अपराधबोध - 14 Gajendra Kudmate द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराधबोध - 14

मग सारांशने धाडस करून तीचाकड़े बघीतले तर शर्वरीचा साडीचा पदर खाली गच्चीवर पडलेला आहे आणि तीचा ब्लाउज काहीसा खालीवर सरकून वीस्कटीत झालेला आहे. ती आताही उत्तेजित होऊन त्याचा दिशेने समोर समोर वाढू लागली होती. मग ती हसू लागली आणि म्हणाली, "का रे तु असा करतोस येना फार मज्जा येत आहे ना. माझे एवढ्याने नाही होणार आहे असे म्हणून तीने तीची साड़ी सम्पूर्ण काढून तेथेच गच्चीवर फेकून दिली आणि ती तीचा ब्लाउजची बटन उघडायला लागली होती ती तसे करत असताना सारांश तीला बोलला थांब असे काही करू नकोस आणि आधी तुझी साड़ी घालून घे. मग शर्वरी म्हणाली , का रे तू किती अनरोमांटिक आहेस, तुझ्यापुढे एक सुन्दर तरुणी निर्वस्त्र होण्यासाठी तैयार आहे आणि तू नाही म्हणत आहेस वेड्या" मग सारांश तीला बोलला, "शर्वरी तू आधी तुझे कपड़े घाल मग मला तुझ्याशी बोलायचे आहे" मग शर्वरीने तीचा ब्लाउजची बटन लावून तो व्यवस्थित केला आणि साड़ी घालून घेतली त्यानंतर सारांश तीचा जवळ गेला आणि म्हणाला," हे बघ शर्वरी आता जे काही घडले ते अनयास ,अनभिज्ञपणे घडले आहे. माझा तसा काही हेतु नव्हता. मग शर्वरी मध्येच बोलली, " का रे अजुन काही घडलेच नाही आणि तू पण थंडा आहेस काही घडू दिले नाहीस" असे म्हणून तीने सारांशचा हात धरून तीचा वक्षस्थला वर ठेवला सारांशने तात्काल त्याचा हात तेथून काढला आणि शर्वरीचा थोबाडीत लावली. मग तो तीचावर ओरडू लागला होता, तुला वारंवार सांगून सुद्धा कळत नाही काय ,तू माझ्या मीत्राची पत्नी असून त्या घरची सुन आहेस आणि तू हे असे वर्तन पर पुरुषाचा समोर करते आहेस, तुला लाज वाटत नाही काय."

    आता मात्र शर्वरीचा डोळ्यात अश्रु आलेले बघून सारांश थोड़ा व्यथित झाला आणि त्याने त्याचा आवाज कमी केला. तो मग शर्वरीचा शेजारी बसला आणि तीला म्हणाला, " शर्वरी काय झाले काही त्रास आहे काय तुला. तू हे असे बाजारू स्त्री सारखे वर्तन का बर करतेस हे बरे नाही आहे तुझ्यासाठी आणि तुझ्या पतीसाठी" तेवढ्यात तेथे श्वेता सुद्धा येऊन ठेपली. तीला बघून सारांश हा घाबरला होता म्हणून श्वेता म्हणाली, "सारंश घाबरू नको मला सगळ माहित आहे मी माझ्या स्वतःचा डोळ्यानी सगळ बघीतल आहे. त्याच बरोबर तुमचा दोघांचे बोलने सुद्धा ऐकले आहे. आता मला शर्वरीकडून सत्य काय ते जानून घ्यायचे आहे. बोल शर्वरी बोल तुझ्या मनात काय आहे ते मन मोकळेपणाने बोल, तुझ्या मनातील दुःख वेदना सगळी तु आज बाहेर काढ़ आज जर नाही काढशील तर कधीच नाही काढू शकशील ". आता मात्र शर्वरिला थोडेसे धाडस होऊ लागले होते आणि ती सांगू लागली, " ताई मी जे काही बोलेन त्याचा बद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. मी जेव्हा या घरात नवरी म्हणून आली तेव्हा माझे सुद्धा इतर मुलींचाप्रमाणे स्वप्र होते की माझा सुद्धा हक्काचा पती असावा. त्याचा कडून मला शारीरिक आणि मानसीक सुख प्राप्त व्हावे. त्या अनुशंगाने मी आले तेव्हा आणि आता शेखरचा बाबतीत तसे काही घडलेच नाही आजवर, तो एका छोट्याशा कंपनीत कामाला आहे आणि त्याचा पगार हा कमी आहे. येथेच माझे अर्धे स्वप्न तुटून गेले होते. माझ्या ताईने माझे लग्न तुमचाकड़े बघून तुमचा भावाशी लावून दिले. मी पण बालपनापासून गरीबीचे दिवस बघीतले आहे म्हणून मला माहित आहे की कसे काटकसर करून आयुष्य जगावे म्हणून मी कसलीही तक्रार न करता आयुष्य जगायला तयार आहे. परन्तु ".असे म्हणून ती रड़ लागली.

