोय ...अजून वाचा

8

कालासगिरीची रहस्यकथा - 8

अध्याय 17 यश आणि संकेत ला त्यांचा लहान पणीचा मित्र गोपाल आठवला जो त्यांच्या गावात त्यांच्या राहत होता. तो एक अनाथ मुलगा होता जो कुठूनतरी बाहेरून आला होता. तो मंदिरात पंडितजींसोबत राहत होता आणि तेथे काम करत होता. तो आध्यात्मिक गोष्टी शिकत होता. संकेत, यश आणि गोपाल हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. एकदा ते यशच्या मामाच्या गावाला काही दिवसांसाठी गेले होते. त्यांना माहिती पडल की तेथे तलावाजवळ काही लोक कॅम्पिंग करत आहेत. त्यांनीही कॅम्पिंगला जायचं ठरवलं. संकेत, यश, गोपाल आणि यशचा चुलत भाऊ असे सर्वजण तिथे गेले. सर्वांनी कॅम्पिंगसाठी सर्व तयारी केली. रात्री ...अजून वाचा

9

कालासगिरीची रहस्यकथा - 9

अध्याय १८ डॉ. संकेत म्हणालेत, "सरपंचजी, हे पंडितजी कोण आहेत?" सरपंच म्हणाले, " ते एक महान व्यक्तीमत्व ते आता आपल्या टेकडीवरील मंदिरात पंडित आणि वैद्य आहेत. ५ वर्षांपूर्वी आपले जुने पंडितजी जेव्हा वारलेतना, तेव्हा हे कुठून तरी दुसऱ्या ठिकाणावरून इथे आलेत आणि म्हणाले की ते पंडित आणि वैद्य आहेत आणि त्याचं नाव वासुदेव आहे. त्यांना नरसिंहस्वामीचा मंदिरात पंडित म्हणून सेवा करायची आहे या आदी ते येथील पंडितजींना भेटले होते मन्हालेत तर त्यांनीच त्यांना इथे येण्यास सांगितल होत. त्यांचा चेहऱ्यावरील तेज बघून गावातील सगळ्यांनी ते मान्य केल, ते ५ वर्षांपूर्वी डोंगरावरील मंदिरात गेलेत आणि त्या नंतर खाली ...अजून वाचा

10

कालासगिरीची रहस्यकथा - 10

आध्याय 19 दुसरीकडे संकेत आणि यश यांनी लगेच मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सरपंच महेश आणि श्याम सोबत येण्याचं विचारलं. त्यांनी सुद्धा होकार दिला. मीरा तिचा बाबांना म्हणाली, "बाबा, आम्हीही तुमच्यासोबत येणार." तिच्या वडिलांनी सांगितलं “ नाही मीरा.” तुम्ही आधीच तिथून आलात ना?. पण मीरा म्हणाली, "बाबा, आम्हाला यायचा आहेन. डॉ. संकेत मन्हालेत "ठीक आहे, चला तुम्हीपण." तितक्यात अन्वी आणि निलिमा बाहेर आल्यात आणि सगळ्यांना जेवायला बोलावलं. सरपंच म्हणाले सगळ्यांना, “जेवल्यानंतर आपण जाऊयात का तिकडे?." यश म्हणाला, "असं करूया सरपंचजी, अन्न आपण पॅक करूयात. आपण आता त्यांच्या सोबतच जेवूयात ." ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय