बालकाण्ड अध्याय - 1 ॥ श्रीसद्‌गुरवे रामचंद्राय नमः ॥ जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वा कृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिलावल्लभोऽभूत् । प्राप्यायोध्यां नियोगात् पितुरटविमगात् नाशयित्वा च वालिं बध्वाब्धिं रामचंद्रो दलितदशमुखः सीतया युज्यमानः ॥ १ ॥ चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥ श्रीगणेश वंदन ॐ नमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या । वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥ १ ॥ तुझें निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप । तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥ २ ॥ यालागीं जैसा अससी तैसियासी । नमन साकार निराकारासी । तंव अंगत्व मुकले अंगासी । भज्यभजकासी अद्वैत ॥ ३ ॥ ज्ञानतेजें सतेज फरश । नित्यस्मरणाचा अंकुश । आनंदमोदकाचा सुरस । मुखीं देसी घांस निजभक्तां ॥ ४ ॥ ऐसें ऐकोन स्तवन । संतोषला गजानन । माझें वसवूनियां वदन । वक्ता वचन स्वयें झाला ॥ ५ ॥ ऐसा जाला सुप्रसन्न । तेणें विघ्नचि केलें निर्विघ्न । उन्मेखेंसीं बोलिला आपण । भावार्थरामायण चालवीं वेगीं ॥ ६ ॥

Full Novel

1

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 1

बालकाण्ड अध्याय - 1 ॥ श्रीसद्‌गुरवे रामचंद्राय नमः ॥ जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वाकृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिलावल्लभोऽभूत् ।प्राप्यायोध्यां नियोगात् पितुरटविमगात् च वालिंबध्वाब्धिं रामचंद्रो दलितदशमुखः सीतया युज्यमानः ॥ १ ॥चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥ श्रीगणेश वंदन ॐ नमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या ।वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥ १ ॥तुझें निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप ।तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥ २ ॥यालागीं जैसा अससी तैसियासी । नमन साकार निराकारासी ।तंव अंगत्व मुकले अंगासी । भज्यभजकासी अद्वैत ॥ ३ ॥ज्ञानतेजें सतेज फरश । नित्यस्मरणाचा अंकुश ।आनंदमोदकाचा सुरस । मुखीं देसी ...अजून वाचा

2

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 2

अध्याय 2 ॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥ यज्ञपुरुषाने दिलेल्या प्रसादाचे विभाग राजा पाहे राष्ट्र सकळ । तंव फिटले द्वंद्वदुःखदुष्काळ सर्वत्र सुकाळ । अफळ ते सफळ वृक्ष झाले ॥ १ ॥प्रजा स्वानंदे निर्भर । गोगोधनां आनंद थोर ।अग्निहोत्रें घरोघर । याग द्विजवर यजिती सुखें ॥ २ ॥पृथ्वी धनधान्यें परिपूर्ण । कोणा नाहीं दुःख दैन्य ।घरोघरीं वेदाध्ययन । हरिकीर्तन हरिभक्ती ॥ ३ ॥भूतळा येईल राघव । यालागीं वैकुंठींचें वैभव ।पुढे धाडिले जी सर्व । तेणें शोभा अपूर्व अयोध्येसीं ॥ ४ ॥ अयोध्येत इंद्राच्या अप्सरांचे आगमन राजा शोभे सिंहासनीं । अति आल्हाद राजभुवनीं ।आनंद न माये त्रिभुवनीं । तंव स्वर्गाहूनि आल्या देवांगना ...अजून वाचा

3

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 3

अध्याय 3 ॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥ कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांच्याकडून प्रसाद भक्षण : कैकेयी धरोनि पोटेसीं । संबोखी तियेसी ।तूं का व्यर्थ दुःखी होसी । आम्हां दोघींसी दुःख एक ॥१॥एकोदरा सख्या बहिणी । दो दुस्सर पाटणी नांदती सख्या ॥२॥दोघीं नाही नित्य भेटी । दोघी नाही नित्य गोष्टी ।दोघीं नाहीं नित्य दृष्टी । मिथा चावटी सख्यत्वाची ॥३॥दोघी नाही नित्य संबंध । दोघीं नाही नित्य संवाद ।दोघीं नाहीं नित्य बोध । तो सख्यसंबंध अति मिथ्या ॥४॥दोघीं नाहीं एक सुख । त्या सख्या मानिती मूर्ख ।तूं एक करिसी व्यर्थ दुःख । आम्हां निजसुख एकत्वें ॥५॥आम्हां तुम्हां एक आहेवपण । आम्हां ...अजून वाचा

4

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 4

अध्याय 4 ॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥ कौसल्येचे डोहाळे : ऐकोनियां कथाश्रवण । ज्ञाते म्हणती अप्रमाण ।नव्हे हें मूळीचें । तिहीं शिवरामायण पहावें ॥ १ ॥स्कंड पुसे अगस्तीप्रती । शिवभवानी राम जपती ।राम कोण तो त्रिजगतीं । यथास्थिती मज सांगा ॥ २ ॥तो म्हणे श्रीराममहिमान । सांगावया मी अति दीन ।जेथें वेदां पडे मौन । तें वदावया वदन मज नाहीं ॥ ३ ॥तुझ्याचिं ऐसा प्रश्न । सदाशिवाप्रति जाण ।पार्वती पुसे आपण । श्रीराम कवण मज सांगा ॥ ४ ॥श्रीरामाची कोण स्थिती । कोण श्रीरामाची कीर्ती ।समूळ सांगा मजप्रती । पुसे अति प्रीती जगदंबा ॥ ५ ॥कोण श्रीरामाची ख्याती । ...अजून वाचा

5

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 5

अध्याय 5 ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कौसल्येचे डोहाळे : पूर्वकथेचे अनुसंधान । कौसल्यें उघडिले नयन ।डोहाळे पुसावसा जाण । सावधान स्वयें जाला ॥ १ ॥कौसल्या रामगर्भें स्वरूपस्थिती । राजा प्रवृत्तिधर्में पुत्रार्थी ।दोहींच्या संवादाची प्रीती । डोहळे निश्चिती अवधारा ॥ २ ॥राजा म्हणे स्वमुखें कांते । काय आवडीं आहे तूतें ।वेगीं सांग डोहळ्यांतें । सांडी परतें भ्रमासी ॥ ३ ॥येरी म्हणे मी अवघा राम । मजमाजी तंव कैंचा भ्रम ।अवतरलों पुरुषोत्तम । देवांचे श्रम फेडावया ॥ ४ ॥ऐकोनि शंकिजे रायें । म्हणे इसी जाहलें तरी काये ।आप आपणियातें पाहें । सावधान होय प्रिये तूं ॥ ५ ॥येरी म्हणे मी नव्हे ...अजून वाचा

6

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 6

अध्याय 6 श्रीरामजन्मप्रसंग ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामाचा जन्मकाळ : श्रीरामाचा जन्मप्रभाव । अजन्मा जन्मेल रामराव ।पाहूं आला सुरनरसमुदाव तो नवलाव पाहूं आले ॥ १ ॥प्रसूतिसमय कौसल्येसी । तंव अयोध्येच्या चौपासीं ।विमानें दाटलीं आकाशीं । विबुध वेगेंसी पैं आले ॥ २ ॥सूर्यवंशा येईल रघुनाथ । यालागीं मध्यान्हीं आला आदित्य ।लग्नीं साधिला अभिजित । जन्ममुहूर्त राघवा ॥ ३ ॥वक्री अतिचर होऊन । वेगीं चालोनि आपण ।केंद्री आणि उच्चस्थान । तेथे ग्रहगण स्वयें आले ॥ ४ ॥शुद्धसुमनीं वसंत ऋतु । मधुमास अति विख्यातु ।शुक्ल पक्ष नवमी आंतु । जन्म रघुनाथ पावला ॥ ५ ॥ सुखरूप प्रसूती व श्रीरामांचे प्रकटन : श्रीराम ...अजून वाचा

7

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 7

अध्याय 7 श्रीरामांची तीर्थयात्रा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ धन्य रामायण सृष्टीं । धन्य वाल्मीकाचे वाग्वृष्टी ।अक्षरीं अक्षरपरिपाटी । दोष नासती ॥ १ ॥नासती महापातकें । नासती द्वंद्वेदुःखे ।रामकथा ऐकतां हरिखें । सुख महासुखें थोरावे ॥ २ ॥येथोनि श्रीरामचरित्र । अपवित्रा करी अति पवित्र ।कथाकौतुक अति विचित्र । श्रोतीं सादर परिसावें ॥ ३ ॥ श्रीरामजन्माने लंकेत घडलेल्या अशुभसूचक घटना : श्रीराम जन्मला अयोध्यापुरीं । तंव वीज पडे लंकेवरी ।भूस्फोटन नगरद्वारीं । भूकंप नगरीं त्रिकेटेंसीं ॥ ४ ॥रावण जंव भद्रीं चढे । तंव मुकुट पायरीवरी पडे ।वायुघातें छत्र मोडे । सभेचे हुडे खचोनि पडती ॥ ५ ॥कुंभकर्णाच्या घरावरी । दिवाभीत घूं ...अजून वाचा

8

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 8

अध्याय 8 विश्वामित्रांचे आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम सच्चिदानंदघन । तोही वैराग्यलक्षण ।लोकलक्षणार्थ दावी आपण । दीन जन ॥१॥सकळ वैराग्याचे फळ । स्वयें श्रीराम केवळ ।तोही वैराग्याचें शीळ । दावी प्रबळ लोकोपकारा ॥२॥ श्रीरामांची अनासक्ती : तीर्थाहूनि आलिया रघुनाथ । नावडे राज्य राज्यार्थ ।नावडे लोक लोकार्थ । विषयस्वार्थ नावडे ॥३॥नावडे इंद्रियांचा संग । नावडे इंद्रियांचा भोग ।नावडे देहादि देहधर्म ।नावडे विलाससंभ्रम । वैराग्य परम अनुतापी ॥५॥नावडे स्त्रियांची भेटी । नावडे स्त्रियांसीं गोष्टी ।नावडे स्त्रियां पाहों दृष्टी । वैराग्य पोटीं विषयांचें ॥६॥नावडे शाब्दिक चावट । नावडे चातुर्य वटवट ।नावडे अतिवाद खटपट । मौननिष्ठ अनुतापी ॥७॥नावडे कळा कौतुक चांग । ...अजून वाचा

9

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 9

अध्याय 9 श्रीरामांचे वैराग्यनिरुपण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सन्मुख देखोनि श्रीराम । विश्वामित्राचा मनोधर्म ।सुखावोनि सप्रेम । आनंदे परम ॥१॥आजी माझें सार्थक कर्म । आजी माझा सफळ धर्म ।आजी माझें पूर्ण काम । रायें श्रीराम यज्ञार्थ दिधला ॥२॥ऋषि म्हणे श्रीरामासी । चाल जाऊं माझ्या आश्रमासी ।सिद्धि पाववीं स्वधर्मासी । तूं सर्व कामासी निजमोक्ष ॥३॥राम म्हणे ऋषि समर्था । कांही पुसेन मनोगता ।कृपा करावी कृपावंता । मी तत्वता वचनार्थी ॥४॥ देहदोषांविषयी श्रीरामांचा विश्वामित्रांस प्रश्न : देह तंव अत्यंत अशक्त । देहकर्म तेंही नाशवंत ।कर्मफळ ते क्षयभूत । सुख कोण येथ देहसंगे ॥५॥देहलोभे आर्तभूत । जो विषय सेवीत ।तो तत्काळ विष्ठा ...अजून वाचा

10

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 10

अध्याय 10 राजा जनक व शुकाचार्य यांचा संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विश्वामित्र उवाच –न राघव तवास्त्यन्यज्ञेयवतां वर ॥स्वयैव बुद्ध्या सर्वं विज्ञातवानसि ॥१॥ विश्वामित्र म्हणे रघुनाथा । तूं सूक्ष्मबुद्धि अति तीक्ष्णता ।ज्ञान ज्ञेय परमार्था स्वभावता परिपूर्ण ॥१॥ज्ञात्यांमाजी ज्ञानवरिष्ठ । त्यांचा अनुभव जो चोखट ।तो तुजमाजी दिसे प्रकट । वैराग्य उद्‌भट ज्ञानगर्भा ॥२॥वैराग्य जें ज्ञानसगर्भ । तोचि ज्ञानाचा समारंभ ।वैराग्येंवीण ज्ञान दुर्लभ । तें तुज सुलभ स्वभावता ॥३॥ भगवद्‌व्यासपुत्रस्य शुकस्येव मतिस्तव ।विश्रांतिमात्रमेवैतज्ज्ञाता ज्ञेयमपेक्षते ॥२॥ जैसा शुक व्याससुत । जन्मापासोनि स्वभावमुक्त ।तैसाचि तूं रघुनाथ । प्राप्त परमार्थ स्वन्हावें ॥४॥त्या शुकाचा ज्ञानार्थ । विकल्पें पावला घात ।तोचि गुरुवाक्यें निश्चित । निजपरमार्थ पावला ...अजून वाचा

11

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 11

अध्याय 11 श्रीवसिष्ठरामसंवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विश्वामित्र उवाच –तस्य व्यासतनूजस्य मलमूत्रापमार्जन् ।यथापयुक्तं तद्‌ राम तावदेवोपयुज्यते ॥१॥ श्रीव्यासाच विरक्त । सांगितले शुकाचे चरित्र ।जनकें त्याचा विकल्पमात्र । केला निरहंकार द्वारपाळद्वारें ॥१॥सज्ञानाचें कृपावचन । द्वारपाळाद्वारें जाण ।करोनि विकल्पाचें दहन । पूर्ण समाधान श्रीशुकासी ॥२॥जैसी विरक्ती शुकासी । तैसी विरक्ती श्रीरामासी ।राज्यवैभव नावडे त्यासी ।त्वांही करावा शिगुरू साचार । विश्रांतीचें घर विवेकापासीं ॥४॥ वासनासंक्षयो नाम मोक्ष इत्युच्यते बुधैः ।पदार्थवासनासक्तिर्बंध इत्याभिधीयते ॥२॥ सकळ वासनेची शांती । या नांव मुख्य मुक्ती ।विषयवासनाउत्पती । बद्धता निश्चितीं या नांव ॥५॥देही असोनि विदेहस्थिती । ज्यासीं नाहीं विषयासक्ती ।त्यासी बोलिजे जीवन्मुक्ती । जाण निश्चितीं रघुनाथा ॥६॥ विश्वामित्र ...अजून वाचा

12

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 12

अध्याय 12 ताटिका वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हे रामायणी निजकथा । जैं आदरें ऐके श्रोता ।तैं पापपुण्यांच्या करी । स्वभावता नित्यमुक्त ॥१॥कथाश्रवणें नित्यमुक्त । हाही नवलाव नव्हे येथ ।अक्षरीं अक्षर अक्षरार्थ। श्रीरघुनाथकथार्थें ॥२॥पढतां रघुनाथचरित्र । श्रोते वक्ते नित्य पवित्र ।धन्य ऎकती त्यांचे श्रोत्र । धन्य वक्त्र वदत्याचें ॥३॥धन्य धन्य वाल्मीकि मुनी । श्रीरामकथा वदली वाणी ।कथा त्रैलोक्यपवनी । भवमोचनी चरितार्थ ॥४॥रामनाम दों अक्षरीं । कुंटिणी वंदिजे सुरवरीं ।ऐशी कथेची अगाध थोरी । ते कोणें वॆखरीं वानावी ॥५॥हें असो पूर्वकथासंबंधीं। श्रीरामासी लागे समाधी ।ते स्वयें वसिष्ठ उद्बोधी । ते कथाविधी अवधारा ॥६॥श्रीराम जाला सावधान । प्रपंचपरमार्थस्थितीं समान ।हे वसिष्ठांचे ...अजून वाचा

13

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 13

अध्याय 13 सुबाहुनिर्दलनं ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ एह्येहि रजनीं वसाम शुभदर्शन ।अयं सिद्धाश्रमो नाम त्वत्प्रादाद्‌भविष्यति ॥१॥ सिद्धाश्रमात मुक्काम : म्हणे रामासी । सिद्धाश्रम नाम यासी ।येळे राहावें आजिचे निशीं । सिद्धाश्रमासी निजसिद्धी ॥१॥आम्ही तुम्ही केलिया वस्ती । या सिद्धाश्रमाची सिद्ध ख्याती ।विस्तारेल त्रिजगतीं । मम आश्रमाप्रति प्रभाते गमन ॥२॥ अस्त्र विद्याग्रहण : येथे सुखें निशा क्रमून । प्रभाते स्नानसंध्या करून ।विश्वामित्र म्हणे आपण । अस्त्रग्रहण करीं रामा ॥३॥वसिष्ठाज्ञेचा निर्धारू । अनुविद्येसी तूं सद्‌गुरूं ।तदर्थीं आल्हाद थोरू । श्रद्धासादरू रघुनाथ ॥४॥वंदोनि सद्‌गुरूचरण । कृतांजलि रामलक्ष्मण ।त्यासीं विश्वामित्र आपण । अस्त्रप्रदान प्रारंभी ॥५॥तो म्हणे हें अस्त्रभिग्रहण । त्रिशुद्धी व्हावें सावधान ।सबीजमंत्राचें ...अजून वाचा

14

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 14

अध्याय 14 अहल्योद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ एवमुक्ते तयोर्वाक्य सर्व एव महर्षय: ।विश्वामित्रं पुरस्कृत्य राघवं वाक्यमब्रुवन् ॥१॥मैथिलस्य नरश्रेष्ठ जनकस्य ।यज्ञः परमधर्मिष्ठो यास्यामस्तत्र वै वयम् ॥२॥त्वं चापि नरशार्दूल सहास्माभिर्गामिष्यासि ।अद्भुतं च धनूरत्नं तत्र त्वं द्रष्टुमर्हसि ॥३॥ जनकराजाकडून स्वयंवराचे आमंत्रण : ऋषिसभे प्रसन्नोन्मुख । बैसले वर्णिती रघुकुळ टिळक ।तंव जनकाचे दोघे सेवक । पत्र कुंकुमांकित घेवोनि आले ॥१॥विश्वामित्रें निजगायार्थ । ऋषी मेळविले समस्त ।स्वामीनें त्यांसमवेत । यावें यथार्थ स्वयंवरा ॥२॥तंव रामलक्ष्मणांलागुनी । कौशिक बोलावी सन्मानोनी ।दोघीं साष्टांग नमूनी । कर जोडोनी बोलत ॥३॥आम्ही तुझे नित्यांकित । निजसेवक निश्चित ।सिद्धी पावला यज्ञार्थ्स् । पुढील कार्यार्थ सांगावा ॥४॥स्वामी जे तूं आज्ञा देसी । ...अजून वाचा

15

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 15

अध्याय 15 सीतेचा पूर्वजन्मवृत्तान्त : ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पदकमलरजोभिः मुक्तपाषाणदेहाद्वियमभवदहल्या गौतमे धर्मपत्नी ।त्वयि चरति विशीर्ण ग्रावविंध्याद्रिपादेकति कति भवितारस्तापसा ॥ १ ॥ श्रीरामचरण स्पर्शाचा परिणाम : लागतां श्रीरामपादरजःकण । जावोनियां पाषाणपण ।जाहले अह्ल्योद्धरण । तें दारग्रहण गौतमें केलें ॥ १ ॥चरणरजांचा प्रताप । अहल्या जाहली निष्पाप ।हरून गौतमाचा विकल्प । स्त्री अनुरूप पतिव्रता ॥ २ ॥अगाध पदमहिमा देखोन । विस्मित जाले ऋषिजन ।स्वर्गी सुरवर करिती स्तवन । नाम पावन तिहीं लोकीं ॥ ३ ॥पुढें विंध्याद्रीचे ठायीं । जे पाषाण लागती रामपायीं ।ते निःशेष विरोनि पाहीं । उठतील स्त्रीदेहीं सुंदरत्वें ॥ ४ ॥तयां स्त्रियांचे देखोन । बहुसाल तपस्विजन ।ब्रह्मचर्य विरर्जून ...अजून वाचा

16

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 16

अध्याय 16 परशुरामांचा प्रताप : ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीता स्वयंवरासी जाण । शिवचापासी लावला गुण ।जा जनकें करावया । काय कारण तें ऐका ॥ १ ॥ शिवधनुष्याचा पण करण्याचे कारण : पूर्वी परशुराम कैलासीं । धनुर्विद्या शिवापाशीं ।परशुविद्या गणेशापाशीं । लघुलाघवेंशीं शिकला ॥ २ ॥परशुराम कैलासीं । राहिला असे शिवसेवेसी ।तत्परता अहर्निशीं । श्रद्धा गणेशीं समसाम्य ॥ ३ ॥तंव आक्रंदे आत्यंतिक । ऐकिली रेणुकेची महाहाक ।परशुरामें एकाएक । ऐकोनि साशंक तो झाला ॥ ४ ॥येवोनि सांगे शिवापाशीं । रेणुका बोभात आक्रंदेशीं ।आज्ञा पुसतों स्वामींसी । मज मातेपासीं जावया ॥ ५ ॥ रेणुकेची कथा : ऐका रेणुकापुराण । जें ...अजून वाचा

17

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 17

अध्याय 17 सहस्रार्जुनाचा वध व शिवधनुष्याची पूर्वकथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ राजा व राजपुत्र यांच्याशी युद्ध व त्यांचा निःपात परशुराम पाहे दुरून । निर्नायकी दिसे सैन्य ।राजा नाहीं आला आपण । राजपुत्र पूर्ण देखिले ॥ १ ॥रायाचे राजसुत । शोधोनि मारावे समस्त ।हे मातेची आज्ञा समर्थ । तो मी कार्यार्थ साधीन ॥ २ ॥केला त्र्यंबकाचा टणत्कार । नादें मूर्छित झाले सुर ।दुमदुमले गिरिकंदर । राजकुमार धाकिन्नले ॥ ३ ॥धाकें दचकला प्रधान । उभा ठेला धैर्य धरून ।सैन्यें उभ्या उभ्या सांडीती प्राण । टणत्कारें पूर्ण नभ कोंदलें ॥ ४ ॥बाण सोडिला सिंहमुख । तेणें गज मारिलें निःशेष ।रथांचे छेदोनि आंख ...अजून वाचा

18

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 18

अध्याय 18 शिवधनुष्याचा प्रताप व सीतास्वयंवरात रावणाची फजिती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ स्वयंवरास आलेले निमंत्रित राजे-महाराजे : स्वयंवरसभेची स्थिती स्वर्गीं देव विमानीं पाहती ।शहाण्णव कुळींचे भूपती । दाटलें क्षितीं सन्मानें ॥ १ ॥आले तपस्वी ऋषीवर । आले यक्ष गंधर्व किन्नर ।स्वयंवरा आले निशाचर । दैत्य महावीर तेही आले ॥ २ ॥धैर्य वीर्य महाशौर्य । रूपगुणी गुणगांभीर्य ।धर्माधर्म अति औदार्य । ऐसे नृपवर्य येते झाले ॥ ३ ॥जे गोब्राह्मणां साह्यार्थीं । ज्यांची यशकीर्ती महाख्याती ।ज्यांचे पवाडे स्वर्गीं गाती । स्वयंवरार्थीं येते जाले ॥ ४ ॥जे दान देती सर्वस्व । ज्यांची वैकुंठीं वर्णिती वाढिव ।ज्यांचें त्रैलोक्यीं प्रसिद्ध गौरव । तेही राजे ...अजून वाचा

19

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 19

अध्याय 19 श्रीरामस्वरूप वर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामाविषयी सीतेची उत्कंठा : सीतेसी सांगती सखीजन । टळलें रावणाचें विघ्न भाग्याची सभाग्य पूर्ण । आवडे तो आपण नृप लक्षीं ॥ १ ॥दळें बळें अति संपत्ती । धैर्य वीर्य यश कीर्ती ।सखिया दाविती भूपती । सीता ते नृपती मानीना ॥ २ ॥श्यामसुंदर निजमूर्ति । पती तो एक रघुपती ।सीतेनें निश्चय केला चित्तीं । वरकड निश्चितीं मानीना ॥ ३ ॥सभेसी बैसला रावण । धनुष्या न चढवेचि गुण ।राम करूं न शके वरण । जनकें पण केला कथिण ॥ ४ ॥ धनुर्भंगाच्या पणाबद्दल राजांना आवाहन : जो धनुष्यीं वाहील गुण । त्याचें म्यां ...अजून वाचा

20

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 20

अध्याय 20 श्रीराम-सीता विवाह ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामाविषयी सीतेची उत्कंठा : श्रीरामाचे पूर्णपण । रूपरेखागुणलावण्य ।देखोनि सीतेचें वेधलें । सर्वथा आन नावडे ॥ १ ॥सांडोनियां चम्द्रामृत । चकोर अन्य न सेवित ।तेंवी सांडूनि रघुनाथ । सीतेचें चित्त आन न मानी ॥ २ ॥जनकें देखोनियां रघुनाथ । चित्तीं आल्हाद अत्यंत ।जानकी द्यावी निश्चितार्थ । साशंकित धनुष्यार्थीं ॥ ३ ॥ श्रीरामांना पाहून सभाजनांची अनेकविध अवस्था : सभास्थियांचे नयन । रामरूपीं अति निमग्न ।रावनासी पडलें मोहन । तटस्थ जन श्रीरामें ॥ ४ ॥श्रीराम देखोनि ऋषिपंक्तीं । अवघे आश्चर्य मानिती ।सीता द्यावी रघुपतिप्रती । मानलें चित्तीं सर्वांसी ॥ ५ ॥पुढील कार्य अति ...अजून वाचा

21

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 21

अध्याय 21 दशरथाचे मिथिलेस आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामसीतेचे पाणिग्रहण : सीतेचें रामासीं लग्न । वचन ऐकोनि रावण दाखवीच काळें वदन । गेला निघोन अधोमुखें ॥ १ ॥देखोनि श्रीरामप्रताप । राजे जाले सकंप ।तिहीं सांडोनियां दर्प । गेले नृप निजनगरा ॥ २ ॥यापरी राजे राक्शस अनेक । समप्रतापें केले विमुख ।तेणें जनकासी अत्यंत सुख । परम हरिख लग्नाचा ॥ ३ ॥राजा म्हणे विश्वामित्रासी । शीघ्र आणावया दशरथासी ।मी धाडितों प्रधानासी । परी तो त्यासी मानीना ॥ ४ ॥ जनक उवाच –भवतोऽनुमतेर्ब्रह्मन् शीघ्रं गच्छंतु मंत्रिणं ।मम कौशिक भद्रं ते त्वयोध्यां त्वरिता रथैः ॥ १ ॥जनकेन समादिष्टा दूतास्ते शीघ्रवाहनाः ।त्रिरात्रमुषिता ...अजून वाचा

22

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 22

अध्याय 22 सूर्यवंशवर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दशरथ राजा मिथिलेला येतो : जीवशिवांचे समाधान । ते हे कथा रामायण परिकर पावन । जगदुद्धरन जडजीवां ॥ १ ॥श्रीरामीं संलग्नता । सर्वांगें समरसें सीता ।यादि नांव सुलग्नता । ते लग्नकथा अवधारा ॥ २ ॥मार्गीं वसोनि चारी वस्ती । राजा दशरथ शीघ्रगतीं ।आला विदेहपुराप्रतीं । जेथें रघुपति निजविजयी ॥ ३ ॥विदेहपुरा वस्ती आले । ते त्रिभुवनीं विजयी जाले ।विश्वामित्रें मित्रत्व केलें । गुरुत्व दिधलें वसिष्ठें ॥ ४ ॥श्रीवसिष्ठें विश्वामित्रु । केला श्रीरामीं धनुर्विद्यागुरु ।आपण ब्रह्मविद्यासद्‌गुरु । विजयी रामचम्द्र याचेनि ॥ ५ ॥वसिष्ठनिष्ठानिजनिर्धारीं । दशरथ पावला विदेहपुरी ।रत्न्कळसांचिया हारी । तेजें अंबरीं रवि ...अजून वाचा

23

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 23

अध्याय 23 सीमान्तपूजन रुखवत व भोजन समारंभ ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीमान्तपूजन – भोजनसमारंभ सूर्यवंशींचे भूपती । असंख्य आणि ।तेर् म्यां सांगितले संकळिती । क्षमा श्रोती करावी ॥ १ ॥ एवमुक्तोऽथ जनकः तमुवाच कृतांजलेः ।श्रोतुमर्हसि धर्मज्ञ मत्कुलं शृण्वतां वर ॥ १ ॥प्रधानेश्वर वक्तव्यं कुलं निरवशेषतः ।वक्तव्यं कुलजातेन तन्निबोध नरेश्वर ॥ २ ॥ वसिष्ठें सूर्यवंशावळी । वर्णिली अति प्रांजळी ।जनक उठोन तये वेळीं । कृतांजळी विनवीत ॥ २ ॥ जनकाचें कुलवर्णन : माझिये कुळींचे भूपाळ । खातिवंत अति प्रबळ ।राउळें परिसावे सकळ । सकळकुळपर्यावो ॥ ३ ॥कन्यादानीं सकळ कुळ । सांगावें लागे स्वयें समूळ ।पहिले कुळीं निमी भूपाळ । त्याची ...अजून वाचा

24

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 24

अध्याय 24 श्रीराममंडपागमनं ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचे लग्नमंडपात आगमन – श्रीरामप्रसाद सेवितां । समाधिसुख फिकें आतां ।ऐसी उल्लासली । श्रीरघुनाथाचेनि शेषें ॥ १ ॥सद्गुारूपरात्पर उपरी । सर्वातें सावधान करी ।घटिका प्रतिष्ठिली अंतरीं । जीवनावरी संख्येची ॥ २ ॥अक्षरें अक्षर पळेंपळ । घडी भरता न लगे वेळ ।लोकव्यापारें विकळ । काळ गेला नेणती ॥ ३ ॥घडी झेंगटातें हाणित । काळ जावो न द्यावा व्यर्थ ।तेणें काळें काळ अंत आणित । मुद्दल तेथें बुडालें ॥ ४ ॥नवल लोकांची नवाई । काळें गिळिलें न पडे ठायीं ।दुमाही चौमाही गणिता वही । तेणें पाही नागवले ॥ ५ ॥सद्गुीरू सांगे भरली घडी । ...अजून वाचा

25

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 25

अध्याय 25 जानकीचे पाणिग्रहण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जानकीचे पाणिग्रहण – श्रीराममंडपाआंत । आला चहूं वरांसमवेत ।जनकासी आल्हाद बहुत आला दशरथ ऋषियुक्त ॥ १ ॥जनकें दिधला सन्मान । गाद्या पडगद्या वरासन ।मृदुलिया लोटांगण । ऋषिससंपन्न सभेसीं ॥ २ ॥ मधुपर्क : मधुपराचें विधिविधान । चारी पुरुषार्थ चवाई पूर्ण ।त्यावरी समाधि सुखासन । वरासन चौघांसी ॥ ३ ॥सदोदिता आवाहन । अधिष्ठानासी आसन ।कर्मरहितासी आचमन । चरणक्षाळण अचरणा ॥ ४ ॥श्रीराम भूषणां भूषण । त्यासी अलंकार आभरण ।निरावरनासी प्रावरण । सर्वगता आगमना वाहनादिक ॥ ५ ॥सहजासी पाठीपोट । अखंडासी वस्तिपीठ ।निःशब्दा शब्द स्पष्ट । निरंतरा अंतःपट लग्नार्थ धरिती ॥ ६ ॥श्रीराम ...अजून वाचा

26

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 26

अध्याय 26 श्रीरामपरशुरामएकात्मबोध निरूपणं ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लग्नाचे वर्‍हाड अयोध्येकडे निघाले : चौधी बहिणींसहित जाण । जालें जानकीपाणिग्रहण केली बोळवण । सुख संपूर्ण दशरथासी ॥ १ ॥चौघे पुत्र चौघी सुना । कीर्ति न समाये त्रिभुवना ।येव्हढे आल्हादें जाणा । अयोध्याभुवना निघाला ॥ २ ॥संनद्ध केलिया दळभार । महामदें गर्जती कुंजर ।घंटाकिंकिणीं सालंकार । पताकीं अंबर शोभत ॥ ३ ॥घोदे नाचविती वीर । जी जी मा मा थीर थीर ।तीपायीं असिवार । अति अरुवार नाचती ॥ ४ ॥अढाऊ झेली साबळधर । कोयतेतकार धनुर्धर ।चालती पायांचे मोगर । अलगाइत बाणाइत ॥ ५ ॥वोढणिये थैकार देत । जेठिये तळपत चमकत ।ऐसें ...अजून वाचा

27

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 27

अध्याय 27 श्रीरामजानकी अयोध्याप्रवेश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांनी विष्णुचाप वरुणास दिले : परशुराम गेला स्वस्थाना । स्वस्थता दशरथाचे ।आनंद वाढला चौगुना । रघुनाथ जाणा निजविजयी ॥ १ ॥सांडोनि वैष्णवचापासी । भार्गव गेला स्वाश्रमासी ।धनुष्य दिधलें श्रीरामासी । तेणें वरुणासी तेंदिधलें ॥ २ ॥मी आपुलिया निजात्मशक्तीं । रणीं जिंकोनि राक्षसपंक्ती ।वैष्णवचाप हें असतां हातीं । लोक म्हणती धनुष्यबळ ॥ ३ ॥माझ्या यशाची निजपुष्टीं । अवघी जाईल धनुष्यासाठीं ।यालागीं तें उठाउठीं । राम जगजेठी स्वयें त्यागी ॥ ४ ॥स्वसामर्थ्य नाहीं ज्यासी । धनुष्य यश केंवी होईल त्यासी ।यालागीं श्रीराम नव्हें अभिलाषी । म्हणोनि वरुणासी दिधलें ॥ ५ ॥ अयोध्येत प्रवेश, ...अजून वाचा

28

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 1

अयोध्याकाण्ड अध्याय 1 श्रीरामलक्ष्मणांच्या शस्त्रास्त्र विद्यानैपुण्याचे प्रदर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ गजाननाय महते प्रत्युहतिमिरच्छिदे ।अपारकरुणामूर्त्यै सर्वज्ञाशे नमः ॥ १ रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥ रामायणाचे रूपक : श्रीरामकथेची नव्हाळी । शेष वंदी पाताळी ।शिव वंदी प्रेमसमेळी । कथाभूतळी जगद्वंद्य ॥१॥तरी ते शतकोटी रामायण । आळवूं शकेल कोण ।तेथे मी अपुरते दीन । परी तो जनार्दन स्वयें वदवी ॥२॥तरी श्रीरामस्वरूप चिद्रूपता । चैतन्यशोभांकित सीता ।तरी देवक्तांच्या क्रूतकार्यार्था । मानुष्यजाड्यता अवतारू ॥३॥अर्धनारीनटेश्वरी । जो पुरूष तोचि नारी ।तेंवी ते सीता निर्धारी। एकात्मतेवरी स्त्रीपुरुष ॥४॥जैसीं बहुरूपी रावराणी । परी स्त्रीपुरुषभाव नाहीं मनी।तरी तेचि संपादणी। लोकसंरक्षणी सत्यत्वे दावी॥५॥’एकाकी न रमते’ ...अजून वाचा

29

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 2

अध्याय 2 श्रीरामराज्याभिषेक प्रारंभ ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामराज्यभिषेकाची तयारी, प्रजाजन व राजे यांची सभा : राज्याभिषेक श्रीरामासी । उल्लास दशरथासी ।बोलावोनि ज्येष्ठां श्रेष्ठासी । गुह्य त्यांपासीं सांगतु ॥१॥उदार वसिष्ठादि महाॠषींसी । पृथ्वीपाळ नृपवरांसी ।सेनापती समग्रांसी । गुह्य त्यांपासीं सांगत ॥२॥अष्टादश निजप्रजांसी । बोलोवोनि अति प्रीतीसीं ।बसवोनि सन्मानेंसीं । त्यांपासीं काय मग बोले ॥३॥ परिश्रान्तोऽस्मि लोकस्य गुर्वीं धर्मधुरं वहन् ।सोऽहं विश्राममिच्छामि पुत्रं कृत्वा प्रजाहिते ॥१॥भवभ्दिरपि तत्सर्वमनुवर्तध्वमद्य वै ।अनुजातो हि मां सर्वैर्गुणैः श्रेष्ठा ममात्मजः ॥२॥पुरंदरसमो वीर्ये रामः परपुरंजयः ।तं चंद्रमिव पुष्येण युक्तं धर्मभृतां वरम् ॥३॥यौवराज्ये नियोक्तास्मि प्रातः पुरुषपुंगवम् ।अनुरुपः स वो नाथो लक्ष्मीवाल्लक्ष्मणाग्रजः ॥४॥त्रैलोक्यमपि नाथेन येन स्यान्नाथवत्तरम् ।अनेन श्रेयसा सद्यः ...अजून वाचा

30

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 3

अध्याय 3 दुष्ट मंथरेचा कैकेयीवर प्रभाव ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामराज्याभिषेक निश्चितीमुळे इंद्रादिकास चिंता, त्या देवांची ब्रह्मदेवाला विनंती : । तेणें इंद्रादिकां चिंता गहन ।समस्त देवीं मिळॊनि जाण । चतुरानन विनविला ॥१॥देव म्हणती ब्रह्मयासी । तुझें आश्वासन आम्हांसी ।राम अवतरला सूर्यवंशी । तो रावणासी वधील ॥२॥सपुत्र सबंधु सप्रधान । राम करील राक्षसकंदन ।तेणें देवांस बंधमोचन । ते मिथ्या वचन होऊ पाहे ॥३॥सत्य करीं आपुलें वचन । आमुचें करीं बंधमोचन ।आमचे आपत्तीचें विंदान । सावधान अवधारीं ॥४॥इंद्र बारी चंद्र छत्रधारी । यम पाणी वाहे घरीं ।वायु सर्वदा पूजे ओसरी । विधि तेथें दळकांडा ॥५॥अश्विनी सूनू दोनी । तिही परिमळ द्यावे ...अजून वाचा

31

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 4

अध्याय 4 कैकेयी-दशरथ संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ आज्ञाप तु महाराजो राघवस्याभिषेचनम् ।उपस्थानमनुज्ञाप्य प्रविवेश निवेशनम् ॥१॥प्रियार्हां प्रियमाख्यातुं विवेशांतःपुरं वशी कैकेय्या गृहं श्रेष्ठं प्रविवेश महायशाः ॥२॥न ददर्श स्त्रियं राजा कैकेयीं शयनोत्तमें ।स कामबलसंयुक्तो । रत्यर्थी मनुजाधिपः ॥३॥अपश्यन्दयितां भार्यां पप्रच्छ विषसाद च ।नहि तस्य पुरा देवी तां वेलामत्यवर्तत ॥४॥प्रतहारी त्वथोवाच संत्रस्ता तु कृतांजलिः ।देव देवी भृशं क्रुद्धा क्रोधागारमाभिद्रुता ॥५॥ अभिषेकाची सिद्धता, दशरथ कैकेयीच्या भवनात येतो, तेथील चमत्कारीक स्थिती : श्रीरामासी अभिषेकार्थ । प्रातःकाळीं पुष्य समुहुर्त ।सिद्ध सामग्री करावया समस्त । आज्ञा नेमस्त रायें केली ॥१॥मग रतिकामसंभोगासीं । आला कैकेयीभवनासी ।गृहीं न देखोनियां तिसी । पुसे समस्तांसी प्रिया कोठें ॥२॥तेथें दास दासी ...अजून वाचा

32

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 5

अध्याय 5 दशरथभवनात श्रीरामांचे आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रभाते शर्वरीं दृष्टवा चंद्रनक्षत्रमंडिताम् ।ततः सूतो यथाकालं पार्थिवस्य निवेशनम् ॥१॥प्रविवेश सुमंतो मतिसत्तमः॥२॥ प्रातःकाळी सुमंत दशरथास उठविण्यास गेला : अभिषेकावया श्रीरघुनाथ । प्रातःकाळीं सुमुहुर्त ।चंद्र देखोनि गुरुपुष्ययुक्त । वेगीं सुमंत ऊठिला ॥१॥सुमंत प्रधान बुद्धिमंत । प्रबोधावया श्रीदशरथ ।आला राजभवनांत । कैकेयीयुक्त नृप जेथें ॥२॥ दशरथाची काळजी : अभिषेकावया रघुनंदन । राया होई सावधान ।ऐकोनी प्रधानाचे वचन । मूर्च्छापन्न दशरथ ॥३॥राम जाईल वनांत । कोणते तोंडी बोलूं मात ।हातींचा जाईल रघुनाथ । दुःखे मूर्च्छित दशरथ ॥४॥वना धाडीतो दशरथ । ऐसी ऐकताचि मात ।वचन नुल्लंघीच रघुनाथ । जाईल वनांत तत्काळ ॥५॥रामासी नाहीं राज्यचाड ...अजून वाचा

33

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 6

अध्याय 6 कौसल्यासांत्वनं ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कैकेय्युवाचराजा न कुपितो राम व्यसनं नास्य किंचनं ।किंचिन्मनोगतं त्वस्य त्वभ्दयान्नानुभाषते ॥१॥प्रियं त्वामप्रियं वाणी नास्य प्रवर्तते ।तदवश्यं त्वया कार्यं यदनेन श्रुतं मम ॥२॥एष मह्यं वरं दत्वा पुरा मामभिपूज्य च ।पश्चात्संतप्यतेःराजा यथान्यःप्राकृस्तथा ॥३॥ श्रीरामांनी शपथपूर्वक आश्वासन दिल्यानंतर कैकेयीकडून वरांचे वृत्तकथन : पूर्व प्रसंगी आपण । रामें वाहिली वसिष्ठाची आण ।तेणें कैकेयी सुखसंपन्न । पूर्वकथन तें सांगे ॥१॥रायासी नाहीं ज्वरादि अवस्था । नाहीं भूतसंचारता ।आणिक कांही नाहीं व्यथा । तुझी ममता बहु बाधी ॥२॥तें रायाचें मनोगत । सांगातां तुझें पोळेल चित्त ।यालागीं पैं नृपनाथ । साशंकित सांगावया ॥३॥तूं रायाचा प्रिय पूर्ण । प्रियापासीं अप्रिय वचन ...अजून वाचा

34

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 7

अध्याय 7 सीता-लक्ष्मण वनगमननिर्धर ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा दृढ निश्चय ओळखून कौसल्या त्यांचे स्वस्तयन करते : झाली कौसल्या । श्रीरामासी वनाभिगमन ।करावया करि पुण्याहवाचन । स्वस्त्ययन अवधारा ॥१॥ निश्चितं तं तथा रामं विज्ञाय गमनोत्सुकम् ।प्रास्थानिकं स्वस्त्ययनं कर्तृमेवोपचक्रमे ॥१॥सा विनिय तमायासमुपस्पृश्य जलं शुचि ।चकार माता रामस्यं मंगलानि मनस्विनी ॥२॥गधैश्चापि समालभ्य राममायतलोचना ।ओषधीं च सुसिद्धार्थां विशल्य करणीं शुभाम् ॥३॥चकार रक्षां कौसल्या मंत्रैरभिजजाप च ।देवानभ्यर्च्य विधिवत्पणम्य च शुभव्रता ॥४॥ वनीं व्हायया वनवासी । अति उल्हास श्रीरामासी ।कौसल्या जाणोनि निश्चयेसीं । धाडी वनासी स्वस्तयनें ॥२॥करोनि करचरणक्षाळण । कौसल्या करी शुद्धाचमन ।करविलें देवतार्चन । रघुनंदननिजविजया ॥३॥सुमनचंदनीं अति ओजा । पूजा केली अधोक्षजा ।लोटांगणीं ...अजून वाचा

35

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 8

अध्याय 8 श्रीरामांचे वनाकडे प्रयाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामस्त्वनेन नाक्येन सुप्रीतः प्रत्युवाच तम् ।व्रजापृच्छस्व सौमित्र सर्वमेव सुहृज्जनम् ॥१॥ये राज्ञे ददौ महात्मा वरुणः स्वयम् ।जनकस्य महायज्ञे धनुषी रौद्रदर्शने ॥२॥अभेद्ये कवचे दिव्ये तूणी चाक्षय्यसायकौ ।सर्वमायुधमादाय क्षिप्रमाव्रज लक्ष्मण ॥३॥स सुहृज्जनमामंत्र्य वनवासाय निश्चितः ।इक्ष्वाकुगुरुमागस्य जग्राहायुधमुत्तमम् ॥४॥तद्दिव्यं राजशार्दूलः संस्कृतं माल्यभूषितम् ।रामास्य दर्शयामास सौमित्रिः सर्वमायुधम् ॥५॥ श्रीराम लक्ष्मणाला मातेचा आशीर्वाद घेऊन आयुधे आणण्यास पाठवितात : श्रीराम म्हणे सौमित्रासी । जरी तूं वनवासासी येसी ।तरी पुसोनि ये निजमातेसी । आणि पत्‍नीसी भेटोनि ॥१॥आणिकही सुहृदसंबंधे । त्यांसी पुसोनि यावें यथवबोधें ।माझीं आणावीं दिव्यायुधें । तीं अति शुद्धें युद्धार्थी ॥२॥मज दिधलें दशरथें । वरुणदत्त धनुष्यातें ।तेणेसीं आणावे ...अजून वाचा

36

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 9

अध्याय 9 श्रीरामांचे चित्रकूटावर गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांच्या प्रयाणानंतर दशरथ व राण्या त्यांच्या मागून धावत जातातः वना श्रीरघुनाथ । राजा महामोहें मूर्च्छित ।तो होवोनियां सावचित्त । पुसे दशरथ राम कोठें ॥१॥त्यासी स्त्रिया सांगती मात । तुम्हीं दिधला निजरथ ।त्यावरी बैसोनि रघुनाथ । गेला निश्चित वनवासा ॥२॥एक सांगती रायासी । राम आश्वासीत जनांसी ।आहे नगरद्वारापासीं । तंव राव वेगेंसी धाविंनला ॥३॥ अथ राजा वृतः स्त्रीभिः सद्विजो दीनमानसः ।निर्जगाम प्रियं पुत्रं द्रक्ष्यामि च वनं गतम् ॥१॥ सातशें राणियांसमवेत । धाविंनला दशरथ ।कोठें कोठे माझा रघुनाथ । स्वयें पुसत सर्वांतें ॥४॥मग आक्रंदे दिधली हाक । श्रीरामा दाखवीरे निजमुख ।तुज जालिया ...अजून वाचा

37

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 10

अध्याय 10 दशरथाचे प्राणोत्क्रमण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ गुहकाकडे सुमंताचा मुक्काम : येरीकडे सुमंत गुहक । श्रीराम गेलियावरी देख पावले दुःख । तोचि श्लोक अवधारा ॥१॥ कथयित्वा तु दुःखार्तः सुमंत्रेण चिरं सह ।गंगपारे गते रामे जगाम स्वपुरं गुहः ॥१॥भरद्वाजाभिगमनं प्रयागे च सभाजनम् ।अगिरेर्गमनं तेषां तत्रस्थैरभिलक्षितम् ॥२॥अनुज्ञातःसुमंत्रोथ योजयित्वा हयोत्तमान् ।अयोध्यामेव नगरीं प्रययौ गाढदुर्मनाः ॥३॥ पुसोनि सुमंता गुहकासी । श्रीराम बैसोनि नावेसीं ।गेलिया गंगापरतीरासी । लागली दोघांसी टकमक ॥२॥न लागतां पातया पातीं । दोघे श्रीरामासी पाहती ।दृष्टी अंतरल्या रघुपती । दोघे पडती मूर्च्छित ॥३॥जरी दोघे जाले सावधान । तरी रामविरहें अति दुर्मन ।अश्रुधारा वाहती नयन । करिती स्मरण रामनामें ॥४॥वाचे रामनामस्मरण ...अजून वाचा

38

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 11

अध्याय 11 श्रीरामपादुकांना पट्टाभिषेक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांची त्यागबुद्धी पाहून सुमंताची अवस्था : श्रीरामाचें वनप्रयाण । ते निर्लोभपण ।सुमंत आठवी आपण । श्रीरामीं मन दृढ जडलें ॥१॥त्या त्यागाची निजगती । दावोनी गेला श्रीरघुपती ।ते सुमंत स्मरे अति प्रीतीं । त्यागस्थिती ते ऐसी ॥२॥असत्य त्यजिजे जेंवी पवित्रें । तेंवी त्यागी राज्यालंकार वस्त्रें ।वना निघतां श्रीरामचंद्रे । केलें वल्कलांबर परिधान ॥३॥जेवीं निंदा त्यजिजे साधुसंतीं । तेंवी राज्यवैभवसंपत्ती ।सर्वही त्यजोनि रघुपती । निघे वनाप्रती वल्कलांबरीं ॥४॥रजकस्पर्शाचें जीवन । जेंवी नातळती साधुजन ।तेंवी सांडोनि राज्यादि धनमान । निघे रघुनंदन वनवासा ॥५॥राज्यातील अणुप्रमाण । श्रीराम काहीच नेघे जाण ।त्यजोनियां पादत्राण । निघाला ...अजून वाचा

39

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 12

अध्याय 12 भरताचे वनप्रयाण व गुहकाशी संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कैकेयी भरताला उपदेश करते : जालिया जननिवृत्ती । प्राप्ती मध्यरात्री ।कैकेयी येवोनि भरतप्रती । बोले उपपत्ती ते ऐका ॥१॥ उत्थापयित्वा कैकेयी पुत्रं वचनब्रवीत ।उत्तिष्ठ पुत्र भद्रं ते राजपुत्र निबोध मे ॥१॥त्वद्विधा नैव शोचंति सतां सदसि संमताः ।गृहाणेदं स्वकं राज्यं सफलं कुरु में श्रमं ॥२॥मनो नंदय मित्राणां मम चाभीष्तदर्शन ।त्वकृते हि मया सर्वमिदमेवंविधं कृतं ॥३॥तत्पुत्र शीघ्रं विधिना विधिज्ञैःवसिष्ठमुख्यैः सहितो द्विजेंदैः ।संकाल्य राजानमदीनसत्वमात्मानमुर्व्यामभिषेचयस्व ॥४॥ उठवोनियां पुत्रासी । कैकेयी बुद्धि सांगे त्यासी ।राम गेला वनवासासी । तूं कां करिसी शोक त्याचा ॥२॥रांडवे बायलेव्हे परी । रडतां न लाजसी सभेमाझारीं ।ऊठ वेगीं ...अजून वाचा

40

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 13

अध्याय 13 भरताचे चित्रकूटावर आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ स्नानसंध्या व त्रिवेणीला साष्टांग प्रणिपात : भरतें गंगा उतरोन । स्नान संध्या तर्पण ।आजींची वस्ती प्रयागस्थान । म्हणोनि निशाणें त्राहाटिलीं ॥१॥रथ गज वाजी वीरश्रेणी । चालातां मार्ग न पुरें धरणीं ।पुढे देखिली त्रिवेणी । दूत गर्जोनी सांगती ॥२॥देखोनी त्रिवेणी भरत शत्रुघ्न । दोघी घातले लोटांगणा ।त्यजोनियां पादत्राण । चरणचालीं निघालें ॥३॥वसिष्ठादि ऋषीश्वर । चरणीं चालती सत्वर ।देखोनि त्रिवेणींचे तीर । जयजयकार तिहीं केला ॥४॥ गोदान, पिंड्दान, धनदान : देवोनि लक्षानुलक्ष गोदानें । भरतशत्रुघ्नें केलीं स्नानें ।तीर्थश्राद्ध पिंडदानें । पितृर्पणें तिहीं केली ॥५॥तीर्थ उअपवास मुंडन । रायासी नाही हे बंभन ।वसिष्ठ ...अजून वाचा