    तीला रडताना बघून श्वेताने तीचा जवळ घेतले आणि तीला सांत्वना देत तीचे अश्रू पुसले. त्यानंतर शर्वरी पुन्हा बोलू लागली, " ताई कुठलीही स्त्री एकवेळ पोटाचा भूके साठी उपाशी राहू शकते ,परन्तु शरीराची भूख तीचे काय. ज्या स्त्री कड़े तीचा हक्काचा पती आहे तर तीची आस हीच असते की तीची ती भूख तीचा पतीकडून शांत होईल किंवा केली जाईल. नेमके तेच आजवर शेखरकडून झाले नाही आणि कधी होणार ही नाही कारण की तो नपुंसक आहे. तो अपघाताने झाला, कुणाचा वाईट सवईने झाला हे मला काही माहित नाही आहे. माझा पती माझा बरोबर माझा बीछान्यात असून मी एकटीच रात्रभर सारखी इकडून तीकडे कुशी बदलत असते. याच दरम्यान मी एकदा रात्री गच्चीवर आलेले असताना तुम्हा दोघांना प्रणय क्रीडा करताना बघीतले. मी तेथेच लपून तुमची प्रणय क्रीडा बघत बसली आणि माझ्या अतुप्त मनाला शांत करत बसली, शेवटी मी ठरवले होते की मला काही करून माझी भूख शांत करायची आहे म्हणून मी त्या दिवशी स्वतःचा शरीराची उत्तेजना शांत करण्यासाठी सारांशचा शरीराशी खेळत होते. मी दररोज गच्चीवर येऊन कुणी पर पुरुष मला बघत असेल तर त्याचा कडून मी माझी भूख शांत करून घेईल असा वीचार करते ,परन्तु माझ्या नशिबाने तेथेही दगा दिला. आज सारांश ताई तुमचा आशेने मला येऊन चीकटला आणि माझी सगळी वासना बाहेर नीघायला तयार झाली. परन्तु आज ही मी यात यशस्वी होऊ शकले नाही, ताई सारांश खरच चांगला मुलगा आहे आणि तो तुम्हाला जीवापाड प्रेम करतो जे काही घडल त्यात याची कसलीच चुक नाही आहे. 

    आता मात्र श्वेताला वाटू लागले की ती नाहक स्वतःला दोष देत बसली आणि स्वतःचे आयुष्य उध्वस्त करायला लागली होती, मग ती शर्वरिला म्हणाली, "शर्वरी तू काळजी करू नकोस तुझ्या समस्येचे समाधान आपण करु." त्यानंतर सारंश आणि श्वेताने पुढाकार घेऊन शेखरला योग्य ती वैद्यकीय चिकि्सा देऊन त्याला त्याचा समस्येतुन मुक्तता मीळवून दिली आणि त्या दोघांचे आयुष्य सुखमय केले, आता श्वेताला अपराधबोध या भावनेतुन मोकळे झाल्यासारखे वाटू लागले. त्यानंतर श्वेता आणि सारांश परिणय सूत्रात बांधल्या गेले आणि त्यांचा आयुष्याची नवीन पहाट झालेली होती.

               समाप्त