PRATIBIMB book and story is written by Mrs. Mrinmayee Shirgaonkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. PRATIBIMB is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
प्रतिबिंब - कादंबरी
Mrs. Mrinmayee Shirgaonkar
द्वारा
मराठी फिक्शन कथा
प्रतिबिंब भाग १ शेवटी कशीतरी आठवड्याभराची सुट्टी काढून यश आणि जाई शिवपुरीस आपल्या जुन्या संस्थानी जायला निघाले. रावसाहेब जाऊनही चार महिने होऊन गेलेले. वकिलाचे दहादा फोन येऊन गेले. पण यशच्या कामाच्या व्यस्ततेने फुरसत मिळत नव्हती. शेवटी वकिलाने आता आला नाहीत तर सर्व सरकारजमा होईल आणि नंतर काहीच हाती लागणार नाही असे निकराचे सांगताच जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. यशच्या मते तसेही तिथे जुन्या पुराण्या वास्तुशिवाय काही नव्हतेच. वकिलास सांगून विकून टाकावे असे त्याने बोलूनही दाखवले, पण जाताना सासऱ्यांनी दहा वेळा जाईस एकदा तरी शिवपुरी जाऊन यावे मग जो वाटेल तो निर्णय घ्यावा असे परोपरीने कळवळून सांगितलेले तिच्या मनातून जाईना. शेवटी तिने
प्रतिबिंब भाग १ शेवटी कशीतरी आठवड्याभराची सुट्टी काढून यश आणि जाई शिवपुरीस आपल्या जुन्या संस्थानी जायला निघाले. रावसाहेब जाऊनही चार महिने होऊन गेलेले. वकिलाचे दहादा फोन येऊन गेले. पण यशच्या कामाच्या व्यस्ततेने फुरसत मिळत नव्हती. शेवटी वकिलाने आता आला ...अजून वाचातर सर्व सरकारजमा होईल आणि नंतर काहीच हाती लागणार नाही असे निकराचे सांगताच जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. यशच्या मते तसेही तिथे जुन्या पुराण्या वास्तुशिवाय काही नव्हतेच. वकिलास सांगून विकून टाकावे असे त्याने बोलूनही दाखवले, पण जाताना सासऱ्यांनी दहा वेळा जाईस एकदा तरी शिवपुरी जाऊन यावे मग जो वाटेल तो निर्णय घ्यावा असे परोपरीने कळवळून सांगितलेले तिच्या मनातून जाईना. शेवटी तिने
प्रतिबिंब भाग २ परत येऊन दोघे जेवले पण जाईचे मुळीच जेवणात लक्ष नव्हते. तिला राहूनराहून ती बाई गेली कुठे हाच विचार त्रास देत होता. दुपारी पलंगावर पडली, तरी तिची ती एकटक नजर जाईच्या डोळ्यांसमोरून जाईना. शेवटी जाई उठली आणि ...अजून वाचात्याच खुर्चीत येऊन बसली. तिला आता त्या माडीवरच्या दालनांना पाहण्याची आस लागली. किल्ल्या यशकडे होत्या. शिवा आणि रखमा जिना, दरवाजा साफ करून घेत होते. साफसफाई झाली. रखमाने चहा केला. मग सगळेच वर आले. यशने चाव्या काढून शिवाच्या हातात दिल्या. प्रथम एक चावी शिवाने पूर्ण फिरवून बाहेर काढली. मग दुसरी, नंतर तिसरी. चौथी चावी पूर्ण फिरवल्यानंतर खट्कन कुलूप उघडले. शिवाने कडी
प्रतिबिंब भाग ३ सकाळी यशला जाग आली तेव्हा जाई शेजारी नव्हती. बाथरूममधे असेल असा विचार करून तो कूस बदलून झोपला. पण मग त्याला परत जाग आली. बाथरूमचं दार उघडंच होतं. त्याने दिवाणखान्यात येऊन पाहिलं, स्वैपाकघरात पाहिलं. जाई कुठेच नव्हती. ...अजून वाचात्याला अचानक वरचा आरसा आठवला. तो धावत वर आला. पाहतो तर, जाई आरशावर मान टेकून, जमिनीवर बसल्याजागी झोपली होती. त्याने घाबरून, तिला जागे करण्यासाठी, हलवायला सुरवात केली तशी हळूहळू तिने डोळे उघडले. अनोळखी चेहऱ्याने तिने यशकडे पाहिले आणि ती सावरून उठून बसली. "अगं इथे काय करतेस? किती घाबरलो मी. कधीपासून आहेस इथे? आणि अशी काय अवघडून झोपलीस? " जाई काहीच
प्रतिबिंब भाग ४ त्या दिवशी वाडा संपूर्ण सजवला होता. नव्यानेच रंगरंगोटी करण्यात आली होती. भाऊसाहेब खुशीत होते. बऱ्याच वर्षांनी वाड्याला नवी मालकीण मिळणार होती. त्यांच्या मुलाची, अप्पासाहेबाची बायको, म्हणजेच, भाऊसाहेबांची सून वयात आली होती. व्याह्यांचा ...अजून वाचानिरोप आला होता. आज सूनबाई कायमच्या वाड्यावर राहायला येणार होत्या. एका मोठ्या जबाबदारीतून मोकळं झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. मंडळी पोचली. रितीरिवाज, परिवारातील इतर स्त्रियांनी पूर्ण केले. भाऊसाहेबांच्या पत्नीचे अकाली निधन त्यांना फार एकटे करून गेले होते. पण मुलाला सावत्रपणा नको म्हणून त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचारही मनात आणला नव्हता. रितीप्रमाणे गावातील कलावंतीण, सूनेची दृष्ट काढायला आली होती. तिच्याबरोबर तिची उफाड्याची मुलगी शेवंताही
प्रतिबिंब भाग ५ दुसऱ्या दिवशी यशच्या महत्वाच्या मिटींग्ज होत्या. जाईने त्याला आग्रहाने जायला लावले. मी बेडवरून उठणारच नाही असा निर्वाळाही दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच नवरानवरीस देवदर्शनास नेले. साताठ तासांचा प्रवास होता. मंडळी मुक्काम करून तिसऱ्या दिवशी परतणार ...अजून वाचाभाऊसाहेबांनी प्रकृती अस्वास्थ्याचे निमित्त पुढे केले. सगळ्यांना धाडले. त्यात घरात राबणारे, नुकतेच लग्न झालेले, शिवाचे आजा-आजीही होते. तुम्हाला तरी देवदर्शन कधी होणार, असे म्हणत आग्रहाने धाडले. मालकाच्या दानतेने ती दोघे सुखावली. सगळे गेल्यावर भाऊसाहेबांनी शेवंताचे शव ओढत नेत वाड्याच्या छतावरून मागच्या दरीत फेकून दिले. आरशाच्या कपाटाच्या बिजागऱ्या तोडल्या, मग भिवास बोलावून नवे कपाट बनवून त्यावर या आरशाचे दार लावण्यास सांगितले. जुने