Parmeshwrache Astitva - 4 books and stories free download online pdf in Marathi

परमेश्वराचे अस्तित्व - ४


"मल्लिङगमदभक्त जनादर्शन स्पर्शनचि नम
परिचर्या स्तुती:प्रव्हगुण कर्मानु किर्तनम ।।
अर्थ:- माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शन
स्पर्श,पूजा सेवा,स्तुती,वंदन इत्यादी करावे
तसेच माझे गुण आणि कर्म यांचे सतत चिंतन
कारावे.(श्रीमदभागवत) परमेश्वराची पूजा करावी,भक्ती करावी पण हे सर्व करीत असतांना अभिमान धरू नये स्वतः केलेल्या कामाचा गवगवा करू नये. संसार सागरातून पार होण्यासाठी सत्संग व भक्ती महत्वाची आहे.परमात्मा एकच आहे पण अनेक असल्या सारखे वाटते.जमिनीत बी पेरल्यानंतर जसे अनेक
रुपात विस्तार पाऊन प्रकट होते किंव्हा
कपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रोत भरलेले
आहे.
बुद्धीच्या साहयाने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्यांच्या विषया पासून परावृत्त करावे.कर्म वासनांनी चंचल झालेल्या मनाला काबूत ठेऊन ते भगवंताच्या मंगल रुपाकडे
वळवावे.मनाला पूर्ण रूपाने भावंतामध्ये
असे विलीन करावे की ते पुन्हा दुसऱ्या कोणत्याही विषयाचे चिंतन करणार नाही.
आपले ब्रह्मांडरूपी शरीर जल,अग्नी आकाश,वायू,अहंकार ,महतत्व
आणि प्रकृती या सात आवरणांनी वेढलेला
जो विराट पुरुष तोच भगवान आहे.
उपनिशिदात एक उल्लेख आहे,जो साधक आपले पार्थिव शरीर विसरून अंत:कारणाचा विकास करून मन बुद्धी
अहंकार समाप्त करतो त्यालाच परमेश्वर
प्राप्ती होते.उपनिशिदात भगवंताची साधना
आहार शुद्धी सांगितली आहे.आहार म्हणजे
नुसते अन्न नाही तर--
१) कानाचा आहार ध्वनी आहे.
२) त्वचेचा आहार स्पर्श आहे.
३) नेत्रांचा आहार दृश्य जगत आहे.
४) जिव्हेचा आहार रस आहे.
५)मानाचा आहार उत्तम विचार आणि ध्यान.
आपला आहार सात्विक असेल तर आपले विचार चांगले असतात ,आचरण
शुध्द व पवित्र असते.
गणपती अथर्वशीर्षात एक मंत्रआलेलाआहे. "ऊँ भद्रं कर्णेभि:शृणूयाम देवा:भद्रम
पश्येमाक्षभिर्यजत्रा:"
हे देवांनो,आम्ही कानांनी मंगल ऐकावे,
ईश्वरोपासना करणारे आम्ही डोळ्यांनी
मंगल कारक गोष्टी पाहाव्यात.
म्हणून भगवंत ,साधनेसाठी या पाचही
गोष्टी महत्वाच्या आहेत.यांचा सर्वांचा चांगला
उपयोग करता आला पाहिजे.
परमेश्वर सर्वांच्या हृदयात आहे.आपले
शरीर हे ईश्वरी शक्तीनेच चालते,आपला श्वास,
आपला विचार,शरीरातील रक्त प्रवाह या सर्व
क्रियांचे संचलन परमेश्वर द्वारा होत असते.
वृक्षाचे पान सुद्धा परमेश्वराच्या शक्ती शिवाय
हलू शकत नाही.पण आपल्याला हे समजत
नाही की,हा भगवंत आपल्या अंतर्यामी आहे.
भक्ती सूत्रात नारद म्हणतात,भक्तीचा
एक महान गुण असा आहे की,आपली बुद्धी
पवित्र करते, अनुचित विचाराला स्थान राहात नाही.ईश्वरीय प्रेम निर्माण होते.
जीवनातील उच्चतम लक्ष प्राप्त करण्या करता आपली पात्रता वाढविली पाहिजे.आंतरिक बदल केला पाहिजे.जो नित्य नेमाने परमेश्वराचे एकचित्त मन करून
स्मरण पूजन करतो त्याच्या कल्याणाचे उत्तरदायित्व परमेश्वर घेतो.
ज्याने मन जिंकले त्याला परमात्मा प्राप्त झालेलाच असतो.,त्याने शांती प्राप्त
केलेली असते "जितात्मान प्रशांतस्य परामात्मा समाहित:" आशा मनुष्यासाठी
सुख,दुःख,शीत,उष्ण,मान,अपमान सर्वच
सारखे भौतिक अस्तित्वाच्या द्वंद्वाचा मनुष्यावर परिणाम होत नाही.भक्ती अगर
साधना दृढ निश्चयाने केली पाहिजे.विचलित
होता कामा नये.
"उत्साहनिश्चयाद्वैर्यातत्तकर्मप्रवर्तनात ।
समत्यागात्सतोवृत्तेषडभिर्भक्ति:प्रसिध्यति।।
"अंतःकरण पूर्वकबउत्साह निश्चय आणि
धैर्याने भक्तांच्या सत्संगामध्ये विहित कार्याचे
पालन करून व पूर्णपणे सत्व गुणांनी युक्त
होऊन कार्य केल्यामुळे मनुष्य यशस्वीपणे
भक्ती योगाचे अनुसरण करू शकतो.(उपदेशामृत)
परमेश्वराचा निर्गुण विस्तार
ज्या प्रमाणे दूध जरी सहज थिजले तरी ते
दही असते.बीजाचा वृक्ष होतो,सुवर्णाचे अलंकार होतात,तसाच निर्गुणाचा विस्तार होतो.
"जे सातत्याने हरी नाम घेतात,हरी कीर्तनात रमतात,त्यांच्यात पापाचे नाव सुद्धा राहात नाही.यम म्हणजे मनो निग्रह,दम म्हणजे
इंद्रिय निग्रह,याना निकृष्ट दशा आणली,
तीर्थे आपल्या जाग्यावरून उठून लावली,यम
लोकांचे सर्व व्यापार बंद पडले,यम म्हणाला
कोणाचे नियमन करावे?दम म्हणाला जिंकावे? तीर्थे म्हणाली आम्ही कशाचे क्षालन करावे?कारण दोष औषधालाही
उरलेनाहींत" "या प्रमाणे माझ्या नाम घोषाने
जगातील सर्व प्राण्यांची दुःखें नाहीशी होतात. व सर्व जग दुमदुमून जाते.(ज्ञानेश्वरी)
एवढे परमेश्वराच्या नामात सामर्थ्य आहे.
अनन्याश्चिंतयंतो मां ये जनःपर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम ।।
(भगवदगीता)
अर्थ:-जे लोक एकनिष्ठ होऊन माझे चिंतन
करून माझी उपासना करतात,त्या सर्वदा
माझ्याशी युक्त असलेल्या निष्काम भक्तांचा
योगक्षेम मी चालवतो.ज्यांनी मनापासून
सर्व भार माजवर टाकला आहे,त्यांचे इच्छित
मीच पूर्ण करतो.











इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED