The mind is for you books and stories free download online pdf in Marathi

मन हे बावरे तुझ्यासाठी....

तुम्ही प्रेमाविषयी अनेक कथा / कविता वाचल्या असतील आणि प्रत्येक कथा /कवितेमधून काहीतरी नवीन कल्पना प्रेमाविषयी आली असेल. तुम्ही आत्तापर्यंत मेचुअर लव स्टोरीज वाचल्या असतील पहिल्या असतील मेचुअर म्हणजे कहाणीतील पात्र मेचुअर असलेले. पण ही कहाणी थोडीशी वेगळी आहे यात लहानपणापासून एखादी व्यक्ती आपल्या सोबत असते आपली प्रत्येक आवड-निवड आपला स्वभाव आपल्याविषयी सर्व काही माहिती असते.

खूप छान असत लहानपणीच ते प्रेम ज्यात कोणाचीच रोकटोक नसते आणि सर्वात महत्वाच म्हणजे त्या वयात झालेली चूक हि खरतर चूक म्हणून ग्राह्य धरली जात नाही आणि अश्या परिस्थितीत आपण कोणाच्या तरी प्रेमात पडलेलो असतो खरतर आपल्याला माहितही नसते कि प्रेम म्हणजे काय प्रेमाच्या भावना काय असतात. पण तरीही एखाद्याच्या सोबतीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. तिच्यासाठी झाडावर चढून कैरी, चिंच बोर आनायची खूप मस्त वाटत जेव्हा एखादी मुलगी आपल्या आयुष्यात येते जी आपल्यावर हक्क दाखवते आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी सांगते आपल्याला रिकरेक्ट करते आपल्या वाईट सवयी घालवते आणि आपण मात्र याच गोष्टींना प्रेम समजून बसतो आणि पूर्ण भविष्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये घुटमळत असतो.

या कथेची सुरवात होते लखनऊ मधील असलेल्या स्वस्तिक कॉलनी मधून त्या कॉलनीमध्ये आदित्य आणि सोनल या दोघांच्या फॅमिली राहत असतात. आदित्य खूप कुल मुलगा असतो पण त्याची एक वाईट सवई असते तो नेहमी सकाळी उशिरा उठायचा. हि एक सवई सोडली तर तो प्रत्येक बाबतीत प्रोग्रेसीव होता मग ते खेळात असो किंवा अभ्यासात तो नेहमी सर्वांच्या पुढे असायचा एका दिवशी त्याच्या कॉलनीमध्ये एक नवीन फॅमिली राहायला आली ती म्हणजे सोनलची फॅमिली होती हळूहळू सोनल आणि आदित्य या दोघांच्या फॅमिलीची एकमेकांशी ओळख होते तेव्हा सोनलची आई एका दिवशी आदित्यच्या घरी येते आणि आदित्य आणि सोनलच्या आईमध्ये खूप गप्पा रंगतात त्यात विषय निघतो कि सोनल साठी घरापून जवळ असलेली शाळा शोधात आहेत तेव्हा आदित्याची आई त्यांना आदित्यच्या शाळेबद्धल सांगते ती त्यांच्या घरापासून खूप जवळच्या अंतरावर असते आणि तिथले शिक्षक पण अनुभवी असतात. त्यामुळे सोनलची आई सोनलचे त्याच शाळेत अॅडमिशन करते तेव्हापासून आदित्य आणि सोनल एक्सोबातच शाळेत जातात आणि शाळा सुटल्यावरही एक्सोबातच घरी जात असतात. त्यामुळे आदित्य आणि सोनल खूप चांगले मित्र झालेले असतात. आणि प्रत्येक छोटी-छोटी गोष्ट ते एकमेकांसोबत शेअर करत असतात. १० वी पर्यंत तर हेच घडत असत ते दोघे खूप मनमोकळे पाने बोलत असतात आणि या दोघांच्या नात्याबाद्धाल दोघांच्याही घरच्यांना बिलकुल अडचण नव्हती १० वी नंतर सोनलला खूप चांगले मार्क पडतात त्यामुळे कॉलेजमध्ये जाण्यासाठी तिचे बाबा तिला स्कुटी घेऊन देतात.

वेळ येतो कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रवेश घेताना कोणत्या ट्रेडला प्रवेश घायचा यावर चर्चा सुरु असते इकडे आदित्यला १० वी ला सोनालपेक्षा कमी मार्क पडलेले असतात. त्यामुळे आदित्य घरातून बाहेरच निघत नव्हता त्याच्या मनामध्ये भीती होती कि कोणी त्याला हा प्रश्न विचारेल कि किती मार्क पडले आणि जर आपण खरे मार्क सांगितले तर ते परत आपल्याला ऐकवणार आणि सोनलला त्याच्यापेक्षा चांगले मार्क पडलेले आहेत हे त्याला माहिती होत आणि त्याला अस वाटत होत कि सोनल आपल्यापासून दुरावणार ती शिकायला जर दुसर्या शहरामध्ये गेली तर किंवा सोनल आपल्यासोबत पाहिल्यासारखे वागली नाही तर या सगळ्या प्रश्नांनी आदित्यला वेड लावले होते दुसरीकडे सोनल हा विचार करत होती कि आदित्य बाहेर कुठे दिसत नाही वेकेशनसाठी बाहेर गेला कि काय पण मला ण सांगताच कसाकाय जाऊ शकतो आणि जरी गेला असला तरी आत्ता कॉलेजच्या अॅडमिशन ची वेळ आली तरी अजून कसा माघारी आला नाही कि शिकण्यासाठी दुसर्या शहरात गेला कि काय हा विचार करताच सोनलला आदित्य त्यांच्या गच्चीवर दिसतो सोनल खरतर कॉलेज ला अॅडमिशन घेण्यासाठी आदित्यामुळे थांबली होती कदाचित तिलाही आदित्यला गमावण्याची भीती होती ती आदित्यला पाहतात पळत-पळत गच्चीवर जाते आणि आदित्यला विचारते एवढ्या दिवस कोठे होतास दिसलाच नाहीस तेवढ्यात आदित्य विषय बदलण्यासाठी सोनलला विचारतो कि तू कोणत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार आहेस आणि कोणत्या ट्रेड ला घेणार आहेस तेव्हा सोनल म्हणते तू ज्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेशील त्याच कॉलेजमध्ये मी पण अॅडमिशन घेणार आहे. तू कोणत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार आहेस तेव्हा तो त्यांच्या घराजवळच्याच एका कॉलेजचे नाव सांगतो आणि दोघेही तिथे अॅडमिशन घेतात सोनल आदित्यला प्रत्येक बाबतीत समजून घेत असते कदाचित सोनलच्या मनात आदित्याविषयी प्रेमाची भावना जागी झाली होती पण आदित्यच्या मनात अस काहीच नव्हत त्याने आत्तापर्यंत सोनालवीषयी असा विचार कधीच केला नव्हता सोनल त्याची फक्त बेस्ट फ्रेंड आहे या पलीकडे काहीही नाही असा विचार आदित्य करत होता कॉलेजमध्ये गेल्यावर आदित्यला त्याच्या वर्गात पहिली मुलगी दिसली ती दिसायला खूप सुंदर होती तिला पाहताच आदित्य तिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करू लागला कॉलेजचा पहिला तास संपल्यावर सिनिअरच्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांचा वेलकम ठेवला होता त्यात आदित्य आणि मायरा या दिघंची ओळख होते.

मायरा अभ्यासात खूप हुशार होती तिने तिच्या शाळेमध्ये १० वी ला १ला नंबर आणला होता. त्यामुळे आदित्य तिच्यावर जाम इम्प्रेस झाला होता. त्यला खूप दिवसपासून मायराला सांगायचं होत कि त्याच्या मनामध्ये मायराविषयी काय आहे ते पण तिच्या समोर गेल की त्याच्या तोंडाला कुलूप लागत होत आणि याच वेळी त्याच्या मनामध्ये सोनल विषयीही प्रेमाच्या भावना जाग्या झाल्या होत्या त्यामुळे तो खूप गडबडला होता कि कोणाला आधी सांगू दोघींच्या समोर गेल्यावर त्याला जे बोलायचं आहे ते बोलताच येत नव्हत, त्यामुळे तो ठरवतो कि आपण एक प्रेमपत्र लिहायचं आणि दोघींच्याही घरी पोस्ट करायचा ठरल्याप्रमाणे तो सोनल आणि मायरा या दोघींनाही पत्र लिहितो आणि टपाल पेटीच्या समोर येऊन थाबतो आणि परत तिथे त्याच गोंधळ होतो कि पाहिलं पत्र कोणाला पाठू कारण दोघीही त्याला तेवद्याच आवडत असतात. त्यामुळे तो त्या दोन पत्रांमध्ये १० – २० असा खेळत बसतो आणि शंभर मायराच्या पत्रावर आल आणि ते पत्र लगेच आदित्यने टपाल पेटीमध्ये टाकले तेवढ्यात तिथे सोनल येते आणि आदित्यच्या डोळ्यावर हात ठेवते आदित्य पटकन ओळखतो कि सोनल आहे सोनल त्याला विचारते इकडे काय करतोस चल माझ्यासोबत आपण कॉफी प्यायला जाऊ अस म्हणून तो सोनालसोबत निघतो पण त्याच्या लक्षातच येत नाही कि सोनालचच पत्र पोस्ट करायचा राहील आहे तिच्या गाडीकडे गेल्यावर आदित्य म्हणतो कि गाडी मी चालणार मला मुलींच्या पाठीमागे बसायला थोड ऑकवर्ड वाटत आणि त्याच्या हातातल पत्र सोनलच्या हातात देतो आणि तो गाडी चालवतो सोनलची नजर सहज पत्राच्या पत्यावर जाते तर ते पत्र तिचच आहे अस समजत तिला विचार पडतो कि आम्हीतर एकाच कॉलनीमध्ये राहतो मग याला मला पत्र लिहायची काय गरज पडली पत्रात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आदित्यापासून सोनल ते पत्र लपवते कॉफीशॉपमध्ये गेल्यावर आदित्यला समजते कि आपले पत्र आपल्या हातात नाही तो पत्र वेड्यासारखं शोधात असतो गाडीच्या शेजारी डीक्कीमध्ये पण त्याला सोनलचे पत्र काही सापडताच नाही. सोनल घरी गेल्यावर आदित्यने लिहिलेल तिच्यासाठीच ते पत्र वाचते त्यातून तिला समजत कि आदित्याविषयी ज्या भावना तिच्या मनामध्ये आहेत त्याच भावना त्याच भावना आदित्याच्याही मनात आहेत. पण इकडे आदित्य ते पत्र हरवलं अस समजतो आणि त्या पत्र विषयी विचार करण बंद करतो पण दुसरीकडे सोनल ते पत्र वाचून खूप खुश असते आयुष्यात पहिल्यांदा तिला जे हव होत ते ण प्रयत्न करता ते तिला मिळालेलं असत.

दूसरीकडे आदित्य मायराच्या उत्तराची वाट पाहत असतो तिच्यासोबत जास्त वेळ घालवतो या आशेनी कि ती आदित्यला तिच्या मनातल्या भावना किंवा त्या पात्राच उत्तर सांगेल मायरा आदित्यला पेस्ट्री खाण्यासाठी ऑफर करते अत्तापार्यात तो मायरा सोबत बाहेर जाणार होता ते दोघजण शॉप मध्ये जातात आणि आदित्य मायरासाठी पेस्ट्री घेऊन येतो थोडावेळ दोघेजण गप्पा मारतात आणि तेवढ्यात मायरा म्हणते कि मला अजुन एक स्टोबेरी फ्लेवरची पेस्ट्री खायची आहे. हे म्हणताच आदित्यला खूप बर वाटत पण तो आधीआपल्या खिश्यात हात घालतो त्याला खरतर हे परवडणार नव्हत पण मायराच्या एका smile साठी तो तिला स्टोबेरी फ्लेवरची पेस्ट्री घेऊन देतो तेव्हापासून ते दोघा कधीही भेटले कि काहीना काहीतरी खात असायचे आणि प्रत्येक वेळेस आदित्यलाच बिल भाराव लागायचं त्यामुळे त्याला थोड चीडल्यासारख वाटत होत पण मायराच्या चेहऱ्याकडे पाहून तो सगळा राग विसरून जायचा मायरा आदित्यच्या आयुष्यात आल्यापासून त्याने सर्व पदार्थांची चव घेतली होती पाणीपुरी पासून ते बर्फाच्या गोळ्यापर्यंत सर्व पदार्थ चाखले होते एकदिवशी ते दोघाजण कॉलेजच्या गार्डनमध्ये बसले होते तेव्हा अचानक विषय निघतो मायरा आदित्यला म्हणते तू मला पाठवलेल पत्र मिळाल तू खूप छान लिहितोस मी ते पत्र आईलापण दाखवल आदित्य भीतीदायक अवाजात म्हणतो मग काय झाल त्यावर मायरा म्हणते please तू माझी निबंध लिहिण्यामध्ये मदत करशील का तू खरच खूप छान लिहितोस. तेव्हा आदित्यचा पहिला हार्ट ब्रेक होतो त्या पत्रातून जे समजायला हव होत ते तर तिला समजलच नाही आणि प्रत्येक ग्रुपमध्ये अशी एक तरी मुलगी असते जिला पाहून वावट कि ती कदाचित मला पसंत करते पण खरतर तस नसत त्या मुली स्वत:मध्येच गुंतलेल्या असतात. त्यानंतर तो एवढा तुटून जातो कि रेडीओ वर सॅड songs ऐकत बसतो सगळे जन विचारतात कि काय झालाय सांग पण तो कुणालाच काही सांगत नाही कारण त्याला सगळे जन चिडवत असतात त्याला कुणीच समजून घेत नसत सोनल सुद्धा त्याला काय झाल विचारून हसत असते आदित्य ह्या सगळ्याला कंठाळून घरामधून बाहेर पडतो आणि रात्री उशिरा घरी परततो. घरी सोनल येऊन थांबलेली असते आदित्य घरी येताच सोनल आदित्यवर चिडते आणि त्याला विचारते कि काय झाले आहे तुला तू असा का फिरतोयस तुला आमची काहीच काळजी नसली तरीही मला आहे तुझी काळजी त्यावर आदित्या sorry म्हणून त्याच्या रूम मध्ये जाऊन बसतो थोड्या दिवसानंतर तो नॉर्मल होतो त्यानंतर कॉलेजचे अॅनुअल फांग्षण असते तेव्हा आदित्य ठरवतो कि आप सोनलला प्रपोस करायच तो खूप हिम्मत करतो तिच्यासमोर बोलायची पण नाही बोलता येत त्याला सोनलच्या समोर गेला कि गप्पा बसायचा त्यामुळे फांग्षण मध्ये तो वाईण घेतो आणि तिला सगळ मनातल काही सांगायचं ठरवतो पण त्यावेळी काहीरती विचात्रच घडत कोणत्यातरी कारणावरून आदित्य आणि सोनल या दोघांची भांडणे होतात. त्यानंतर सोनल आदित्यला न कॉलेजमध्ये दिसते न कॉलनीमध्ये त्याला एका आठद्यानान्त्र समजत कि ती शिकायला ती शिकायला तिच्या मामाच्या गावी गेली आहे.

हे ऐकून आदित्यला खूप त्रास होतो स्वतःच्य वागण्याचा त्याला वाटत उगाच आपण भांडलो एकमेकांसोबत त्या भांडणात मी माझी बेस्ट फ्रेंड गमावली त्याच दुसर्या वेळी हार्ट ब्रेक झाल होतत्यानंतर तो ठरवतो कि आपण कोणत्याच मुलीसोबत फ्रेन्डशिप पण नाही ठेवायची आपल्यामध्ये रिलेशनशिप टिकवण्याच कॉलीटीज नाहीत त्यामुळे आपल्यामुळे कोणालाच त्रास होता कामा नये आणि हा विचार करून बारावी नंतर तो ITI पूर्ण करून जॉब ला लागतो तेव्हा त्याची सगळी दुनियाच बदललेली असते घर ते ऑफिस आणि वेळ असेल तर मित्रांसोबत बाहेर जायचे एवढचआदित्य आणि सोनल कॉलेजमध्ये असतानाचा त्यांन ओळखणारा एकच त्यांचा फ्रेंड होतो तो म्हणजे संजय आदित्यला संजयकडून समजत कि सोनलच लग्न ठरलय तू काय करणार आहेस त्यावर आदित्य म्हणतो कि प्रत्येकच आयुष्य आहे त्याला त्याच्या हिशोबाने जगू द्याव संजय म्हणतो अरे पण तुझ प्रेम आहे न तिच्यावर ऐद्या म्हणतो हे फक्त तुला माहिती आहे आणि हे कोणाला सांगू नकोस ज्या नात्याची सुरवातच कुठे झाली नव्हती त्या आठवणीत रामाण्यामध्ये काहीच रस नाही मला या आदित्यच्या वाक्यावर