Thodasa is in love, there is little left…. - 7 books and stories free download online pdf in Marathi

थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी .... - 7

अरोही च रडणे बघून आदी तिला म्हणला ...अरु, सॉरी ...मला तुला दूख्वय्चे नव्हते . अगं, छोटासा प्रॉब्लेम जाहला होता ....ऑफीस मधे ..... मझा एक मित्र आहे ...आदी अरोही ला सांगू लागला ....त्याचा छोटासा पर्सनल प्रॉब्लेम होता .त्यामुळे त्याला ऑफीस च्या अकाउंट मधून पैसे काढावे लागले . आणि आता बॉस ला हे समजल्याने त्यला आता नोकरीवरून काढून टाकावे लागणार होते .मला सकाळी त्याचा फोन आला होता . त्याला दोन गोष्टीची मदत हवी होती . एक म्हणजे त्यला अकाउंट मधे भरायला पैसे ...आणि दुसरी म्हणजे त्यला कामावरून काढून नये ...म्हणून मी साहेबाशी बोलावे अस त्यला वाटत होते . अगं ....खूप गरीब आहे तो ...माणसाची परीस्तीथी माणसा कडून काय काय नाही करून घेत? आदी च बोलण ऐकून अरोही ला आदींचा अभिमान वाटला .पण, आपला टाईम, वेळ त्याने दुसऱ्या व्यक्तीला दिला ...म्हणून त्याचा थोडासा राग पण आला . पण, ती फार काही आदी ला बोलली नाही .
दुसऱ्या दिवशी आदी आणि अरोही महाबळेश्वरून घरी निघाले . अरोही दोघांची ही बँग आवरली .आणि दोघे ही निघाले . जाताना आदी ने अरोही चा मूड चांगला करण्याचा खूप प्रयत्न केला . अरोही आणि आदी दोघे ही घरी आले . दुसऱ्या दिवशी अरोही तिच्या माहेरी सोळाव्या सठि जाणार होती . बायको माहेरी जाणार म्हणून, आदी ही थोडासा नाराज होता ..तिने आपल्याला सोडून कुठेच जाऊ नये ...कायम आपल्याच जवळ रहावे, अस आदीला वाटत होते . नवीन नवीन लग्नात हे सगळ चालायचंच... अरोही ने महाबळेश्वर ला गेलेली बँग काढली .आणि माहेरी जायची बँग भरली . माहेरी ती फक्त दोन ते तीन दिवसांसाठीच जाणार होती .मग आदी, अरोही आणि आदी ची आई तिघेजण ही मुंबई ला जाणार होते . लग्न झल्यापसून आदी ची नुसती गडबड च चालू होती .........नुसते ई कडे जा तिकडे जा ...चालूच होते .... संध्याकाळची जेवण जाहली. अरोही ने भांडी घासायला घेतली . अरोही भांडी घासत असताना तिथे आदी आला ....त्याने तिला भांडी घासायला मदत केली . दोघांनी हसत खेळत भांडी घासली ...आणि मग आदी आणि अरोही सगळ आवरून बेडरूम मधे झौपय्ल निघून गेली .आदी ची आई ही हॉल मधे झौपय्ल निघून गेली . ई कडे आदी आणि अरोही दोघांनी ही रात्र भर खूप गप्पा मारल्या ... अरोही ला खूप छान वाटल .गप्पा मारून झल्यावर अरोही नी हसत हसत आदी ला प्रश्न विचारला ......आदी, मी गेल्यावर तुला करमेल का? तिच्या ह्या प्रश्नांवर आदी च्या डोळ्यात पाणी आले, आणि ओठांवर हसू ... पूरशा च असच असत ... त्यला दुःख लपवता ही येत नाही ...आणि सांगता ही येत नाही . मग उरत फक्त डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू ..... अरोही ला तिच्या प्रश्नाच उत्तर मिळाल. आणि स्वतःचा अभिमान ही वाटला . की, ऐत्के चांगला नवरा आपल्याला मिळाला.... तिने आदी ला प्रेमाने जवळ घेतले ... मायेने त्याच्या पाठीवर कुरवाळले . आदी च्या डोळ्यातून घळ घळ पाणी वाहू लागले . आदी ने अरोही ला आणखीन घट्ट मिठी मारली . तिच्या मिठीत च आदी अरोही ला म्हणला .....अरु, .....नको ना ग जाऊ ...सवय जाहली ग तुझी ....नाही करमनार मला .......खरंच नाही करमनार ....अरोही ने पुन्हा आदींची पाठी वरून मायेने हात फिरवला .आणि ती बोलू लागली ....आदी, मला जावे लागेल रे ...आई, बाबा वाट बघत असतील .त्याच्यासाठी तरी जावेच लागेल . आणि दोन तीन दिवसांसाठीच तर मी जाणार आहे .मग परत येणार च आहे . मग आपण मुंबई ला जाऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरवात करू .... तिथे फक्त तू आणि मी .... आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरवात . अरोही च्या बोलण्यावर दोघांनी आपले डोळे पुसले .....आणि मिठी सोडली . आदी ने प्रेमाने अरोही कडे बघितले . खूप उशीर जाहला आहे, आता झौप .....उद्या सकाळी तुला जायचय .... लवकर जा ....आणि ...लवकर या ...आह्मी वाट बघतोय . यावर दोघे ही गोड हसले .आणि दोघे ही झोपी गेले .
सकाळ जाहली .सकाळ नेहमी सारखीच होती .पण, माहेराला जायच म्हणून अरोहीचा चेहरा जरा जास्तच खुलला होता . सकाळी लवकर उठून ती स्वयंपाकाला सूध्हा लागली होती . अरोही च्या पाठोपाठ आदी आणि आदींची आई दोघे ही उठले .लवकर उरकून ते ही तिची मदत करयला आले .हसत खेळत कामे चालली होती .अरोही तर खूप खुश होती . दुपारचे लवकरच अरोही चे काका तिला नह्यला आले . जेवण जाहली .आणि अरोही जायला निघाली . आदी तिला गाडी पर्यंत सोडवायला निघाला .अरोही आणि अरोहीचे काका गाडीत बसले .आणि गाडी निघाली . आदी तिथेच उभा होता . अरोही ने मागे वळून पहिले .तर आदी त्याचे डोळे पुसत उभा होता . आदिला बघून तिच्या डोळ्यात ही पाणी आले . गाडी पुढे पुढे चालत होती .आणि तिचा आदी तिच्या पासून दूर दूर चालला होता .थोड्या वेळाने तो दिसेनासा जाहला . अरोही ला आपण आदी पासून दूर जाहलो ह्याच दुःख ही होतच, पण आई वडील आपल्याला भेटणार ह्याचा आनंद ही होता .
एक दीड तासाचा प्रवास करून अरोही तिच्या माहेरी आली . तिच्या काकांनी तिला तिच्या घरी सोडले .आणि ते निघून गेले . अरोही ला घरात बघून तिच्या आई वडिलांना खूप आनंद जाहला . शिवाय तिचा तो साडी तल ते रूप खूपच सुंदर दिसत होत . अरोही घरी आल्यापासून तिचे आई वडील सगळ तिच्या आवडीच्च करत होते . तिच्याच घरची आणि तिच्याच माणसाची तिला नव्याने ओळख होत होती . पण सगळ तिचंच असून सूध्हा तिला करमत नव्हते . तिला चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते . पहिल्यांदा तिला ...आपण आदि ला किती मिस करतोय ...ह्याची जाणीव जाहली . माहेरचे दोन तीन दिवस असे च निघून गेले .आणि आता अरोही ची सासरी जायची वेळ आली . ती सगळ आवरून तयार होती .तिची नन्द आणि नंदेचा नवरा तिला न्ह्यायाला येणार होते . पाहुणे आले .... जेवण खाव्णे जाहली ... आणि आता अरोही सासरी जायला निघाली . जाताना तिने सगळ्याचा निरोप घेतला ...तिच्या डोळ्यातून घळघळ धारा लागल्या होत्या .हातातील रूमलाने ती त्या पुसत होती . भरल्या डोळ्याने आणि जड अंतःकरण नेच ती गाडीत बसली .आणि गाडी निघाली .मुलीच असच असत .....थोड्यावेलाचा आनंद घेऊन येतात .आणि मग .......... असो ......अरोही तिच्या सासरी आली . त्यांना रात्रीच मुंबई साठी निघावे लागणार असल्यामुळे ..
आदी ची आणि तिच्या आई ची आवराआवर चालु होती . सगळ आवरून अरोही, आदी आणि आदींची आई तिघेही मुंबई साठी निघाले . नवीन स्वप्ने, नवीन आशा ...मुंबई गेल्यावर अस करायच, तस करायच ....आपला संसार असा मांडायचा एक ना अनेक अशी अनेक स्वप्ने अरोही च्या डोळ्यात होती . तस तीच ही काही चुकत नव्हते .मुंबई आहेच अशी ..की, प्रत्येकाला तीच वेड असते .ह्या जन्मत एकदा तरी मुंबई ला जायला मिळावे ..म्हणून प्रत्येक माणूस धडपडत असतो .


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED