Mahanti shaktipithanchi - 5 books and stories free download online pdf in Marathi

महती शक्तीपिठांची भाग ५

महती शक्तीपिठांची भाग ५

१९)त्रिपुरा - त्रिपुरा सुंदरी शक्तीपीठ

त्रिपुराच्या उदयपूर जवळ राधाकिशोरपूर गावात आईचा डावा पाय खाली पडला.
इथे आईचे रूप “त्रिपुरासुंदरी “असुन सोबत शिवशंकर “त्रीपुरेश “रुपात विराजमान आहेत .
हे शक्तीपीठ त्रिपुरा आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर आहे .

महाविद्या समाजात त्रिपुरा नावाच्या अनेक देवी आहेत , त्यापैकी त्रिपुरा-भैरवी, त्रिपुरा आणि त्रिपुरा सुंदरी विशेष उल्लेखनीय आहेत.
देवी त्रिपुरासुंदरी म्हणजे ब्रह्मा स्वरूप, भुवनेश्वरी विश्वमोहिनी.
तीच देवी, महाविद्या, त्रिपुरसुंदरी, ललितांबा इत्यादी अनेक नावांनी आठवतात.
शक्ती संप्रदायात त्रिपुरासुंदरीला एक विलक्षण महत्त्व आहे.
दक्षिण-त्रिपुरा उदयपूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर, राधा किशोर गावात माताबाढि पर्वत शिखरावर उदयपूर शहराच्या दक्षिण-पश्चिमेस राज-राजेश्वरी त्रिपुर सुंदरीचे भव्य मंदिर आहे.

याला 'कोराबीपीठ' असेही म्हणतात.

मंदिराचे प्रांगण कोरमप्रमाणेच आहे, आणि मंदिरात लाल-काळ्या कास्टिक दगडाने बनलेली आई महाकालीची मूर्ती देखील आहे. याशिवाय अर्धा मीटर उंच एक छोटी मूर्ती असून त्याला मटा म्हणतात.
असे म्हटले जाते की त्रिपुरा राजा शिकार करण्यासाठी किंवा युद्धासाठी जात असतांना ही मुर्ती ठेवत असे.

त्रिपुरावर बादशहाची सत्ता असताना एका रात्री त्याला स्वप्नात आई त्रिपुरेश्वरी दिसली आणि म्हणाली की चिंतागावच्या डोंगरावर तिची एक मूर्ती आहे, ती रात्रीतून आण.
मात्र आजच रात्री ती आणावी लागेल .
स्वप्न पाहिल्यावर राजा जागा झाला व त्याने ताबडतोब सैनिकांना रात्री मूर्ती आणण्याचे आदेश दिले.
सैनिक मूर्ती घेऊन परत येत होते पण मतबारीला पोहोचल्यावर सूर्योदय झाला आणि आईच्या आदेशानुसार तेथे मंदिर बांधले गेले आणि मूर्ती स्थापित केली गेली.
राजाला मंदिर बांधायचे होते, पण त्रिपुरेश्वरीची मूर्ती बसवल्यामुळे राजा चिंतेत पडला की आता त्याने तेथे कोणाचे मंदिर बांधावे?
पण अचानक अशी आकाशवाणी झाली की विष्णू ज्या ठिकाणी मंदिर बांधणार होते तेथे राजाने आई त्रिपुरा सुंदरीचे मंदिर बांधावे आणि राजाने ते केले
हे मंदिर नंतर 'त्रिपुरा सुंदरी' मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
राजा विष्णू तिथे होते ही दंतकथा देखीलआहे..

मंदिराच्या मागे पूर्व दिशेला ४.४ एकर जागेवर एक तलाव आहे, त्याला “कल्याणसागर” म्हणतात.
त्यात मोठे कासव आणि मासे आहेत, ज्यांच्या नैसर्गिक मृत्यूकरिता (कासवा / मासे दफन करण्यासाठी )स्वतंत्र जागा आहे, जिथे याजकांचे थडगे बांधले आहेत.
सर्वात जवळचे विमानतळ आगरतळा येथे आहे, तेथून सहजपणे रस्त्याने मंदिरात पोहोचू शकतात .


२०)चट्टल – भवान शक्तीपीठ

बांगलादेशातील चटगांव (चटगांव) जिल्ह्याजवळ चंद्रनाथ पर्वत शिखरावर छत्रल (चट्टल किंवा चहल) मध्ये आईचा उजवा बाहू पडला.
चट्टल शक्तीपीठ बांग्लादेशच्या चटगांव जिल्ह्यातील सातकुंडा स्टेशनवर आहे.
इथे आईचे रूप “भवानी ” असुन सोबत ,शिवशंकर “चंद्रशेखर “रुपात विराजमान आहेत .

21) त्रिस्रोटा – भ्रामरी शक्तीपीठ

हे शक्तीपीठ सालबाढ़ी गाँव, बोडा मंडल, जलपाइगुड़ी जिला, पश्चिम बंगाल इथे आहे .
सालबाढ़ी गावात त्रिस्रोथ या ठिकाणी आईचा डावा पाय पडला.
देवी भ्रामरी म्हणजे पार्वतीचा एक अवतार आहे .
भ्रामरी येथे मधमाशांना देवीच्या रूपात ओळखले जाते .
देवी महात्म्य या गाथेत त्याचा उल्लेख मिळतो .
देवी भागवत पुराण मध्ये संपूर्ण ब्रह्मांडातील जीवांसाठी तिची महानता दाखवली गेली आहे आणि तिच्या सर्वोच्च शक्तिचे वर्णन केले गेले आहे .
याची कथा अशी सांगतात
एकदा अरुणासुर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता.
तो देवी देवतांचा तिरस्कार करीत असे .
त्यांना या विश्वातून बाहेर काढून फेकायला इच्छित होता .
त्याने हिमालयात जाऊन भगवान ब्रह्माची घोर तपश्चर्या केली .
त्याच्या कठोर तपश्चर्ये मुळे भगवान ब्रह्माने त्याला या पृथ्वीवरील आणि स्वर्गातील सर्व जीवित प्राण्यापासून त्याचे रक्षण होईल असे वरदान दिले .
या महान वरदानामुळे तो फार गर्विष्ठ झाला.
त्याने स्वर्गात जाऊन स्वर्गलोक जिंकला .
स्वर्गलोक आणि अन्य देवलोक यावर पण त्याने विजय मिळवला .
नंतर देवता, ऋषि, आणि अनेक पवित्र लोकांनी प्रार्थना केल्यानंतर माता पार्वतीने मधमाशीच्या रूपात अवतार घेतला आणि कित्येक दिवस त्या राक्षसाबरोबर लढली आणि शेवटी त्याचा वध करून संपूर्ण ब्रह्मांडाचे रक्षण केले.
माता भ्रामरीला मुख्यत: मधमाशांच्या हल्यापासून वाचण्यासाठी पूजले जाते .
ती सर्व प्रकारच्या गंभीर आजारांचा इलाज करते आणि आपल्या आध्यात्मिक स्पर्शाने भक्तांचे मन शांत करते .
भक्तांना एक पवित्र व्यक्ती बनवते .
भक्तांच्या सर्व अनैतिक व वाईट विचारांना त्यांच्या मनातून हटवते .
त्यामुळे त्यांचे ध्यान फक्त भक्तीवर केंद्रित होते .
दिव्य माता असल्याने ती नेहेमीच भक्तांच्या बोलावण्याची वाट पहात असते आणि सहजपणे त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देते .
व ताबडतोब त्यांना दर्शन देते .
फक्त भक्तांनी शुद्ध भक्तिने तिची पूजा करायला हवी .
इथे आई रूप “भ्रामरी” असुन सोबत शिवशंकर “अंबर किंवा “भैरवेश्वर “रुपात विराजमान आहेत .

२२) प्रयाग- ललिता शक्तीपीठ

अलाहाबाद यमुना नदीपासून काही अंतरावर मीरापूर परिसरातील प्राचीन महाशक्ती पीठाच्या मंदिरामध्ये शहराच्या मध्यभागी आईची हस्तांगुली ( करंगळी ) पडली .
त्याच ठिकाणी भाविकांनी आईचे भव्य मंदिर बांधले.
या शक्तीपीठला “ललिता “म्हणून देखील ओळखले जाते.
येथे आई भगवती, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या चार रुपात आहे.
मंदिरात प्रवेश केल्यावर दैवी शक्तीची भावना मनात येते.
संकट मोचन हनुमान, राम, लक्ष्मण ,सीता आणि नवग्रहातील दैवी मूर्ती उजव्या बाजूला स्थापित केल्या आहेत.
आत राधा-कृष्णाच्या भव्य मूर्ती आहेत.
अलाहाबादमधील तीन मंदिरे मातृशंतातून शक्तीपीठ मानली जातात आणि तिन्ही प्रयाग शक्तीपीठाच्या शक्ती ललिताची आहेत.
अक्षयवट (किल्ला) जवळ मीरापूर आणि अलोपी मंदिराची ही तीन मंदिरे आहेत.
इथे आईचे रूप “ ललिता” आहे सोबत शिवशंकर “भव” रुपात विराजमान आहेत .
अक्षयवट किल्ल्यातील कल्याणी-ललिता देवी मंदिराजवळ ललितेश्वर महादेवाचे मंदिर देखील आहे.
मत्स्यपुराणात उल्लेखित १०८ शक्तीपीठांमधील देवीचे नाव “ललिता” असे आहे.
इथे लोककल्याणासाठी हवन केले जाते .
दररोज मंदिरात आईचे पुजन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते .
शतचंडी यज्ञाचे आयोजन मानव कल्याणासाठी केले जाते .
अलाहाबाद ते ललिता देवी मंदिर (शक्तीपीठ) दरम्यान अंतर 3 किलोमीटर आहे.

