"आई, अगं मी निघते आता, उशीर होतोय मला चल येते मी" ती म्हणाली. तीने देवाला नमस्कार केला. आईने तिला हातावर दहीसाखर दिले. नंतर तीने आई बाबांना नमस्कार केला. तिच्या बहिणी तिला म्हणाल्या, "ताई, आॅल दि बेस्ट" ती म्हणाली, "Thank you." आणि तिने त्यांना छानशी स्माईल दिली. आणि ती घराबाहेर पडली.

नवीन एपिसोड्स : : Every Monday, Wednesday & Friday

1

प्रेमगंध... (भाग - १)

"आई, अगं मी निघते आता, उशीर होतोय मला चल येते मी" ती म्हणाली. तीने देवाला नमस्कार केला. आईने तिला दहीसाखर दिले. नंतर तीने आई बाबांना नमस्कार केला. तिच्या बहिणी तिला म्हणाल्या, "ताई, आॅल दि बेस्ट" ती म्हणाली, "Thank you." आणि तिने त्यांना छानशी स्माईल दिली.?? आणि ती घराबाहेर पडली. राधिका हि आपल्या कथेची नायिका. दिसायला अगदी सुंदर. उंच गोरीपान, गोलसर चेहरा, ब्राऊन रंगाचे डोळे, कुरळे काळेभोर केस एखाद्या मराठी टिव्ही सिरीयलच्या नायिकेप्रमाणे राधिका सुंदर दिसायची. तिचं राहणीमान अगदी साधं, निर्मळ अशी गोड, प्रेमळ स्वभावाची. ??लहानपणापासून ती खुप समजूतदार होती तेवढीच कष्टाळू पण होती. घरामध्ये तिच्यासोबत तिचे आईवडील आणि तीच्या ...अजून वाचा

2

प्रेमगंध... (भाग - २)

दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका शाळेत येऊन पोहोचली. ती स्टाफरूममधून रजिस्टर, पुस्तकं वगैरे घेऊन जायला निघाली. ती जायला मागे वळली ती कोणाला तरी जोराची धडकली. ती एकदम घाबरली, तिच्या हातातील पुस्तकं खाली पडली. समोर तिने पाहिलं तर एक उंच, गोरासाच मुलगा तिच्याकडे बघतच उभा राहिला होता. त्याला तसं बघून तिला थोडं आॅकवर्ड फिल झालं. तसं ती त्याला लगेच म्हणाली, "साॅरी सर, ते मी मागे पाहिलं नाही ना. म्हणून चुकुन धक्का लागला माझा." "नाही इट्स ओके होते असं कधी कधी." तो म्हणाला आणि त्याने तिची पडलेली पुस्तकं उचलून दिली. तो- "तुम्ही नवीन आहात का इथे ?" राधिका- "हो मी कालच कामावर ...अजून वाचा

3

प्रेमगंध... (भाग - ३)

पावसाचे दिवस असल्यामुळे आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरूच होता. राधिका शाळेत जायला निघाली. तिला असं पावसात चालत जायला खुप ती बसस्टॉपवर येऊन पोहोचली. काही लोकं शेडमध्ये बसली होती, काही छत्री घेऊन बाहेर उभे होते. पावसाचा जोरपण वाढला होता. राधिका छत्री घेऊन बाहेर उभी राहिली. ☔☔ छत्रीचं पाणी पडायचं ते हातात घेऊन आजूबाजूला उडवत होती. तिच्या चेहर्‍यावर छानशी स्माईल होती.?? तीला खुप मज्जा वाटत होती. ती स्वतःच्या धुंदितच रमली होती. आजुबाजूची काही लोकं तीला बघून गालातल्या गालातच हसत होते. ?? तर काही लोक "इतकी मोठी मुलगी असून लहान मुलांसारखी पाण्यासोबत खेळते." अशा आविर्भावात तीच्याकडे बघत होते.?? तिचं अचानकच आजुबाजूला लक्ष ...अजून वाचा

4

प्रेमगंध... (भाग - ४)

( मागच्या भागात आपण पाहिले की, सकाळचा प्रसंग आठवून राधिका आणि अजय दोघेही गालातल्या गालातच हसत होते. ?? दोघांचीही अवस्था झाली होती. आता पुढे... ) थोड्या वेळातच शाळेची मधली सुट्टी झाली. पाऊस चालू असल्यामुळे सगळी मुलं वर्गातच बसून राहिली. राधिकाला तर सकाळचा प्रसंग आठवून स्टाफरूममध्ये जाऊच नये असं वाटत होतं. अजयच्या नजरेला नजर कशी द्यावी हेच तीला कळत नव्हतं. ?? पण तिला भूक लागली होती म्हणून तो विचार झटकून ती जायला निघाली. ती स्टाफरूमजवळ आली तसं तिने खिडकीमधून हळूच आतमध्ये डोकावून पाहिलं तर अजयची खुर्ची तिला रिकामी दिसली. आणि अजयच्या बाजूला ती बसायची त्या खुर्चीत दुसरीच कोणीतरी नवीन शिक्षिका ...अजून वाचा

5

प्रेमगंध... (भाग - ५)

(आपण मागच्या भागात पाहिलं की, राधिका बसमधला घडलेला प्रकार घरी सगळ्यांना सांगते.... आता पुढे...) अजयच्या घरी पण अजय आणि आईबाबा जेवायला बसले होते. दुपारचं दोघांचं बोलणं आई अजयच्या बाबांना सांगत होती. अजय आईचं बोलणं ऐकून गालातल्या गालातच हसत होता. ?? बाबा- "काय रे खरंच कुणी मुलगी आवडलंय का तुला ?" अजय- "नाही बाबा असं काही नाही. मी ते आईला सहजच विचारत होतो. पुढे जर मला एखादी मुलगी आवडली तर आपल्या होम मिनिस्टर चा विरोधी पक्ष व्हायला नको ना, म्हणून आधीच खात्री करून घेतली." आणि त्याने बाबांच्या हातावर टाळी दिली. आणि दोघेही हसू लागले. ???? आई- "नको टेन्शन घेऊस बाळा, ...अजून वाचा

6

प्रेमगंध... (भाग - ६)

(आपण मागच्या भागात पाहिलं.... अंजली बाई- "वाह... अजय खुप छान काळजी घेतोस हा अर्चनाची, अशीच काळजी घेत रहा बरं तसं अर्चना त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, "हो बाई, अजय खुप काळजी घेतो माझी." ???? यांवर अजय हसू लागला आणि म्हणाला, "हो तर काळजी घ्यावीच लागेल बाई, नाही तर हिला काही त्रास झाला ना तर घरी सगळे मला आरोपीच्या कटघर्‍यात उभे करतील." तसे सगळे शिक्षक हसू लागले, राधिका पण हसू लागली. ??? शाळेचा आजचा दिवसही छान गेला. आता पुढे बघुया... ) शाळा सुटल्यावर राधिका घरी आली. फ्रेश झाली आणि बाहेर येऊन बसली. छान पाऊस पडत होता. पाळण्यावर बसून मस्त ती ...अजून वाचा

7

प्रेमगंध... (भाग - ७)

( आपण मागच्या भागात पाहिलं की, राधिका तिच्या वर्गात येऊन विचार करत असते. "अशी कशी वागू शकते मी ? लग्न झालेल्या माणसावर कसं काय प्रेम करू शकते मी ??? तिला स्वतःलाच ओशाळल्यागत झालं आणि ती स्वतःच्या मुर्खपणावर एकटीच हसू लागली.... आता पुढे... ) आज शनिवार असल्यामुळे शाळा पण लवकर सुटली. तीने पाहिलं तर अर्चना अजयच्या बाईकवरून बसून निघून गेली. राधिकापण चालत बसस्टॉपवर आली. तिलाही लवकरच बस मिळाली. बसमधून येताना ती अजय आणि अर्चनाचाच विचार करत होती. "बरं झालं मला दोघांविषयी माहिती पडलं तर, नाहीतर किती मोठी चूक झाली असती माझ्या हातून." हा विचार करून तीच्या अंगावर भितीने काटाच उभा ...अजून वाचा

8

प्रेमगंध... (भाग - ८)

(आपण मागच्या भागात पाहिलं की राधिका अजयला टाळायचा प्रयत्न करतेय हे अजयच्या लक्षात आलं होतं. तरीही अजय राधिकाशी स्वतःहून प्रयत्न करत होता. पण ती मात्र त्याच्याशी जेवढ्यास तेवढंच बोलत होती. राधिकाचं अजयशी असं वागणं आता अर्चनाच्या पण लक्षात आलं होतं... आता पुढे...) एके दिवशी असेच बसले असताना अर्चनाने अजयला विचारलं. अर्चना- "अजय, राधिकाला काही बोललास का तू ? बर्‍याच दिवसांपासून पाहते मी, ती तुझ्याशी जास्त बोलत नाही. काय झालंय नक्की सांगशील का मला ?" ?? अजय- "मी काय बोलू तिला सांग...? आणि मी काही बोलण्या अगोदर आधी तिने तर माझ्याशी बोलायला हवं ना... " ?? अर्चना- "अरे पण तू ...अजून वाचा

9

प्रेमगंध... (भाग - ९)

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजय राधिकाबद्दल स्वतःशीच विचार करत असतो. "राधिकापण ना किती वेडी मुलगी आहे खरंच, तिने उगाचच गैरसमज करून घेतला. ह्या गोष्टीचा स्वतःला तर त्रास करून घेतलाच पण मला ही त्रास दिला." इतके दिवस राधिका त्याला का टाळत होती, हे त्याच्या लक्षात आलं होतं. ते आठवून त्याला खुप हसु येत होतं... ?? आता पुढे... ) शाळेची घरी जायची सुट्टी झाली. राधिकाला अर्चना आणि तिच्या बाळाला बघायला हॉस्पिटल मध्ये जायचं होतं. म्हणून ती हॉस्पिटलचं नाव विचारायला अजयकडे आली. तर अजय बाईकवर बसून राधिकाचीच वाट बघत होता. त्याला तिला बघून हसूच येत होतं. ? पण तो हसू कंट्रोल ...अजून वाचा

10

प्रेमगंध... (भाग - १०)

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजयची बहिण अमृता दोघांना बोलते, "अरे पण तुमच्या अशा वाटण्याने त्या बिचारीला किती गैरसमज मित्र अजय- "गैरसमज झालाच पण त्या गोष्टींचा दोघांनाही खूप त्रास झाला असेल, त्याचं काय..." आणि तो हसू लागला. तसं सगळ्यांनाच हसू आलं. अशाच त्यांच्या हसतखेळत गप्पा चालल्या होत्या. अजय तर खुपच खुश होता. ??? आता पुढे....) राधिकापण घरी येऊन पोहोचली. पुर्ण रस्त्यात तिला अजयचं बोलणं आठवत होतं आणि ती स्वतःच्या मुर्खपणावरच हसत होती. ?? असेच काही दिवस निघून गेले. आता अर्चना पण रजेवर होती. आणि गैरसमज दूर झाल्यामुळे राधिका आणि अजय पुन्हा पहिल्यासारखेच एकमेकांशी बोलू लागले. अजयला पण खुप छान वाटत ...अजून वाचा

11

प्रेमगंध... (भाग - ११)

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजयच्या बाबांना बारशात यायला उशीर होतो. त्यांना बघुन अमृता, अजय, अर्चनाचा नवरा त्यांच्याजवळ येतात... त्यांच्याकडे, बारसं कसं झालं याची सगळी चौकशी करतात. समर्थ त्यांना "आजोबा" आवाज देत धावतच येतो. बाबा त्याला उचलून घेतात आणि त्याच्या दोन्ही गालावर पप्पी देतात. आणि त्याला घेऊन सगळे जेवायला जायला निघतात. आता पुढे...) राधिका शाळेतल्या शिक्षकांसोबत गप्पा मारत उभी होती. तिने अजयच्या बाबांना समर्थला उचलून घेऊन येताना पाहिलं. त्यांच्यासोबत अजयच्या घरचे सगळेच होते. तिने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. "कंडक्टर काका अजयच्या फॅमिलीसोबत कसे काय...?" असं ती मनातच विचार करू लागली. आणि त्यांच्याकडे पाहतच होती, त्याचवेळी अजयच्या बाबांचं पण तिच्याकडे लक्ष ...अजून वाचा

12

प्रेमगंध... (भाग - १२)

(आपण मागच्या भागात पाहिलं की, सगळंच अजयच्या मनासारखं घडत होतं. तो खुप खुश होता. त्याला काही झोप लागत नव्हती. राधिकाचाच चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता... विचार करता करता त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. इथे राधिकाची पण काही वेगळी परिस्थिती नव्हती. तिलाही अजयचा विचार करता करता खुप उशीरा झोप लागली... आता पुढे...) अजय आणि राधिका दोघेही एकमेकांवर प्रेम करतात हे आता सर्व शिक्षकांना कळलं होतं... अधून मधून राधिका नसताना सगळे शिक्षक अजयला राधिकाच्या नावाने चिडवत बसायचे... निलेश सर- "काय अजय, मग कधी विचारतोस राधिकाला लग्नाविषयी..." अजय फक्त गालातल्या गालातच हसत होता. ?? सरीता बाई- "त्याला काही विचारलं की फक्त ...अजून वाचा

13

प्रेमगंध... (भाग - १३)

(आपण मागच्या भागात पाहिलं की, अजय- "राधिका, आता तुझी मैत्रीण पण येईल परत..." अंजली बाई- "हो ना, कधीपासून जाॅईन आहे अर्चना... आणि बाळ कसं आहे तिचं...?" अजय- "आता या सोमवारपासूनच जाॅईन होईल ती. आणि दोघंही एकदम टकाटक आहेत..." तो हसतच म्हणाला. "असू दे, दोघेही टकाटकच असू दे", सरीता बाई पण हसतच म्हणाल्या. अशाच सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या... आता पुढे...) अर्चना- "अजून किती दिवस थांबणार आहेस तू...?? अजय- "कशाबद्दल बोलतेयस तू अर्चू...?" अर्चना- "कशाबद्दल काय...? राधिकाला लग्नाबद्दल कधी विचारणार आहेस तू...? आता अजून उशीर नकोय... कळलं ना. नाहीतर मीच विचारून टाकते तीला." अजय- "अर्चू लग्न झालंय तुझं आणि एका बाळाची ...अजून वाचा

14

प्रेमगंध... (भाग - १४)

(आपण मागच्या भागात पाहिलं की, अजय- "राधिका... तू मला खूप आवडतेस... लग्न करशील का माझ्याशी...?" दोघीही एकमेकींकडे बघू लागल्या... वेळ दोघीही चेहर्‍यावर काहीही हावभाव न आणता शांतच उभ्या होत्या. अजयला तर चांगलाच घाम फुटला होता. तो खुप घाबरला होता... तो मनातच विचार करत होता की आता राधिका चिडेल आणि रागाने निघून जाईल... त्याने खिशातून रूमाल काढला आणि चेहर्‍यावरचा घाम पुसू लागला... त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती... तो राधिकाच्या बोलण्याची वाट बघत होता... आता पुढे...) राधिका- "अजय, मला अजिबात वाटलं नव्हतं की माझ्याबद्दल तू असा काहितरी विचार करत असशील... मी तुला किती चांगला मित्र समजत होती रे आणि किती विश्वास ...अजून वाचा

15

प्रेमगंध... (भाग - १५)

(आपण मागच्या भागात पाहिलं की, राधिका- "हे काय आहे अजय..." अजय- "तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट आहे... पहिल्यांदाच मुलीला असं गिफ्ट काही सुचत नव्हतं मला काय गिफ्ट आणू ते... तूझी आवडनिवड नाही माहिती मला... पण यांत जे काही आहे... ते तुला नक्कीच खुप आवडेल... प्लीज नाही म्हणू नकोस..." राधिकाने ते गिफ्ट घेतलं... राधिका- "थँक्यू अजय..." आणि एकमेकांचा निरोप घेऊन तिघेही आपापल्या मार्गाला निघून गेले.... आता पुढे...) अजय, अर्चना, राधिका तिघेही आज खुप खुश होते.... अजय आणि अर्चना घरी पोहोचले. अर्चना घरात गेली, तर अर्चनाची आई पण बाळाला घेऊन अजयच्या घरी बसली होती. अजयची आई पण बाजूला बसली होती. अर्चनाने अजयच्या आईचे ...अजून वाचा

16

प्रेमगंध... (भाग -१६)

(आपण मागच्या भागात पाहिलं की, आई- "तू पण त्यांना लाड करून डोक्यावर चढवून ठेवलंय, बाकी काही नाही... काय करायचे करा तुम्ही..." आणि आई रागानेच आतमध्ये निघून गेली... तशा मिरा आणि मेघा दोघींनी राधिकाला दोन्ही बाजूंनी जाऊन मिठी मारली... आणि तिच्या गालावर किस केले. राधिका- "असू दे असू दे... आज दोघींचंही माझ्यावरचं प्रेम उतू चाललंय... नाही का गं सोनू...?" सोनाली- "हो ना ताई, बरोबर बोलतेस तू..." तशा त्या जोरजोरात हसू लागल्या... आणि या सगळ्यात राधिकाला अजयबद्दल बोलायचं होतं ते राहुनच गेलं... आता पुढे...) राधिका आईला जेवण करायला मदत करत होती... मीरा, मेघा दोघीपण बाहेर अभ्यास करत बसल्या होत्या... बाबा शांतपणे ...अजून वाचा

17

प्रेमगंध... (भाग - १७)

(आपण मागच्या भागात पाहिलं की... राधिका- "खुप मोठी झालंयस का गं तू आता... आहेस शेंडेफळ पण खुप मोठ्या मोठ्या करतेस... आणि तुमच्यामुळे माझं कसलं आलंय गं नुकसान...? काहीही बोलत असतेस... खुप उशीर झालाय... झोप आता गूपचूप, वेडी कुठली..." तशी सोनाली हसू लागली... राधिकाने सोनालीच्या केसांवरून हात फिरवला... आणि सोनाली तिच्या अंगावर पाय टाकून झोपून गेली... राधिकाला पण उशीरा कधीतरी झोप लागली.... आता पुढे...) आज सकाळी राधिकाला जागही लवकरच आली. ती आंघोळ वगैरे आटोपून किचन मध्ये जाऊन टिफीनची तयारी करू लागली. आज तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता... कालचं सगळं आठवून ती एकटीच हसत होती. मेघा आणि मीरा देखील राधिकाला मदत ...अजून वाचा

18

प्रेमगंध... (भाग - १८)  

(आपण मागच्या भागात पाहीलं की, अजय त्याच्या आईबाबांसोबत राधिकाच्या घरच्या परिस्थितीविषयी बोलतो. आणि त्याचे आईबाबा पण त्याला खूप समजून अजय- "आई बाबा खरंच मी खुपच नशीबवान आहे... तुमच्यासारखे समजदार आणि प्रेमळ आईबाबा मला भेटले... खुपच समजून घेतात तुम्ही मला..." बाबा- "अरे तुला समजून घेणार नाही तर आणखी कोणाला घेऊ... तू खुश तर आम्ही खुश... तुझ्या सुखातच आमचं सुख आहे... हो ना गं सावी..." आई- "हो अगदी बरोबर बोललात तुम्ही...." आईबाबांचं बोलणं ऐकून अजयला खुप छान, आणि मनालाही तेवढंच समाधान वाटत होतं... आता पुढे...) ----------------------------------------------------------- अखेर राधिकाच्या घरी जाण्यासाठी रविवारचा दिवस उजाडला. अजय खूप खूश होता. तो सकाळपासूनच गाणी गुणगुणत ...अजून वाचा

19

प्रेमगंध... (भाग - १९)

थोड्या वेळाने मेघा दोघांसाठी चहा घेऊन आली. तीने चहाचे कप त्यांच्यासमोर पकडले. दोघेही परत तिच्याकडे बघतच राहिले. मेघाने दोघांनाही दिला. मेघा दोघांनाही बघून गालातल्या गालातच हसत होती. ती चहा देऊन घरात निघून गेली. अजय - "अर्चू, मला असं वाटते, तू बोलतेय ते खरंच आहे. आपल्याला रंग वेगवेगळे दिसतात की आपले डोळेच रंगबिरंगी झालेत?" मेघा आणि मीरा दोघीही त्यांचं ऐकून घरात खूप हसत होत्या. अजय आणि अर्चना दोघेही विचारातच पडले होते. आणि दोघांनाही हसू आलं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ अजय आणि अर्चना दोघेही बसून चहा पित होते. थोड्या वेळाने मीरा बाहेर आली आणि ती चहाचे कप घेऊन घरात जाऊ लागली. अर्चनाने तिला आवाज ...अजून वाचा

20

प्रेमगंध... (भाग - २०)

(आपण मागच्या भागात पाहीलं की, मेघा आणि मीरा या दोघी जुळ्या असतात, त्याचा फायदा घेऊन दोघीही अजय आणि अर्चनाची करत असतात. त्यामुळे दोघेही खूप गोंधळात पडतात. पण राधिकाला सगळं माहीती पडल्यावर ती त्यांना सगळं सांगते. आणि राधिकाच्या घरच्यांना दोघांचाही स्वभाव, वागणं, बोलणं खूप आवडते. आता राधिकाचे बाबा आणि अजयमध्ये काय बोलणं होतं ते पाहूया....) अजय - "बाबा, तुम्ही आता कसलीच काळजी नका करू. आता यापुढे सगळंच चांगलं होणार आहे. यापुढे कसलंही टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आम्हाला दुसरं काही नको फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत कायम असू द्या बस." अजयचं असं आपुलकीचं बोलणं ऐकून राधिकाला ...अजून वाचा

21

प्रेमगंध... (भाग - २१)

(आपण मागच्या भागात पाहीलं की, अजय आणि राधिकाच्या बाबांचं व्यवस्थित बोलणं होते. अजय आणि अर्चना दोघेही घरी निघून जातात. मेघा आणि मीराची मजाकमस्ती चालूच असते. सोनाली आणि बाबांच्या बोलण्याने सगळ्यांचे डोळे पाणावतात. घरातलं वातावरण खूपच भावनात्मक होऊन जातं.... आता बघूया पुढील भागात काय होते...) अजयच्या घरी अजयचे आईबाबा, त्याची बहीण अमृता, अर्चनाचा नवरा अजय, अर्चना, तिची आई सर्वच एकत्र जमले होते. अजयने राधिकाच्या बाबांशी झालेलं सगळं बोलणं त्याच्या आईबाबांना सांगितलं. त्यांना पण स्वतःच्या मुलावर खूप गर्व वाटत होता. अजयचे बाबा - "अजय, राधिकाच्या बाबांसोबत अगदी योग्य आणि व्यवस्थित बोललास तू. आम्हाला अगदीच बोलणं पटलं तुझं. आपल्याला घरात राधिकाला आपली ...अजून वाचा

22

प्रेमगंध... (भाग - २२)

आपण मागच्या भागात पाहीलं की अजयची आई सगळ्यांना अजयच्या बाबांची सगळी गंमत सांगत होती. आणि श्रीरामपूरमध्ये राधिकाची आत्या कुसूम तीचा मुलगा गोविंद यांचं राधिकाच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घालण्याविषयी त्यांचं बोलणं होते. राधिकाच्या घरी खूप आनंदी वातावरण असते. तिच्या बाबांची तब्येत बरी होते आणि ते कामाला जाण्याविषयी बोलतात.... आता बघूया पुढील भागात काय होते ते..... राधिकाच्या बाबांची तब्येत पण आता एकदम बरी झाली होती. ते पण आता नियमितपणे त्यांच्या कामावर जात होते. राधिकाचे शाळेचे दिवस पण छान चालले होते. आज सकाळपासूनच राधिकाच्या घरात मेघा मीराचा गोंधळ चालू होता. दोघीही एकमेकींना कोणत्याही गोष्टीवरून चिडवत होत्या. आणि सगळे दोघींची ...अजून वाचा

23

प्रेमगंध... (भाग - २३)

आपण मागच्या भागात पाहीलं की मेघा मीराची खूप मजाकमस्ती चालू असते आणि आई त्यांना खूप ओरडत असते. अजय, अर्चना येत असतात तेव्हा रस्त्याने एका भरधाव येणाऱ्या गाडीने एका आजीला धक्का देऊन ती गाडी पुढे निघून जाते. पण अजय ओरडूनच त्यां गाडीवाल्याला सुनावतो. आणि त्याचं ते बोलणं ऐकून तो गाडीवाला येऊन अजयला पुढे बघून घेईन तूला अशी धमकी देऊन जातो.... पण त्याच्या धमकीला अजय काय भीक घालत नाही. तो पण त्याच्यासमोर हिंमतीने उभा राहतो. पण अर्चना त्याला कसं तरी आवरते. ती खूप घाबरते. आणि हे सर्व राधिका गर्दीत उभी राहून बघत असते. तिने शांत आणि समजदार अशा अजयचं हे रूप ...अजून वाचा

24

प्रेमगंध... (भाग - २४)

आपण मागच्या भागात पाहीलं की अजय राधिकाला मघाशी झालेल्या प्रसंगाबद्दल साॅरी बोलत असतो.... पण राधिका मात्र त्याला समजून घेते. बाबांची आणि राधिकाची बसमध्ये भेट होते. राधिका घरी जाऊन आईला अजयसोबत घडलेल्या प्रसंगाबद्दल सगळं सांगते... पण संध्याकाळी त्या गुंडाच्या घरी येण्याने मात्र राधिकाच्या बाबांची तळपायाची आग मस्तकात जाते आणि ते खूप रागासंतापात त्याला बोलत असतात, पण तो त्यांचं सर्व शांतपणे ऐकत असतो.... आता बघूया पुढील भागात काय होते ते...... राधिकाचे बाबा आणि सगळेच त्याच्याकडे रागाने बघत होते. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक असूरी हास्य होतं. तो - "अहो मामा, माझ्याशी लग्न करून कसं काय तुमच्या पोरीचं आयुष्य खराब होईल ...अजून वाचा

25

प्रेमगंध... (भाग - २५)

आपण मागच्या भागात पाहीलं की, राधिकाचे बाबा खूप संतापलेले असतात... तो गुंड धमकीच्या स्वरुपात त्यांच्याशी बोलत असतो म्हणून राधिकाचे त्याला रागातच कानाखाली मारतात आणि त्याला निघून जायला सांगतात... घरातले सगळे खूप घाबरलेले असतात, पण राधिका आणि बाबा सगळ्यांना धीर देतात... इथे अजयची आई पण अजयवर रागावलेली असते. पण अजयचे बाबा आणि अजय तिला समजावतात... आता बघूया पुढील भागात काय होते ते.... --श्रीरामपूर-- भालेकर वाडा--- गोविंद बाहेरून आल्यापासूनच घरात सगळ्या वस्तूंची आदळआपट करत फिरत होता... आणि जोरजोरात ओरडत होता... त्याचे काही साथीदार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण तो कोणाचंच ऐकत नव्हता. घरातले सर्व नोकरचाकर खूप घाबरले होते... ते ...अजून वाचा

26

प्रेमगंध... (भाग - २६)

(आपण मागच्या भागात पाहिलं की गोविंद कुसुमला रागारागात बोलत असतो. मला काहीही करावं लागलं तरी चालेल पण मी राधिकासोबतच करणार असं तो तिला सांगत असतो. कुसुम त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते. पण तो काही तिचं ऐकत नाही. कुसुमला त्याच्या बोलण्याचं खूप वाईट वाटते आणि ती पश्चात्तापाने रडू लागते. सावित्रीमाय तीला समजावते आणि तीला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. ती सावित्रीमायला घेऊन राधिकाच्या घरी जाते आणि तीच्या आईबाबांची माफी मागते...) कुसुम राधिकाच्या बाबांसमोर जाऊन उभी राहिली. आणि तीने खाली वाकून राधिकाच्या बाबांचे पायच पकडले आणि माफी मागू लागली. राधिकाच्या बाबांनी आपले पाय एकदमच मागे घेतले. राधिकाचे बाबा - "ताई, लहान ...अजून वाचा

27

प्रेमगंध... (भाग - २७)

(आपण मागच्या भागात पाहिलं की, कुसुम आणि सावित्रीमाय राधिकाच्या बाबांना परत आपल्या गावी येऊन राहायला सांगतात. नेहमीप्रमाणेच अजय आणि मजाकमस्ती चालू असते. शाळेची सहल श्रीरामपूरमध्ये जाणार असल्यामुळे राधिकाची जायची अजिबात इच्छा नसते, म्हणून अजय रागवून निघून जातो. पण अर्चनाच्या बोलण्यावर ती सहलीला जायला तयार होते. आता बघूया पुढे काय होते ते....) अजयची आई - "अजय, तूला आईची काही काळजी आहे की नाही रे...." किचनमध्ये जेवण करता करताच आई बोलत होती. अजय पटकन आईजवळ गेला. अजय - "अगं आई, काय झालं? तुझी तब्येत बरी नाही का? ये तू इथे येऊन बस. आराम कर मी करतो सर्व. बस तू इथे..." ...अजून वाचा

28

प्रेमगंध... (भाग - २८)

(आपण मागच्या भागात पाहिलं की, अजयचं लग्न लवकरात लवकर व्हावं असं त्याच्या आईला वाटत असते. राधिका मात्र शाळेच्या सहलीला की नये याचा विचार करत असते. तीच्या आईचा पुर्ण पणे नकार असतो पण बाबा मात्र तुम्ही बिनधास्त जा, कोणालाही घाबरुन राहायचं नाही असं बोलत असतात... कुसुम आणि सावित्रीमाय गोंविंदला सुधरवायचं कसं यावर चर्चा करतात.... आता बघू पुढे काय होते ते....) --श्रीरामपूर-- भालेकर वाडा--- आज कुसुमने त्यांचे ओळखीचे वकील मी. चांदेकर यांना बोलावून घेतलं होतं... तीला तीच्या संपूर्ण संपत्तीच्या सगळ्या कागदपत्रांमध्ये (वसीयतनामा) काही बदल करून घ्यायचा होता... सकाळचे अकरा वाजून गेले होते, गोविंदचा अजूनही उठायचा पत्ता नव्हता... कुसुमने बादलीत थंडगार ...अजून वाचा

29

प्रेमगंध... (भाग - २९)

( आपण मागच्या भागात पाहिलं की, कुसुम सगळी संपत्ती राधिकाच्या बाबांच्या नावावर करते... या गोष्टीचा गोविंदला प्रचंड राग येतो. कुसुमला रागातच बोलत असतो. कुसुम त्याला घरातून बाहेर काढून टाकते... गोविंद रागातच बार मध्ये जातो... तिथे वेटरला त्याचा धक्का लागतो त्यामुळे बाॅटल्स ग्लास खाली पडून फुटतात... त्यामुळे त्याला अजून राग येतो आणि तो त्याला रागातच मारतो... मग त्याचा बालपणीचा मित्र भीम्या त्याला रूममध्ये घेऊन जातो आणि सगळं विचारतो, गोविंद त्याला जे घडलं ते रागातच सगळं सांगतो आणि भीम्या शांतपणाने त्याचं बोलणं सगळं ऐकून घेतो.... आता बघूया पुढे... ) गोविंद खूप चवताळलेला होता. तो भीम्याला दारू आणायला सांगतो... भीम्या त्याला ...अजून वाचा

30

प्रेमगंध... (भाग - ३०)

(आपण मागच्या भागात पाहिलं की गोविंदचा बालपणीचा मित्र भीम्या त्याला समजावत असतो आणि तो त्याचं ऐकतो पण.... राधिकाला मात्र सगळ्या बालपणीच्या आठवणी आणि मैत्रीणींची आठवण येत असते... ती एकटीच आठवणीत रमलेली असताना अजय तिला बघतो आणि तीला काळजीने काही प्राॅब्लेम झालाय का? असं विचारतो... तीला अजयला तिच्या नातेवाईकांबद्दल सगळं सांगायचं असते, पण आता नको आपण या विषयावर नंतर कधीतरी बोलू असं सांगून तो तिला सगळ्यांसोबत एंजॉय करायला घेऊन जातो... आता बघूया पुढे काय होते पुढच्या भागात....) सगळे मुलं नदिच्या काठावर खेळत होते... शिक्षक त्यांच्यावर लक्ष ठेऊन होते... बाजूच्या शेतातला एक माणूस खूप सारे मक्याचे कणीस घेऊन आला आणि ...अजून वाचा

31

प्रेमगंध... (भाग - ३१)

(आपण मागच्या भागात पाहिलं की नारायण नावाचा एक शेतकरी सगळ्यांसाठी आपल्या शेतातले मके घेऊन येतो आणि ते मके अजय, सर, दिलीप सर मुलांना भाजून देत असतात... तेवढ्यात तिथे दारू पिलेली चार पाच माणसं येतात आणि त्यांना बघून नारायण अजयला वैगेरे तिथून निघून जायला सांगतात... म्हणून ते पण जायला निघतात... पण त्यातला एक माणूस नारायणला कमरेत लाथ मारून खाली पाडतो. त्याच्या कपाळाला लागते... अजय येऊन त्यांना सावरतो आणि त्यांना ओरडतो... पण नारायण अजयला समजावून जायला सांगतो... पण ते राधिकाला उद्देशून बोलतात, त्यामुळे अजयला राग येतो आणि त्यांना अजय, निलेश सर, दिलीप सर तिघेही मिळून चांगलीच अद्दल घडवतात आणि अजय नारायण ...अजून वाचा

32

प्रेमगंध... (भाग - ३२)

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजय आपलं नदिवर राहीलेलं घड्याळ घ्यायला परत येतो... पण तिथे नारायण काका कचरा टोपलीत असतात... अजयपण त्यांना मदत करत असतो. पण तिथे गोविंद आपल्या माणसांसोबत येतो... गोविंद रागातच अजयला मारायला जातो पण तो गोविंदच्या नाकावरच मुक्का मारतो... त्याच्या नाकातून रक्त येऊ लागते... भीम्या ते बघतो आणि अजयला मारायला धावतो... अजयचं राधिकाच्या आवाजाकडे लक्ष जाते आणि तेवढ्यात भीम्या अजयच्या डोक्यात मारतो.... रक्त खूप वाहून जाते त्यामुळे तो बेशुद्ध पडतो... अजयला हाॅस्पीटलमध्ये अॅडमीट केले जाते... आता पुढे...) अजयला सकाळीच शुद्ध येते... अजय ठिक असल्याचं डाॅक्टर सांगतात... सगळ्यांच्या जीवात जीव येतो... अजयच्या आईच्या डोळ्यांतून मात्र अजूनही ...अजून वाचा

33

प्रेमगंध... (भाग - ३३)

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजयला डिस्चार्ज देण्यात येतो आणि कुसुम सगळ्यांना आपल्या घरी घेऊन जाते.... वाड्याचा थाटमाट बघून अवाक होतात... कुसुम अजयच्या घरच्यांना राधिकाचे बाबा आणि तिच्याबद्दल सगळं सांगते... अजयची आई आल्यापासून खूप शांत शांत असते... अजयचे बाबा तिला जाऊन समजावतात... आता पुढे...) दुपारच्या जेवणाची सगळी तयारी झाली होती... कुसुमने सगळ्यांना जेवण करण्यासाठी बाहेर बोलवलं... सगळे येऊन जेवायला बसले... जेवणाचा सगळा घमघमाट पसरला होता... कुसुम, राधिकाची आई आणि राधिका सगळ्यांना आग्रह करून वाढत होत्या... कुसुम - "आज घाईघाईत साधंच जेवण बनवून वाढलं तुम्हाला... गोड मानून घ्यावं सगळ्यांनी..." अजयचे बाबा - "अहो ताई, हे साधं जेवण म्हणावं का...? ...अजून वाचा

34

प्रेमगंध... (भाग - ३४)

(आपण मागच्या भागात पाहीलं की राधिकाची बालमैत्रीण सुमी आणि तीचा मुलगा कृष्णा येतो... दोघीही एकमेकींना ओळखतात... सुमी खूप बडबडया असते, त्यामुळे तिची बडबड ऐकून सगळे तिला हसत असतात... थोड्या वेळाने भीमा तिथे येऊन पोहोचतो आणि सगळ्यांची माफी मागतो... अजयची आई रागाने त्याच्या कानाखाली मारते... भीमा सगळ्या वाईट गोष्टी सोडून देण्याचं वचन सुमीला आणि सावित्रीमायला देतो... आता पुढे...) सगळं आनंदाचं वातावरण झालं होतं... आपल्या माणसांनी सगळं घर भरलेलं होतं म्हणून कुसुमला मनाला खूपच समाधान वाटत होतं... किचनमध्ये राधिका, सुमी, काही नोकर सगळे जेवणाची तयारी करत होते... सुमीची बडबड चालूच होती... राधिका - "सुमी... गौरी, केसर आणि कोमल आता कुठे ...अजून वाचा

35

प्रेमगंध... (भाग - ३५)

आपण मागच्या भागात पाहीलं की कुसुम राधिकाच्या बाबांना त्यांच्यासोबत येऊन राहायला सांगते... भीम्या गोविंदसोबत काम का करू लागला हे सुमीने राधिकाला सांगितलं... अजयची आई अजूनही शांतच होती कोणासोबत काहीच बोलत नव्हती. सगळे शेतात फिरत होते त्याचवेळी तिथे गोविंद येतो आणि भीम्याच्या कानाखाली वाजवतो... आता पुढे... गोविंदने भीम्याला मारायला सुरूवात केली... पण भीम्याने गोविंदवर अजिबात हात उचलला नाही... सुमीने गोविंदसमोर जाऊन हात जोडले आणि रडू लागली. कृष्णा खूप घाबरला तो रडू लागला... राधिकाने त्याला जवळ घेतलं आणि आतमध्ये घेऊन गेली... "मालक, हात जोडते तुमच्यासमोर... सोडा माझ्या नवर्‍याला..." - सुमी... "गोविंदा सोड त्याला, काय चालवलंस तू? प्रत्येकवेळी तूझी दादागिरी खपवून ...अजून वाचा

36

प्रेमगंध... (भाग - ३६)

(आपण मागच्या भागात पाहीलं की गोविंद भीम्याला मारतो... गोविंद अजयला बघून त्याला पण धमकी देतो...कुसुम त्याला तिथून निघून जायला पण अजयची आई सगळ्यांना सांगते की अजयचं आता राधिकासोबत लग्न होऊ शकत नाही, तूम्ही तिच्यासाठी दुसरा मुलगा बघा... अजयच्या आईला सगळे समजावण्याचा प्रयत्न करतात, पण ती अजयला राधिका आणि ती... दोघींपैकी एकीची निवड करायला सांगते... आता बघूया पुढे...) "बरं ठिक आहे आई... तुमची हिच इच्छा असेल तर मी राधिकाचा विचार सोडून देतो... पण माझी पण एक अट आहे, मी पण यापुढे लग्नाचा विचार अजिबात करणार नाही... आणि मला तुम्ही कोणीच लग्नासाठी फोर्स करणार नाही... जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हाच ...अजून वाचा

37

प्रेमगंध... (भाग - ३७) 

( आपण मागच्या भागात पाहीलं की, अजय आईचं म्हणणं ऐकून राधिकाला सोडण्याचा विचार करतो... अजय आणि राधिका दोघेही एकमेकांच्या रडत असतात... कुसुम अजयच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करते पण ती तीच्या निर्णयावर ठाम असते... भालेकर वाड्यावर सर्व गावकरी जमा होतात... गोविंदच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सगळे गावकरी कुसुमला साथ देण्यांस तयार होतात... आता बघूया पुढे...) राधिकाने आज सकाळी शाळेत जाण्याची तयारी केली... कुसुमने स्वतःच राधिकाला जेवणाचा टिफीन आणून दिला आणि तीच्या डोक्यावर मायेने हात फिरवला.... "राधी, सगळं काही ठिक होईल... तू काही काळजी करू नकोस... मी आहे तुझ्यासोबत..." - कुसुम. "हो... आतू चल येते मी..." - राधिका. "हो बाळा काळजी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय