कुटूंब नियोजन काळाची गरज Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कुटूंब नियोजन काळाची गरज

कुटूंबनियोजन काळाची गरज

कुटूंब नियोजन ही भारत देशासाठी काळाची गरज आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आज भारत देशातील लोकसंख्या अफाट आहे. ती अरबच्या घरात गेली आहे. अशावेळी लोकांना खायला प्यायला मिळत नाही.
भारत देशात भुमी ही कमी आहे. तसेच ह्या देशात भुमीचं प्रमाण अजून कमी होत आहे. त्याचं कारण निर्वासीत. या देशाचा जननदर हा जास्त असून मृत्यूदर हा कमी आहे. हा मृत्यूदर कमी असल्यानं वाढणा-या लोकसंख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी कुटूंबनियोजन करणे ही काळाची गरज आहे.
ज्याप्रमाणे जननदर वाढला आहे. त्यानुसार त्या वाढणा-या जननदरानुसार वाढलेल्या लोकांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारच्या नाकीनव येत आहे. हिच लोकसंख्या, जी वाढत आहे. त्या वाढणा-या लोकसंख्येला खायला, जे अन्न लागतं. ते अन्न शेतीतून मिळते. म्हणून शेती करण्यासाठी जंगलं नष्ट केली जात आहेत. ज्यामध्ये हिंस्र प्राणी राहतात. ते प्राणी आता जंगलं नष्ट झाल्यानं वस्तीत येत आहेत. त्यातच राहायला घर पाहिजे म्हणून त्याला लागणारं लाकूडही जंगलात मिळतं. यासाठीही ते लाकूड मिळवितांना जंगलं तोडली जात आहेत. तसेच राहायला जागा पाहिजे म्हणून शेतजमीनीला ओसाड करुन तो प्रश्न मिटवला जात आहे. यामुळं हा प्रश्न सोडविण्यासाठी शेतजमीन कमी होत आहे.
या देशात कुटूंबनियोजन नसल्यानं खाणारी तोंड वाढली आहेत. तसेच त्यांचा प्रश्न सोडवित असतांना जमीन कमी होत आहे. त्यामुळं नवनवीन प्रश्न उद्भवत आहेत. यावर उपाय एकच. ते म्हणजे कुटूंबनियोजन.
कुटूंबनियोजन करणं ही काळाची गरज आहे. ती फार मोठी गरज आहे. कारण आज काही काही कुटूंब स्वतः पुढे येवून व पुढाकार घेवून कुटूंबनियोजनाची शस्रक्रिया करतात. परंतू काही काही कुटूंब अशी आहेत की जी कुटूंबनियोजन शस्रक्रिया करीत नाही. ते तर आपल्या घरी तीनच्या वर मुलं आजही जन्माला घालत असतात. मग त्यांना खायला मिळो अथवा न मिळो. आजही काही काही ठिकाणी मुलाच्या हव्यासानं मुली मुलगे होईपर्यंत जन्माला घातली जातात. मग त्या मुलींची संख्या वाढली तरी चालेल. अशानं लोकसंख्या वाढते. तसंच काही काही ठिकाणी आपल्या धर्माची वाढ झाली पाहिजे म्हणून त्या त्या धर्मात जननसंख्येला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. यावरुनही लोकसंख्या वाढत आहे.
ही जननसंख्या वाढू नये. म्हणून सरकार उघडपणे विरोध करु शकत नाही. कारण असा उघडपणे विरोध केला तर उद्या हिच मंडळी आपल्याला मतदान करणार नाही अशीही भीती सरकारला वाटत आहे. त्यातून सरकारनं त्यावर उपाय काढला. तो म्हणजे मुलींच्या विवाहाचे वय. हे विवाहाच्या वयाचे प्रमाणच वाढवले. जेणेकरुन मुलींनी शिकून समृद्ध व्हावं. अर्थात विचार करण्यालायक व्हावं. जेणेकरुन त्या विचार करण्यातून किती मुलं जन्मास घालावी? मुलं जास्त जन्मास घातली तर त्याचे परिणाम काय होतील? हा विचार मुलींना विवाह केल्यानंतर करता येणार आहे. तसेच कायदे असेही बनवले गेले आहेत की मुलांनी जरी मुलं जन्मास घालतांना बळजबरी केलीच. तर त्यावर स्रीयांना दादही मागता येणार आहे.
विवाहासाठी वय वर्ष एकवीस करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असतांना काही लोकं ओरडत आहेत. कारण त्यांना त्याचा मतितार्थ बरोबर कळला आहे. वय वर्ष जेव्हा एकवीस होईल. तेव्हा साहजीकच अठरा वर्षानंतर विवाह केल्यास जिथे तीन मुलं जन्मास येवू शकणार होती. तिथे वय वर्ष एकवीसपर्यंत एकही मुल जन्मास येणार नाही. त्यानंतर कदाचित एक किंवा दोनच मुलं स्रीया जन्मास घालतील असं सरकारला वाटतं. परंतू वय वर्ष एकवीस करा की चोवीस करा. पुत्र जन्माला घालणारी मंडळी जेव्हापर्यंत पुत्र जन्माला घालता येतात. तेव्हापर्यंत ती मुलं जन्मास घालतच राहतील. कारण त्यांना पुत्र जन्मानंतरच नुकसान दिसत नाही. त्यांना फक्त आणि फक्त आपला संसार दिसतो तर काही लोकं धर्मप्रेरीत असल्यानं त्यांना पुत्र जन्माच्या वेळी आपला धर्म दिसतो. तो कसा वाढेल हा प्रश्न सतावतो.
महत्वाचं म्हणजे पुत्र जन्मावर ब्रेक जर लावायचा असेल तर कुटूंबनियोजन सक्तीचं करावं. जो व्यक्ती एक किंवा दोनवर थांबत नसेल तर त्याच्या तिस-या अपत्याला जन्मास घालतांना त्याच्या सर्वसोयी नाकाराव्यात. त्याच्या तिस-या अपत्यांना जन्मास घालतांना बाळंतपण शुल्कही जास्त वसूल करावं. तसेच ज्यानं तिसरं अपत्य जन्मास घातलं. त्या कुटूंबांनाच शासन दरबारच्या सर्व सुविधांपासून वंचित करावे. हे असे जेव्हा होईल. तेव्हाच कुटूंबनियोजन यशस्वी होईल. जास्त मुलं जन्मास घालण्याला ब्रेक लागेल. त्यातच लोकसंख्यावाढ नियंत्रणात आणता येईल नव्हे तर यातून निर्वासीतांचा प्रश्न सोडविता येईल. तसेच वनाचेही संरक्षण होईल व वन्यप्राण्यांचेही संरक्षण होईल. त्याचबरोबर देश सृजलाम सुफलाम होईल. पर्यावरणाचेही रक्षण होईल. त्याचबरोबर जंगलांचे रक्षण झाल्याने पाऊस पडेल. तसेच देशातील शेतीत चांगलं धनधान्य पिकेल व सर्वांनाच अन्न, वस्र निवारा योग्यरितीनं देता येईल यात शंका नाही. परंतू त्यासाठी कुटूंबनियोजन सक्तीचं करणं ही काळाची गरज आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०