२३)जयंती शक्तीपीठ

हे शक्तीपीठ शिलाँगपासून 53 किमी अंतरावर आहे.
मेघालय हे भारताच्या पूर्वेकडील भागातील एक डोंगराळ राज्य आहे आणि येथील गारी, खासी, जैंटिया हे मुख्य डोंगर आहेत.
संपूर्ण मेघालय हा पर्वतांचा प्रांत आहे.
बांगला देशाच्या सिल्हैट जिल्ह्यात जयंती या प्रदेशातील भोरभोग गाँवात कालाजोर च्या खासी पर्वतावर 'जयंती शक्तीपीठ' आहे, जिथे आई सतीची "डावी मांडी" पडली होती .
जैंतिया डोंगराच्या बाऊर भागात शक्तीपिठाचे गाव आहे.
इथे आईचे रूप 'जयंती' आहे, सोबत शिवशंकर 'क्रमदिश्वर' रुपात विराजमान आहेत.
शिलाँग रेल्वेने जोडलेले नाही, म्हणून जवळचे रेल्वे स्टेशन गोलपारा टाउन किंवा लुमडिंग आहे, तेथून प्रवास रस्त्याने करता येतो.

2४) जुगाड्या भूतधात्री शक्तीपीठ

हे शक्तीपीठ खीरग्राम, वर्धमान जिला, पश्चिम बंगाल मंगलकोट इथे आहे .
इथे आईच्या उजव्या पायाचा मोठा अंगठा पडला होता .
इथे आईचे रूप “जुगाड़्या”किंवा “भूतधात्री “असून सोबत शिवशंकर “क्षीर खंडक” रुपात विराजमान आहेत .

25)कन्याश्रम – सर्वाणी शक्तीपीठ

हे शक्तीपीठ कन्याकुमारीच्या मंदिरात भद्रकालीचे एक मंदिर तीन समुद्रांच्या संगमावर आहे .
ती कुमारी देवीची मैत्रिण आहे.
ईथे सती आईची पाठ पडली होती.
इथे आईचे रूप “शक्ती शार्वणी किंवा नारायणी “असुन सोबत शिवशंकर ” निमिश किंवा स्तपमा “रुपात विराजमान आहेत
कन्याकुमारी हे एक बेटआणि भारताची शेवटची दक्षिण सीमा आहे, ज्याबद्दल असे सांगितले जाते की इथे स्नान करणारा मनुष्य सर्व पापांपासून मुक्त झाला आहे.
देवी मंदिराच्या दक्षिणेस मातृतीर्थ, पितृतीर्थ, भीमतीर्थ आहे.
पश्चिमेस थोड्या अंतरावर स्थान आहे .
कन्याश्रम मंदिर समुद्र किनाऱ्यावर आहे.
तेथे स्नानासाठी घाट आहे, जिथे गणेशाचे मंदिर आहे.
मंदिरात अनेक देवता आहेत.
मंदिरापासून थोड्या अंतरावर पुष्करणी आहे.
समुद्र किनारपट्टीजवळ एक अजब कुंड आहे ज्यात गोड पाणी आहे.
त्याला “मंडूक तीर्थ “म्हणतात.
यात भक्त स्नान करतात.
समुद्रापासुन थोड्या अंतरावर विवेकानंद शिला आहे , तेथे स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे.
स्वामीजी येथे बसून ध्यान करीत असत.
कन्याकुमारी हे रेल्वे व रस्त्याद्वारे जोडलेले आहे.
हे त्रिवेंद्रमपासून 80 किमी अंतरावर आहे.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED