Bhatkanti - punha ekda - 25 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २५)

अमोल निघाला आहे , हे सर्वाना कळलं होतं. " जायलाच पाहिजे का ... अमोल सर ... ? " संजनाने विचारलं. सुप्री दुरूनच अमोलला बघत होती.
" पप्पांना मदत पाहिजे आहे तिथे. जावे लागेल. नाहीतरी आता प्रवास संपला आहे माझा. " अमोलच्या या वाक्यावर संजनाने सुप्रीकडे वळून बघितलं.
" असं का बोलतो आहेस अमोल ... " कोमल
" म्हणजे तुम्ही पुढे जाणार आता... मी दिल्लीला चाललो.. मग संपला ना प्रवास इकडचा... " अमोलचे तर नक्की झालेलं निघायचे. थांबून तर चालणार नाही.
" तुम्ही जाणार कसे दिल्लीला... " एका मुलीने विचारलं. प्रश्न तर बरोबर होता तिचा. अमोलनी कोमलकडे पाहिलं. कोमलला समजलं.
" मला नक्की माहित नाही. but एक दिवस तरी थांब. चौकशी करावी लागेल पुढे. उद्याचा दिवस थांबणार का तू... " काही पर्याय नव्हता. थांबावेच लागेल. या सर्व चर्चेत दुपार कधी झाली कळलं नाही.

============================== ================================


सईचा ग्रुप रात्री जेवल्यानंतर आराम करत बसला होता. आकाश एकटाच शेकोटी जवळ बसला होता. सई मात्र घुटमळत होती. चलबिचल नुसती मनात. आकाश त्याच्याच दुनियेत मग्न. पण मागे सई उभी आहे हे त्याच्या लक्षात आलं.
" काय झालं मॅडम... " आकाशच्या शेजारी येऊन बसली.
" बोलू कि नको ... कळत नाही मला... पहिल्यांदा असे होते आहे मला. नेहमी मी काही मनात न ठेवताच बोलते, आज नाही येतं मनातलं बाहेर... ",
" बोला ... मनात काही ठेवू नका.. " सई जरा धीट झाली.
" मला तू आवडायला लागला आहेस.. खरंच ... तुझं वागणं ... स्वभाव ... बोलणे... म्हणजे... तू वेगळाच आहेस... " आकाशला ते ऐकून हसू आलं.
" मला माहित होते.... तू हसणार ते... आणि हे सुद्धा माहित आहे .. तू माझ्यापेक्षा मोठा आहेस ते...तरी प्रेम झालं आहे मला.. " ,
" थॅक्स ma'am .... पण माझी कोणीतरी वाट बघते आहे... हे माहित आहे ना तुम्हाला... " ,
" सगळं माहित आहे मला... तू कोण आहेस... तुझ्या life मध्ये कोणी आहे ... त्याने काय फरक पडतो. प्रेम असेल तर काय फक्त लग्न .... हाच option आहे का... प्रेम कोणावरही होऊ शकते... वय नसते प्रेमाला... आणि तुझ्यावर प्रेम करते, याचा अर्थ असा नाही कि तू मला भेटलाच पाहिजे... " आकाशला पटलं ते.


" इतके दिवस सांगणार होती. आता , तू काय जाशील सोडून... म्हणून सांगून टाकलं. "
" काही प्रॉब्लेम नाही... होते कधी कधी असं.... असंच असते मन.. असो, तुम्हाला कर्नाटकला जायचे आहे ना. " ,
" लगेच चाललास का तू... " सईने पुन्हा विचारलं.


आकाशने वळून पाहिलं. " आधी कसं... कोण आहे मी... तेच माहित नव्हतं. आणि आता, तिची ओढ लागली आहे. कदाचित ती भेटली तरच बाकीच्या गोष्टी आठवतील मला, असं वाटते. " सई ऐकत होती.
" इथून गाड्या जात नाहीत.. उद्या सकाळी निघालो ना... तर पुढचा रस्ता सांगीन. कदाचित २-३ गाड्या बदलून जावे लागेल शहरात.. पावसाने रस्ते बंद केले आहेत ना... एकदा का शहरात गेलात कि तिथून जाऊ शकता तुमच्या घरी... ",
" आणि तू... तुला नाही जायचे का घरी... " ,
" हो तर... जायचेच आहे... पण तुमची वाट वेगळी आहे... शिवाय पुढे गावात जायचे होते मला... तुम्हाला ज्या गाडीने जायचे आहे ती गाडी जवळच्या गावातून जाते, तुम्हाला सोडलं कि जाईन पुढे. " आकाशने बोलणं संपवलं. दोघेही गप्प. शेकोटी एकटीच काय ती जळत होती. आकाश पुन्हा विचारात गढून गेला. सईदेखील त्याला त्याच्याच आठवणींच्या स्वाधीन करून निघून गेली.


============================== ================================


"अमोल .. " कोमलने अमोलला हाक मारली. " पलीकडे एक गाव आहे. तिथे जाऊन एक s.t. पकडावी लागेल. ती तुला दुसऱ्या गावात घेऊन जाईल. तिथून पुढे आणखी एक गाडी पकडून शहरात जावे लागेल. तिथून तु दिल्लीला जाऊ शकतोस. " अमोलला कसं कळणार देव जाणे.
" माहित आहे जरा confusing आहे ते.. पण तोच option आहे तुला.. " कोमल ...
" ok ... बघतो मी... निघावे तर लागेल.. ",
" बघ ... अजून विचार कर.. नको राग ठेवूस डोक्यात.. " ,
" हे बघ कोमल.. , कोणावर राग नाही आहे. फक्त पप्पांनी बोलावलं म्हणून चाललो आहे. आणि आता काहीच नाही मनात माझ्या. सुप्रियालाच नाही बोलायचे माझ्याशी. मित्रसुद्धा मानत नाही आता ती. जाऊ दे, तुम्ही जमलं तर समजवा तिला. मी निघतो. " ,
" पण जाणार कसा.. नदी आहे मधेच... पलीकडे जायचे आहे तुला.. " ,
" मग ? पुढे ब्रिज वगैरे असेल ना.. " ,
" नाही .. पण एक होऊ शकते. नदी किनाऱ्यावर होड्या असतात. त्यांना बोलून जाऊ शकतोस " अमोल काही विचार करून निघाला. अर्थात वाईट वाटलं सुप्रीला. तरी काही करू शकत नव्हती ती.


============================== ================================


finally, आकाश - सईचा ग्रुप एका ठिकाणी पोहोचला. " इथून पुढे एक वाट आहे. जी तुम्हाला पुन्हा गावात घेऊन जाईल... तिथे विचारलं तर सांगेल कोणीही... कुठली गाडी पकडावी ते. " सईने सगळ्यांना सांगितलं.
" तू आता कुठे चाललास.... " ,
" इथून पुढे एक गाव आहे... तिथे एक आजी राहते. शेवटी जेव्हा आलेलो तेव्हा ४ दिवस तिने राहायला दिलं होते तिच्या झोपडीत. अर्धी भाकरी मला देयाची ती , तिच्या वाटणीची... तिला भेटूनच निघीन पुढे.... " ,
" मग आज शेवटची भेट का... " सईने आकाशकडे पाहिलं.
" सांगू शकत नाही... गणूच्या मनात आलं तर.... त्यालाच माहित... " आकाश...
" आम्हाला लक्षात ठेवणार का... मला तरी... " सई पुन्हा भावुक झाली.
" अजूनही सगळं आठवलं नाही मला.... तर आताच कसं विसरणार.... तुम्ही नेहमीच लक्षात राहणार माझ्या... आणि एक प्रॉमिस करतो मी.... जुने सगळं जरी आठवलं तरी .... तुम्हाला कधीच नाही विसरणार... "


साधारण , सकाळचे ८:३० वाजले होते. छान थंड हवा वाहत होती. आजूबाजूला छान हिरवाई होती. गेले २ दिवस पावसानेही उसंत घेतली होती. तीच संधी साधून नवे कोंब जमिनीतुन वर डोकं काढून बसलेले भासत होते. पायवाट अधिक हिरवी दिसतं होती. काही पक्षांचे थवे निघाले होते पुन्हा..... पोटा-पाण्यासाठी.... आणि आकाश निघायच्या तयारीत होता. सईसहित सगळयांना भरून आले. मग एकेकाने मिठी मारली त्याला. आलिंगन देऊन भटक्याला निरोप... सईची मिठी जरा लांबली.
" कधी भेटशील पुन्हा... " ,
" भेट होईल... कधी ते माहित नाही... "
" तू कधी आलास तर कसं कळेल मला.... मोबाईल तर वापरत नाहीस.... " सईचे प्रश्न संपत नव्हते. आकाश हसला त्या प्रश्नावर...
" पाऊस आहे ना.. तोच सांगेल तुम्हाला... मी जेव्हा येईन... " आकाशने पाटीवर त्याची सॅक लावली. सगळ्यांकडे एक नजर टाकली...आणि निघाला तो... वाईट वाटतं होते सईला... पण त्याची माणसं भेटली पाहिजे ना त्याला... स्वच्छ निळंशार आभाळ .... एक मोठ्ठा डोंगर समोर... सोबतीला हिरवाई... हिरवीचं पायवाट... आणि मोठ्या कॅनव्हास वर निघून चाललेला आकाश... सई त्याला नजरेआड होऊ पर्यंत बघत होती.


============================== ================================


" कसं वाटेल ग... मी कधी तुला सोडून गेलो तर.. " आकाशने सुप्रीला अचानक विचारलं.
" का ... कंटाळा आला का माझा... इतक्या लवकर.. " ,
" असंच विचारलं.. सांग तर ... " ,
" नाही... विचार केला.. खरंच .. तुझ्याशिवाय जगणं काय... ते नाही imagine करू शकत.... " ,
" खरंच का ... " ,
" हो.... असंच वाटायचं... गणूने माझी सगळी पुण्याई..... आतापर्यंत जेव्हडी चांगली कामे केली आहेत.. त्याचा प्रसाद म्हणजे तू... असंच वाटते अजूनही मला. काही गोष्टी आपल्याला न मागताच मिळतात..पण आठवणींचा शाप जाता जात नाही. किती वर्ष मी तो शाप घेऊन फिरत होते. तुझ्यामुळे त्या गोष्टी विसरण्यास शक्य झाल्या.... नाहीतर माहित नाही... आणखी किती वर्ष मी अशीच हरवत गेली असती स्वतःला... तुझ्यामुळे जगण्याला अर्थ मिळाला. तू जाण्याचा गोष्टी का करतोस... तू कधी जाणार नाहीस हे माहित आहे मला... आणि तुझी पाठ तर कधीच सोडणार नाही मी... " सुप्रीने आकाशला गच्च मिठी मारली.


अश्या खूप आठवणी होत्या दोघांच्या. पण सद्यातरी फक्त सुप्रीलाच ते आठवत होते. सुप्री अशीच विचार करत बसली होती. कुठे असेल आकाश... काय करत असेल... त्यात अमोल निघून गेलेला. कारण वेगळं असलं तरी, शेवटी अमोलने असे निघून जाणे तिला आवडलं नव्हतं. रात्रही खूप झालेली. उद्या सकाळी लवकर निघूया... असा विचार करत झोपायला गेली.



---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश:

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED