स्वराज्यसूर्य शिवराय

(941)
  • 150k
  • 1.1k
  • 61.2k

'स्वराज्यसूर्य शिवराय' ही माझी चरित्रात्मक कादंबरी मातृभारती या लोकप्रिय साइटवर पंचवीस भागामध्ये प्रकाशित झाली आहे. आतापर्यंत ही कादंबरी दहा हजार लोकांनी वाचली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा परिचय, त्यांच्या विविध पराक्रमाचे वर्णन, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, त्यांचा गनिमी कावा, धाडस, साहस, जीवाला जीव लावणारे सवंगडी, शत्रूला सळो की पळो करणारी नीती, अशा सर्व बाबींवर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे. शेकडो वर्षे झाली परंतु श्री शिवाजी महाराजांची लोकप्रियता दिवसेंदिवस, उत्तरोत्तर वाढत आहे. शिवराय हे महाराष्ट्रातील जनतेचे दैवत आहे. सिनेमा, नाटक, कथा, कादंबरी, चरित्र, पोवाडे, गाणी इत्यादी कुठल्याही प्रकारात शिवरायांचे वर्णन पुढे येताच शिवभक्त क्षणभर थांबतो, पाहतो, गुणगुणायला लागतो. भक्तीभावाने महाराजांना वंदन करून मगच पुढे जातो. आबालवृद्धांना आवडणारे, भावनारे अनेक प्रसंग शिवरायांच्या जीवनात घडून गेले आहेत. शिवरायांच्या पूर्वीचा महाराष्ट्र, भोसले घराणे, शहाजी राजे भोसले यांचे पराक्रम,अफजलखानचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून चातुर्याने करून घेतलेली सुटका, पावनखिंडीत बाजीप्रभूने केलेला पराक्रम, मुरारबाजीचा साहसी पराक्रम, प्रतापराव गुजर यांनी केलेले जगावेगळे धाडस अशा शेकडो घटना पुन्हा पुन्हा शिवभक्तांना मंत्रमुग्ध करतात, स्फूर्तीदायी ठरतात. जिजाऊ! शिवाजी महाराजांच्या मातोश्री! शिवरायांच्या जीवनात धाडसाचे, पराक्रमाचे, स्वराज्य स्थापनेचे बीजांकुरण करताना शिवरायांना धीर देणारे, मार्गदर्शन करणारे एक प्रमुख व्यक्तीमत्त्व! छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेकांनी लिहिले आहे. मी या कादंबरीच्या निमित्ताने एक उत्तुंग व्यक्तीत्त्व वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हे महत्वाचे चरित्र लिहिताना मातृभारती संस्थेचे मुख्य श्री महेंद्र भाई शर्मा, मातृभारती मराठी विभाग प्रमुख अनुजा कुलकर्णी आणि मातृभारतीच्या सर्व संबंधित यांनी सहकार्य केले त्यामुळेच हे करु शकलो. कादंबरी वाचून अनेक वाचकांनी भरपूर प्रतिसाद दिला या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद! नागेश सू. शेवाळकर

Full Novel

1

स्वराज्यसूर्य शिवराय - 1

पुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. ...अजून वाचा

2

स्वराज्यसूर्य शिवराय - 2

पुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. ...अजून वाचा

3

स्वराज्यसूर्य शिवराय - 3

पुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. ...अजून वाचा

4

स्वराज्यसूर्य शिवराय - 4

पुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. ...अजून वाचा

5

स्वराज्यसूर्य शिवराय - 5

पुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. ...अजून वाचा

6

स्वराज्यसूर्य शिवराय - 6

पुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. ...अजून वाचा

7

स्वराज्यसूर्य शिवराय - 7

पुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. ...अजून वाचा

8

स्वराज्यसूर्य शिवराय - 8

पुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले. ...अजून वाचा

9

स्वराज्यसूर्य शिवराय - 9

बंड! होय बंड! शिवरायांनी जे स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न सुरू केले होते, हक्काची लढाई सुरू केली होती ती आदिलशाहीच्या दृष्टीने प्रकारचे बंडच होते. सुरुवातीला आदिलशाही दरबारी ज्या तक्रारी जात होत्या तिकडे दरबाराने 'उनाड पोरासोरांचे उद्योग' म्हणून कानाडोळा केला. परंतु शिवरायांची घोडदौड थांबत नव्हती ते एकामागून एका किल्ल्यावर भगवे निशाण फडकवत होते. आदिलशाहीकडे रोज नवनव्या तक्रारी येत होत्या. आदिलशाहा गंभीर झाला. ह्या पोराचे बंड मोडून काढण्यासाठी काय करावे या विचारात तो असताना त्याने शहाजीराजांना जाब विचारला. राजेही विचारात पडले, काय उत्तर द्यावे. शेवटी शहाजी राजेंनी उत्तर पाठवले, ...अजून वाचा

10

स्वराज्यसूर्य शिवराय - 10

शिवरायांची यशस्वी घोडदौड चालू असताना त्यांच्या जीवनात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एक अत्यंत वाईट तर एक आनंदी अशी. शिवरायांचे बंधू संभाजीराजे हे लहानपणापासूनच शहाजीराजे यांच्यासोबत कर्नाटकात राहात असत. तेही अत्यंत शूर, धाडसी, पराक्रमी होते. त्यावेळी अफजलखान कर्नाटकातील कनकगिरीच्या गडावर हल्ला करण्यासाठी कर्नाटकात पोहोचला होता. त्याला मदत करावी असा आदेश आदिलशाहीने संभाजीराजेंना दिला होता. त्या हुकुमानुसार संभाजीराजेंनी अफजलखानासोबत कनकगिरीच्या किल्ल्याला वेढा घातला होता. ...अजून वाचा

11

स्वराज्यसूर्य शिवराय - 11

अफजलखानाच्या प्रचंड पराभवाचा आदिलशाहीने फार मोठा धसका घेतला होता. का घडले? कसे घडले? अफजलखानासारखा बलाढ्य सरदार केवळ पराभूतच होत तर स्वतःच्या जीवाला मुकतो ह्या गोष्टीवर आदिलशाही दरबार विश्वास ठेवूच शकत नव्हता. पाठोपाठ शिवरायांनी वाई हा प्रांत, कोल्हापूरच्या आसपासचा फार मोठा प्रदेश ताब्यात घेतला असल्याचीही बातमी दरबारात पोहोचली. कोल्हापूर काबीज करून शिवाजी नक्कीच पन्हाळगडावर हमला करणार ही शक्यता लक्षात येताच आदिलशाही जबरदस्त हादरली. आदिलशाही बेगम आणि तिचा पुत्र अतिशय चिंतेत पडले होते. या शिवाजीचा बिमोड कसा करावा, त्याला कसे आवरावे ह्या काळजीत सारे होते. पण शिवराय एका मागोमाग एक धक्के देत होते. ...अजून वाचा

12

स्वराज्यसूर्य शिवराय - 12

स्वराज्यावर आलेली संकटाची मालिका खंडित होण्याची शक्यता दिसत नव्हती. स्वतः शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यात पन्हाळगडावर अडकले होते. जौहर भर वेढा शिथिल होऊ देत नव्हता. दुसरीकडे शाईस्तेखान लालमहालात बसून स्वराज्याची हानी करत होता. तातडीने काहीतरी निर्णय घेणे आवश्यक होते. युक्ती, शक्ती, गनिमीकावा वापरून गनिमांना हैराण केलेच पाहिजे या विचाराने शिवरायांनी एक धाडसी निर्णय घेतला. एक जोखीम पत्करण्याचे ठरवले. विश्वासू सहकाऱ्यांनाही शिवरायांचे म्हणणे पटले. त्यांनीही होकार दिला. लगेचच सर्वांनी मिळून त्या योजनेला मूर्त स्वरूप देण्याची योजना आखण्याची तयारी सुरू केली. हे सारे करत असताना कमालीची खबरदारी घेतली जात होती. 'भिंतीला असणाऱ्या कानांनाही' आणि सिद्दीच्या खबऱ्यांनाही काहीही कळू नये याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले जात होते.. ...अजून वाचा

13

स्वराज्यसूर्य शिवराय - 13

सिद्दी जौहर याच्या विषारी विळख्यातून बुद्धीचातुर्याने, धाडसाने, युक्तीने शिवराय सहीसलामत सुटले. स्वराज्याच्या गळ्याशी आलेले फार मोठे संकट टळले परंतु बाजीप्रभू देशपांडे याजसारखा पराक्रमी मोहरा कायमचा सोडून गेला हे फार मोठे दुःख शिवरायांना झाले. दुसरीकडे आदिलशाही शिवरायांकडून एकामागोमाग एक होणाऱ्या पराभवाने त्रस्त झाली होती, भयभीत झाली होती. अफजलखानाच्या पाठोपाठ सिद्दी जौहरचा झालेला पराभव जास्तच झोंबत होता. ...अजून वाचा

14

स्वराज्यसूर्य शिवराय - 14

शाहिस्तेखानावरील विजय ही एक प्रचंड बळ देणारी घटना होती. स्वराज्यावर आलेले फार मोठे संकट शिवरायांनी अत्यंत चातुर्याने, धाडसाने, नियोजनाने, सोडविले परंतु शाईस्तेखानाने आणि त्याच्या फौजेने स्वराज्याची आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि प्राण हानी फार मोठ्या प्रमाणात केली होती. आर्थिक हानी कशी भरून काढता येईल हा विचार शिवराय सातत्याने करीत होते. विचार करता करता अचानक त्यांच्या समोर औरंगजेबाच्या ताब्यात असलेल्या सुरत या शहराची आठवण झाली. सुरत म्हणजे अत्यंत श्रीमंत असे शहर. शिवरायांनी ठरविले की, स्वराज्याची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सुरतेवर छापा टाकायचा आणि त्या शहरातील व्यापारी, श्रीमंत लोक यांच्याकडून वसुली करून झालेले स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढायचे. ह्या छाप्यातून मिळणारी संपत्ती औरंगजेबाने विस्कटलेली स्वराज्याची घडी नीट बसविण्यासाठी कामी येणार होती. ...अजून वाचा

15

स्वराज्यसूर्य शिवराय - 15

शिवराय सुरतेवरून निघाले ते औरंगजेबाला आर्थिक बाबतीत फार मोठा धडा शिकवून. औरंगजेबाच्या मामाने स्वराज्याची जी लुट केली होती त्याचा घेऊन शिवराय निघाले. मनात एक आनंद होता, समाधान होते. ही बातमी केव्हा एकदा माँसाहेबाना सांगावी, सोबतचा सारा ऐवज त्यांच्यापुढे कधी ठेवावा, सारी कथा त्यांना कधी ऐकवावी अशा एका वेगळ्याच अवस्थेत शिवराय राजगडाच्या दिशेने दौडत होते. परंतु येताना जो जोश, जो आवेश मावळ्यांमध्ये होता तो जाणवत नव्हता कदाचित लागोपाठ घडत असलेला प्रवास, सुरत शहरात अविश्रांत केलेली कामगिरी किंवा वाहनांच्या पाठीवरील वाढलेले 'धनाचे' ओझे...... तिकडे राजगडही आतुर झाला होता, उतावीळ झाला होता. ...अजून वाचा

16

स्वराज्यसूर्य शिवराय - 16

शहाजीराजांच्या आकस्मिक निधनानंतर जिजाऊंचे मन सती जाण्यापासून वळविण्यात शिवराय यशस्वी झाले. सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. जिजाऊंशिवाय स्वराज्य स्थापन करण्याची चालू ठेवण्याची कल्पनाच शिवराय सहन करू शकत नव्हते. शहाजी राजे ....शिवरायांचे वडील अचानक गेले. त्या जबरदस्त अशा धक्क्यातून शिवराय हळूहळू सावरले. दुःख करत बसायला वेळ तरी कुठे होता? शिवरायांनी पुन्हा स्वराज्याकडे लक्ष केंद्रित केले. मुधोळ, कुडाळ हे विजय आणि कोकणातील एका बेटावर सिंधुदुर्गसारख्या बळकट किल्ल्याची बांधणी करण्या- सोबतच वेंगुर्ल्याची मोहिम अशा काही यशस्वी मोहिमा शिवरायांनी पूर्ण केल्या.… ...अजून वाचा

17

स्वराज्यसूर्य शिवराय - 17

पुरंदरच्या धुमश्चक्रीत किल्लेदार पडला. परमवीर कोसळला. मरण समोर दिसत असताना नाही खचला. मुरारबाजी शरण नाही गेला. प्रलोभनास नाही भुलला. जीवलग अमर झाला. स्वराज्याचा शिलेदार कामी आला. जाताना ताठ मानेने गेला. स्वराज्याचे शिर उंचावून गेला. भगव्याची शान राखत गेला. पुरंदरची शान गेली. अभिमान गेला. पुरंदरवरील मावळ्यांना अतीव दुःख झाले. प्रचंड धक्का बसला.पण त्या बहाद्दरांनी जिद्द सोडली नाही. धीर सोडला नाही. ...अजून वाचा