संजय म्हणतो कि जर तिने तुला आत्ता येऊन प्रपोज केल तर तू तिला लग्न करू देणार का आदित्य हसून म्हणतो ज्या गोष्टी शक्यच नाहीत त्यांचा विचारच नाही केलेला बरा अस महणून तो तिथून निघून जातो काही दिवसानंतर त्यांच्या घरी एक पोस्ट येत त्याच्यानाध्ये सोनलच्या लग्नाची पत्रिका असते आणि लग्नाचे स्थळ असते स्वतिक कॉलनी हे एकूण आदित्यच्या परीक वाचण्याचा मुडच होत नाही तो त्याची ऑफिसची बॅग उचलती आणि घराबाहेर पडतो, त्याच्या दिक्यामध्ये एकाच विचार चाललेला असतो कि ती खरच मला विसरली असेल का पण परत त्याच मन म्हणत कि आपण आठवणीत ठेवण्यासारख काय दिलय तिला त्यानंतर काही दिवसानंतर सोनल आणि तिची फॅमिली त्यांच्या घरी येते आदित्य नुकताच ऑफिस वरून घरी आलेला असतो त्याला सोनलचे वडील म्हणतात काय सर मग काय करताय आत्ता आदित्य हसून उत्तर देतो कि तो इंजिनिअर आहे त्यावर सोनलचे वडील म्हणतात कि मला वाटल नव्हत रे तू इंजिनिअरिंग करशील म्हणून त्यावर आदित्य म्हणतो कि आयुष्यात नेहमी अनपेक्षितच गोष्टी घडतात आपण ज्याच्या मागे एक दिवस समजत कि ते कडी आपल नव्हताच अस म्हणून तो फ्रेश होतो आणि घराबाहेर पडतो सोनल पण त्याच्या पाठीमागे जाते आणि त्याला आवाज देते पण तो नाही थांबत गाडी खूप वेगाने चालवतो त्याच्या पाठीमागे सोनल स्कुटी घेऊन जाते एक बागेमध्ये बसलेला त्याला बघते आणि त्याच्यापाशी जाऊन बसते आणि म्हणते कि कुणीतरी एवढ्या सुंदर मुलीला इग्नोर करायचं ठरवलंय त्यावर आदित्य म्हणतो तू का आलीस इकडे सोनल चिडून म्हणते तुझ्या कानात कचरा जरा जास्तच अडकलाय का हाक मारलेली ऐकू येत नाही का त्यावर आदित्य म्हणतो मी कानामध्ये हेडफोन घातले होते त्यामुळे कदाचित आवाज आला नसेल आणि तू मला का आवाज देत होतीस त्यावर सोनल म्हणते कि तू घरी अस का बोललास कि आपण ज्याच्या मागे असतो ते एक दिवस समजत कि ते आपल कधी नव्हतच सोनल त्याला नॉटी आवाजामध्ये विचारते कि तुझा हार्ट ब्रेक झालाय का कारण असे वाक्य त्यांनाच सुचू शकतात. त्यांचा हार्ट ब्रेक झाला असेल त्यावर आदित्य सोनलला म्हणतो तुला याचा अनुभव आहे वाटत सोनल म्हणते हा आहे कॉलेजमध्ये असताना केला होता एका मुलाने कारण नसताना हार्ट ब्रेक मग आदित्यच्या डोळ्यात पाणी येत आणि आदित्य सोनलला hug करून म्हणतो कॉ त्या चुकीसाठी आत्ता जशी हक्काने बोललीस तसीच हक्काने बोलली असतीस तर येवढा त्रास नसता झाला तुला आणि मलापण मला सोडून जायची काय गरज होती मग सोनल म्हणते तुला एवढी अक्कल नाही का मुलींसोबत कस वागायच का उचलली जीभ लावली तळ्याला जरा विचार करून बोलला असता तर हि वेळ आलीच नसती सोनल नंतर आदित्यला म्हणते कि फक्त एवढंच होत न कारण अजून काही नव्हत आदित्य म्हणतो एवढंच होत मग सोनल म्हणते कि यात डोळ्यात पाणी येण्यासारखं काय होत तू अजून पण नाही बदललास अजून तुझी जुनी सवई नाही का गेली गोष्टी लपवण्याची आदित्य म्हणतो नाही काहीच नाही लपवत फक्त हेच कारण होत अस म्हणतो आणि बाकड्यावरून उठतो त्यावर सोनल म्हणते कि काहीच कारण नाही तर मग हेच माझ्या डोळ्यात बघून मन काय आहे न माणूस जेव्हा खुट बोलत असतो किंवा काहीतरी लपवत असतो तेव्हा समोरच्याशी नजर मिळवायला घाबरत असतो त्याला भीती असते कि कडची आपले डोळे खर बोलतील आदित्य म्हणतो तुझा काही तरी गैर समाज होतोय अस काहीच नाही तुझ्यापासून लपवण्यासारख.

सोनल म्हणते खरच काहीच नाही का मला सांग एक फ्रेंड तुला सोडून गेला असता तर तुला आत्ता जेवढा त्रास झाला असता का याच उत्तर माझ्या डोळ्यात बघून दे हो काहीच नाही त्याच्याशिवाय आदित्य सोनलकडे बघून म्हणतो सोनल आदित्याला म्हणते तू अजूनही खर बोलत नाहीस त्यावर आदित्य चिडून म्हणतो पण तुला काय पडलाय माझ का मला त्रास देतेस त्यावर सोनल आदित्यला म्हणते त्रास माझा होतोय का तुला वेळेवर ण घेता आलेल्या निर्णयाचा आदित्य सोनलला म्हणतो म्हणजे काय काय म्हणायचं तुला नक्की त्यावर सोनल म्हणते तू लिहिलेलं ते पत्र हरवलं नव्हत ते माझ्याकडे होत आणि ते मी वाचलंय तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे माहिती आहे मला आणि कडची त्याचाच त्रास होतोय तुला मग आदित्य म्हणतो हो होतोय मला त्याचा त्रास नाही बघुशाकात तुला कोणासोबत त्यावर सोनल विचारते मला आधीच विचारायला तुला काय लाज वाटत होती का एवढ्या दिवस का मनामध्ये ठेवलं का स्वताला त्रास डेत राहिलास त्यावर आदित्य म्हणतो कि तुला नव्हत गमवायच मला त्यामुळे नाही सांगितल मला वाटल कि कदाचित मी तुझ्याबद्दल काय विचार करतो हे समजल्यावर तू माझ्याशी फ्रेन्डशिप तोडशील त्यामुळे मी नाही सांगितल पण आत्ता या सगळ्यांचा काय उपयोग आदित्य म्हणतो जाऊदे तू जा घरी मला एक मिटिंग आहे इथून मी ऑफिसमध्ये जाणार आहे. त्यावर सोनल म्हणते तुझ झाल असेल बोलून तर माझ एकूण घेशील तुला माहिती आहे कदाचित मी तुला तुझ्या आधीपासून पसंत करत होते पण तुला कधी नाही सांगितल आणि तू जरी मला विचारल असत तरी मी तुला होच म्हणणार होते त्यावर आदित्य म्हणतो सोडणा आत्ता त्या आठवणी मला नाही आवडत जुन्या आठवणींमध्ये रमायला सोनल विचारते का त्यावर आदित्य उत्तर देतो त्यावर तसीच कारण आहेत जाऊदे तू तुझ्या लग्नासाठी आलीस त्यावर लक्ष दे माझा नको विचार करू सोनल चिडून म्हणते आत्ता एवढ सगळ सांगून तू मला लग्नावर Concentration करायला सांगतोस मला जर लग्न करायचं असत तर इकडे आलेच नसते मी तिकडेच लग्न केल असत पण मी केवळ तुला भेटायला आले आहे कदाचित माझ्या हातून अशी चूक घादुनाये ज्याचा मला आयुष्यभरासाठी पश्चाताप होईल त्यामुळे मी आले आहे आणि तू मला म्हणतोस कि माझा विचार करू नकोस मला संग तू माझ्याशिवाय राहू शकतोस का त्यावर आदित्य म्हणतो कि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत पण तुला माझ्या आयुष्यामध्ये जगपण नाही देऊ शकत सोनल विचारते का माझी अशी काय चूक झाली आहे कि त्यामुळे तू मला तुझ्या आयुष्यात जागा नाही देऊ शकत.

सोनल आपण फक्त आपलाच विचार नाही करू शकत तू ठीदा तुझ्या मम्मी पप्पांचा विचार कर आत्तापर्यंत तुझ्या लग्नाचे कार्ड सुद्धा वाटून झाले आहेत आणि तू लग्नाला जर नकार दिला तर काय इज्जत राहील तुझ्या वडिलांची सोनल म्हणते तुला त्या सर्वांची काळजी आहे आणि माझी नाही का तू या सर्वांचा विचार करू शकतोस पण माझ काय मी काय करू मी तुझ्याशिवाय राहण्याचा विचार स्वप्नात पण नाही करू शकत आणि जर तुझा हा शेवटचा निर्णय असेल तर मला या जगात राहण्याची इछाच नाही तुला जर जिवंतपणी माझी साथ देता येत नसेल तर काहीच हरकत नाही तू सर्वांचा विचार कर फक्त माझा सोडून एवढ म्हणून सोनल तिथून चाललेली असते तेवढ्यात आदित्य तिला थांबवतो आणि विचारतो एवढ प्रेम करतेस माझ्यावर सोनल म्हणते तुला आजू विश्वास नाही माझ्यावर विश्वास आहे पण आत्ताच कसकाय सांगितल एवढ्या वर्षातून मला पप्पा बाहेर कुठेच जाऊ देट नव्हते लग्नसाठी म्हणू मी इकडे आले आहे. आत्ता तू सांग तू काय करणार आहेस तुला माझी साथ हवी आहे का तू माझ्याशिवाय जगू शकतोस त्यावर आदित्य म्हणतो कि तुझ्याशिवाय जगन थोड अवघड आहे मला तुझ्या सोबतच जगायचं आहे. मग त्यावर सोनल म्हणते चाल तास संग पप्पांना कि तू माझ्यावर प्रेम करतोस आणि माझ्याशिवाय नाही राहू शकत नाहीतर ते माझ लग्न लाऊन देतील. हे सगळ झाल्यानंतर सायंकाळी सर्वांच जेवण झालेलं असत त्यावेळी सोनल आणि अदुत्या त्यांच्या मम्मी पप्पांना एकत्र बसवतात आणि त्यांच्या नात्याबद्दल सांगतात त्यानंतर सोनलचे वडील सोनल आणि आदित्य वर चिडतात आणि सोनलला रागीट आवाजात म्हणतात कि तुला जर आधीच हे लग्न करायचे नव्हते तर आधीच कशाला हो म्हणालीस का आमच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे होते तुमच्या दोघांच जर हे आधीच ठरलं होत तर आम्हाला सांगायचं न आम्ही विचार केला असता यावर पण असू द्या तुम्हाला लग्नाच्या आधीतरी समजल नाहीतर लग्नाच्या मंडपात दोघेही बेहोष झाला असतात सोनल आणि आदित्य एक आवाजात विचारतात म्हणजे काय त्यावर सोनलचे वडील म्हणतात तुम्ही दोघांनी लग्नाची पत्रिका वाचली आहे का तर दोघेही नाही असे उत्तर देतात. सोनलची आई लग्नाची पत्रिका अन्ते आणि दोघानाही पत्रिका वाचायला सांगतात. तर लग्न पत्रिकेमध्ये आदित्य आणि सोनल या दोघांच नाव असत. दोघेही इतके खुश होतात कि दोघेही त्यांच्या आई-वडिलांना hug करतात त्यावर सोनल विचारते हे तुम्ही कस ठरवलं कि आमच दोघांच लग्न लावायचं सोनलची आई म्हणते आदित्यने लिहिलेल पाहिलं प्रेमपत्र मी वाचाल होत आणि तुझ्या नजरेत आदित्यसाठी प्रेमाच्या भावना पहिल्या होत्या आणि आम्ही तुला इथून घेऊन गेलो तेव्हा तुझा पडलेला चेहरा पाहून आम्हाला खात्री पटली कि तुम्ही दोघ एकमेकांशिवाय नाही राहू शकत आणि तुम्हाला हेच समजण्यासाठी एकमेकांपासून लांब ठेवणे गरजेचे होते हे एकूण दोघेही त्यांच्या आई-वडिलांचे आभार मानतात आणि आपल्या मॅरेड लाईफ ला सुरवात करतात.

खूप नशीब लागत आई-वडिलांनी मुलांच्या भावना समजून घेण्यासाठी आणि खूप नाशीवन असतात ते जोडे जे आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या संमतीने आपल्या नवीन आयुष्याची सुरवात करतात.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED