Geet Ramayana Varil Vivechan book and story is written by Kalyani Deshpande in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Geet Ramayana Varil Vivechan is also popular in पौराणिक कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
गीत रामायणा वरील विवेचन - कादंबरी
Kalyani Deshpande
द्वारा
मराठी पौराणिक कथा
।।श्रीराम श्रीराम श्रीराम।।
वाचकांनो आज मी ग.दि.माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणावर आधारित लिहिलेल्या गीत रामायणावर यथाशक्ती विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ग.दि माडगूळकरकरांनी एकूण छप्पन गीतांत क्रमाने संपूर्ण रामायणाचे प्रसंग वर्णन केलेले आहेत. त्यातील आजपासून रोज एकेक गीत घेऊन मी त्यावर विवेचन करणार आहे.
वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल ह्याची मला खात्री आहे.
त्यातील पाहिलं गीत आहे
स्वये श्री रामप्रभू ऐकीती
एका परिटाच्या संदेहामुळे श्रीरामप्रभु सीतामाईंचा त्याग करतात त्यावेळी त्या गरोदर असतात हे श्रीरामप्रभूंना माहीत नसते. श्रीरामाच्या आदेशावरून लक्ष्मण सीता माईला ऋषी वाल्मिकीनच्या आश्रमात नेऊन सोडतात.
तिथेच सीतामाई एखाद्या तपस्विनी योगिनी प्रमाणे आयुष्य व्यतीत करतात. तेथे लव आणि कुश ह्या जुळ्या मुलांचा जन्म होतो.
ऋषी वाल्मिकीनच्या मार्गदर्शनाखाली ते दोघे सगळ्या विद्या शिकून सर्वगुणसंपन्न होतात. देवाच्या आदेशानुसार वाल्मिकी ऋशिंनी रामायण लिहिलेलं असते. आता सर्व प्रजेच्या मनात असलेला सीता माईंविषयी असलेला वृथा संदेह दूर व्हावा असे वाल्मिकी ऋषींना मनोमन वाटते. त्यासाठी ते लव आणि कुश यांना गीतरुपात रामायण शिकवितात आणि ते अयोध्येत सर्वत्र गाण्यास सांगतात.
।।श्रीराम श्रीराम श्रीराम।। वाचकांनो आज मी ग.दि.माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणावर आधारित लिहिलेल्या गीत रामायणावर यथाशक्ती विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ग.दि माडगूळकरकरांनी एकूण छप्पन गीतांत क्रमाने संपूर्ण रामायणाचे प्रसंग वर्णन केलेले आहेत. त्यातील आजपासून रोज एकेक गीत घेऊन मी ...अजून वाचाविवेचन करणार आहे. वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल ह्याची मला खात्री आहे. त्यातील पाहिलं गीत आहे स्वये श्री रामप्रभू ऐकीती एका परिटाच्या संदेहामुळे श्रीरामप्रभु सीतामाईंचा त्याग करतात त्यावेळी त्या गरोदर असतात हे श्रीरामप्रभूंना माहीत नसते. श्रीरामाच्या आदेशावरून लक्ष्मण सीता माईला ऋषी वाल्मिकीनच्या आश्रमात नेऊन सोडतात. तिथेच सीतामाई एखाद्या तपस्विनी योगिनी प्रमाणे आयुष्य व्यतीत करतात. तेथे लव आणि कुश ह्या जुळ्या मुलांचा
लवकुशांनी राम दरबारात रामायण सांगण्यास सुरुवात केली आहे. ते सांगतात: शरयू नदीच्या काठावर अयोध्या नावाची मनू ने निर्माण केलेली विशाल नगरी स्थित आहे. (मनू हा भारतीयांचा आद्य पुरुष आहे व शतरुपा ही मनूची पत्नी असून आद्य स्त्री आहे. त्यांच्यापासूनच ...अजून वाचावंशाचे लोकं निर्माण झाले.) तर ह्या अयोध्या नावाच्या अजस्त्र नगरी मध्ये एकाहून एक सुंदर अश्या इमारती, वास्तू उभ्या आहेत. दोन्ही बाजूला सुंदर वास्तू आणि त्यांच्या मध्ये समांतर असे रस्ते आहेत ज्या रस्त्यांवरून अनेक रथ हत्ती घोडे, तिथून येणारे जाणारे प्रवासी नटून थटून त्यावरून मार्गक्रमण करत असतात. ह्या अयोध्या नगरीच्या घराघरावर रत्नांची तोरणे आहेत. घर मंगलचिन्हांनी सुशोभित केलेले आहेत. ठिकठिकाणी नयनरम्य
सर्वथा संपन्न समृद्ध अश्या संसारात राजा दशरथ व त्यांच्या भार्यांना एकच शल्य खुपत होतं ते म्हणजे पुत्र नसणे. त्याच व्यथेत विचार करीत कौसल्या देवी आपल्या राजवाड्यातील उपवनात बसलेल्या असतात. सहज त्यांचं लक्ष फुलांनी लगडलेल्या लतिकेवर जाते आणि त्यांना विषाद ...अजून वाचात्यांचं मन व्याकुळ होते. त्या विचार करतात: 'पहा ह्या वेलीला सुद्धा भरभरून फुले आहेत पण माझ्या संसारवेलीवर एकही पुत्ररूपी फुल नसावं हे किती दुर्दैव आहे. आजपर्यंत कधी मनात वाईट विचार आला नव्हता,कधी कोणाचा हेवा वाटला नव्हता. एवढंच कशाला कधी दोन सवती असून त्यांच्या प्रति कधी मत्सर मला वाटला नाही पण आज ह्या फुलांनी समृद्ध अश्या वेली बघून मला खूप हेवा
राजा दशरथांच्या मनातही देवी कौसल्ये प्रमाणे पुत्र नसल्याचे शल्य खुपत असते. त्या निराशेतून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राजा दशरथ मृगयेला(शिकारीला) जातात. इकडे एक श्रावण नावाचा कुमार मजल दरमजल करत आपल्या वृद्ध अंध माता पित्यांना कावड मध्ये बसवून त्यांच्या इच्छेनुसार तीर्थाटन ...अजून वाचाअसतो. एका पारड्यात पिता एका पारड्यात माता अशी कावड खांद्यावर घेऊन तो एकेका तिर्थस्थळी माता पित्यांना नेत असतो. असाच तो यात्रा करत करत शरयू नदीच्या तीरावर येऊन थांबतो,कावड खाली ठेवतो. त्याच्या पित्याला तहान लागली असल्यामुळे तो जवळील जलाशयातून पाणी आणावयास जातो. तिथेच एका वृक्षावर राजा दशरथ शिकारीची वाट बघत असतो. राजा दशरथ आवाजावरून न बघता त्या दिशेने अचूक बाण सोडून
राजा दशरथाने वसिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे अश्वमेध यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ केला. भरपूर अन्न वस्त्र धन दान केले. ऋषी मुनी योग्यांचा योग्य तो सन्मान केला. यज्ञात शेवटची समिधा टाकताच त्या यज्ञ कुंडातून अग्निदेव प्रकट होतात. त्यांच्या हातात एक सुवर्ण पात्र ...अजून वाचाज्यात पायस(खीर) असते. ते पायस अग्निदेव दशरथ राजास देतात आणि म्हणतात:- हे दशरथा तू केलेला यज्ञ संपन्न झाला आहे. तुझ्यावर सगळे देव प्रसन्न झाले आहेत. श्री विष्णू देवांनी स्वतः मला आदेश देऊन हा प्रसाद घेऊन इथे पाठवलं आहे हा माझा सन्मान च आहे असे मी मानतो. ह्या पात्रातील पायस तिन्ही राण्यांना भक्षण करण्यास दे. हे पायस अत्यंत मधुर आणि ओजस्वी