18

स्वराज्यसूर्य शिवराय - 18

पुरंदरचा तह झाला. एक भळभळती, सलणारी, बोचणारी जखम घेऊन शिवराय राजगडावर पोहोचले. केलेला तह त्यांच्या जिव्हारी लागला होता. मावळ्यांनी सांडून, प्राणांची आहुती देऊन जिंकलेले तेवीस किल्ले मिर्झाराजेंना सहजासहजी द्यावे लागले ही बोचणी शिवरायांना सतावत होती. पाठोपाठ संभाजीराजेंना औरंगजेबाने दिलेली सरदारकी स्वीकारण्याची पद्धती ही शिवरायांसाठी क्लेशदायक होती. शिवरायांची परिस्थिती अत्यंत उदासीन झालेली असताना मिर्झाराजेंचे अजून एक फर्मान आले. त्याप्रमाणे आदिलशाहीवर मिर्झाराजे चालून जाणार होते आणि त्या मोहिमेत शिवरायांनी सामील होऊन विजापूरकरांचा पराभव करण्यासाठी सर्व मदत करावी, प्रत्यक्ष युद्धात सहभागी व्हावे असा तो आदेश होता. त्याप्रमाणे शिवरायांना स्वतःच्या सैन्यासह मिर्झाराजेंच्या फौजेत समाविष्ट व्हावे लागले. फार मोठी फौज घेऊन मिर्झाराजे आदिलशाहीवर चालून गेले. घनघोर युद्ध पेटले. ...अजून वाचा

19

स्वराज्यसूर्य शिवराय - 19

अडकला! स्वराज्यसूर्य अडकला! शहाजी-जिजाऊंचा सुत अडकला! औरंगजेबाच्या पिंजऱ्यात अडकला! स्वराज्याचा,माँसाहेबाचा चेहरा काळवंडला. घात झाला. औरंगजेबाने दगा दिला. शिवरायांना कैदेत नजरकैद असली तरीही काय झाले, शेवटी तुरूंग तो तुरूंगच! सततचा खडा पहारा छातीवर! जंगलात एखाद्या शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेला सिंह डरकाळी फोडून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो, जाळे कुरतडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो परंतु शिवाजी नामक वाघाला काहीही करता येत नव्हते. त्यांचेवर करडी नजर होती. ...अजून वाचा

20

स्वराज्यसूर्य शिवराय - 20

आग्रा येथून सुटका होऊन तीन-साडेतीन वर्षांचा काळ लोटत होता. शिवरायांनी या कालावधीत तसा संपूर्ण विसावा घेतला. स्वराज्याची विसकटलेली घडी प्रयत्न केला. परंतु ह्रदयात एक जखम तीव्रतेने सलत होती ती म्हणजे पुरंदरचा तह! मिर्झाराजेंसोबत केलेल्या तहात गेलेले तेवीस किल्ले स्वराज्यात कसे येतील, कसे आणता येतील या संबंधीचा विचार शिवरायांना अस्वस्थ करीत होता. एकेदिवशी शिवराय आणि माँसाहेब राजगडावर बसले होते. राजगडापासून दूरवर असलेला कोंढाणा किल्ला दिसत होता. माँसाहेब तिकडे लक्ष लावून पाहात असताना अचानक शिवरायांकडे बघून म्हणाल्या, ...अजून वाचा

21

स्वराज्यसूर्य शिवराय - 21

महाराष्ट्र ही संतांची भूमी! अनेक संतश्रेष्ठ या भूमीत होऊन गेले. त्यांनी धार्मिक जागृती तर केलीच परंतु सोबत राजकीय आणि या संदर्भात जाणीव जागृतीचे महान काम केले. त्यासाठी कीर्तन, अभंग, दोहे, भजन, गवळणी, भारूड, प्रवचन अशा विविध प्रभावी माध्यमातून जनजागरणाचे फार मोठे कार्य संतांनी केले. शिवरायांच्या जीवनाचा अभ्यास करीत असताना शिवजन्मापूर्वीही अनेक संत या राज्यात होऊन गेले. त्यापैकी चक्रधर स्वामी, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज ह्या प्रमुख संतांचा उल्लेख आढळतो. शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रात फार मोठे जनशिकवणीचे कार्य करीत होते. ...अजून वाचा

22

स्वराज्यसूर्य शिवराय - 22

बहलोलखान आदिलशाहीतील एक हुकमी एक्का! एक प्रभावी अस्त्र ! अतिशय नीडर, बेडर, खुनशी अशी ख्याती असलेला एक सरदार. शिवरायांकडून, मावळ्यांकडून अनेकवेळा आदिलशाहीतील बड्याबड्या सरदारांनी जबरदस्त पराभवाची चव चाखली होती. अनेक मानहानीकारक पराभव आदिलशाहीच्या खात्यावर जमा झाले होते. शिवरायांचा पराभव कसा करावा हा फार मोठा प्रश्न आदिलशाहीसमोर पडलेला असताना त्यावर विचारमंथन चालू असताना, प्रत्येक पराभवाची शहानिशा चालू असताना 'शिवरायांच्या वाघांनी पन्हाळा जिंकला' ही अजून एक चिंतेत टाकणारी, लाजीरवाणी बातमी विजापूरावर तोफेच्या गोळ्याप्रमाणे येऊन धडकली. ...अजून वाचा

23

स्वराज्यसूर्य शिवराय - 23

शिवरायांची घोडदौड अविरत चालू होती. सर्वत्र त्यांचा दरारा पसरत होता. विशेषतः शत्रूपक्षांमध्ये शिवरायांच्या पराक्रमाची धास्ती पसरली होती. कारण शिवरायांनी तशी जबरदस्त केली होती. शत्रूंनी शेकडो वर्षे मराठी भागातील जनतेला स्वतःच्या अंमलाखाली ठेवून अतोनात, क्रुर, भयंकर असा छळ केला होता. प्रचंड प्रमाणात लुट केली होती. त्यांच्या क्रुरकर्माला कुणी फारसा विरोध करत नसे. अधूनमधून कुणी तसा प्रयत्न केला तर त्याला संपवण्यासाठी ही दुश्मन मंडळी मागेपुढे पाहात नसत. ...अजून वाचा

24

स्वराज्यसूर्य शिवराय - 24

शिवरायांना राज्याभिषेक झाला. अत्युच्च आनंदाचा क्षण रयतेने अनुभवला. परंतु तो आनंद फार टिकला नाही. तो क्षण, स्वप्नपूर्तीच्या आनंदाचा प्रत्यक्ष घेऊन अत्यंत समाधानाने जिजाऊ माँसाहेबानी या जगाचा निरोप घेतला. लाडक्या शिवबाला दुःखाच्या महासागरात लोटून देत आऊसाहेब निघून गेल्या. शिवरायांच्या जीवनात माँसाहेबाचे स्थान काही वेगळेच होते. एक माता म्हणून, एक मार्गदर्शक, एक स्फूर्तीमय व्यक्तिमत्व, चैतन्यमयी माता इत्यादी अनेक भुमिकांमधून त्या शिवरायांना, मावळ्यांना सतत कार्यमग्न ठेवताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची ज्योत कायम तेवत ठेवत होत्या. शिवरायांना अवर्णनीय असे दुःख झाले होते. परंतु त्यांना दुःख करायला वेळ तरी कुठे होता? स्वराज्याप्रती, रयतेपोटी असलेले कर्तव्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते, स्वस्थ बसता येत नव्हते. शिवरायांनी कठोरपणे दुःख बाजूला सारले. ...अजून वाचा

25

स्वराज्यसूर्य शिवराय - 25

सातारा येथे असताना शिवराय आजारी पडले. अफवांचे पिक जोमात आले. कदाचित त्या अफवांमुळे नको ते घडले, ठिणगीची बीजे पेरल्या संभाजी राजे! शिवरायांचे चिरंजीव! संभाजी लहान असतानाच दुर्दैवाने त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आईविना असलेले तान्हे पोर आजीच्या कुशीत शिरले. माँसाहेब त्या तान्हुल्याच्या आई बनल्या. मातेची उब देऊन त्यांनी संभाजीराजांना खेळवले,भरवले, खाऊ घातले, झोपवले. शिवरायांच्या पत्नी म्हणून आलेल्या इतर माता संभाजीराजांना होत्या पण त्या सावत्र आई होत्या. कुणी तसा भेदभाव करीत नसल्या तरीही सोयराबाईंची संभाजीसोबतची वागणूक तितकी आपलेपणाची नव्हती. त्यांना पुत्र झाला. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय