राजकीय वादळं क्षमणार कधी Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राजकीय वादळं क्षमणार कधी

राजकीय वादळं क्षमणार कधी

आज सामान्य माणसाला कोणी हुंगत नाही. त्याची काही इज्जत नाही असे वाटायला लागले आहे. कारण ही सामान्य जनता आहे.
सामान्य जनता ही नेत्यांच्या पेक्षा अतिशय महत्वाची आहे. कारण याच सामान्य माणसांच्या भरवशावरच ते या देशात मतदानाच्या माध्यमातून निवडून येत असतात.
मतदान ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट असून त्या मतदानातून दोनचार वेळा निवडून आलेले प्रतिनिधी हे दोनचार वेळा निवडून येताच बेताल वक्तव्य करीत असतात. त्या बोलण्यातूनच जास्त प्रमाणात वाद चालत असतात.
असं बेताल वक्तव्य केवळ एका बाजूचीच माणसं करतात असं नाही. तर विरुद्ध भागाचीही नेतेमंडळी असं बेताल वक्तव्य करीत असतात. गतकाळात अशा बेताल वक्तव्यात काहींचा क्रमांक आघाडीवर राहतो. तर काहींचा मागे. मात्र बोलत सगळेच असतात. कोणताही विचार न करता. काही दिवसापुर्वी एका नटीच्या गालासारखे रस्ते असल्याचे वादग्रस्त वक्तव्य एका नेत्यानं केले होते.
हेच बेताल वक्तव्य. असं बेताल वक्तव्य आपण कोणाबद्दल करतो? तो कोण आहे? आपण त्याची बरोबरी करु शकतो का? याचा जराही विचार कोणीच करीत नाही.
महत्वाचं म्हणजे आपण एखादा आमदार बनलो. एखादा खासदार बनलो. आपण अध्यक्ष बनलो. एखाद्या खात्याचा मंत्री. आपण खुप मोठा तीर मारला. आपण काहीही बोलू शकतो असं बहूतेक नेतेमंडळी मानतात. त्यातच असं बेताल बोलणं. परंतू ती नेतेमंडळी असं बोलतांना नेमकं हे विसरतात की आपण त्यांची बरोबरी करु शकतो काय?
मुळात अध्यक्ष असलेले काही नेते. मैफलीतील मित्रमंडळात म्हणतात की मी अमूक नेत्यांना शिव्या देवू शकतो. मारुही शकतो.
आता यामध्ये ज्यांना मारणार ती मंडळी कुठे आणि आपण कुठे असा विचार अशा नेत्यांनाही पडत नाही. काही लोकं तर म. गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या तत्सम नेत्यांबाबत नेत्यांबाबत बोलत असतात. असे वादग्रस्त विधान करतांना आपण या गत समाज विचारवतांची बरोबरी करु शकतो का? याचा विचार करीत नाहीत.
आपण असे विचारवंत होवू शकतो का? आपण समाजासाठी काही करु शकलो का? याचा विचार न करता उचलली जीभ व लावली टाळूला असे बेताल वक्तव्य नेते करीत असतात.
महत्वाचं म्हणजे असे बेताल वक्तव्य कोणीही करु नये. प्रत्येकांनी असं बेताल वक्तव्य करण्यापुर्वी विचार करावा की आपण कोणाबद्दल बोलतोय. आपण तसं वागतो का? आपण जर तसं वागत असेल आणि आपण ज्या माणसांबद्दल बोलतो. त्या माणसाला बोलण्याची आपली लायकी असेल, तरच आपण बोलावे. अन्यथा आपल्याला काहीही बोलण्याचा अधिकार नाही.
विशेष सांगायचं म्हणजे आपली लायकी नसतांना आपण असंही बोलत असतो आणि आपल्या देशात राजकीय वादळं विनाकारण निर्माण करीत असतो. जी राजकीय वादळं आपल्या देशाला घातक अाहेत. ज्यातून राजकीय वादळं निर्माण होवून देश पोखरला जातो. आपला देश मुळातच अशा राजकीय वादळाचा गुलाम राहिलेला आहे. अशी राजकीय वादळं पुर्वीच्या काळातही झालेली आहेत.
इसवीसनाच्या सातशेव्या शतकात प्रथमच भारतात प्रवेश करणारे मुसलमान. त्यांनी विश्वासघातानं राजा दाहिरची क्रुर हत्या केली. जो राजा दाहिर हिंदू धर्माचाच नाही तर बौद्ध धर्माचाही पुरस्कर्ता होता. तरीही केवळ हिंदू धर्मालाच राजाश्रय दिला असा विचार करणारी इतर धर्माची मंडळी राजा दाहिरबाबत बेताल वक्तव्य करीत असत. त्यातूनच राजा दाहिरबाबत सुडबुद्धी जागृत झाली व त्याची परियंती राजा दाहिरची हत्या करवून घेण्यात झाली. ज्ञानमत याने मुस्लीम शासक मोहम्मद बिन कासीमशी संगनमत करुन स्वतःला राजा बनवीन असे आमीष मिळताच मोहम्मद बिन कासीमच्या मदतीनं दाहिरची हत्या केल्यानंतर त्याचीही हत्या झाली. त्या व्यतिरीक्त राजा दाहिरच्या परीवारावरही अत्याचार करण्याचे षडयंत्र झाले.
हेच घडले ११ व्या शतकात. राजा जयचंद दिल्लीचा शासक न बनल्यानं त्यानं असंच पृथ्वीराज बाबत बेताल वक्तव्य केलं. तसंच बेताल वागणंही. त्याच्याच कुरघोडीनं पृथ्वीराज चौहानला असेच मरावं लागलं. तसेच त्यांचा परीवार दिल्लीत अग्नीमध्ये स्वाहा झाला जोहार करीत. हेच अलाऊद्दीन खिलजीच्या काळात घडलं. राणी पदमावतीला जोहार करावा लागला अलाऊद्दीन खिलजीच्या धाकानं. आपला पती रतनसिंहाचा पराभव पाहून. इथे कित्येक राजपूत राण्यांना जोहाराला पुढं जावं लागलं. तसेच संभाजीची दारुण हत्याही अशीच फितूरीनं आणि सत्तालालसेनं झाली. हेच बेताल बोलणं आणि बेताल वागणं. ह्याच बेताल बोलण्यातून विषाची गरळ पसरली आणि त्यातून मरणागती गेले भारतीय राजे. ज्या भारतीय राजांचा काहीच गुन्हा नव्हता. ही राजकीय वादळंच होती.
इतिहासाची पानं चाळतांना अशीच मुस्लीम शासकांनी सुरु केलेली हत्या प्रकरणं. त्यातच घाबरुन मानसिंह सारखी व मिर्झाराजे जयसिंगसारखी मांडलिक झालेली मंडळी. ज्यांनी हत्येच्या भीतीनं आपल्या सुंदर सुंदर मुली मुस्लिम राज्यकर्त्यांना दिल्या. एकच शासक झाला बाप्पा रावल की ज्यानं राजा दाहिर अभ्यासला. त्यातच त्याच्या हत्येचा बदला काढण्यासाठी बाप्पा रावलनं राजा दाहिरच्या हत्येनंतर भारतात प्रस्थ जमवलेल्या मुस्लिम शासकांना काबूल, कंदाहारपर्यंत हाकललं. त्यातच त्याच्या धाकानं मुस्लिमांनी आपल्या मुलींचा विवाह बाप्पा रावलशी लावून दिला. इथेही राजकीय वादळच धुमसलं. पराभवानंतर बदला. बदल्यानंतर पराभव. हे आजपर्यंत घडत आलं. केवळ आणि केवळ राजकीय वादळानं.
आज खरंच या संविधानीक काळात सर्व समान असतांना व हत्येची भीती नसतांना अशी राजकीय वादळं घडविण्याची गरज आहे का? नाही. मग असा पानीपतचा पराभव बदलून का लिहावा. साबूदान्याचा शोध १९४३ ते ४४ मध्ये लागला तर त्यावेळी सैन्याना साबूदान्यावर ठेवले अशी केलेली काही नेत्यांनी बदनामी मनाला पटत नाही.
आज सुजलाम सुफलाम असलेला भारत देश इंग्रजांनी लुटला असे म्हटले जाते. बरोबर आहे. त्यांनीही या देशातील कच्चा माल अतिशय स्वस्त दरात आपल्या देशात नेला आणि महाग असलेला माल आपल्याला थोपवला. मुस्लिम शासकांनीही काय केलं? तेच केलं. मोहम्मद गझनीनंही सतरा वेळा सोमनाथासारख्या कित्येक मंदिरावर स्वा-या करुन येथील धन आपल्या देशात नेलं. कित्येक बौद्ध मंदिरं पाडली. कित्येक हिंदूची मंदिरं. महत्वाचं म्हणजे सातशेच्या शतकानंतर जे जे मुस्लिम शासक झाले. त्या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या रुपात येथील बौद्ध, जैन, हिंदू धर्मीयांना छळले हे तेवढंच खरं आहे. ते केवळ राजकीय वादळांनीच. तरीही आज राजकीय वादळं क्षमलेले नाहीत. राजकीय वादळांनं नुकसान होत असलं तरी.......
महत्वाचं म्हणजे ही राजकीय वादळं आज संपवायची गरज आहे. कारण ही राजकीय वादळं आपली संस्कृतीच संपवत नाहीत तर ही राजकीय वादळं आपल्यालाही संपवून टाकत आहेत. या राजकीय वादळांचाच फायदा घेवून विदेशी ताकदी आपल्या देशात येतात व आपल्याच देशाला संपवतात. तसंच घडलं आहे आजपर्यंत. म्हणून वेळीच सावधान झालेलं बरं! असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. आपल्यावर असं संकट पुन्हा निर्माण होवू नये यासाठी असं बेताल बोलणं व बेताल वागणं टाळावं. जेणेकरुन राजकीय वादळं क्षमतील व देश विकासाच्या टप्प्यावर अधिक पुढे जाईल यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०