41

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 14

अध्याय 14 श्रीरामांकडून दुष्ट कावळ्याला शिक्षा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ चित्रकूटावर श्रीरामांची दैनंदिन चर्या, लक्ष्मणाची सेवा : येरीकडे श्रीरघुनाथ चित्रकूट पर्वताआंत ।अग्निहोत्र सीता समवेत । नित्य वेदोक्त प्रतिपाळी ॥१॥श्रीरामसेवेसी सौमित्र । पर्णशाळा केली विचित्र ।श्रीरामाचें अग्निहोत्र । अहोरात्र संरक्षी ॥२॥विचित्र आणी फळें मुळें । नित्य निर्वाह पुरवी जळें ।काष्ठें आणोनियां प्रबळें । अग्नि सोज्ज्वळ स्वयें रक्षी ॥३॥रामसीतेचें चरणक्षाळण । नित्या नेमें करी लक्ष्मण ।जैसीं लक्ष्मीनारायण । या बुद्धीं पूर्ण पूजित ॥४॥विधिविधान जाणे श्रीराम । दर्शपौर्णमासिक होम ।मृगमांसें होमसंभ्रम । चालवी नेम सौमित्र ॥५॥श्रीरामाचे सेवेवरी । शरीर वंचीना तिळभरीधनुष्यबाण घेवोनि करीं । मृगें मारी होमार्थ ॥६॥धन्य त्या मृगांचें जीवित । ...अजून वाचा

42

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 15

अध्याय 15 श्रीराम-भरतभेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरताचे चित्रकूटाकडे प्रयाण : देखोनि चित्रकूट पर्वत । अत्यंत हरखिला भरत ।देखावया । उल्हास अद्‌भुत सर्वांसी ॥१॥सेन शृंगारिली मनोहर । वीरीं केले नाना शृंगार ।गर्जत घेवोनि गजभार । भरत सत्वर चालिला ॥२॥कोईते कातिया कुर्हा्डे । वन छेदिती सैन्यापुढें ।वेगीं भूमि सज्जिती मातियेडे । गज रथ घोडे चालावया ॥३॥अश्वगजांचा कडकडाट । रथ चालिले घडघडाट ।सैन्य चालतां न पुरे वाट । रजें वैकुंठ व्यापिलें ॥४॥चरणरज अति उभ्दट । लोकलोकांतर त्यजोनि स्पष्ट ।ठाकोनि जावें वैकुंठ । हा नेटपाट रजाचा ॥५॥गज गर्जती गहिरे । वारूं हिंसती एकसरें ।तुरें वाजती अपारें । गिरा गंभीर वीर गर्जती ॥६॥निशाण ...अजून वाचा

43

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 16

अध्याय 16 श्रीरामांकडून पिंडदानविधी ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ आघ्राय रामस्तं मूर्घ्नि परिष्वज्य च राघवं ।अंके भरतमारोप्य पर्यपृच्छत सादरं ॥१॥क तेऽभूत्पिता तात यदरण्यं त्वमागतः ।नहि त्वं जीवतस्तस्य वनमागतुमर्हासि ॥२॥किंनु वीर महारण्ये तवागमनकारणं ।कच्चिदॄशरथो राजा कुशली सत्यसंगरः ॥३॥तात कच्चिच्च कौसल्या सुमित्रा च प्रजावती ।सुखिनी किच्चदार्या च देवी नंदती कैकेयी ॥४॥ श्रीराम भरतास अयोध्येचे कुशल विचारतातः अति प्रीतीं रघुनंदन । भरत आणि शत्रुघ्न ।हृदयी धरिले आलिंगोन । सुखसंपन्न तेणें दोनी ॥१॥हृदया हृदय एक जालें । तेणें सुखाचें भरतें आलें ।दुख निःशेष निमालें । सागर भरिले स्वानंदें ॥२॥परमानंदें तृप्ति गाढी । द्वंद्वदुःखें देशोधडी ।होत हरिखाचिया कोडी । जोडिला जोडी श्रीराम ॥३॥मग भरतासी रघुनंदन ...अजून वाचा

44

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 17

अध्याय 17 भरताचे समाधान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाने बांधलेल्या पर्णशाळेचे सर्वांनी केलेले कौतुक : श्रीरामें उद्धरिले पितर । गगनीं करिती ।वर्षती सुरवर । जगदुद्धार श्रीराम ॥१॥मार्गीं चालतांदेखती डोळां । मनोहर पर्णशाळा ।सौमित्रे रचिल्या विशाळा । जनकबाळा स्वयें सांगे ॥२॥तें देखोनि म्हणती माता । धन्य जीवित्व सुमित्रासुता ।वनीं सुखरूप श्रीरामसीता । जाणा तत्वतां याचेनि ॥३॥याची सेवा अति निर्वाण । श्रीराम चरणी विकिला प्राण ।मस्तकीं जळ वाहे आपण । काष्ठें संपूर्ण हा आणी ॥४॥श्रीरामसीतेचें चरणक्षाळण । स्वादिष्ठ फळें पुरवी संपूर्ण ।नित्य नेमेस्त करी आपण । आणि जागरण अहर्निशीं ॥५॥वनी वसतां श्रीरघुनाथा । येणें विसरविली मातापिता ।विसरविली राज्यभोगता । सुख रघुनाथा ...अजून वाचा

45

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 18

अध्याय 18 श्रीरामपादुकांसह भरत अयोध्येत येतो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरत श्रीरामांची क्षमायाचना करतोः भरतें धांवोनि आपण । धरिले श्रीरामचरण ।अश्रु चालिले संपूर्ण । तेणें चरणक्षाळण श्रीरामा ॥१॥ स्वस्थगात्रस्तु भरतो वाचा संसज्जमानया ।कृताजलिरिदं वाक्यं राघवं पुनरब्रवीत ॥१॥ स्वेद रोमांच रवरवित । तेणें सर्वांग डवडवीत ।हरिखे उत्कंठित जालें चित्त । सद्रदित पैं वाचा ॥२॥विकळ वाचा होवोनि ठायीं । विनटोनि श्रीरामाच्या पायीं ।अंजळिपुट जोडोनि पाहीं । भरत लवलाहीं विनवित ॥३॥करोनिया कुशास्तरण । तुजवरी देत होतों प्राण ।हा माझा अपराध दारूण । क्षमा संपूर्ण करीं स्वामी ॥४॥भूतीं पृथ्वी नांगरून । दाढी घालोनि करिती दहन ।जीवनेंसहित लाताऊन ॥ कर्दमकंदन जन करिती ॥५॥तो ...अजून वाचा

46

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 1

अरण्यकाण्ड अध्याय 1 श्रीरामांचे दंडकारण्यात गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।एकैकं अक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १ रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकिकोकिलम् ॥ २ ॥ श्रीरामनाम महिमा : श्रीराम चूतवृक्ष प्रबळ । त्यावरी वाल्मीक कवि कोकिळ ।नारदवसंतें फुटली कीळ । मधुराक्षरी सरळ आलापु केला ॥ १ ॥त्या मधुराक्षरांमाजी मधुर । श्रीरामनाम हें सुखसार ।सुखी केले चराचर । सुखें शंकर डुल्लत ॥ २ ॥उफराटें राम ये अक्षरी । मरा मरा या उत्तरीं ।नारद वाल्मीका उपदेश करी । दों अक्षरीं उद्धरला ॥ ३ ॥नाम शुद्ध हो अथवा अशुद्ध । जो जपे तो पावन शुद्ध ।श्रीरामनाम जगद्वंद्य । ...अजून वाचा

47

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 2

अध्याय 2 विराध राक्षसाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अत्री आश्रमात श्रीरामांचे आगमन : अतिऋषि वसे जेथ । आतुरविश्रांतिपर्वत आला श्रीरघुनाथ । समवेत स्त्रीबंधू ॥ १ ॥देखोनि अत्रीचे चरण । श्रीरामें घातलें लोटांगण ।ऋषीनें दिधलें आलिंगन । समाधान ध्येयध्याना ॥ २ ॥सीता आणि लक्ष्मण । दोघीं घातलें लोटांगण ।दृढ मस्तकीं धरले चरण । सुखसंपन्न ऋषि जाला ॥ ३ ॥श्रीरामें अति उल्हासता । अनसूयाचरणीं ठेविला माथां ।अत्रि म्हणे श्रीरघुनाथा । तुझी हे माता पुरातन ॥ ४ ॥ अनसूया व सीतेची भेट, सीतेचे अभिनंदन : ऐकोनि अत्रीचें वचन । सौमित्रें वंदिले तिचे चरण ।सीतेनें घातलें लोटांगण । दिधलें आलिंगन अनसूये ॥ ...अजून वाचा

48

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 3

अध्याय 3 शरभंगऋषींचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हत्वा त तं भीमबलं विराधं राक्षसं वने ।आश्रमं शरभंगस्य राघवौ तौ ॥ १ ॥तस्य् देवप्रभावस्य तपसा भावितात्मनः ।समीपे शरभंगस्य ददर्श महदद्भुतम् ॥ २ ॥ श्रीरामाचे शरभंगाश्रमात आगमन : महाभयानक विराधु । त्याचा क्षणार्धे केला वधु ।प्रतापें शोभती दोघें बंधु । परम आल्हादु सीतेसी ॥ १ ॥मग तिघें जणें वेगेंसीं । निघालीं शरभंगाआश्रमासी ।मार्ग क्रमितां दो कोशीं । त्या आश्रमासी देखिलें ॥ २ ॥तैं शरभंग तपोराशी । तो न्यावया ब्रह्मलोकासी ।ब्रह्मयाने धाडिलें इंद्रासी । विमानेंसीं हंसयुक्त ॥ ३ ॥ ब्रह्मदेवाचे विमान धाडले : हंसयुक्त विमानंसी । बैसावया सामर्थ्य नाहीं इंद्रासी ।पुढें घालोनि ...अजून वाचा

49

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 4

अध्याय 4 मंदकर्णी ऋषींचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मंदकर्णी ऋषींचा उद्धार शरभंगे दिवं प्राप्ते मुनिसंघाः समंततः ।अभ्यगच्छंत ककुत्स्थं ज्वलिततेजसम् ॥ १ ॥ ब्राह्मण आश्रयार्थ श्रीरामांकडे येतात : विराध वधिला अति दारुण । केलें शरभंगोद्धरण ।तें देखोनि मुनिगण । आले ठाकून श्रीरामा ॥ १ ॥वैखानस वालखिल्य । अग्निहोत्री शुद्धशीळ ।राक्षसभयें अति व्याकुळ । आले सकळ श्रीरमापासीं ॥ २ ॥जळाहारी फळाहारी । जताधारी ब्रह्मचारी ।पत्राहारी वायुआहारी । निरहारी ऋषी आले ॥ ३ ॥एक भगवे एक नागवे । वल्कलधारी मळिन लेवे ।राक्षसभयें आले आघवे । आम्हां राघवें रक्षावें ॥ ४ ॥एकांगुष्ठाव्रत एकांसी । एक ते वृक्षाग्रनिवासी ।एक ते एकपाद तापसी । ...अजून वाचा

50

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 5

अध्याय 5 अगस्ती ऋषींकडून श्रीरामास अस्त्रप्राप्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ताबडतोब आजच जाण्याचा पदेश : श्रीराम म्हणे महामती । जेष्ठ बंधु अगस्ती ।तयाचिया दर्शनार्थी । तुम्हांप्रती मी आलों ॥ १ ॥करावया ज्येष्ठाचें दर्शन । अति उदति माझें मन ।कोणें मार्गें करावें गमन । कृपा करोनि सांगावें ॥ २ ॥ यदि बुद्धिः कृता राम द्रष्टुं तं मुनिपुंगवम् ।अद्यैव गमने बुद्धिं रोचयस्व महामते॥ १ ॥ जरी अगस्तीचें दर्शन । करावया वांछी तुझें मन ।तरी आजचि करावें गमन । विलंबव्यवधान न करावें ॥ ३ ॥ आश्रमातील देवस्थाने : जे मार्गी करितां गमन । सर्वथा न चुकिजे आपण ।तैसें सांगेन मार्गचिन्ह । सावधान ...अजून वाचा

51

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 6

अध्याय 6 कश्यपवंशवर्णन व अमृतहरणासाठी गरुडाचे प्रयाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अथ पंचवटीं गच्छन्नंतरा रघुनंदनः ।आससाद महाकायं गृघ्नं भीमपराक्रमम् १ ॥तं दृष्टावा तौ महाभागौ वनस्थौ रामलक्ष्मणौ ।मेनाते राक्षसं गृघ्नं ब्रुवाणौ को भवनिति ॥ २ ॥ततो मधुरया वाचा सौम्यया प्रीणयन्निव ।उवाच वत्स मां विद्धि वयस्यं पितुरात्मनः ॥ ३ ॥ पंचवटीत संगमावर आश्रमयोजना : पंचवटीं परम प्रयाण । श्रीराम सीता सह्लक्ष्मण ।अगस्तीसी करोनि नमन । शीघ्र गमन तिहीं केलें ॥ १ ॥रम्य रमणीय गंगातटीं । पंचक्रोश पंचवटीं ।उल्हास तिघांच्याही पोटीं । उठाउठीं निघालीं ॥ २ ॥अरुणावारुणासंगमप्राप्ती । मीनली प्राची सरस्वती ।तीर्थ पावन त्रिजगतीं । आवडे वस्ती श्रीरमा ॥ ३ ॥सुंदर आणि ...अजून वाचा

52

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 7

अध्याय 7 जटायूसह श्रीरामांचे पंचवटीत आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अमृतरक्षणासाठी घेतलेली दक्षता : अच्युत नाम धरोनि मानसीं । निघाला अमृतासी ।भावें वंदितां कश्यपासी । साह्य् सप्तऋषी त्यासी जाले ॥ १ ॥गरुडें अतिक्रमोनि गगन । सूक्ष्मरुप धरोनि जाण ।परमामृत लक्षितां पूर्ण । तव बहु रक्षण अमृतासी ॥ २ ॥प्रथम सर्पांचें संपूर्ण । दुसरें रक्षण वरुण ।तिसरें जाण यक्षगण । मरुद्गण तें चवथें ॥ ३ ॥पांचवें रक्षण यमदूत । सहावे रक्षण शिवदूत ।सातवे रक्षण विष्णुदूत । सावचित्त सर्वदा ॥ ४ ॥ योग्य वेळी गरुडाचे आक्रमण : गरुडें साधोनयां सवडी । कुंडीं घालोनियां उडी ।अमृत शोपोनियां तातडीं । अति झडाडी निघाला ...अजून वाचा

53

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 8

अध्याय 8 शूर्पणखेला विद्रूप करतात ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ स तां पंचवटीं गत्वा नानाशकुनिनादिताम् ।उवाच भ्रातरं रामो लक्ष्मणं शुभलक्ष्मणम् देशः समः श्रीरान्तुप्पितस्तरुभिर्वृतः ।इहाश्रमपदं रम्यं यथावत्कर्तमर्हसि ॥ २ ॥ पंचवटीत आगमन व वनसौंदर्याने सर्वांना संतोष : पंचवटीं । श्रीराम सुखावे देखोनि दृष्टीं ।सुखावली सीता गोरटी । आल्हाद पोटीं सौमित्रा ॥ १ ॥श्रीरामा देखोनि आल्हादें । कोकिळा कूजती पंचमशब्दें ।घुमरी घुमघुमती स्वानंदें । सुखानुवाद अति मधुर ॥ २ ॥श्रीरामां तूं तूं सीते तूं तूं । धन्य धन्य सुमित्रा तूं तूं ।ऐसें कपोत कूजतू । पुण्यपुरुषार्थी ये वनीं ॥ ३ ॥स्वतःप्रमाण कीं परतःप्रमाण । प्रयोगोपाधीनें व्यावर्तित कोण ।जहदजहल्लक्षणेचें काय प्रयोजन । शुक ...अजून वाचा

54

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 9

अध्याय 9 खर – दूषणांशी युद्ध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विद्रूप शूर्पणखा पद्मपुरीला जाते : घेवोनि लक्ष्मणाचा दरारा । आली पद्मपुरा ।निर्नासिकी विरुपाकारा । रुधिरधारा लागलिया ॥ १ ॥राक्षससभेचिये मेळीं । शूर्पणखा अतुर्बळी ।ते सरकटली समूळीं । राक्षसकुळीं गाजिली ॥ २ ॥शूर्पणखा अती दुर्धर । तीतें विटंबिलें तो महावीर ।राक्षसां धाक लागला थोर । निशाचर चळीं कांपती ॥ ३ ॥शूर्पणखेचें विरुपकरण । देखोनिय़ां खर दूषण ।कोपा चढले अति दारुण । क्रोधें गर्जोन पूसत ॥ ४ ॥ तां तथा पतितां दृष्टवा विरुपां शोणितोक्षिताम् ।भगिनीं क्रोधसंतप्तः खरः पप्रच्छ राक्षसः ॥१॥बलविक्रमसंपन्ना कामगा कामरुपिणी ।इमामवस्थां नीता त्वं केनांतकसमागता ॥२॥ खर-दूषण राक्षसास निवेदन व ...अजून वाचा

55

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 10

अध्याय 10 दूषण राक्षसाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ युद्धार्थी चालिला खर । देखोनि उभा श्रीरघुवीर ।अवघे खवळले निशाचर शस्त्रसंभार सुटले ॥ १ ॥ ततस्ते कूरकर्माणं क्रुद्धाः सर्वे निशाचराः ।रामं नानाविधैःशस्त्रैरभ्यवर्षन्त दुर्जयम् ॥ १ ॥ श्रीरामांचे युद्धकौशल्य : श्रीराम रणरंगधीर । क्रूरकर्मी निशाचर ।मोळोनि समग्र सैन्यसंभार । शस्त्रें अपार वर्षले ॥ २ ॥गदा मुग्दल तोमर त्रिशूळ । परशु पट्टिश महाशूळ ।कातिया कुर्‍हाडी परिघ मुसळ । लहुडी स्थूळ महाघात ॥ ३ ॥खड्ग हाणिती खणखणां । बाण सुटती सणसणां ।वोडणें वाजती दणदणां । लागली निशाणां एक घाई ॥ ४ ॥श्रीराम एकाकी एकला । गेला तुटला निवटला ।शस्त्रसंपाती आटला । म्हणती निमाला ...अजून वाचा

56

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 11

अध्याय 11 त्रिशिरा व खर राक्षसांचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दूषणाच्या वधानंतर खर व त्रिशिरा हे पुढे येतात; वल्गना : श्रीरामें मारिल्या सैन्य धुरा । तेणें दुर्धर कोप आला खरा ।त्यासी पुसोनियां त्रिशिरा । श्रीरामचंद्रावरी आला ॥ १ ॥खर म्हणे त्रिशिर्‍यासी । रणीं मर्दिलें दूषणासी ।म्हणोनि भिवो नको रामासी । तुझे पाठीसीं मी आहें ॥ २ ॥मनुष्य खाजें राक्षसांसी ।त्याचें भय काय आम्हांसी ।काटें देखोनि फणसासी । खाणारासी भय नाहीं ॥ ३ ॥चिरोनि फणसाचे कांटे । काढोनि अमृताचे सांठे ।मग सेविती घटघटें । युद्धसंकटें तेंवि श्रीराम ॥ ४ ॥श्रीराम बाणकटकेंसीं । अति दुर्धर राक्षसांसी ।तो गोड भखितां आम्हांसी ...अजून वाचा

57

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 12

अध्याय 12 शूर्पणखा-रावण संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पंचवटीतील राक्षससंहारामुळे राक्षसस्त्रियांचा विलाप : खरत्रिशिरादि बळांवर्ती । राक्षसांची जातिव्यक्ती ।रामें पाडिले क्षितीं । शरसंपातीं निवटोनियां ॥ १ ॥ ततःशूर्पणखा दृष्ट्वा सहस्त्राणि चतुर्दश ।हतानि रामेणैकेन मानुषेण पदातिना ॥ १ ॥ एकला श्रीराम धनुष्यपाणी । युद्धीं विचरतां चरणीं ।चवदा सहस्त्र वीरश्रेणीं । पाडिले रणीं शरघातें ॥ २ ॥बोंब सांगावया पुरती । राक्षसांची पुरुषव्यक्ती ।नाहीं उरली रणाप्रती । बाणावर्ती निवर्तले ॥ ३ ॥बोंब सांगावया देख । उरली शूर्पणखा एक ।घेवोनि लक्ष्मणाचा धाक । मारोनि हाक पळाली ॥ ४ ॥रणीं विमर्दाची धुकधुक । अति आक्रोशें करी शंख ।जनस्थान आली देख । नकटें मुख घेवोनी ...अजून वाचा

58

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 13

अध्याय 13 रावण व मारीच यांची भेट : ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावण व मारीच यांची भेट : सीताप्राप्त्यर्थ । रथारुढ रावण ।मारीचाश्रमा ठाकोन । आला आपण सवेग ॥ १ ॥ तत्र कृष्णानिजधरं जटामंडलधारिणम् ।ददर्शं नियताहारं मारीचं नाम राक्षसम् ॥ १ ॥तं रावणः समागम्य विधिवत्स्वेन तेजसा ।कुशलं परिपृच्छ्यार्थ ययाचे तेज पूजितः ॥२॥ मारीचातें देख रावण । जटाधारी वल्कलाजिन ।आणि नेमस्थ फळाभोजन । एकांतस्थान वनवासी ॥ २ ॥ऐसा मारीच रावणें देखोन । दोघीं दिधलें आलिंगन ।मग त्यासी कुशळ पुसोन । केलें पूजन यथाविधि ॥ ३ ॥ आलेल्या संकटांचे मारीचाला निवेदन व सीता हरणाची इच्छा : मग बैसवून एकांतीं । रावण ...अजून वाचा

59

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 14

अध्याय 14 हरिणरुपी मारीचाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचे पंचवटीत आगमन, तेथील विध्वंस पाहून त्याची बिकट अवस्था : पंचवटीं । रावण देखोनि आपुल्या दृष्टीं ।मारिल्या राक्षसांच्या कोटी । तेणें पोटीं दचकला ॥ १ ॥राक्षसांचीं दीर्घ मढीं । पडलीं देखोनि करवंडी ।मारीच अत्यंत हडबडी । खाजवी शेंडी भयभीत ॥ २ ॥आधींच श्रीरामभयें भीत । त्यावरी देखोनि राक्षसघात ।मारीच चळचळां कांपत । जे राक्षसां अंतक श्रीराम ॥ ३ ॥ मारीचाचा अनुनय : देखोनि राक्षसांचे कंदन । मारीचास स्वयें रावण ।अत्यंत देऊन सन्मान । त्याचे चरण दृढ धरिलें ॥ ४ ॥सीताहरण अति निर्वाण । खुंटलें स्वामिसेवकपण ।कृपा करोनि आपण । जानकीहरण ...अजून वाचा

60

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 15

अध्याय 15 लक्ष्मणाचे सांत्वन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांची हाक ऐकून सीता घाबरते : श्रीरामस्वरासमान । मारीचानें केलें आक्रंदन सीता करी रुदन । श्रीराम आपण सांपडला ॥ १ ॥राम रणरंगधीर संपूर्ण । विकट योद्धा अति दारुण ।तरी तो आक्रंदे दीनवदन । पाव लक्ष्मणा म्हणोनि ॥ २ ॥श्रीरामाचें आक्रंदन । ऐकोनियां दीनवदन ।उगाचि राहिला लक्ष्मण । याचें का मन द्रवेना ॥ ३ ॥ अतृस्वरं तु तुं भर्तुर्विज्ञाय सद्दशं वने ।उवाच लक्ष्मणं सीता गच्छ जानीहि राघवम् ॥ १ ॥सखायं भ्रातरं ज्येष्ठं रामं पंथानमागतम् ।काक्रंदमान तु वने भ्रातरं त्रातुमर्हसि ॥ २ ॥तं क्षिप्रमभिधावं त्वं भ्रातरं शरणैषिणम् ।रक्षसां वशमापन्नं सिहानामिव गोवृषम् ॥ ३ ...अजून वाचा

61

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 16

अध्याय 16 लक्ष्मण आश्रमातून गेल्यावर भिक्षेकर्‍याच्या वेषात रावणाचे आगमन : ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण आश्रमातून गेल्यावर भिक्षेकर्‍याच्या वेषात आगमन : लक्ष्मण गेला रामापासीं । सीता एकली गुंफेसीं ।रावण आला तेचि संधीसीं । सीतेपासीं भिक्षुवेषें ॥ १ ॥ एतदंतरमासाद्य दशग्रीवः प्रतापवान् ।परिव्राजकरुपेण वैदेहिमन्ववर्तत ॥ १ ॥ गुंफे नसतां श्रीरामलक्ष्मण । शून्य मंदिरी रिघे श्वान ।तेंवी आला दशानन । सीताहरणकार्यार्थी ॥ २ ॥गर्भजन्में जन्मली नाहीं । सीता देहींच विदेही ।तिचे हरन करावया पाहीं । आला लवलाहीं लंकानाथ ॥ ३ ॥सीताहरण करुं म्हणतां । मुळींच भीक लागली लंकानाथा ।चौपालवी आली हाता । अंगीं अशुभता बाणली ॥ ४ ॥चौदा चौकड्यांचें राज्यलक्ष्मण । ...अजून वाचा

62

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 17

अध्याय 17 जटायु-रावण युद्ध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेला रथात बसवून रावणाचे प्रयाण : रावण करोनि सीताहरण । सवेग आपण ।ते काळींचें गमनलक्षण । सावधान अवधारा ॥ १ ॥ वामेन सीतां पद्माक्षीं मूर्धजेषु करेण सः ।ऊर्वोस्तु दक्षिणेनैव परिजग्राह पाणिना ॥ १ ॥ततस्तां परुषैर्वाक्यैरभितर्ज्य महास्वनः ।अंकेनादाय वैदेहीं रथमारोहयत्तदा ॥ २ ॥ सीता बैसवितां रथासीं । आंग टाकिलें भूमीसीं ।रावणें धरोनियां केशीं । वाहोनि अंकासी बैसे रथीं ॥ २ ॥अंकीं बैसवितां पद्माश्री । तेणें रावण जाला सुखी ।सीता जाली परम दुःखी । धांवा पोखी आक्रंदें ॥ ३ ॥ सीतेचा विलाप, आक्रंदन व लक्ष्मणाबद्दल अनुताप : धांव पाव गां श्रीरघुवीरा । सवेग ...अजून वाचा

63

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 18

अध्याय 18 रावण सीतेला अशोकवनात पाठवतो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जटायू मूर्च्छित झाल्यामुळे सीतेला शोक : जटायूस स्वयें रावण वधिता जाला करोनि छळण ।ते देखोनि सीता जाण । झाली आपण अति दुःखी ॥ १ ॥ तं स्वल्पजीवितं भूमौ क्षतजार्द्र जटायुषम् ।निरिक्ष्य पतितं सीता विललाप सुदुःखिता ॥ १ ॥ जटायूचे उपडितां पांख । भूमीं मूर्च्छित जीव निःशेख ।त्याचें देखोनियां असुख । परम दुःख सीतेसी ॥ २ ॥न पवतीच श्रीरामलक्ष्मण । जटायु करितां सोडवण ।तों त्यासीच आलें मरण । कपटी रावण दुष्टात्मा ॥ ३ ॥जटायूसी म्हणे आपण । तुझें मज न येचि कां मरण ।तूं बळियां बळीं संपूर्ण । मजलागीं प्राण ...अजून वाचा

64

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 19

अध्याय 19 श्रीरामांचा सीताशोक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेवर राक्षसिणींचा पाहारा असतो त्याचे वर्णन : अशोकवनीं सीतेपासी । दुष्ट राक्षसी ।रावण ठेवी भेडसावयासी । भयें आपणासी वश होईल ॥ १ ॥ अशोकवनिकामध्ये मैथिली नीयतामिती ।तत्रेयं रक्ष्यतां गूढं युष्माभिः परिवारिता ॥ १ ॥ सीतासंरक्षणीं नित्यवासी । विकटा विकृता समयेंसी ।विरुपा विक्राळा राक्षसी । अशोकवनासी त्या आल्या ॥ २ ॥नानारुपा नानाकारा । विक्राळा कराळा अति उग्रा ।भिंगुलवण्या भयासुरा । आल्या समग्रा सीतेपासीं ॥ ३ ॥एकीचें विक्राळ वदन । सर्वांगासी एकचि कान ।तीसी कानचि आच्छादन । येरवीं नग्न कराळी ॥ ४ ॥लागतां कानाचा फडकारा । नक्षत्रें पडती जैशा गारा ।जयाचें भय सुरसुरां ...अजून वाचा

65

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 20

अध्याय 20 उमा व श्रीराम यांचा संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पौणिमेच्या रात्री गवताच्या अंथरुणावर पहुडले असता श्रीरामांचा झालेला : पूर्णिमेची रात्री शोभयमान । तृणशेजे रघुनंदन ।करिता जाला सूखें शयन । करीं पादसंवाहन सौमित्र ॥ १ ॥चंद्रादय मनोहर । चंद्रकिरण अति सुकुमार ।अंगीं लागतां श्रीरामचंद्र । उठी सत्वर गजबजोनी ॥ २ ॥ सौमित्रे ननु सेव्यतां तरुतलं चंडांशुरुज्जंभते ।चंडांशोर्निशि का कथा रघुपते चंद्रोयऽमुन्मीलति ।वत्सैतद्भवता कथं नु विदितं धत्ते कुरंगं यतः ।क्वासि प्रेयसि हा कुरंगनयने चंद्रानने जानकि ॥ १ ॥ श्रीराम म्हणे लक्ष्मण । खडतर सूर्याचे किरण ।मज बाधिती दारुण । बैसूं दोघे जण तरुतळीं ॥ ३ ॥तंव सौमित्र म्हणे श्रीरघुनाथा ...अजून वाचा

66

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 21

अध्याय 21 जटायूचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेच्या शोधासाठी मार्गक्रमण चालू असता अद्‍भुत राक्षसाचा पाय आढळतो : उमा महेशापाशीं । श्रीराम लक्ष्मण वनवासी ।निघाले सीतागवेषणासी । मार्गचिन्हांसी पहाताचि ॥ १ ॥ ददर्श भूमौ निष्क्रातं राक्षसस्य पदं महत् ।स समीक्ष्य परिक्रान्तं सीताया राक्षसस्य च ॥ १ ॥संभ्रान्तहृदयो रामः शशंस भ्रातरं प्रियम् ।इह लक्ष्मण पश्य त्वं राक्षसस्य महत्पदम् ॥ २ ॥मिथ्यामे तर्जितःशैलो न सीता गिरिगह्नरे ।तदद्दष्टवा लक्ष्मणो भितःपदं विकृतमद्‍भुतम्॥ ३ ॥ मार्गी माग पहात जात । तंव राक्षसपद अत्यद्‍भुत ।देखोनि श्रीरामा आनंद । मार्गी माग शुद्ध लागला ॥ ३ ॥लक्ष्मणा धांव धांव आतां । राक्षस घेवोनि जातो सीता ।मार्ग ओळख ...अजून वाचा

67

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 22

अध्याय 22 कबंध राक्षसाचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पुढें मार्ग क्रमीत असताना लक्ष्मणाला अपशकुन होऊ लागतातः करोनि जतायूद्धरण श्रीराम आणि लक्षमण ।करावया सीतागवेषण । वनोपवन शोधिती ॥ १ ॥वन शोधितां लक्ष्मण । तंव देखता होय अपशकुन ।तेणे भयें कंपायमान । सांगता होय श्रीरामा ॥ २ ॥ लक्ष्मणस्तं महातेजाःसत्यवांश्छीलवाश्छुचिः ।अब्रवित्प्रांजलिर्वाक्यं भ्रातरं दीनचेतसम् ॥ १ ॥स्पंदते मे दृढं बाहुरुव्दिग्नमिव मे मनः ।प्रायशश्चाप्यनिष्टानि निमित्तान्युपलक्षये ॥ २ ॥तत्मात्सज्जोभवार्य त्वं कुरुष्व वचनं मम ।ममैव हि निमित्तानि सद्यःशंसन्ति संभ्रमम् ॥ ३ ॥ सौ‍मित्र तेजस्वी महावीर । परनारी सहोदर ।सत्यवादी अति पवित्र । नित्य एकाग्र श्रीरामभजनीं ॥ ३ ॥त्यायोनियां धनमान । रामा त्यजोनि श्रीरामभजन ।ऐसा ...अजून वाचा

68

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 23

अध्याय 23 शबरीचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पंपासरोवरावर विश्रांती : कबंधरुपें दानव दनु । पावला होता राक्षसतनु ।तो उद्धरोनु । केला पावन तिहीं लोकीं ॥ १ ॥दनूनें केलें उर्ध्वगमन । पुढे श्रीराम लक्ष्मण ।पंपेसी निघाले आपण । धनुष्यबाण सज्जोनी ॥ २ ॥ पंपायाः पश्चिमे तीरे उपविष्टो च राघवौ ।ददर्शतुस्ततस्तत्र शबर्या रम्यमाश्रमम् ॥ १ ॥तौ तमाश्रममासाद्य द्रुमैर्बहुभिरावृतम् ।सुरभ्यमभिवीक्षंतौ शबरीमभ्युपेयतुः ॥ २ ॥तौ दृष्ट्वा तु तदा सिद्धा समुत्थाय कृताञ्जलिः ।पादौ जग्राह रामस्य लक्ष्मणस्य च धीमतः ॥ ३ ॥ श्रीराम लक्ष्मण अति सत्वर । पावोनि पंपापश्चिमतीर ।सेवोनियां पंपापवित्रनीर । विश्रांतीस वीर बैसले ॥ ३ ॥ शबरीच्या आश्रमास भेट, शबरीने केलेले स्वागत ...अजून वाचा

69

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 1

किष्किंधाकांड अध्याय 1 श्रीराम-हनुमंत भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम-हनुमंत भेट आदित्यान्वयसागरे दशरथः स्वातीजलं निर्मलंकौसल्याजठराख्यशुक्तिपुटके श्रीराममुक्ताफलम् ।तन्नीलं हृदाये हरेण सम्यग्धृतं सुज्ज्वलंसच्छत्रं स्मरणेन शंकरसमं प्राप्तोति भाग्यं जनः ॥१॥सच्चिदानंदरुपाय जनार्दनस्वरुपिणे ।स्वप्रकाशाय शुद्धाय आचार्याय नमो नमः ॥२॥मायातीताय नित्याय मायागुणप्रकाशिने ।व्यक्ताव्यक्तस्वरुपाय आचार्याय नमो नमः ॥३॥ श्री एकनाथांचे आत्मनिवेदन : अरण्यकांडा झाले निरुपण । श्रीरामें केलें संपुर्ण ।आता किष्किंधाकांडकथन । श्रीरघुनंदन स्वयें वदवी ॥१॥माझ्या अंगीं मुर्खपण । त्या मजकरवीं रामायण ।श्रीराम वदवी आपण । निग्रहूनि निजबळें ॥२॥सांडोनि रामकथालेखन । मजकरितां गमनागमन ।मार्गी श्रीराम रामायाण । स्वयें संपूर्ण प्रकाशी ॥३॥करूं बैसतां भोजन । ग्रासोग्रासीं स्मरे रघुनंदन ।मागें घालूनि जेवन । राम रामायण स्वयें वदवी ॥४॥पाहों ...अजून वाचा

70

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 2

अध्याय 2 सुग्रीवाची जन्मकथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दूतोऽहं प्रेषितस्तेन सुग्रीवेण महात्मना ।राजा वानरमुख्यानां हनूमान्नाम वानरः ॥१॥युवाभ्यां स हि सुग्रीवः सख्यमिच्छति ।तस्य मां सचिवं विद्धि वानरं पवनात्मजम् ॥२॥ हनुमंत सुग्रीवाचा जन्मवृत्तांत विचारतो : हनुमंत सांगे श्रीरामासी । मज सुग्रीवें तुम्हापासीं ।धाडिले पहावया वृत्तांतासी । सख्य तुम्हांसीं करावया ॥२॥देवदैत्यदानवांसी । रिघु नव्हे या वनासी ।तेथें येतां तुम्हां मानवांसी । वानरांसी विस्मयो ॥३॥धीर वीर गंभीरता । तुम्हां दोघां देखोनि येतां।भयें आश्चर्य सुग्रीवाच्या चित्ता । निःशंकता देखोनि ॥४॥ सुग्रीवाची शोचीय अवस्था व इच्छा, मारुतीची भूमिका व श्रीरामांचे आश्वासन : हृतदार हृतस्वार्थ । सुग्रीव वाळिभयें भीत ।तुमचा इच्छितो साह्यार्त । मज तदर्थ धाडिलें ...अजून वाचा

71

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 3

अध्याय 3 सुग्रीवाशी सख्य ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीवाला स्नेहसंबंध जोडण्यासाठी श्रीराम पाचारण करितात : वालिसुग्रीवजन्मकथा । ऐकोनि सुख ।संतोषोनियां हनुमंता । होये बोलता श्रीराम ॥१॥सख्य करावें सुग्रीवासीं । हे मुख्य कर्तव्य आम्हांसी ।तूंही सख्यार्थ आलासी । अतिशयेंसी सुख जालें ॥२॥कबंधे सांगीतले मजपासीं । हृतदारदुःख सुग्रीवासी ।सुखी करावया तयासी । ऋष्यमूकासी मी आलों ॥३॥जो मज होय अनन्य शरण । त्याचें दुःख निर्दाळून ।सुखी करावें संपूर्ण । ब्रीर्द जाण हें माझें ॥४॥दुःख निरसूनि सुख द्यावयासी । मी आलों वनवासासी ।वेगीं बोलावी सुग्रीवासी । सुखी त्यासी मी करीन ॥५॥ऐकोनि श्रीरामाचें वचन । हनुमंत जाला सुखसंपन्न ।वंदोनि श्रीरामाचे चरण । केले उड्डाण ...अजून वाचा

72

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 4

अध्याय 4 वाली सुग्रीवाच्या वैराची मूळ कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दोघा बंधूंच्या कलहाच्या कारणासंबंधी श्रीरामांचा प्रश्न : निर्दळोनियां । सदार राज्य सुग्रीवासी ।द्यावया श्रीराम उल्लासी । मित्रकार्यासी अवंचक ॥१॥स्वकार्य सांडोनियां मागें । मित्र-मित्रकार्यार्थ लगवेगें ।श्रीरघुनाथ धांवे अंगें । साह्य सर्वेस्वें शरणागता ॥२॥श्रीराम विचार करी शुद्धु । हे तंव दोघे सखे बंधु ।कां पडला द्वेषसंबंधु । द्वेषसंबंधु पुसत ॥३॥ किंनिमित्तं महद्वैरं श्रोतुमिच्छामि तत्वतः ।अनंतरं वधिष्यामि संप्रधार्य बलाबलम् ॥१॥ तुम्ही दोघे बंधु सहोदर । तुम्हां दोघांत कां पडिलें वैर ।तेंही अतिशयेंसी दुर्धर । येरयेरां घातक ॥४॥ सुग्रीवाकडून निवेदन : या वैराचें मूळ कारण । समूळ सांगावें संपूर्ण ।ऐकोनिया श्रीरामभाषण । ...अजून वाचा

73

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 5

अध्याय 5 वालीकडून सुग्रीवाचा पराभव ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वालीच्या सामर्थ्याने सुग्रीवाला भीती : पुढती वाळीच्या संत्रासीं । सुग्रीव श्रीरामापासीं ।हृतराज्य गुप्त वनवासी । तेथेंही आम्हांसी मारूं धांवे ॥१॥ तेनाहमपविद्धश्च हृतदारश्च राघव ।तद्‌भयाश्च महीं कृत्स्नां विचरामि समंततः ॥१॥ऋष्यमूकं गिरिवरं भार्याहरणदुःखितः ।प्रविष्टोऽस्मि दुराधर्ष वालिनः कारणान्तरे ॥२॥ आम्हीं जावें जेथ जेथ । वाळी मागें धावें तेथ तेथ ।आमचा करावया जीवघात । वैर पोटांत दृढ धरिलें ॥२॥वालिभयें भयभीत । अहोरात्र असों गुप्त ।पाळती येवोनियां तेथ । शुद्धि सांगत वाळीसी ॥३॥ त्यामुळे सुग्रीव ऋषमूक पर्वताचा आश्रय घेतो : भयें भोंवतां दशदिशीं । नारदें सांगीतलें आम्हांसी ।जावोनि रहावें ऋषमूक पर्वतांसी । तेथें वाळीसी ऋषीशाप ...अजून वाचा

74

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 6

अध्याय 6 वालीचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम हनुमंत सौमित्र । सुग्रीवसमवेत वानर ।पावोनि किष्किंधेचें द्वार । केला सुग्रीवें ॥१॥ अथ तस्य निनादं तं सुग्रीवस्य महात्मनः ।शुश्रावांतःपुरगतो वाली भ्रातुरमर्षणः ॥१॥ सुग्रीवाचेनि गिरागजरें । नादें दुमदुमिलें अंबर ।कोसळों पाहे गिरिकंदर । वाळीचें मंदिर दणाणलें ॥२॥ सुग्रीवाची गर्जना ऐकून वालीचा संताप : ऐकोनि सुग्रीवाची आरोळी । कोपें खवळलासे वीर वाळी ।आरक्त जाला क्रोधानळीं । जेंवी कुलाचळीं बालसूर्य ॥३॥वाळी विचारी हृदयांत । आतांच युद्धीं जर्जरीभूत ।म्यां पाडिला होता मूर्च्छित । सवेंचि गर्जत केंवी आला ॥४॥माझ्या घायें मासानुमास । कुंथत पडे वर्षानुवर्ष ।सवेंचि आला युद्धास । अति उल्लासें गर्जत ॥५॥आतां असो हा ...अजून वाचा

75

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 7

अध्याय 7 सुग्रीवराज्याभिषेक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वालीच्या निधनाने वानरांचा घबराट : श्रीरामाच्या दृढबाणीं । घायें वाळी पडिला रणीं देखोनि धरणीं । वानरां पळणी मांडली ॥१॥ निहते वालिनि रणे रामेण परमात्मना ।जग्मुस्ते वानराः सर्वे किष्किंधां भयविंह्वलाः ॥१॥तारामूचुर्महाभागे हतो वाली रणाजिरे ।अंगदं परिगृह्यार्थ मंत्रिणं परिनोदय ॥२॥चतुर्द्वारकपाटादीन्बद्धा रक्षामहे पुरीम् ।वानराणां तु राजानमंगदं कुरु भामिनि ॥३॥ श्रीरामाच्या बाणनेटीं । वाळी पडिला देखोनि दृष्टीं ।वानरसेना भयसंकटीं । उठाउठीं पळाली ॥२॥वाळी मारिला विंधोनि पूर्ण । सैन्यावरी सोडील बाण ।अवघियांचा घेईल प्राण । पलायमान तेणें धाकें ॥३॥श्रीरामबाण अति दुर्धर । घायें निवटिले त्रिशिरा खर ।चवदा सहस्र निशाचर । बाणीं सत्वर निर्दळिलें ॥४॥श्रीराम जीवें उरों नेदी ...अजून वाचा

76

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 8

अध्याय 8 मागील अनुसंधान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामें उद्धरिलें वाळीसी । राज्यभिषिंचन सुग्रीवासी ।सुखी केलें स्वयें तारेसी । अंगदासी यौवराज्य ॥१॥सुग्रीव राजा निजभ्रतार । युवराज निजकुमर ।तारा तेणें सुखनिर्भर । श्रीरामचंद्रप्रसादें ॥२॥ अभिषेके तु सुग्रीवे प्रविष्टे वानरे गुहाम् ।आजगाम सहभ्राता रामळ पस्रवणं गिरिम् ॥१॥ प्रधान अंगदसमवेत । सुग्रीव गेला किष्किंधेत ।श्रीरामें वसविला माल्यवंत । गुहा प्रशस्त देखोनि ॥३॥ पावसाळा संपल्यावरही सुग्रीवाच्या उपेक्षेमुळे रामांचा क्रोध : माल्यवंतगिरिवरीं । प्रस्रवणगुहेभीतरीं ।श्रीराम राहिला मास चारी । सहे साहाकारी सौमित्र ॥४॥चारी मास पर्जन्यकाळ । श्रीराम राहिला सुनिश्चळ ।श्रीरामकार्या उतावेळ । शरत्काल स्वयें आला ॥५॥ग्रासोनि वर्षाकाळ । शीघ्र पावला शरत्काळ ।श्रीराम काळाचाही काळ ...अजून वाचा

77

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 9

अध्याय 9 वानरसेनेला श्रीरामदर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीव श्रीरामांना वानरसेनेचा विस्तार समजावून सांगतो : सुग्रीवें विनविला रघुवीर । सेनानी सेनाधर ।सैन्ययूथपाळ महावीर । नमस्कार करूं पाहती ॥१॥स्वामि समवेत सौमित्र । पहावा वानरांचा संभार ।ऐकोनि सुग्रीवांचे उत्तर । जाला सादर श्रीराम ॥२॥ यूथपा दशसाहस्रं वृता वानरकोटिभिः ।वानयैः पार्वतीयैश्च सामुद्रैश्च महाबलैः ॥१॥ माझे कटकीं दहा सहस्र । सेनानायक सेनाधर ।एकएकातळीं कोटि वीर । अति दुर्धर रणयोद्धे ॥३॥उदयास्तगिरिपर्यंत । वानर आले जी समस्त ।नंदवनींचे वीर विख्यात । आले त्वरित रामाकार्या ॥४॥सप्तारण्य सप्तसमुद्र । नदीस्रोत वनें उखर ।तेथोनियां वानरवीर । आले सत्वर रामकार्या ॥५॥मेरू मंदार आणि विंध्याद्री । वेंकटाद्रि आणि सह्याद्री ।तेथोनि ...अजून वाचा

78

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 10

अध्याय 10 हनुमंत जन्मकथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा प्रश्न : अगस्तिमहामुनीप्रती । प्रश्न केला श्रीरघुपतीं ।सुग्रीवा निजसखा मारूती अद्‌भुतशक्ती असतां ॥१॥तेणें साधावया मित्र कार्यार्था । कां न करीच वाळीच्या घाता ।या हनुमंताच्या भावार्था । मजला साद्यंत सांगावें ॥२॥ राघवस्य वचः श्रुत्वा हेतुयुक्तमृषिस्तदा ।हनूमतः समक्षं तमिदं वचनमब्रवीत् ॥१॥ अगस्ती मारुतीची जन्मकथा सांगतात : ऐसें पुसता श्रीरघुनाथ । अगस्ति मुनि आनंदयुक्त ।हनुमंताचें निजसामर्थ्य । असे सांगत स्वानंदे ॥३॥आतां सांगेन श्रीरघुनाथा । हनुमंताची जन्मकथा ।सकळमूळारंभवार्ता । होय सांगता अगस्ति ॥४॥पुत्रेष्टियाग दशरथासी । ताटप्रसाद यज्ञपुरुषीं ।वसिष्ठें करोनि विभागांसी । तिघी राणियांसी दीधलें ॥५॥कैकेयीभाग हरिला घारीं । ते शापद्वारें जाली नारी ।तेथें वर्तली ...अजून वाचा

79

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 11

अध्याय 11 सीतेच्या शोधासाठी वानरांना पाठविले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीवाची श्रीरामांना विनंती : दाविला कपिसेनासंभार । अति दाटुगा वीर ।तेणें सुखावला श्रीरामचंद्र । केला नमस्कार सुग्रीवें ॥१॥वानरसेना कडकडाटीं । वेगीं रिघों लागे वैकुंठीं ।अथवा कैलासगिरितटीं । मेरुपृष्ठीं घालूं घाला ॥२॥रिघोनि पाताळाच्या पोटीं । मारूं दानवांच्या कोटी ।अथवा दैत्यांचि थाटी । उठउठीं निर्दाळूं ॥३॥गण गंधर्व सुरवर । यक्ष राक्षस नर किन्नर ।माझे निर्दाळिती वानर । चराचर उलथिती ॥४॥लोकालोकांहीपरती । कव घालोनि अवचितीं ।वानर कृतकार्य साधिती । आज्ञा रघुपति शीघ्र द्यावी ॥५॥ इति ब्रुवंतं सुग्रीवं रामो दशरथात्मजः ।बाहुभ्यां संपरिष्वज्य प्रीतो वचनमब्रवीत् ॥१॥ज्ञायतां सौम्य वैदेही निलये रावणस्य च ॥२॥ सीतेच्या शोध ...अजून वाचा

80

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 12

अध्याय 12 सीताशोधासाठी वानरांचे प्रयाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तिन्ही दिशांकडे वानरांना पाठविल्यावर दक्षिणदिशेकडे महापराक्रमी निवडक वीरांना पाठविले : स्थानें स्वर्गवासीं । तेथें शोधावया सीतेसी ।सुग्रीवें सांगोनि तारापासीं । वेगीं तो स्वर्गासी धाडिला ।पूर्व पश्चिम उत्तर । स्वर्ग पाताळा धाडिले वीर ।दक्षिणदिशेचा विचार । सांगो कपीश्वर विसरला ॥२॥ऐसें न म्हणाचें श्रोतीं । दक्षिणदिशेची गती ।आहे सीतेची निजप्राप्ती । गोड ग्रासार्थीं राखिली ॥३॥गोड ग्रास तो रामायणांत । तो हा सीताशु्द्धीचा ग्रंथ ।ख्याति करील हनुमंत । लंकेआंत तें ऐका ॥४॥दक्षिणदिशेचा विचार । सीथाप्राप्तींचे मुख्य घर ।तेथें धाडिले महाशूर । वीर दिनकरप्रतापी ॥५॥ पितामहसुतं चैव जांबवंतं महाबलम् ।नीलमग्निसुतं चैव हनूमंतं च वानरम ...अजून वाचा

81

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 13

अध्याय 13 श्रीराम-हनुमंत संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुग्रीव अंगदाला हनुमंताच्या स्वाधीन करुन त्याच्यावरच सर्व भार टाकतो : सीताशुद्धीस वानर ।दक्षिणेसी संगद वीर ।निघाले ही सहपरिवार । वानरवीरसमवेत ॥१॥ सह तारांगदाभ्या तु प्रस्थितो हनुमान्कपिः ।सुग्रीवेण यथोद्दिष्टं तं तु देशं सुरासदम् ॥१॥ सु्ग्रीवें बोललावोनि हनुमंत । हातीं दिधला वािलसुत ।सीताशुद्धीं रामकार्यार्थ । तुझेनि निजविजयी ॥२॥अंगद वीर अति विख्यात । सवे नळ नीळ जांबुवंत ।वानरवीर असंख्यात दुर्धर पंत दक्षिणे ॥३॥सिद्धि न्यावया रामकार्यार्था । शुद्धि साधावया सीता ।मुखरण करोनि हनुमंता । होय धाडिता सुग्रीव ॥सीताशुद्धि माझे माथां । सुग्रीवें ठेविली तत्वतां ।तेणें उल्लास हनुमंता । श्रीरामकांता शोधावया ॥५॥ हनुमंत श्रीरामांकडे जाण्याची अंगदाची ...अजून वाचा

82

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 14

अध्याय 14 वानरांचा गुहाप्रवेश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ एक महिना होतांच पूर्व, पश्चिम व उत्तरेकडील वानर परत आले : पश्चिम वायव्य ईशान्य । उत्तर नैर्ऋत्य आग्नेयकोण ।पाताळदिशा स्वर्गभुवन । आले शोधून वानर ॥१॥ तदहः प्रथमं कृत्वा मासे प्रस्रवणं गतां ।कपिराजेन संगम्य निराशाः कपिकुंजराः ॥१॥समेत्य मासे संपूर्णे सुग्रीवमुपचक्रमुः ।तं प्रस्रवणपृष्ठस्थमभिगम्याभिवाद्य च ।सुग्रीवं प्लवगाः सर्वे सुषेणप्रमुखा ब्रुवन् ॥२॥ राया सुग्रीवांचे आज्ञापन । मासें एकें संपूर्ण ।अवघीं यावें सीता शोधून । न येतां दारूण राजदंड ॥२॥ सर्वजण शोध न लागता परत आले : प्रस्रवण गिरिवर । तेथें वसे श्रीरामचंद्र ।तयापासीं सुग्रीव वीर । नित्य तत्पर सेवेंसीं ॥३॥श्रीराम पुसे सुग्रीवासी । वानर गेले ...अजून वाचा

83

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 15

अध्याय 15 तापसी-हनुमंत-संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सावध झाल्यावर त्या वानरांना सभोवती सुवर्णभुवन दिसते : वानर होवोनि सावधान । तंव हेमभुवन ।हेमशय्या हेमासन । उपरी आस्तरण हेमाचें ॥१॥हेममय तेथींची क्षिती । हेममय अवघ्या भिंती ।हेमदीपिका हेमदीप्ती । पात्रपंक्ती हेममय ॥२॥हेमविमानें हेमांबरें । हेमबद्ध सरोवरें ।हेममत्स्य हेमनगरें । जळचरें हेममय ॥३॥मुक्ताफळें हेमरत्‍नें । हेमपदकें हेमभूषणें ।हेममय उपकरणें । हेमाभरणें पशुपक्षी ॥४॥ ते विवर सर्व समृद्धीने निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण : विवरीं धनधान्यसमृद्धी । विवरीं परमामृतनदी ।विवरामांजि ऋद्धिसिद्धी । सुख त्रिशुद्धी वानरां ॥५॥नसोनि रविचंद्रभास । विवरामाजी नित्य प्रकाश ।तेणें वानरां अति उल्लास । पाहती वास वायपुत्राची ॥६॥ऐसिये रमणीय स्थानीं हनुमंत पाहोनियां नयनीं ...अजून वाचा

84

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 16

अध्याय 16 संपातीचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ फळांनी व पाण्याने वानरांची तृप्ती : वानरां मास उपोषण । तापसीं आणूनि पूर्ण ।दिधलें यावृत्तृप्ति भोजन । वानरगण उल्लासी ॥१॥ संतृप्तास्ते फलैर्मूलैः संजाताः शीतवारिणा ।बलवीर्याश्च ते सर्वे तत्रासन्हरिपूगवाः ॥१॥अपतन्सर्व एवैते दिशो वानरयूथपाः ॥२॥ भक्षितां पैं फळमूळ । सेविता निर्मळ जळ ।वानर सुखी जाले सकळ । हर्ष प्रबळ तृप्तीचा ॥२॥वानरांचे सकळ दळ । पूर्विल्यापरिस अति प्रबळ ।शतगुणें वाढलें बळ । जनकबाळ शोधावया ॥३॥ यानंतर सर्व वानरांची परत जाण्याची इच्छा : वानर म्हणती हनुमंतासी । येथें काय फळें खावया आलासी ।किंवा सीता शोधावयासी । त्या रामकार्यासी साधावें ॥४॥शोधितां या विवराआंत । सीता न ...अजून वाचा

85

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 17

अध्याय 17 हनुमंताचे समुद्रावरुन उड्डाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ आख्याता गृध्रराजेन समुत्पत्य प्लवंगमाः ।संगताः प्रीतिसंयुक्ता विनेदुः सिंहविक्रमाः ॥१॥ संपातीकडून माहिती मिळाल्यामुळे वानरांना आनंद : संपातीनें सीताशुद्धी । यथार्थ सांगितली बुद्धी ।तेणें वानरांची मांदी । जयजयशब्दीं गर्जत ॥१॥मिळोनि वानरांचा भार । सिंहनादाहूनि थोर ।करिते जाले भुभुःकार । सीता सुंदर सांपडली ॥२॥येरयेरां आलिंगण । येरयेरां अभिनंदन ।सीता सांपडली चिद्रत्‍न । हर्षे उड्डाण करिताती ॥३॥आमच्या कष्टांची जाली सिद्धी । आजि पावली सीताशुद्धी ।म्हणोनि वानरांची मांदी । हर्षानुवादीं डुल्लत ॥४॥येरयेरां दाविती वांकुल्या । येरयेरा करिती गुदगुल्या ।सत्य सीताशुद्धी जालिया । आमची फिटली आशंका ॥१०५॥अंगदे बैसोनि सपरिवार । शतयोजन हा सागर ।उल्लंघो शके कोण ...अजून वाचा

86

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 18

अध्याय 18 हनुमंताचा लंकाप्रवेश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताच्या उड्डाणात सिंहिकेचे विघ्न : सुरसा देवविघ्नातें । स्वयें जिणानि हनुमंते लंघोनि समुद्रातें । सिंहिका तेथें ग्रासूं आली ॥१॥ प्लवमानं तु तं द्दष्ट्वा सिंहिका नाम राक्षसी ।मनसा चिंतयामास प्रकृद्धा कामरुपिणी ॥१॥इदं हि सुमहत्सत्वं चिरस्य वशमागतम् ।इति संचित्य मनसा छायामस्य समक्षिपत् ॥२॥ गगनीं उडतां हनुमंत । छाया पडती समुद्रांत ।सिंहिकेचा मनोरथ । ग्रासावया हनुमंत वाढली ॥२॥शिववरद सिंहिकेसी । छाया धरितां प्राणी ग्रासी ।छायाग्रह नांव तिसी । ते हनुमंतासीं गिळों आली ॥३॥कपिच्छाया पडतां जळीं । सिंहिका ते छाया गिळी ।हनुमंताची गति खुंटली । देहाची वळली मुरकुंडी ॥४॥ छायायां संगृहीतायां चिंतयामास वानरः ।किमाक्षिप्तोऽस्मि सहसा ...अजून वाचा

87

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 1

सुंदरकांड अध्याय 1 लंकेचा शोध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम् ।काकुत्स्थं करूणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् सत्यसंघं दशरथनयनम् श्यामलं शांतमूर्तिम् ।वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥ श्रीरामनामाचा महिमा : श्रीरामें पावन कथा । श्रीरामें पावन वक्ता ।श्रीरामें पावन श्रोता । श्रीराम स्वतां ग्रंथार्थ ॥ १ ॥श्रीरामें धन्य धरणी । श्रीरामें धन्य करणीं ।श्रीरामें धन्य वाणी । जे रामायणीं विनटली ॥ २ ॥श्रीरामें पावन संसार । श्रीरामें पावन चराचर ।श्रीरामें पावन नर । जें तत्पर नित्य स्मरती ॥ ३ ॥रामनामें शुद्ध साधन । रामनाम शुद्ध ज्ञान ।रामनामें सुते बंधन । नाम पावन सर्वार्थी ॥ ४ ॥रामनामें सरतें ...अजून वाचा

88

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 2

अध्याय 2 सीतेचा शोध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ नगरशोध केल्यानंतर राजवस्तीत हनुमंत जातो : हनुमंत महावीरें । लंका शोधिली ।हाट चोहाटें चौबारें । गुप्त ओवरें स्त्रियांचीं ॥ १ ॥ऐसें शोधितां नगरांत । न लभेचि सीताशुद्धर्थ ।राजवर्गाच्या गृहांत । सीता हनुमंत पाहों रिघे ॥ २ ॥ विचक्रमे गृहान् वेगात् प्रहस्तस्य निवेशनम् ।ततो न देवीति गृहं महापार्श्वस्य वीर्यवान् ॥ १ ॥महोदरस्य च तथा महाकायस्य चैव हि ।विद्युज्जिव्हस्य भुवनं जंबुमालेस्तथैव च ॥ २ ॥वज्रदंष्ट्रस्य तथा शुकसारणयोरपि ।विद्युन्माले सुमालेश्च विकटस्याप्यतुर्बले ॥ ३ ॥बहुशत्रोः सूर्यशत्रोः कुमित्रामित्रयोस्तथा ।चित्रकस्य च विचित्रस्य अतिगर्विष्ठमित्रयोः ॥ ४ ॥ताम्राक्षस्य च धूम्रस्य मकराक्षमृगाक्षयो ।लंबजिव्ह विरूपाक्ष आदिनां च महाबलः ॥ ५ ॥ ...अजून वाचा

89

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 3

अध्याय 3 रावणसभेवर मारूतीचा पुच्छप्रयोग ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ बाजातपेठा, बिभीषणाचे मंदिर पाहूनही सीतेचा शोध लागला नाही : शोधितां । सुखी झाला तो कपीन्द्र ।शुद्धि न लभेचि सीता सुंदर । तेणें वानर उद्वेगी ॥ १ ॥शोधिलें समस्त नगर । शोधिलीं हटकें घरोघर ।शुद्धि न लभेचि अणुमात्र । तेणें वानर उद्वेगी ॥ २ ॥शोधिलें समस्त नगर जाण । जन आणि अवघें वन ।स्वयें शोधिलें सावधान । तेणें उद्विग्न वानर ॥ ३ ॥सीताशुद्धर्थी उद्विग्न । अति चिंता कंपायमान ।आतां करी बुद्धि आपण । सीता चिद्रत्‍न तेणें लाभे ॥ ४ ॥ मारूतीची अभिनव योजना : येथें शोधावया सीताशुद्धर्थ । कळी माजवूं नगराआंत ...अजून वाचा

90

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 4

अध्याय 4 रावणाच्या शयनभवनांत सीतेचा शोध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रयत्‍नाची पराकाष्ठा करूनही सीतेचा शोध लागत नाही रावणाचें सभेआंत न लभे सीताशुद्धीची मात ।तेणें दुःखें हनुमंत । चिंताग्रस्त दृढ झाला ॥ १ ॥दृढ प्रयत्‍न केला भारी । समस्त शोधिली लंकापुरी ।धांडोळिलें घरोघरीं । सीता सुंदरी तेथें नाहीं ॥ २ ॥विनोदें वाटिका अरामशिरीं । नद नदी वापी पोखरीं ।राजकुमरांच्या घरोघरीं । सीता सुंदरी तेथें नाही ॥ ३ ॥प्रत्यावर्ती लंकापुरीं । शतावृत्तीं घरोघरीं ।शुद्धि घेतां नानापरी । सीता सुंदरी तेथे नाहीं ॥ ४ ॥स्त्रीपुरूषांचे शेजारी । त्या स्थानांचे उपराउपरीं ।शोधितां कोट्यनुकोटी नारी । सीता सुंदरी तेथें नाहीं ॥ ५ ॥रावणाचे सभेमाझारीं ...अजून वाचा

91

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 5

अध्याय 5 मारूतीला अशोकवनात सीतेचे दर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचा शांतिहोम : विघ्नदेखिलें सभेआंत । रावण होम क्री ।मंदोदरी सेजे गुप्त । देखे हनुमंत एकाकी ॥ १ ॥ मंदोदरीलाच सीता समजून हनुमंताचे विचार व मनोविकार : ही निश्चयें होय सीता । ऐसें मानलें हनुमंता ।तेचि अवधारा पैं कथा । श्लोकीं श्लोकार्थ अवधारिजे ॥ २ ॥विमानीं उपराउपरीं । शोधितां एकांत ओवरी ।रावणाचे सेजेवरी । मंदोदरी देखिली ॥ ३ ॥ठाण माण गुणलक्षण । रूपरेखा स्थान यौवन ।सीतेसारखी समसमान । दोघी अनुपम्य स्वरूपें ॥ ४ ॥हेचि श्रीरामाची कांता । हेचि माझी स्वामिनी सीता ।ऐसे मानिलें हनुमंता । उल्लासतां नाचत ॥ ५ ...अजून वाचा

92

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 6

अध्याय 6 मंदोदरीची जन्मकथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेची देहस्थिती : श्रीरामाची निजभक्ती । भजनें दाटुगी सीता गती ।तृण नामें गर्जती । नामें त्रिजगती कोंदली ॥ १ ॥श्रीरामाची परम भक्ती । स्वयें जाणे सीता सती ।तिचे भजनाची देहस्थिती । भजती युक्ती अवधारा ॥ २ ॥ काया – वाचा – मनाने भजनभक्ती : ह्रदयीं आत्मा श्रीरघुपती । पाहतां वेदशास्त्रव्युत्पत्ती ।ऐसी जे कां निजप्रतीती । भजनभक्ति ते नांव ॥ ३ ॥तेचि भक्ति धरितां चित्तीं । श्रीराम दिसे सर्वांभूतीं ।हे दृष्टीची भजनस्थिती । केला वेदांती निश्चय ॥ ४ ॥याचि स्थितीं वचनोच्चार । हेंचि वाचिक वजन निर्धार ।श्रीराम अक्षरीं अक्षर । नामोच्चार श्रीराम ...अजून वाचा

93

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 7

अध्याय 7 रावणाचे अशोकवनात आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मारूतीचे अशोकवनात आगमन : पूर्वप्रसंगाप्रती । दूतिकांमागें मारूती ।आला अशोकवनाप्रती सीता सती वंदावया ॥ १ ॥देखोनियां अशोकवन । हनुमान घाली लोटांगण ।करोनियां श्रीरामस्मरण । सीतादर्शन करूं निघे ॥ २ ॥ अशोकवनाचे वर्णन : साधावया सीता चिद्रत्‍न । हनुमान क्षण एक धरी ध्यान ।देखोनियां अशोकवन । आलें स्फुरण हनुमंता ॥ ३ ॥जैसा श्रीरामाचा बाण । तैसें करोनि उड्डाण ।अशोकवनामाजी जाण । आला आपण हनुमंत ॥ ४ ॥वृक्ष सफळ आणि सरळ । वन देखोनि विशाळ ।करी हर्षाचा गोंधळ । घोंटी लाळ मिटक्या देत ॥ ५ ॥दाट देखोनियां झाडां । उल्लास आला माकडा ...अजून वाचा

94

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 8

अध्याय 8 रावण सीता संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाच्या आगमनाने सीतेची झालेली स्थिती : पूर्वप्रसंग संपतां तेथ । होऊनि पंचोन्मत्त ।येवोनि अशोकवनांआंत । सीता पाहत भोगेच्छा ॥ १ ॥रावणें ऐसी देखिली सीता । कंपायमान अति भयार्ता ।जेंवी कदली वायुघाता । श्रीरामकांता तेंवी कांपे ॥ २ ॥देखोनियां दशानन । ऊरूउदरबाहुभूषण ।पीतांबर अति जीर्ण । तेणेंचि आपणा आच्छादी ॥ ३ ॥पीतांबर तो अति जीर्ण । तेणें अवयव आच्छादून ।जानकी अति लज्जायमान । अधोवदन राहिली ॥ ४ ॥नाहीं अभ्यंग ना स्नान । सर्वांग मलिन मळकण ।नाहीं आच्छादन आस्तरण । नाहीं आसन बैसावया ॥ ५ ॥सीता धरणिजा आपण । धरासनीं सुखसंपन्न ।बैसली ...अजून वाचा

95

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 9

अध्याय 9 दशरथ – कौसल्या विवाहाची पूर्वकथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मंदोदरीकडून रावणाचा अनुनय : रावण सीतेसी लावितां हात हनुमान त्याचा करिता घात ।तों मंदोदरी येऊनि तेथ । अति अनर्थ चुकविला ॥ १ ॥अतिकायाची जननी । रावणप्रिया वनमालिनी ।तया रावणा आलिंगूनी । युक्तवचनीं बोलत ॥ २ ॥स्वदारकाम मजसीं रम । मजसीं रमणें हा स्वधर्म ।सीता अकाम चित्ता काम । परम अधर्म अधःपात ॥ ३ ॥सांडी अकाम सीतेंसी । स्वेच्छा रमावें मजसीं ।माझेनि कामें सुखी होसी । सीतेपासीं अति दुःख ॥ ४ ॥ सीताहरणामुळे होणारे भावी अनर्थ : श्रीरामकांता सीता सती । तिचे कामाचे आसक्तीं ।राक्षसांची जावया व्यक्ती । होईल ...अजून वाचा

96

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 10

अध्याय 10 सीतेचा पश्चाताप ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेला रावणाच्या धमक्या : रावणें भेडसावितां सीता । त्याच्या पत्‍न्या ज्या ।आश्वासिती श्रीरामकांता । नेत्रवक्त्रा खुणावूनि ॥ १ ॥ देवगंधर्वकन्याश्च विषेदू राक्षसीस्तदा ।ओष्ठप्रकारैरपरा नेत्राकारैस्तथा परा : ॥१॥सीतामाश्वासयामासुस्तर्जितां तेन राक्षसा ॥२॥ सीतेसी म्हणे स्वयें रावण । माझी भार्या न होतां पूर्ण ।तुझा घेईन मी प्राण । नाक कान कापूनी ॥ २ ॥फोडा इचे दोनी डोळे । वेगें मोडा रे सिसाळें ।स्तन कापा मांसगोळे । अंत्रमाळे काढा वेगीं ॥ ३ ॥तुझिया पातिव्रत्याची थोरी । भीड धरिली सहा मासवरी ।आतां भोगीन बलात्कारीं । राम भिकारी वनवासी ॥ ४ ॥रावणपत्‍न्यांनी सीतेला अभयाचे आश्वासन दिले :ऐसीं ...अजून वाचा

97

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 11

अध्याय 11 सीता व मारुती यांची प्रथम भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वीच्या घटनांचे स्मरण होऊन सीतेचा अनुताप : भेटी श्रीरामकांता । परम आल्हाद हनुमंता ।तिच्या निरपेक्ष एकांता । वृक्षाआंतौता बैसला ॥ १ ॥स्वस्थानीं राक्षसी समस्ता । स्वभावें जाहलिया निद्रिस्ता ।अशोकवृक्षातळीं सीता । सावधानता बैसली ॥ २ ॥म्हणे मज नाहीं पापकर्मपरता । आणि कां भोगितें दुःखावस्था ।वृथा लक्ष्मणाभिशापता । तेणें पापें लंकेशा आतुडलें ॥ ३ ॥लक्ष्मणाची मर्यादारेखा । म्यां उल्लंघिता देखा ।अंतरोनी श्रीरामसखा । त्या दशमुखा आतुडलें ॥ ४ ॥छळूं जातां श्रीरामभक्ता । मुकलें मी श्रीरघुनाथा ।हें पाप माझें माथां । दुःखावस्था मी भोगीं ॥ ५ ॥अवज्ञा केली म्यां ...अजून वाचा

98

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 12

अध्याय 12 सीता – हनुमंत यांचा संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीता मारूतीला पूर्ववृत्तांत कथन करण्याची सूचना करिते : अशोकवनां आंत । आला देखोनि हनुमंत ।त्यासी समूळ वृत्तांत । पुसे साद्यंत जानकी ॥ १ ॥मज वनवासीं असतां । तैं तूं नव्हतासी हनुमंता ।कैंचा आलासी तूं आतां । निजवृत्तांता सांगावें ॥ २ ॥कैसेनि राम देखिला दृष्टीं । तुज रामासीं कैसेनि भेटीं ।कैशा कैशा केलिया गोष्टी । जेणें पोटीं अति प्रीति ॥ ३ ॥कैसा बाणला तो वचनार्थ । साधावया श्रीरामाकार्यार्थ ।हनुमान प्राणेंसीं साह्यभूत । तो गुह्यार्थ मज सांगें ॥ ४ ॥श्रीराम भेटलिया कैसें सुख । श्रीरामवचनीं कैसें पीयूख ।श्रीरामसंगें कैसा हरिख ...अजून वाचा

99

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 13

अध्याय 13 हनुमंताकडून वनविध्वंस ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मणी पाहून श्रीरामांना पूर्वींच्या गोष्टींचे स्मरण होईल ते सीता सांगते : देवोनि वानराहातीं । स्वयें बोले सीता सती ।मणि देखोनि रघुपती । स्मरेल चित्तीं तिघांतें ॥ १ ॥कौसल्या माता आणि सीता । आठवेल दशरथ पिता ।तिघे आठवती श्रीरघुनाथा । कोण्या अर्था तें ऐका ॥ २ ॥पूर्वी समुद्रमंथनीं । तेथें निघाला कौस्तुभमणी ।तो घेतां श्रीविष्णूंनीं । इंद्र ते क्षणीं तळमळी ॥ ३ ॥ब्रह्मशापाच्या शापोक्तीं । सिंधुनिमग्न सर्व संपत्ती ।त्यांतील कौस्तुभ श्रीपती । माझा मजप्रती देइजे ॥ ४ ॥इंद्र मणि मागे करोनि ग्लानी । विष्णु त्यास दे फणिमणि बदलोनी ।इंद्रें देखतांचि नयनीं । ...अजून वाचा

100

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 14

अध्याय 14 रावणपुत्र अखयाचा मारूतीकडून वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऎंशी हजार किंकर, चौदा हजार बनकर व संपूर्णवनाचा मारूतीने केला म्हणून रावणाचा संताप किंकर मारिले ऐशीं सहस्त्र । चवदा सहस्त्र बनकर ।वन विध्वंसिलें मनोहर । तेणें दशशिर कोपला ॥ १ ॥वानर जाणोनि महाबळी । प्रहस्तसुत जंबुमाळी ।रावणें पाचारोनि जवळी । गुज त्याजवळी सांगत ॥ २ ॥मारिले किंकर बनकर । विध्वंसिलें मनोहर ।तो तुवां मारावा वानर । युद्धीं दुर्धर गांजोनी ॥ ३ ॥वानर न मरतां देख । तुज परतल्या एकाएक ।तरी तुवां हारविलें नासिक । नपुंसक राक्षसांत ॥ ४ ॥वानरा न करो मर्दन । तेव्हांचि तुझे काळें वदन ।रासभारोहण अपमान ...अजून वाचा

101

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 15

अध्याय 15 इंद्रजिताचा मारुतीकडून अपमान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अखयाच्या निधनाने रावण दुःखी अखया कुमार पाडिला रणीं । रावणें कानीं ।शंख करित दाही वदनीं । लोळे धरणीं गडबडां ॥ १ ॥मुकुट पडिला सभास्थानीं । हें प्रत्यक्ष देखोन नयनीं ।रावण रडे आक्रंदोनी । विरूद्ध करणी म्यां केली ॥ २ ॥बुद्धिभ्रंश झाला मजसी । कुमार धाडिला युद्धासी ।रणीं वानरें मारिलें त्यासी । बोल कवणासीं ठेवावा ॥ ३ ॥माझें जें कां अशोकवन । तें मज जालें शोकस्थान ।कपीनें लंके घालोनि खान । पुत्रनिधान तेणें नेलें ॥ ४ ॥आम्हां अवघ्यांदेखतां जाण । देहामाजि घालोनि खान ।अखया नेला निजनिधान । नागवण मज आली ॥ ...अजून वाचा

102

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 16

अध्याय 16 रावण सैन्याचा संहार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अपमानामुळे उद्विग्न झालेल्या इंद्रजिताचे पलायन व बिळात प्रवेश इंद्रजित पावोनि । अतिशयें जाला उद्विग्न ।हनुमंताचें बळलक्षण । सर्वथा संपूर्ण लक्षेना ॥ १ ॥हनुमंताची धैर्यवृत्ती । हनुमंताची संग्रामशक्ती ।हनुमंताची सवेग गती । अतर्क्यस्थिती लक्षेना ॥ २ ॥अतर्क्य हनुमंताची गती । ते लक्षेना नाना युक्तीं ।इंद्रजिताची खुंटली मती । रणीं मारूती नाटोपे ॥ ३ ॥रणीं नाटोपे मारूती । आपुलें पूर्वशौर्य कीर्तीं ।वानरें नेली निंदेप्रतीं । सलज्ज चित्तीं इंद्रजित ॥ ४ ॥इंद्रातें रणीं जिंकोन । पावलों इंद्रजित अभिधान ।वानरांसीं करितां रण । तृणसमान मज केलें ॥ ५ ॥मी एक गाढा वीर सृष्टीं । ...अजून वाचा

103

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 17

अध्याय 17 हनुमंताचे रावणसभेत आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजिताची दैन्यावस्था, ब्रह्मदेवाचे स्मरण रणीं पाठी देवोनि वानरा । लपाला विवरा ।परम लज्जा राजकुमरा । काय महावीरां मुख दावूं ॥ १ ॥माझी वीरवृत्ति अति लाठी । इंद्रजितनामाची ख्याती मोठी ।वानरें नेली पुच्छासाठीं । रणसंकटीं गांजोनी ॥ २ ॥कपिपुच्छाचा दुर्धर मार । रणीं गांजिला राजकुमर ।सैन्या जाला समूळ मार । काय करूं मी आतां ॥ ३ ॥कैसेनि भेटों महावीरां । केंवी मुख दावूं राक्षसेंद्रा ।आतां न वचें लंकापुरा । लाजेचें वीरा अति दुःख ॥ ४ ॥वाहिली सदाशिवाची आण । शिवलों रावणाचे चरण ।प्रमाणें जालीं अप्रमाण । वानरें पूर्ण गांजिलें ॥ ५ ...अजून वाचा

104

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 18

अध्याय 18 रावणाच्या दाढी-मिशा मारूतीने जाळल्या ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंतासी न चले घात । स्वयें सांगे इंद्रजित ।अवध्य हा हनुमंत । साक्षेपें सांगत बिभीषण ॥ १ ॥इंद्रजित जो कां ज्येष्ठ सुत । नानायुक्ती स्वयें सांगत ।शस्त्रास्त्रीं ब्रह्मपाशांत । न चले पात हनुमंता ॥ २ ॥शस्त्रशक्ती अस्त्रशक्ती । मंत्रशक्ती तंत्रशक्ती ।कपटमायामोहनशक्ती । रणीं मारूती न धरवे ॥ ३ ॥कर्मपाश धर्मपाश । ब्रह्मयाचा ब्रह्मपाश ।बांधों न शके वानरास । जन्मपाश मुख्यत्वें ॥ ४ ॥बिभीषण प्रिय भ्राता । सांगतसे परम हिता ।शरण रिघावें श्रीरघुनाथा । काय म्यां आतां करावें ॥ ५ ॥सर्वथा अवध्य हा मारूती । इंद्रजिताची उपपत्ती ।बिभीषणाची भिन्न युक्ती ...अजून वाचा

105

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 19

अध्याय 19 लंकादहन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दाढी – मिशा जळाल्यामुळे रावणाची उडालेली धांदल : पुच्छाग्नि फुंकितां रावण । उठला हुताशन ।हनुमंत पित्यासी सांगे आपण । करीं अपमान रावणा ॥ १ ॥एकोनि पुत्राचें वचन । वायु वन्हि प्रज्वळून ।रावणाचें मुख पोळून । केलें दहन खांडमिशां ॥ २ ॥अपमानला दशानन । ओष्ठ पोळले दारूण ।शंख करूं न शके रावण । टिरी पिटोन आक्रंदें ॥ ३ ॥उफराटें शंखस्फुरण । गुद त्राहाटोनि करी रावण ।प्रथम पावला अपमान । पुच्छदहन भलें नव्हे ॥ ४ ॥रावणा विचारी विवेकमार्गी । आम्हीं पुच्छासीं लाविली आगी ।तें हित आम्हांलागीं । वानर सर्वांगीं निःशंक ॥ ५ ॥छळोनि जाळितां ...अजून वाचा

106

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 20

अध्याय 20 हनुमंताचे सीतेला आश्वासन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचा अपमान करून व लंका जाळून मारुती परतला कोट्यानुकोटी वीर । लंकाभुवना करोनि दहन ।रावणातें अपमानून । कपि परतोन निघाला ॥ १ ॥ त्यावेळी त्याच्या मनात चाललेले विचार : वीर मर्दितां समस्त । सांपडला लंकानाथ ।हनुमान न करी त्याचा घात । श्रीरघुनाथ क्षोभेल ॥ २ ॥रामें वाहिली असे आण । विंधोनियां निजबाण ।रणीं मारीन रावण । असत्य कोण करूं शके ॥ ३ ॥हांती सांपडला लंकानाथ । मारितां क्षोभेल रघुनाथ ।यालागीं न मारीच हनुमंत । जीवें जीत सोडिला ॥ ४ ॥असत्य ठेवोनि स्वामीचे माथां । म्यां मिरवावी वाढिवता ।जळो ते श्लांघ्यता ...अजून वाचा

107

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 21

अध्याय 21 गजेन्द्राचे आख्यान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लंकादहनाचा परिणाम : श्रीरामभक्तांचे महिमान । अगाध गहन अति पावन ।हनुमंतें लंकादहन । ओंतिली संपूर्ण सुवर्णाची॥ १ ॥रामभक्त करिती कंदन । तें कंदन होय सुखसंपन्न ।ऐसें भक्तीचें महिमान । कृपा संपूर्ण रामाची ॥ २ ॥हनुमंतें जाळिलें लंकेसीं । नव्हे काळी कोळसा मसी ।सुवर्ण ओतिलें चौपासीं । पीतप्रभेसीं शोभत ॥ ३ ॥करितां लंकेचें दहन । लंका ओतिली सुवर्ण ।याचे मूळ मुख्य कारण । गजोपाख्यान अवधारा ॥ ४ ॥ गजेन्द्र उद्धाराचे आख्यान : भगवंताचें कृपाळुपण । नामस्मरणाचें महिमान ।गजेन्द्राचें उद्धरण । प्रसंगें पूर्ण सुवर्णमय लंका ॥ ५ ॥चालतां कथा रामायण । त्यामाजी गजेंद्रोद्धरण ...अजून वाचा

108

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 22

अध्याय 22 गजेन्द्रउद्धार व हनुमंताचे श्रीरामदर्शनार्थ पुनरागमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ह्रदयीं अंतरात्मा सर्वज्ञ । त्याचेनि बुद्धिंद्रिये सज्ञान ।तेणें वाचा मनें नमन । अनन्य शरण गजेंद्र ॥ १ ॥भगवंतासी अनन्य शरण । होतां पालटे देहचिन्ह ।इंद्रियांचे विपरीतज्ञान । तेंहि लक्षण अवधारा ॥ २ ॥अनन्यत्वीं मन उन्मन । चित्त होय चैतन्यघन ।बुद्धि होय समाधान । अहंता संपूर्ण सोहंत्वी विरे ॥ ३ ॥तेव्हां भूतें होती चिदाकार । विषय होती तन्मात्र ।अनन्यशरणत्वाचें सूत्र । संसारचरित्र परब्रह्म ॥ ४ ॥होवावया अनन्य शरण । पाहिजे भाग्य सत्त्वसंपन्न ।तेणें भाग्यें गजेंद्र गहन । करितो नमन भगवंता ॥ ५ ॥ओंकार ब्रह्मरूप पूर्ण । त्यासी प्रकाशी चैतन्यघन ...अजून वाचा

109

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 23

अध्याय 23 सीतेचा शोध करून हनुमंताचे आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लंकादहन झाल्यावर सीतेची आज्ञा घेऊन मारूती परत येण्यास : आश्वासोनि श्रीरामकांता । भेटावया श्रीरघुनाथा ।हनुमंत होय निघता । तेचि कथा अवधारा ॥ १ ॥लंकादहन करोनि संपूर्ण । हनुमंतासी करितां गमन ।घ्यावया सीतेंचें दर्शन । आला परतोन तीपासीं ॥ २ ॥सीता सर्वांगीं अक्षत । पाहोनियां सावचित्त ।हनुमंत हर्षयुक्त । निघे त्वरित तें ऐका ॥ ३ ॥घ्यावया श्रीरामाची भेटी । हनुमंतासीं त्वरा मोठी ।वंदोनि सीता गोरटी । उठाउठीं निघाला ॥ ४ ॥वेगीं उल्लंघावया सागर । चौफेर अवलोकी वानर ।देखिला अरिष्ट गिरिवर । तेथे सत्वर वळंघला ॥ ५ ॥सकळ असिष्टां आधार ...अजून वाचा

110

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 24

अध्याय 24 वानरांकडून मधुवनाचा विध्वंस ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताने सांगितले की सीतेच्या तेजाने रावण भस्मप्रायच झालेला आहे हनुमंत वीरांप्रती । सीता तपस्विनी श्रीरामसती ।तिनें राक्षसांची वीर्यशक्ती । नेली भस्मांतीं कोपाग्नीं ॥ १ ॥रावणाची शक्ति तेजोराशी । सीतेनें भस्म केले त्यासी ।राम निमित्त मारावयासी । रावणासी रणरंगीं ॥ २ ॥सीताक्षोभे दशानन । जळोन भस्म जाहला जाण ।पतीस यश दिधलें पूर्ण । रामें रावण मारिला ॥ ३ ॥सीता जाळी श्रीराम मारी । ऐसेनि राक्षसांची बोहरी ।क्षणें होईल लंकेमाझारी । सांगे वानरीं हनुमंत ॥ ४ ॥ ते ऐकून अंगदास स्फुरण चढले व स्वतःचसर्वांचा संहार करून यावे असे तो सुचवितो एकोनि हनुमंताचें ...अजून वाचा

111

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 25

अध्याय 25 श्रीराम – अंगद संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दक्षिण दिशेला गेलेले वानर कालमर्यादा संपल्यावरही परतले नाहीतम्हणून श्रीरामास वाटेल तेव्हा हनुमंत आधीच येऊन श्रीरामांना भेटला वानर गेले दक्षिणेसी । मर्यादा लोटली तयांसी ।कोणी नाणिती सीताशुद्धीसी । श्रीरामासीं अति चिंता ॥ १ ॥मजसीं करूनि एकांत । मुद्रा घेवोनि गेला हनुमंत ।तो कां नयेचि पां त्वरित । अति संचित श्रीराम ॥ २ ॥हनुमंत कार्यकर्ता । मजही हा भरंवसा होता ।तोहि न येचि वाट पाहातां । परम चिंता लागली ॥ ३ ॥ऐसी श्रीरामाची चिंता । कळों सरली त्या हनुमंता ।शुद्धि सांगावया सीता । होय निघता अति शीघ्र ॥ ४ ॥श्रीरामाची परम ...अजून वाचा

112

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 26

अध्याय 26 हनुमंतप्रतापवर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ब्रह्मदेवलिखित हनुमंताचा लंकेतील पराक्रम स्वमुखें निजकीर्ती । सर्वथा न सांगे मारूती ।हें श्रीरघुपती । स्वयें प्रश्नोक्तीं चालवित ॥ १ ॥आदरें पुसें श्रीरामचंद्र । हनुमंता तूं वनचर ।कैसेनि तरलासी सागर । सत्य साचार मज सांगें ॥ २ ॥ऐकोनि श्रीरामांचे वचन । हनुमान घाली लोटांगण ।श्रीरामप्रतापमहिमान । सनुद्रतरण वानरा ॥ ३ ॥श्रीरामनामाच्या उच्चारें । जड मूढ तरती भवसागर ।राममुद्रांकित वानर । तेणें परपार पावलों ॥ ४ ॥रामनामाचा कडकडाट । भवसमुद्रीं पायवाट ।पायरी करोनि वैकुंठ । होती प्रविष्ठ परब्रह्मीं ॥ ५ ॥जे रामनामांकित नर । त्यांतें बुडवूं न शके सागर ।श्रीराममुद्रांकित वानर । परपार पावलों ...अजून वाचा

113

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 27

अध्याय 27 हनुमंतपराक्रमवर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ब्रह्मदेवाने लिहिलेल्या पत्राचे वाचन धन्य धन्य तें ब्रह्मलिखित । धन्य धन्य आणिता ।सौमित्र वाची सावचित्त । अर्थें रघुनाथ सुखावे ॥ १ ॥सौमित्र वाची ब्रह्मलिक्जित । ऐकतां पत्रिकेचा अर्थ ।श्रीराम स्वानंदे डुल्लत । हनुमंतचरित्र परिसोनी ॥ २ ॥शुद्धि न लभे सीता सती । कळी लाविली लंकेप्रती ।सभा नागविली रात्रीं । हनुमंत ख्याती तें ऐका ॥ ३ ॥हनुमंताचें आचारित । अचळ समूळ समस्त ।ब्रह्मयानें लिहिलें ब्रह्मलिखित । सावचित्त अवधारा ॥ ४ ॥ गुप्त राहून हनुमंताने नगराता केलेला हलकल्लोळ गुप्त राहोनि नगरद्वारीं । वानरचेष्टा नानापरी ।कलहो लाविला निशाचरीं । कपिकुसरी ते ऐका ॥ ५ ॥पुच्छीं ...अजून वाचा

114

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 28

अध्याय 28 ब्रह्मलिखित सीता-मारूती संवादकथन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पुढील वृत्तांत वाचन मागील प्रसंग संपतां । अंगदसुग्रीवजांबवंतां ।लक्ष्मणेंसीं श्रीरघुनाथा घेवोनि उडतां हनुमंत ॥ १ ॥हनुमंताची परम कीर्ती । गगनीं सुरवर वानिती ।भूतळीं वाखाणिती जुत्पती । वानीं कपिकिर्तीं श्रीराम ॥ २ ॥आवडीं म्हणे श्रीरघुनाथ । सौमित्रां वाचीं ब्रह्मलिखित ।मुद्रिका देवोनि हनुमंत । करी एकांत सीतेसीं ॥ ३ ॥धन्य ब्रह्मयाचें ब्रह्मपत्र । धन्य श्रवणार्थी श्रीरामचंद्र ।धन्य वाचक सौमित्र । धन्य कपींद्र कपिकुळीं ॥ ४ ॥ श्रीराममुद्रेमुळे झालेली सीतेची अवस्था मुद्रिकातेजदेदीप्यता । श्रीराम आला मानी सीता ।तेणें होवोनि सलज्जता । सप्रेमता घाबरी ॥ ५ ॥सावधान पाहतां देखा । पुढें देखे आंगोळिका ।जाणोनि ...अजून वाचा

115

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 29

अध्याय 29 हनुमंतप्रतापाचे ब्रह्मलिखित वर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताने केलेले श्रीरामलक्ष्मण वर्णन सीता पुसे श्रीरामज्ञान । ते सांगावया जाण ।गिळोनियां ज्ञानाज्ञान । जाला सावधान श्रीरामें ॥ १ ॥सीतेनें पुसिली श्रीरामकथा । तेचि सांगावया स्वरूपता ।उल्हास हनुमंताचे चित्ता । यथार्थता सांगत ॥ २ ॥लक्ष्मणाचें निजलक्षण । ठाणमाण सगुणगुण ।समूळ सांगेल आपण । सावधान अवधारा ॥ ३ ॥सादर श्रवणार्थी स्वयें सीता । तेणें आल्हाद हनुमंता ।सावधान मिळाल्या श्रोता । वदे वक्ता आल्हादें ॥ ४ ॥श्रीरामरूप अति स्वरूप । रूपें जिंतला कंदर्प ।परी तो रूपेंचि अरूप । चित्स्वरूप श्रीराम ॥ ५ ॥राम राजीवलोचन । जगाचे नयना सादृश्य तें नयन ।परी देखणा ...अजून वाचा

116

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 30

अध्याय 30 असाळीवधाचे वर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीतेच्या आज्ञेला प्रमाण मानून त्याप्रमाणे वर्तन हनुमंताचें युद्धकंदन । मुख्यत्वें वनविध्वंसन सीतेचें आज्ञापन । फळभोजन मांडिलें ॥ १ ॥जोंवरी होय क्षुधाहरण । पडलीं फळें खाय वेंचोन ।घातली श्रीरामाची आण । फळें तोडोन न खावीं ॥ २ ॥जानकीआज्ञा वंदोनि शिरीं । वनाची करावया बोहरी ।हनुमान जाऊनियां दूरी । फळाहारीं बैसला ॥ ३ ॥काळाग्नि आव्हाहूनि जठरीं । मग बैसला फळाहारी ।वना आली महामारीं । वन संहारीं कपिपुच्छ ॥ ४ ॥सीतेची आज्ञा प्रमाण । घातली श्रीरामाची आण ।पुच्छें वृक्ष उपडोन । तळीं झाडोन फळें खाय ॥ ५ ॥पहिलें साकरेंचें टेंक । सव्यें सेवी पित्तशामक ...अजून वाचा

117

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 31

अध्याय 31 इंद्रजिताचा अपमान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण पुढील वर्णन वाचतो इंद्रजित युद्धा निघतां आवेशीं । असाळी उठिली ।श्रीरामें निरसिलें तियेसी । अति उल्हासीं हनुमंत ॥ १ ॥गजदळेंसीं अति उन्नद्ध । सैन्य देखोनियां सन्नद्ध ।हनुमंतासी अति आल्हाद । श्रीराम गोविंद तुष्टला ॥ २ ॥राक्षस मारावया अति अद्‌भुत । वनउपाडा पाहे सुमूहूर्त ।इंद्रजित गांजोनियां तेथ । गर्वहत करीन मी ॥ ३ ॥माझें पुरावावया मनोरथ । आजि तुष्टला श्रीरघुनाथ ।इंद्रजित आला सैन्यासमवेत । हनुमान नाचत स्वानंदें ॥ ४ ॥पुच्छ नाचतें पैं रणीं । मारोनियां वीरश्रेणी ।पूजूं चामुंडा चवंडायणी । भूतां देऊं धणीं मांसाचीं ॥ ५ ॥अखया कुमराची बोहणी । प्रथम ...अजून वाचा

118

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 32

अध्याय 32 हनुमंताकडून रावणाचे गर्वहरण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाकडून पुढील वर्णनाचे वाचन श्रीराम होवोनि सावचित । लक्ष्मणासीं स्वयें ।पुढारां वाचीं ब्रह्मलिखित । अनुचरित कपीचें ॥ १ ॥राक्षसदांतांचिया रासी । पाडोनि केलिया रणभूमीसीं ।पुढें काय केलें लंकेसीं । तें मजपासी परिसवीं ॥ २ ॥ऐकोनि श्रीरामाची गोष्टी । सुग्रीवासी आल्हाद पोटीं ।हर्षल्या वानरांच्या कोटी । कथाकसवटी ऐकावया ॥ ३ ॥वानरांच्या निजकोडी । सभा बैसली परवडी ।हनुमंताची प्रतापप्रौढी । अति आवडीं ऐकावया ॥ ४ ॥हनुमंताची प्रतापकीर्ती । वाचितां लक्ष्मणा परम प्रीती ।अनुलक्षोनि श्रीराममूर्ती । पत्र प्रयुक्ती वाचित ॥ ५ ॥ इंद्रजिताचा पाडाव करून हनुमंत आपली शेपटी आवरून बसला झाडोनि इंद्रजिताचा पादाडा ...अजून वाचा

119

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 33

अध्याय 33 हनुमंतप्रतापवर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणासमोर मारुती पुच्छासन मांडून बसतो त्यामुळे रावण भयभीत होतो रावणसिंहासनासमान । घालोनियां ।हनुमान बैसला सावधान । दशानन लक्षोनी ॥ १ ॥जैसा सिंहापुढें गजाचा दर्प । कीं गरूडापुढें कांपती सर्प ।तैसा देखोनि कपिप्रताप । महाकंप रावणा ॥ २ ॥ बिभीषण व इंद्रजित रावणास सूचना करितात जंव रावण देखे भयभीत । तंव बिभीषण इंद्रजित संयुक्त ।लंकेशासी बुद्धि सांगत । कीं अवध्य हनुमंत सर्वथा ॥ ३ ॥मारूं जातां हनुमंतासी । तेणें गांजिलें महावीरांसी ।पुच्छें निर्दळिलें सैन्यासी । तो कपि कोणासी नाटोपे ॥ ४ ॥तरी बुझवावया हनुमंता । श्रीरामा अर्पावी सीता ।आणि शरण रिघालिया रघुनाथा । ...अजून वाचा

120

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 34

अध्याय 34 श्रीरामांचे समुद्रतीरावर आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लंकेतील हनुमंताच्या विक्रमाचे सिंहावलोकन ब्रह्मा म्हणे ब्रह्मलिखितीं । कपीची लिहिली ।त्याहून अगाध हनुमंताची ख्याती । किर्ती किती लिहावी ॥ १ ॥श्रीरामा तुझें हें वानर । लंके आलें पालेखाइर ।त्याची कीर्ति अति दुर्धर । मज साचार लिहवेना ॥ २ ॥अठरा लक्ष दीपिका पूर्ण । कपीनें पुच्छें विझवोन ।रावणसभा करोनि नग्न । दशानन गांजिला ॥ ३ ॥रिघोन रावण शयनस्थाना । परिसोनि मंदोदरीचें स्वप्ना ।सीता शुद्धी आणी मना । अशोकवना कपि आला ॥ ४ ॥देवोनियां श्रीराममुद्रा । सुखी करोनि सीता सुंदरा ।गांजावया राक्षसेंद्रा । केला तरूवरा नवभंग ॥ ५ ॥मारिलें वनकरां किंकरां । ...अजून वाचा

121

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 35

अध्याय 35 बिभीषणाकडून रावण व प्रधानांची निर्भर्त्सना ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम व वानरसैन्य समुद्रतीरावर आले श्रीराम जगदानंदकंद । सच्चिदानंद ।श्रीरघुपति नित्यशुद्ध । नाहीं भवबंध स्मरणें तुझ्या ॥ १ ॥वानरसेनासंभार । पावोनियां समुद्रतीर ।कटक उतरलें समग्र । श्रीरामचंद्रासमवेत ॥ २ ॥ रावणमाता कैकसीची चिंता : येरीकडेलंकेआंत । नगर जाळोनि गेला हनुमंत ।तेणें कैकसीस आकांत । राक्षसां अंत दृढ आला ॥ ३ ॥कैकसी रावणाची जननी । लंकागडदाहो देखोनि ।परम दुःखित होय मनीं । स्त्रवतीं नयनीं अश्रुधारा ॥ ४ ॥ कैकसी बिभीषणाकडे जाऊन रावणाचीअपकृत्ये व त्याचे घोर परिणाम त्याला सांगते येवोनियां बिभीषणापासीं । निजदुःख सांगें त्यासी ।मरण आलें रावणासी । राक्षसांसी ...अजून वाचा

122

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 36

अध्याय 36 रावणाकडून बिभीषणाचा अपमान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ बिभीषणकृत हनुमंतप्रतापवर्णनाने सर्व सभा लज्जायमान : कपिपुरूषार्थ अति प्रचंड । बळबंड ।प्रताप ऐकतां काळें तोंड । लज्जा वितंड लंकेशा ॥ १ ॥हनुमंताचें अति प्रबळ । बिभीषणें वानिलें बळ ।तेणें राक्षसें सकळ । तळमळ पैं करिती ॥ २ ॥राक्षस सेनानी प्रधान । अवघे जाले हीन दीन ।सभा समस्त लज्जायमान । म्लानवदन दशमुख ॥ ३ ॥हें देखोनि इंद्रजित । कोपें जालासें कृतांत ।बिभीषणासीं बोलत । निजपुरूषार्थ वर्णोनी ॥ ४ ॥ इंद्रजिताचा संताप, स्वपराक्रम प्रौढी व बिभीषणाची निंदा : इंद्रजित बोले कोपायमान । काकाजी तूं तंव धर्मसंपन्न ।बुद्धियुक्तिप्रज्ञानपन्न । कनिष्ठ वचन कां वदसी ...अजून वाचा

123

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 37

अध्याय 37 बिभीषणाचे श्रीरामांकडे आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ त्यानंतर काही न बोलतां शांतपणे बिभीषण प्रधानांसह तेथून परतला : अपमान । जालिया नव्हे क्रोधायमान ।स्वयें श्रीराम स्मरोन । सावधान बैसला ॥ १ ॥कांही न बोलोनि उपपत्ती । विचारोनि विवेकयुक्ती ।शरण जावें श्रीरघुपती । निश्चयो चित्तीं दृढ केला ॥ २ ॥ बिभीषणाचे विचार : चौघे घेवोनि प्रधान । स्वयें निघाला बिभीषण ।रावणासी मधुर वचन । काय आपण बोलत ॥ ३ ॥आम्ही तुम्ही सखे बंधु । अणुमात्र नाहीं विरोधु ।सांगतां तुजला हितानुवादु । वृथा क्रोधूं तुवां केला ॥ ४ ॥निंदोनियां लंकानाथा । श्रीरामा वाणिलें स्वपक्षार्था ।तरी मी जाईन अधःपाता । जाण ...अजून वाचा

124

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 38

अध्याय 38 बिभीषणाला लंकाप्रदान व राज्याभिषेक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मारूतीच्या वचनाने श्रीरामांचा संतोष : बिभीषणाचा वृत्तांत । समूळ हनुमंत ।तेणें तुष्टला श्रीरघुनाथ । उल्लासत स्वानंदे ॥ १ ॥ऐकोनि हनुमंताचें वचन । संतोषला रघुनंदन ।सुग्रीवादि वानरगण । त्यांप्रति आपण धर्म सांगे ॥ २ ॥सद्भावेंसीं संपूर्ण । अथवा कपटें आलिया शरण ।त्यासीं नाहीं सर्वथा मरण । सत्य भाषण हें माझें ॥ ३ ॥ शरणागताला केव्हांही अभयच, रावण जरी आला तरीही त्याला अभय मिळेल : माझा करावया घात । शरण आलिया लंकानाथ ।त्यासीही माझा अभयहस्त । जाणा निश्चित कपि सर्व ॥ ४ ॥शरणागतापासाव मरण । आम्हांसी सर्वथा नाहीं जाण ।हेंही माझें ...अजून वाचा

125

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 39

अध्याय 39 सागराची श्रीरामांना शरणागती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ बिभीषणास लंकादान दिल्यावर सर्वांना परमानंद : बिभीषणासी लंकादान । देवोनियां ।सभा बैसली सावधान । सुप्रसन्न स्वानंदें ॥ १ ॥वानर करिती गदारोळ । बिभीषणासी सुखकल्लोळ ।सुग्रीवा उल्लास प्रबळ । सकळ दळ देखोनि ॥ २ ॥वानरांचे महाभार । करूं येती नमस्कार ।श्रीरामनामाचा गजर । देती भुभुःकार आल्हादें ॥ ३ ॥ हनुमान व सुग्रीव समुद्र पार करण्याच्या विचारात : तेथें येवोनि हनुमंत । सुग्रीवासी करी एकांत ।सीता सोडावयाचा मुख्यार्थ । लंकानाथ वधावया ॥ ४ ॥समुद्राचिये तीरीं । बैसल्या वानरांच्या हारी ।कैसेनि जाववेल पैलपारीं । ते विचारीं कपिनाथ ॥ ५ ॥नद्द्या पर्जन्यें भरोनि येति ...अजून वाचा

126

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 40

अध्याय 40 सेतुबंधनाची पूर्णता ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ समुद्र निघून गेल्यावर सेतू बांधण्याची तयारी; वानरांना तसा आदेश : नळहस्तें । समुद्रें श्रीरामासी सांगोन ।वंदोनियां श्रीरामचरण । आज्ञा पुसोन स्वयें गेला ॥ १ ॥ऐकोनि समुद्राचें वचन । संतोषला श्रीरघुनंदन ।नळासी संमुख आपण । प्रीतिवचन बोलत ॥ २ ॥प्रीतिप्रेमाचें वचन । नळासी बोले रघुनंदन ।सखा माझा तूं जीवप्राण । सेतु निर्माण करी आतां ॥ ३ ॥समुद्रें सांगितलें आपण । तुझेनि हातें सेतुबंधन ।घेवोनियां वानरगण । सेतु निर्माण करी आतां ॥ ४ ॥स्वयेंची श्रीरघुनाथ । स्वमुखें सुग्रीवासी सांगत ।प्रधान जुत्पती समस्त । मुख्य हनुमंत आदिकरोनी ॥ ५ ॥नळहस्तें सेतुबंधन । समुद्रें सांगितले ...अजून वाचा

127

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 41

अध्याय 41 रामसैन्याचे समुद्रोल्लंघन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सेतू बांधून पूर्ण झाल्यावर श्रीराम लक्ष्मणाला घेऊन लंकेच्या वाटेला लागतात : बांधिला सेतु समाप्त । यालागीं म्हणती नळसेत ।परी तो श्रीरामपुरूषार्थ । जाला विख्यात तिहीं लोकीं ॥ १ ॥सेतु जालिया समाप्त । सुग्रीव संतोषें डुल्लत ।वंदोनियां श्रीरघुनाथ । स्वयें बोलत स्वानंदें ॥ २ ॥समुद्रीं लाभली पायवाट । आमचे चुकले परम कष्ट ।आता लंका करीन सपाट । दशकंठ वधोनि ॥ ३ ॥प्रधान सेनानी सपरिवार । राक्षसांचे भार संभार ।रणीं मारीन दुर्धर वीर । तरी किंकर मी तुझा ॥ ४ ॥सेतु होतांचि समाप्त । लंका जाली हताहत ।रणीं निमेल लंकानाथ । संदेह येथ ...अजून वाचा

128

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 42

अध्याय 42 अतिकायाकडून रावणाची कानउघाडणी ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ आला ऐकोनि रघुनंदन । भयें भयभीत दशानन ।प्रधान सेना अति । लंकाजन सकंपित ॥ १ ॥चाकाटला रावण । तंव भेरी लावोनि निशाण ।स्वयें आला रघुनंदन । वानरसैन्यसंभारीं ॥ २ ॥ लंकेत सर्वत्र हाहाकार व रावणावर दोषारोप : शंख भेरी टाळ घोळ । काहळा वाजती चिनकाहळ ।ढोळ पटह मांदळ । ध्वनि आगला बुरूंगें ॥ ३ ॥धडैधडै विख्यात वाही । निशाणां लागली एक घाई ।विराणीं वाजती दोहीं बाहीं । गिडबिड ठायीं गर्जती ॥ ४ ॥ऐसा वाजंत्रांचा गजर । घेवोनि कपिकुळसंभार ।लंके आला श्रीरघुवीर । केला भुभुःकार वानरीं ॥ ५ ॥देखोनि श्रीरामाचा यावा ...अजून वाचा

129

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 1

युद्धकांड अध्याय 1 वानरसैन्य मोजण्यासाठी रावण हेर पाठवितो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ उदार गंभीर सुंद्रकांड । तें संपवूनि अतिशयें ।पुढां उठावलें युद्धकांड । अति प्रचंड प्रतापी ॥ १ ॥ रामायणाचे महत्व त्यातील परमार्थ : वाखाणावया युद्धकांड । माझें केंवी सरतें तोंड ।तरी जनार्दनकृपा अखंड । जे कांडे कांड अर्थवी ॥ २ ॥रामायणींचा सखोल अर्थ । वक्ता जनार्दन समर्थ ।सबाह्य परिपूर्ण रघुनाथ । ग्रंथ परमार्थ श्रीराम ॥ ३ ॥रामायणींचें निजसार । क्षरीं कोंदलें अक्षर ।पदापदार्थ चिदमिन्मात्र । परम पवित्र रामकथा ॥ ४ ॥कथेजाजील कथार्थ । सबाह्य कोंदला रघुनाथ ।हाचि ग्रंथींचा परमार्थ । निजात्मस्वार्थ साधका ॥ ५ ॥ एकनाथांचे आत्मनिवेदन – ...अजून वाचा

130

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 2

अध्याय 2 श्रीरामांकडून रावण छत्राचा भंग ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ शार्दूळ परत येतो, त्याची बिकट अवस्था व त्याचे कथन पूर्वप्रसंगवृत्तांत । रडत पडत कुंथत ।शार्दूळ आला रुधिरोक्षित । तयासी पुसत लंकेश ॥ १ ॥ वीक्ष्यमाणो विषण्णं तु शार्दूलं शोककर्षितम् ।उवाच प्रहसन्नेव रावणो भीमदर्शनः ॥१॥अयथावच्च ते वर्णो दीनश्चासि निशाचर ।नासि कश्चिदमित्राणां क्रुद्धानां वशमागतः ॥२॥इति तेनानुष्टस्तु वाचं मंदमुदीरयत् ।न ते चारयितुं शक्या राजन्वानरपुंगवाः ॥३॥नापि संभावितुं शक्यं संप्रश्र्नोपि न लभ्यते ॥४॥ शार्दूळ देखोनि अति दुःखीत । त्यासी पुसे लंकानाथ ।वैरिसासी जालासी हस्तगत । रुधिरोक्षित दिसतोसी ॥ २ ॥सादरें पुसतां रावण । शार्दूळ बोले अति कुंथोन ।असंख्यात वानरांचें सैन्य । संख्या कोण करुं ...अजून वाचा

131

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 3

अध्याय 3 रामांच्या मायवी शिराने सीतेचा छळ ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रारंभी झालेल्या अपशकुनाने रावण उद्विग्न : साधावया रणांगण मुळींच रावणा अपशकुन ।श्रीरामें केलें छत्रभंजन । अति उद्विग्न लंकेश ॥ १ ॥ विसर्जयित्वा सचिवान्प्रविवेश स्वामालयम् ।ततो राक्षसमादाय विद्युज्जिव्हं महाबलम् ॥१॥मायाविनं महाघोरमब्रवीद्राक्षसाधिपः ।मोहयिष्यामहे सीतां मायया जनकात्मजाम् ॥२॥शिरो मायामयं गृह्य राघवस्य निशाचर ।मां त्वं समुपतिष्ठस्व महच्च सशरं धनुः ॥३॥एवमुक्तस्तथेत्याह विद्युज्जिह्वो निशाचरः ।तस्य तुष्टोऽभवद्राजा प्रददौ चास्य भूषणम् ॥४॥ छत्रभंगाचा अपशकुन । तेणें उद्विग्न रावण ।विसर्जूनियां प्रधान । आला आपण निजधामा ॥ २ ॥सबळ बळें श्रीरघुनाथा । वानरसैन्य असंख्यातता ।काय म्यां करावें आतां । प्रबळ चिंता लंकेशा ॥ ३ ॥ रावणाचे विचार : ...अजून वाचा

132

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 4

अध्याय 4 राक्षस – वानरांचे युद्ध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लगबगीने रावण सभेत येतो; त्याची बिकट अवस्था : प्रबळ रघुनंदन । आला ऐकोनि रावण ।अतिशयें चितानिमग्न । म्लानवदन सभेसी ॥ १ ॥ तेन शंखविमिश्रेण भेरीशब्देन रावणः ।मुहूर्तं ध्यानमास्थाय सचिवानभ्युदैक्षत ॥१॥ततस्तु सुमहाप्राज्ञो माल्यवान्नाम राक्षसः ।उवाच रावणं मंत्री कृतबुद्धिर्बहुश्रुतः ॥२॥तन्मह्यं रोचते संधिः सह रामेण रावण ।यदर्थमभियुक्तोसि सीता तस्मै प्रदीयताम् ॥३॥तस्य देवर्षयः सर्वे गंधर्वाश्च जयैषिणः ।विरोधं मा गमस्तेन रामेणाभिततेजसा ॥४॥ सभे संचित दशानन । तंव शंख भेरी ढोल निशाण ।श्रीरामकटकीं त्राहाटिले पूर्ण । तेणें रावण गजबजिला ॥ २ ॥ऐकोनि वाजंत्रांचा गजर । त्यामाजी वानरांचा भुभुःकार ।तेणें दचकला दशशिर । मुहूर्तमात्र तटस्थ ॥ ...अजून वाचा

133

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 5

अध्याय 5 रावण – सुग्रीव यांचे युद्ध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुवेळेवरुन सुग्रीव लंकेत उडून गेला : सुवेळे बैसल्या । मनोहर दिसताहे लंका ।संमुख देखोनि दशमुखा । केला आवांका सुग्रीवें ॥ १ ॥ ततो रामः सुवेलाग्रं योजनद्वयमंडलम् ।आरुरोह ससुग्रीवो हरियूथैः समन्वितः ॥१॥ददर्श लंका सुव्यक्तां रम्यकाननशोभिताम् ।तस्यां गोपुरशृंगस्थं राक्षसेंद्रं दुरासदम् ॥२॥श्वेतचामरपर्यस्तं विजयच्छत्रशोभितम् ।पश्यतां वानरेंद्राणां राघवस्थापि पश्यतः ॥३॥दर्शनादाक्षसेंद्रस्य सुग्रीवः सहसोत्थितः ।अचलाग्रादथोत्थाय पुष्लुवे गोपुरस्थले ॥४॥ श्रीराम चढला सुवेळेवरी । सहित सुग्रीव कपिसंभारीं ।दोनी योजनें सुवेळाग्री । सभा वानरीं शोभत ॥ २ ॥तंव देखिलें लंकानगर । वनीं काननीं अति सुंदर ।त्यामाजी रावणाचें गोपुर । दीर्घ मनोहर रमणीय ॥ ३ ॥श्रीरामसेना वानरसंभार । आले ...अजून वाचा

134

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 6

अध्याय 6 शिष्टाईसाठी अंगदाचे जाणे ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रक्ताचे पाट पाहून श्रीरामांचा कळवळा : पूर्वप्रसंगीं रणांगणीं । वानरीं वीरश्रेणी ।रुधिर प्रवाह देखोनि धरणीं । श्रीराम मनीं कळवळला ॥ १ ॥ सर्व बंदोबस्त करुन नंतर पुढील योजनेचा बेत : कृपा उपजली रघुनाथा । एकाचिया अपकारता ।करुं नये सकळांच्या घाता । राजधर्मता हे नव्हे ॥ २ ॥सुग्रीवराजा आणि जांबवंत । अंगदादि वानर समस्त ।नळनीळादि हनुमंत । शरणागत बिभिषण ॥ ३ ॥ राघवः सन्निवेश्यैवं स्वसैन्यं रक्षसां वधे ।संमंत्र्य मंत्रिभिः सार्धं निश्चित्य च पुनःपुनः ॥१॥आनंतर्यमभिप्रेप्सुः क्रमयोगार्थतत्ववित् ।बिभीषणस्यानुमते राजधर्मनुस्मरन् ॥२॥ दुर्गपरिधी द्वाबंध । करावया राक्षसांचा वध ।सैन्य ठेविलें सन्नद्ध । वीर विविध आतुर्बळी ...अजून वाचा

135

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 7

अध्याय 7 अंगदाकडून रावणाची निंदा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अंगदाचे रावणाच्या सभेत उड्डाण : अंगद आकाशमार्गेंसीं । शीघ्र आला लंकेसीं ।प्रवेशला रावणसभेसीं । अति विन्यासीं ते ऐका ॥ १ ॥ सोऽभिपत्य मुहूर्तेन श्रीमद्रावणमंदिरम् ।ददर्शासीनमव्यग्रं रावणं सचिवैःसह ॥१॥ततस्तस्याविदूरेण निपत्य हरिपुंगवः ॥२॥ सभासद व रावणावर त्याचा परिणामः रावणसभेपुढें जाण । आलें अंगदाचें उड्डाण ।तेणें दचकला दशानन । कंपायमान भयभीत ॥ २ ॥पडतां अंगदाची उडी । लंका अत्यंत हडबडी ।दडाल्या वीरांचिया कोडी । जालीं बापुडीं राक्षसें ॥ ३ ॥कराव्या अवघ्यांचा घात । पुढतीं आला रें हनुमंत ।ऐसा वळसा लंकेआंत । अति आकांत राक्षसां ॥ ४ ॥कपिभयें भयभीत । रावणसभा पैं समस्त ।जैसें ...अजून वाचा

136

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 8

अध्याय 8 अंगद – शिष्टाई वर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची दुर्दशा : मागिले प्रसंगीं जाण । वामनें गांजिला ।तिज्या रावणाचें प्रकरण । सांगें आपण अंगद ॥ १ ॥पूर्वप्रसंगीं स्वभावतां । जाली दों रावणांची कथा ।तिज्या रावणाची प्रौढता । ऐक तत्वता लंकेशा ॥ २ ॥परिसतां अंगदवचन । रावणा हृदयीं खोंचती बाण ।कांही न चले आंगवण । ऐके आपण कुसमुसित ॥ ३ ॥ श्वेतद्विपातील फाजिती : एक रावण मूर्खावेशीं । स्वयें निधाला श्वेतद्वपासी ।तेथें गति न चले विमानासीं । सेवकांसीं अगम्य ॥ ४ ॥मागे सांडोनि विमान । राहवोनियां सेवकजन ।एकला निघे रावण । मूर्खाभिमान । आक्रोशीं ॥ ५ ॥श्वेतद्विपीचें राज्य ...अजून वाचा

137

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 9

अध्याय 9 द्वंद्वंयुद्ध वर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ बिभीषणाला अंगदाने आणलेल्या मुकुटाचे अर्पण : सभेंत गांजूनि रावणातें । अंगदे मुकुटातें ।श्रीरामें आपुल्या निजहातें । बिभीषणातें वाहिला ॥ १ ॥मुकुट बाणतां बिभीषणासीं । देखोनि उल्लास वानरांसी ।राजशोभा शोभली त्यासीं । श्रीरामासीं आल्हाद ॥ २ ॥ ददृशुर्वानरा वीरा भीषणं च बिभीषणम् ।मुकुटेन प्रभासंतं त्रिकूटमिव मंदरम् ॥१॥रामस्तु बहुभिर्हृष्टैर्विनदद्‌भिः प्लवंगमैः ।वृतो रिपुवधाकाक्षी युद्‍धायैव प्रवर्तत ॥२॥ मुकुट बाणतां बिभीषणासीं । कैसी शोभा आली त्यासी ।जेंवी मंदराद्रि रत्‍नशिखरेंसीं । शोभा तैसी बिभिषणा ॥ ३ ॥मस्तकीं बाणतांचि मुकुट । जैसा जाला राज्यपट ।तैसा दिसताहे तेजिष्ठ । अति वरिष्ठ बिभीषण ॥ ४ ॥बिभीषण आज्ञेचें भय भारी । ...अजून वाचा

138

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 10

अध्याय 10 इंद्रजिताला मांत्रिक रथाची प्राप्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ युद्ध चालू असता रात्र झाली : रणीं करितां द्वंद्वयुद्ध इंद्रजित गांगिला सुबद्ध ।त्याचे पोटीं अति विरुद्ध । रात्रीं शरबंध करावया ॥ १ ॥प्रथम गांजिलें हनुमंते । तें बहु दुःख इंद्रजितातें ।अंगदें गांजितां येथें । अति लज्जेतें पावला ॥ २ ॥अपमानाचें अति विरुद्ध । रामलक्ष्मणादि वीर विविध ।रणीं करावया शरबंध । रात्रीं युद्ध मांडिलें ॥ ३ ॥ युद्ध्यतामेव तेषां तु तदा वानररक्षसाम् ।रविरस्तंगतो रात्रिः प्रवृत्ता प्राणहारिणी ॥१॥अन्योन्यं बद्धवैराणां घोराणां जयमिच्छताम् ।संग्रवृत्तं निशायुद्धं तदा वानररक्षसाम् ॥२॥राक्षसोऽसीति हरयो वानरोऽसीति राक्षसाः ।अन्योन्यं समरे जघ्नुस्तस्मिंस्तमसि दारुणे ॥३॥हत दास्य चैहीति कथं विद्रवसीति च ।एवं सुतुमुलः ...अजून वाचा

139

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 11

अध्याय 11 इंद्रजिताकडून श्रीरामांना शरबंधन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजिताचा मांत्रिक रथ अग्नीतून बाहेर आल्यवर रणामध्ये आगमन : पूर्वप्रसंगी वीर । होम करुनी अभिचार ।शस्त्रें पावला रहंवर । तेणें तो दुर्धर खवळला ॥ १ ॥अभंग रथ अश्व अमर । रथीं दिव्यास्त्रसंभार ।ऐसा पावोनि रहंवर । रणीं जावया निघाला ॥ २ ॥बैसोनि तया रथावरी । अदृश्य इंद्रजित गगनांतरीं ।येतां रणभूमीवरी । देख जुंझारी नरवानर ॥ ३ ॥ स ददर्श महावीर्यस्तावुभौ रामलक्ष्मणौ ।क्षिपंतौ शर जालानि कपिमध्ये व्यवस्थितौ ॥१॥स तु वैहायसं प्राप्य रथं तौ रामलक्ष्मणौ ।आचचक्ष रणे तस्मिन्विव्याध निशितैः शरैः ॥२॥तौ तस्य शरवेगेन पतितौ भ्रातरावुभौ ।गृहित्वा धनुशी व्योम्नि घोरान्मुमुचतुः शरान् ॥३॥ देखिले ...अजून वाचा

140

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 12

अध्याय 12 सीतेला श्रीरामांचे दर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामलक्ष्मणांना शरबंदी पडलेले पाहून इंद्रजिताची वल्गना : शरबंधनीं बांधोनि रघुनाथ इंद्रजित अतिशयें श्लाघत ।तेचि अर्थींचा श्लोकार्थ । स्वयें वदत तें ऐका ॥ १ ॥ इन्द्रजित्वात्मनः कर्म तौ शयानौ निरिक्ष्य च ।उवाच परमप्रीतो हर्षयन्सर्वनैर्ऋतान् ॥१॥दूषणस्य च हन्तारौ खारस्य च महाबलौ ।सादितौ मामकैर्बाणैर्भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥२॥नैतौ मोक्षयितुं शक्यो चैतस्मादिषुबन्धानात् ।सर्वैरपि समागम्य सर्पसंघैः सुरासुरैः ॥३॥यत्कृते चिन्तयानस्य शोकार्तस्य पितुर्मम ।अयं मूलमनर्थस्य सर्वेषां निहतो मया ॥४॥ शरबंधीं राम लक्ष्मण । दिर्घशयन अचेतन ।पडिले देखोनि दोघे जण । इंद्रजितें आपण वाल्गिजे ॥ २ ॥जिहीं मारिले खर दुषण । त्रिशिर्‍याचा घेतला प्राण ।चौदा सहस्र राक्षसगण । विंधोनि बाण ...अजून वाचा

141

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 13

अध्याय 13 श्रीरामांची शरबंधनातून मुक्तता ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीता अशोकवनात परत्ल्यावर श्रीराम शरबंधानातून शुद्धीवरआले व लक्ष्मणाची अचेतन स्थिती विलाप करु लागले : सीता नेलिया अशोकवना । मागें शरबंधीं रघुनंदना ।पावोनि लब्धचेतना । आपअपणा अवलोकी ॥ १ ॥ अथ दीर्घेण कालेन संज्ञां लेभे नरोत्तमः ।प्रत्यवेक्षत मात्मानं शोणितेन परिप्लुतम् ॥१॥अदीनो दीनया वाचा रामः परमसत्ववान् ।अभ्यभाषत दीनात्मा हरिभिः परिवारितः ॥२॥लक्ष्मणं पतितं दृष्ट्वा दुःखशोकसमान्वितः ।विललाप ततो रामो मंदभश्रूण्यवर्जयन् ॥३॥किं नु मे सीतया कार्यं लब्धया जीवितेन वा।शयानं योऽद्य पश्यामि लक्ष्मणं शुभलक्षणम्॥४॥यत्र क्वचिल्लभेद्‌भार्यां पुत्रान्मित्रांश्च बांधवान् ।न लक्ष्मणसमो भ्राता सचिवः सांपरायिकः ॥५॥ शरबंधनीं रघुनंदन । स्वयें होवोनि सावधान ।निजांगीं खडतरले बाण । रुधिरें क्लिन्न भूमिशायी ...अजून वाचा

142

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 14

अध्याय 14 धूम्राक्षाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सर्पशरबंधातून सावध झाल्यावर श्रीरामाचे सैनिकांना आलिंगन : सर्पशरबंधापासून । सुटले राम ।दोघीं सज्जिलें धनुष्यबाण । ठाणमाणसाटोपें ॥ १ ॥सावध होवोनि रघुनाथ । सुग्रीव अंगद जांबवंत ।बिभीषण हनुमंत । कपि समस्त आलिंगी ॥ २ ॥एक एक वानरवीर । स्वयें आलिंगी रामचंद्र ।वानरीं केला भुभुःकार । जयजयकारें गर्जती ॥ ३ ॥ वानरसैन्याच्या रामनामाच्या गजराने रावाण भयभीत, दूतांकरवी शोध आणतो : रामनामाचा गजर । वानरीं केला अति सधर ।नामें दुमदुमिलें अंबर । दशशिर दचकला ॥ ४ ॥ तेषां तु तुमुलं शब्दं वानराणां तरस्विनाम् ।नर्दतां राक्षसैः सार्द्धं तदा शुश्राव रावणः ॥१॥उवाच रक्षसां श्रेष्ठः समीपपरिवर्तिनः ।ज्ञायतां ...अजून वाचा

143

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 15

अध्याय 15 अकंपन व वज्रदंष्ट्र यांचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ धूम्राक्षं निहतं श्रुत्वा रावणो राक्षसेश्वरः ।क्रोधेन महताविष्टो निःश्वसन्नुरगो ॥१॥दीर्घमुष्णं च निःश्वस्य क्रोधेन कलुषीकृतः ।अब्रवीद्राक्षसं क्रूरं वज्रदंष्ट्रं महाबलम् ॥२॥गच्छ त्वं वीर निर्याहि राक्षसैः परिवारितः ।जहि दाशरर्थि रामं सुग्रीवं वानरैः सह ॥३॥तथे त्युक्त्वा द्रुततरं मायावी राक्षसेश्वरः ।निर्जगाम बलैः सार्धं बहुभिः परिवारितः ॥४॥ धूम्राक्ष राक्षस बळवंत । त्याचा हनुंमतें केला घात ।तें ऐकोनि लंकानाथ । क्रोधान्वित अति दुःखें ॥ १ ॥धूम्राक्षाचें युद्धमरण । ऐकोनि स्वयें रावण ।सर्पप्राय फुंपावे पूर्ण । क्रोधें प्राण त्यजूं पाहे ॥ २ ॥ रावणाने वज्रदंष्ट्रास पाठविले : धीर वीर महाशूर । वज्रदंष्ट्र निशाचर ।त्यासी सांगे दशशिर । ...अजून वाचा

144

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 16

अध्याय 16 प्रहस्ताचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वील प्रसंगीं हनुमंतें । रणीं मारिलें अकंपनातें ।ऐकोनियां लंकानाथें । क्रोधान्वित ॥ १ ॥ ततस्तु रावणः क्रुद्ध : श्रुत्वा हतमकंपनम् पूरीं परिययौ लंकां सर्वगुल्मानवेक्षितुम् ॥१॥रुद्धां तु नगरीं दृष्ट्वा रावणो राक्षसेश्वरः ।उवाचात्महितं काले प्रहस्तं युद्धकोविदम् ॥२॥पुरस्योपनिरुद्धस्य सहसा पीडितस्य च ।नान्यं समर्थं पश्यामि युद्धे युद्धविशारद ॥३॥अहं वा कुंभकर्णो वा त्वं वा सैन्यपतिर्मम ।इंद्रजिद्वा निकुंभो वा वहेयुर्भारमीदृशम् ॥४॥सर्वं बलमिदं शीघ्रं मायया परिगृह्य च ।विजयायाशु निर्याहि यत्र सर्वे वनौकसः ॥५॥ रावण लंकादुर्गाचा बंदोबस्त करतो : एके हनुमंतें रणागणीं । अकंपन पाडोनियां रणीं ।मारिल्या राक्षसांच्या श्रेणी । त्यापुढें कोणी उरेना ॥ २ ॥अकंपनाचा भरवसा होता । ...अजून वाचा

145

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 17

अध्याय 17 सुग्रीव मूर्च्छित पडतो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रहस्त वधाची वार्ता ऐकून रावण स्वतः जाण्याचे ठरवितो : पूर्व रणाआंत । नीळे मारिला प्रहस्त ।ऐकोनियां लंकानाथ । अति आकांत पावला ॥ १ ॥रावणाचा अति आप्त । प्रधान सेनानी प्रहस्त ।त्याचा नीळें केला घात । लंकेआंत आकांत ॥ २ ॥ प्रहस्तस्य वधं श्रुत्वा रावणो भ्रांतमानसः ।राक्षसानादिदेशाथ राक्षसेद्रो महाबलः ॥१॥कार्या शत्रुषु नावज्ञा यैरिंद्रबलसूदनः ।सूदितः सैन्यपालो मे सानुयात्रः सकुंजरः ॥२॥सोऽहं रिपुविनाशाय विजयाया विचारयत् ।स्वयमेव गमिष्यामि रणशीर्ष तदद्‍भुतम् ॥३॥अथ तद्वानरानीकं रामं च सहलक्ष्मणम् ।निर्दहिष्यामि बाणौघैः शुष्कं वनमिवानलः ॥४॥ नीळें मारिला प्रहस्त । बोंब उठली लंकेआंत ।तें ऐकोनि लंकानाथ । जाला भ्रांत सक्रोधी ॥ ...अजून वाचा

146

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 18

अध्याय 18 नील व रावणाचे युद्ध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाचे रामांस वंदन करुन प्रयाण : श्रीरामें निरुपण सांगून बंधूसी पावली मूळींची खूण ।घालोनियां लोटांगण । श्रीरामाचरण वंदिले ॥ १ ॥वंदितां श्रीरामचरण । लक्ष्मणासीं आलें स्फुरण ।श्रीरामें देवोनी अलिंगन । धाडिला आपण संग्रामा ॥ २ ॥ स रावणं वारणहस्तबाहुं ददर्श भीमोद्यतदीप्तचापम् ।प्रच्छादयंतं शरवृष्टिजालैस्तान्वानरान्बाणविकीर्णदेहन् ॥१॥तमालौक्य महातेजा हनुमान्मरुतात्मजः ।निवार्य शरजालानि विदुद्राव स रावणम् ॥२॥रथं तस्य समासाद्य तोदमाक्षिप्य सारथेः ।त्रासयन्‍रावणं धीमान्हनुन्मान्वाक्यमव्रवीत ॥३॥एष मे दक्षिणो बाहुः पंचशाखः समुद्यतः ।विधमिष्यति हे देहे भूतात्मानं चिरोषितम् ॥४॥ वानरसैन्याला रावणापांसून पीडा : रावणाचें उग्र स्वरुप । अत्युग्र वाहोनिया चाप ।अनिवार शरप्रताप । वानरदर्प भंगिला ॥ ३ ॥रावणाच्या ...अजून वाचा

147

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 19

अध्याय 19 रावणाचा पराजय ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वप्रसंगाच्या अंती । नीळ मूर्च्छित पडिला क्षितीं ।रावण मिरवी यश कीर्ती गर्वोन्नति विजयाची ॥ १ ॥ विसंज्ञं वानरं दृष्टवा रणोत्सुकः ।रथेनांबुदघोषेण सौ‍मित्रिमभिढुद्रुवे ॥१॥तमाह सौ‍मित्रिरदीनसत्त्वो विस्फारयंतई धनुरप्रमेयम् ।अवेहि मामद्य निशाचरेन्‍द्र न वानरांरत्वं प्रतियोद्धुमर्हसि ॥२॥स तस्य वाक्यं प्रतिपूर्णघोषं ज्याशब्दमुग्रं च निशम्य राजा ।आसाद्य सौ‍मित्रिमुपस्थितं तं रोषान्वितं वाक्यमुवाच रक्षः ॥३॥दिष्ट्यासि मे राघव दृष्टिमार्गं प्राप्तोऽन्तगामी विपरीतबुद्धिः ।अस्मिन्‍क्षणे यास्यसि मृत्युलोकं संछाद्यमानो मम बाणजालैः ॥४॥ नीळाला नेत असता लक्ष्मणाच्या आगमनामुळे रावण परतला : श्रीरामस्मरणें सुखसंपन्न । नीळ निजसुखें मूर्च्छापन्न ।त्यातें देखोनि विसंज्ञ । दशानन विचारी ॥ २ ॥वानरांचा सेनापती । रावणें आणिला रणख्याती ।ऐशी मिरवावया कीर्ती । ...अजून वाचा

148

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 20

अध्याय 20 कुंभकर्णाला जागृत करतात ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दुःखित मनःस्थितीमध्ये रावणाचे आगमन : श्रीरामासीं करितां रण । रणीं रावण ।लज्जायमान अति उद्विग्न । आला आपण लंकेसीं ॥ १ ॥ स प्रविश्य पुरीं लंका रामबाणभयार्दितः ।भग्नदर्पस्तदा राजा बभूव व्यथितेंद्रियः ॥१॥मातंग इव सिंहेन गरुडेनेव पन्नगः ।अमिभूतोऽभवद्राजा राघवेण महात्मना ॥२॥ब्रह्मदंडप्रतीकानां विद्युत्सदृशवर्चसाम ।स्मरन्‍राघवबाणानां विव्यथे राक्षसेश्वरः ॥३॥ हीन दीन लज्जायमान । राजा प्रवेशे लंकाभुवन ।आठवितां श्रीरामबाण । धाकेंचि प्राण निघों पाहे ॥ २ ॥जैसा विजेचा लखलखाट । तैसा बाणांचा कडकडाट ।श्रीरामबाणें दशकंठ । धाकें यथेष्ट धाकत ॥ ३ ॥ब्रह्मदंडा न चले निवारण । तैसे अनिवार श्रीरामबाण ।तिहीं बाणीं त्रासिला रावण । आक्रंदे पूर्ण ...अजून वाचा

149

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 21

अध्याय 21 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥॥ श्रीभावार्थरामायण ॥युद्धकांड॥ अध्याय एकविसावा ॥रावण व कुंभकर्ण यांचा संवाद॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भयानक कुंभकर्णाला वानर सैन्याची अस्वस्थता :प्रबोधोनि कुंभकर्णा । भेटों जातां पैं रावणा ।भय उपजलें वानरगणा । त्याच्या उग्रपणा देखोनी ॥ १ ॥ जगाम तत्रांजलिमालया वृतः शतक्रतुर्गेहमिव स्वयंभुवः ।तं मेरुशृंगप्रतिमं किरीटिनं स्पृशंतमादित्यमिवात्मतेजसा ॥१॥वनौकसः प्रेक्ष्य विवृद्धमद्‍भुतं भयार्दिता दुदुविरे समंततः ।केचिच्छरण्यं शरणं स्म रामं वज्रांति केचिद्व्यथिताः पतंति ॥२॥कैविद्दिशश्च त्वरिताः प्रयांति केचिद्‌भयार्ता भुवि शेरते स्म ॥३॥ मेघांचिया मेघमाळा । शोभती कुंभकर्णाच्या गळां ।मुकुट टेंकला नभोमंडळा । तेजें रविकळा लोपती ॥ २ ॥कराळ विक्राळ भयानक वदन । प्रळयतेजें अत्युग्र नयन ।देखोनि त्याचें भ्यासुरपण । वानरगण त्रासले ॥ ...अजून वाचा

150

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 22

अध्याय 22 वानरसैन्य मोजण्यासाठी रावण हेर पाठवितो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कुंभकर्ण नारदाची उक्ती सांगतो : नारदसंवाद–लक्षण । समूळ रामायण ।रावणासी कुंभकर्ण । स्वयें आपण सांगत ॥ १ ॥ शृणुष्वेदं महाराज मम वाक्यमरिंदम ।यदर्थं तु पुरा सौ‍म्य नारदाच्छुतवानहम् ॥१॥षण्मासाद हमुत्थायअशित्वा भक्ष्यमुत्तमम ।नच तृप्तोऽस्मि राजेंद्र ततोऽहं प्रस्थितो वने ॥२॥बहूनि भक्षयित्वाहं सत्वानि विविधानि वै ।भुवत्वा चाप्रीणनं कृत्वा शिलातलमुपाविशत ॥३॥ शत्रुदमनीं अति समर्था । ऐकें बापा लंकानाता ।नारदमुखें मी ऐकिली कथा । सावधानता अवधारीं ॥ २ ॥ कुंभकर्ण – नारद भेट : सहा मासां मज जागेपण । खातां उत्तम अन्नपक्वान्न ।तृप्ती न पवेचि संपूर्ण । मग मी आपण वना गेलों ॥ ३ ...अजून वाचा

151

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 23

अध्याय 23 रावण – मंदोदरी संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कुंभकर्णाची गर्जना युद्धाला जाण्याची सिद्धता : सन्नद्ध बद्ध सायुध । युद्धा निघतां कुंभकर्ण ।काय बोलिला गर्जोन । एकला मारीन अवघ्यातें ॥ १ ॥रामलक्ष्मणां करीन घात । वानर भक्षीन समस्त ।अंगद सुग्रीव हनुमंत । फळशाखार्थ गिळीन ॥ २ ॥ऐकोनि कुंभकर्णगर्जन । रावणा आलें अति स्फुरण ।नगरीं त्राहटिलें निशाण । युद्धा आपण निघावया ॥ ३ ॥ कुंभकर्णवचः श्रुत्वा रावणो लोकरावणः ।गंतुमैच्छतिक्रोधः सर्वसैन्येत संवृतः ॥१॥संग्राममभिकांक्षंतं रावणं श्रुत्य भामिनी ।तत्रोत्थाय ततो देवी नाम्ना मंदोदरी तथा ॥२॥माल्यवंतं करे गृह्य यूपाक्षसहिता तथा ।मंत्रिभिर्मंत्रतत्वज्ञैस्तथान्यैर्मंत्रिसत्तमैः ॥३॥छत्रेणाध्रियमाणेन अतिकायपुरःसरा ।चामरैर्वीज्यमानैश्च वीज्यमाना स्वलंकृता ॥४॥सेवार्थं मार्गविपुलं ध्वजमाल्योपशोभितम् ।उत्सारणं प्रकुर्वद्‌भिर्वेत्रझर्झरपाणिभिः ॥५॥ रावण ...अजून वाचा

152

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 24

अध्याय 24 नारद रावण संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मंदोदरीच्या भवनात धर्मऋषींचे आगमन : श्रीरामपदांबुजीं नित्य न्हातां । श्रीरामकीर्ती गातां ।श्रीरामरुपीं मन वसतां । श्रीरामता उन्मनेंसीं ॥ १ ॥मंदोदरीचिया भवानासी । स्वभावें आला धर्मऋषी ।तिणें पुजोनियां त्यासी । अत्यादरेंसी पूसिलें ॥ २ ॥नारदमुनींच्या वचनासी । परम विश्वास रावणासीं ।हे पूर्व कथा जाली कैसी । विदित तुम्हांसी तरी सांगा ॥ ३ ॥ मंदोदरीच्या प्रश्नाला धर्मऋषींचे उत्तर : ऋषि म्हणे मी स्वधर्मता । जाणें भूतभविष्यार्था ।तुझ्या पश्नाची निजकथा । सावधानता अवधारीं ॥ ४ ॥पूर्वी भेटी सनत्कुमारांसी । त्यांच्या वचनार्था श्रद्धेसीं ।तेंचि पुसतां नारदापासीं । आला विश्वासी परमार्थी ॥ ५ ॥परी विरोधें ...अजून वाचा

153

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 25

अध्याय 25 कुंभकर्णाचा युद्धाला प्रारंभ ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावण मंदोदरीला गुप्तरहस्य सांगून परत पाठवितो : पूर्वप्रसंगामाझारीं । सभेसीं मंदोदरी ।तिसी एकांत गुह्योत्तरीं । धाडी अंतःपुरीं रावण ॥ १ ॥ अंतःपुराय गच्छ त्वं सुखिनी भव सस्नुषा ।एवमुक्त्वा परित्यज्य भार्यां प्रीतमना इव ॥१॥रावणस्तु ततो वाक्यं राक्षसानिदमब्रवीत ।कल्प्यतां मे रतः शीघ्रं क्षिप्रमानीयतां धनुः ॥२॥अथादाय शितं शूलं शत्रुशोणितरंजितम् ।कुंभकर्णो महातेजा रावणं वाक्यमब्रवीत् ॥३॥अहमेको गमिष्यामि रणं रणविशारद ॥४॥ मंदोदरीचे निर्गमन : रावणें मंदोदरीप्रती । सांगोनि एकांत गुह्योक्ती ।समाधानसुखनुवृत्तीं । अंतःपुराप्रती पाठवी ॥ २ ॥सपुत्रस्नुषेंसीं आपण । सांडोनि चिंता अनुद्विग्न ।सुखी राहावेंस समाधान । सुप्रसन्न सुखरुप ॥ ३ ॥ऐकोन रावणाचें वचन । मंदोदरी सुखसंपन्न ...अजून वाचा

154

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 26

अध्याय 26 हनुमंत – कुंभकर्ण युद्ध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ क्रोधाविष्ट कुंभकर्णाकडून वानरसैन्याचा संहार : रणीं मारिले निशाचर । क्रोध फार ।गिळावया पैं वानर । अति सत्वर धांवला ॥ १ ॥संमुख येतां कुंभकर्ण । मागां न सरती वानरगण ।अंगदें आश्वासिलें पूर्ण । करावया रण उद्यत ॥२॥ ते निवृत्ता महामायाः श्रुत्वांगदवचस्तदा ।नौष्ठिकीं बुद्धिमास्थाय सर्वे संग्रामकांक्षिणः ॥१॥अथ वृक्षान्महाकायाः शृंगाणि सुमहांति च ।वानरास्तुर्णमुत्पाट्य कुंभकर्णमभिद्रवन् ॥२॥ अंगदाचा वानरसैन्याला धीर : देवोनि रामनामाचा धीर । अंगदें परतविलें वानर ।करोनि वाढिवेचा गजर । धांवले समोर कुंभकर्णा ॥ ३ ॥सांडोनि शरीराची आस । मरणावरी घालोनि कांस ।वानरवीरां विशेष । अति उल्लास संग्रामीं ॥ ४ ॥रामनामाच्या गजरीं ...अजून वाचा

155

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 27

अध्याय 27 कुंभकर्णावर सुग्रीवाचा विजय ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ स्वये बोले श्रीरघुनंदन । सुग्रीव आणि कुंभकर्ण ।दोघांसी मांडलेंसे रण सावधान अवधारा ॥ १ ॥ उत्पपात तदा वीरः सुग्रीवो वानराधिपः ।सशालहस्तः सहसा समाविध्य महाबला ॥१॥अति दुद्राव वेगेन कुंभकर्ण महाबलम् ।तमापतंतं संप्रेक्ष्य कुंभकर्ण प्लवंगमम् ॥२॥तस्थौ विवृत्तसर्वांगो वानरेंद्रस्य संमुखः ।कुंभकर्णं स्थितं दृष्ट्वा।सुग्रीवो वाक्यमब्रवीत ॥३॥विहताश्च त्वचा वीराः कृतं कर्म सुदुष्करम् ।सहस्वैकं निपातं मे शालवृक्षस्य राक्षस ॥४॥ हनुमंताच्या धर्मयुद्धनीतीमुळे कुंभकर्णाला आदर वाटतो : सुग्रीव कपिराज आपण । लक्षोनियां कुंभकर्ण ।सवेग करोनि उड्डाण । आला गर्जोन शालहस्ती ॥ २ ॥कुंभकर्ण अति विस्मित । मज उचलोनि हनुमंत ।होता गरगरां भोवंडित । तो कां न मरितां स्वयें ...अजून वाचा

156

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 28

अध्याय 28 कुंभकर्णवध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ स्वतःची विद्रुपता समजल्यावर कुंभकर्णाचा खेद व संताप : कुंभकर्णा लावोनि ख्याती । पावोनि विजयवृत्ती ।स्वयें आला श्रीरामाप्रती । वानर गर्जती उल्लासे ॥ १ ॥येरीकडे कुंभकर्ण । विजयोल्लासें आपण ।लंकेसीं जातसे जाण । दशानन वंदावया ॥ २ ॥हांसती लंकेचे जन । हारवोनियां नाक कान ।विजय मिरवितो आपण । काळें वदन कुंभकर्णा ॥ ३ ॥कुंभकर्ण अति उन्मत्त । नाककानां झाला घात ।कोणी सांगों न शके मात । तेणें लंकानाथ अति दुःखी ॥ ४ ॥शत्रु मर्दिल कुंभकर्ण । ऐसा भरंवसा होता पूर्ण ।शेखीं हरवोनि नाककान । आला आपण फेंपात ॥ ५ ॥सुग्रीवें छेदिले नाककान । ...अजून वाचा

157

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 29

अध्याय 29 नरांतकाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कुंभकर्णाच्या वधाने रावणाचा शोक : श्रीरामें मारिला कुंभकर्ण । ऐकोनियां पैं ।स्वयें करी शंखस्फुरण । दुःखें प्राण निघो पाहे ॥ १ ॥ कुंभकर्णं हतं श्रुत्वा राघवेण महात्मना ।राक्षसा राक्षसेंद्राय रावणाय न्यवेदयन् ॥१॥स श्रुत्वा निहतं संख्ये कुंभकर्णं महाबलम् ।रावणः शोकसंतप्तो मुमोह च पपात च ॥२॥राज्येन नास्ति मे कृत्यं किं करिष्यामि सीतया ।कुंभकर्णविहीनस्य जीविते नास्ति मे स्पृहा ॥३॥तदिदं मामनुप्राप्तं बिभीषणवचः शुभम् ।यदज्ञानान्मया तस्यन गृहीतं महात्मनः ॥४॥ येवोनि घायाळ रक्षोगण । सांगती कुंभकर्णाचें मरण ।सुग्रीवें छेदिले नाककान । रामें करचरण छेदिले ॥ २ ॥ऐसा विटंबोनियां जाण । रणीं मारिला कुंभकर्ण ।अदट श्रीराम आंगवण । ...अजून वाचा

158

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 30

अध्याय 30 देवांतक व त्रिशिर यांचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ नरांतकाच्या वधामुळे त्याचे पाचही पुत्रांचे रणांगणावर आगमन : मारिला नरांतक । राक्षसदळी परम धाक ।पळोनियां वीरनायक । लंकेसंमुख निघाले ॥ १ ॥पळतां देखोनि राक्षसभार । कोपा चढला राजकुमर ।अवघे होऊन एकत्र । निशाचर परतले ॥ २ ॥ नरांतकं हतं दृष्ट्वा चुक्रुशुनैर्ऋतर्षभाः ।देवांतकजस्त्रिमूर्धा च पौलस्त्यश्च महोदरः ॥१॥आरुढो मेरुसंकाशं वानरेंद्रं महोदरः ।वालिपुत्रं महाविर्यमभिदुद्राव वीर्यवान् ॥२॥भ्रातृव्यसनसंतप्तस्तदा देवांतको बली ।आदाय परीघं घोरमंगदं समभ्यद्रवत् ॥३॥रथमादित्यसंकाशं युक्तं परमवाजिभिः ।अस्थाय त्रिशिराश्चापि वालिपुत्रमुपाद्रवत् ॥४॥स त्रिभिर्मेघसंकाशैनैर्ऋतैस्तैरभिद्रुतः ।वृक्षमुत्पाटयामास महाविटपमंगदः ॥५॥ अंगद वीरशिरोमणी । नरांतक पाडिला रणीं ।तें देखोनि पांचही जणीं । आलें गर्जोनी संग्रामा ॥ ३ ॥त्यांहीमाजी तिघे ...अजून वाचा

159

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 31

अध्याय 31 अतिकाय राक्षसाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ चौघा वानरांनी तिघा राजकुमारांना व दोन राक्षसांना मारिलेः चौघे मिळोनि । तिघे रावण राजकुमर ।महापार्श्व आणि महोदर । पांचही महाशुर मारिले ॥ १ ॥आम्ही म्हणों हे वानर । पालेखाईरे वनचर ।परी हे निधडे महाशर । दुर्धर वीर मारिले ॥ २ ॥सखे बंधु मारिले तिन्ही । पितृव्य निमाले दोन्ही ।तें देखोनियां नयनीं । अतिकाय मनीं क्षोभला ॥ ३ ॥ अतिकायाचे क्रोधाने आगमन : मारिले देखोनि स्वजन । अतिकाय कोपायमान ।रविप्रभेंसीं समान । देदीप्यमान तेजस्वी ॥ ४ ॥एवढिया तेजासीं कारण । ब्रह्मदत्त वरद संपूर्ण ।प्राकृताचेनि हातें मरण । सर्वथा जाण न पावसी ...अजून वाचा

160

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 32

अध्याय 32 श्रीराम-लक्ष्मणांना शरबंधन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अतिकाय वधामुळे वानरसैन्यांत हर्षकल्लोळ व रावणाचा शोक : अतिकाय तो अतिरथी सौमित्र केवळ पदाती ।तेणें त्यासी पाडिले क्षितीं । वानर गर्जती हरिनामें ॥ १ ॥ प्रहर्षयुक्ता बहवश्च वानराः प्रबुद्धपद्मप्रतिमाननास्तदा ।अपूजयन्लक्ष्मणमिष्टभागिनं हते रिपौ भीमबले दुरासदे ॥१॥ जैसीं उत्फुल्लित पद्मकमळें । तैसीं वानरांचीं मुखकमळें ।स्वानंदें शोभती प्रांजळें । अतिकाय बळें मारलिया ॥ २ ॥अतिकाय तो अतिरथी । लक्ष्मणें मारिला पदाती ।तें देखोनि श्रीरघुपती । सौ‍मित्रा पूजित स्वानंदे ॥ ३ ॥स्वर्गी गर्जतीं सुरवर । नामें गर्जती वानर ।ऋषी करिती जयजयकार । विजयी सौ‍मित्र संग्रामीं ॥ ४ ॥रणीं मारितां राक्षसभार । शेष उरले निशाचर ।भेणें ...अजून वाचा

161

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 33

अध्याय 33 रामलक्ष्मणांची शरबंधनांतून सुटका ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ब्रह्मवरदानाच्या पालनाकरिता रामलक्ष्मण शरबंधनात पडले : प्रतिपाळावया ब्रह्मवरदान । श्रीराम लक्ष्मण ।शरबंधी पडोनि आपण। विसंज्ञपण दाविती ॥ १ ॥बहुरुपी प्रेताचें सोंग धरी । आपण सावध अंतरीं ।रामसौ‍मित्र तयापरी । शरपंजरी सावध ॥ २ ॥शरबंधी बांधले दोघे जण । विकळ दिसती रामलक्ष्मण ।परी ते सबाह्य सावधान । प्रतापे पूर्ण पुरुषार्थी ॥ ३ ॥ब्रह्मयाचे वरदें देख । येतां शरबंधासंमुख ।इंद्रजित अथवा दशमुख । छेदील मस्तक श्रीराम ॥ ४ ॥यालागीं शरबंधासमोर । कोणी न येती निशाचर ।करित विजयाचा गजर । गेले समग्र लंकेसीं ॥ ५ ॥लागतां शरबंधाचे बाण । वानरांचा जावा प्राण ।करितां ...अजून वाचा

162

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 34

अध्याय 34 कुंभाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामसैन्य शरबंधनातून मुक्त झाले : स्वयें बिभीषण बोलत । हनुमान वीर विख्यात ।शरबंधी श्रीरघुनाथ । सैन्यासमवेत ऊठिला ॥ १ ॥अंगद सुग्रीव राज्यधर । जुत्पतींसमवेत वानर ।येणें उठविले समग्र । वीर शूर स्वामिभक्त ॥ २ ॥मारुतीस मानी श्रीराघव । मारुतीस मानी सत्य सुग्रीव ।मारुतीस मानिती वीर सर्व । कीर्ति अभिनव येणें केली ॥ ३ ॥निमिषे आणोनि पर्वत । वानर उठवोनि समस्त ।ठेवोनि आला जेथींचा तेथ । श्रीरामभक्त हनुमंत ॥ ४ ॥ ततो ऽ ब्रवीन्महातेजा सुग्रीवो वानराधिपः ।अर्थ्यं विज्ञापयन्नेवं हनूमन्तमिदं वचः ॥१॥येतो हतः कुंभकर्णः कुमाराश्च निषूदिता ।नेदानीमुपनिर्हारं रावणः कर्तुमर्हति ॥२॥लंकामभिपतंत्वाशु प्रगृह्योत्काः प्लवंगमाः ।ततोस्तंगत ...अजून वाचा

163

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 35

अध्याय 35 मकराक्षाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कुंभ पडल्यावर निकुंभाचे रणांगणावर आगमन : सुग्रीवें झोंटधरणी । कुंभ पाडिलिया ।तें देखोनिया नयनीं । निकुंभ क्षोभोनी चालला ॥ १ ॥ निकुंभो भ्रातरं दृष्ट्वा सुग्रीवेण निपातितम् ।प्रदहन्निव कोपेन सुग्रीवं प्रत्यवेक्षत ॥१॥कृतसंग्राममालं च दत्तपंचांगुलं शुभम् ।आददे परिघं घोरं नगेंद्रशिखरोपमम् ॥२॥निकुंभो भूषणेर्भाति परिघेणायतेन च ।नगर्या विटपावल्या गन्धर्वनगरैरपि ॥३॥सहसैवामरावत्या सर्वैश्च भुवनैः सह ।निकुंभपरिघोद्‍भूतं भ्रमतीव नभस्थलम् ॥४॥ निकुंभाच्या परिघ आयुधाने वानरसैन्याची दाणादाण : कुंभ पडताचि रणीं । निकुंभ चालिला कोपोनी ।सुग्रीवा जाळिले नयनीं । क्रोधोन्मादीं अवलोकी ॥ २ ॥मागें बहुतां रणांगणीं । जेणें केलिया संग्रामश्रेणी ।जो दाटुगा अरिदळणीं । तो परिघ घेवोनि चालिला ॥ ३ ...अजून वाचा

164

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 36

अध्याय 36 मायावी सीतेचा इंद्रजिताकडून वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ करोनि मकराक्षाचा घात । विजयी बैसला श्रीरघुनाथ ।येरीकडे इंद्रजित क्रोधन्वित तळमळी ॥ १ ॥ निहतं मकराक्षं तं दृष्ट्वा रामेण संयुगे ।शक्रजित्सुमहाक्रुद्धो विवेश रणसंकटम् ॥१॥ इंद्रजिताला चिंता : मकराक्ष मारिला महाकपटी । तें देखोनियां दृष्टीं ।इंद्रजित पडिला रणसंकटीं । त्याची गोष्टी अनुवादे ॥ २ ॥मारिले भरंवशाचे वीर । जे कां निधडे महाशूर ।त्यांसी मारिती वानर । पालेखाइर पशुदेही ॥ ३ ॥मारिला कुंभकर्ण महावीर । देवांतक निरांतक त्रिशिर ।वधिला अतिकाय दुर्धर । महोदर महापार्श्व ॥ ४ ॥प्रहस्त पावला रणीं मरण । कुंभ निकुंभ दोघे जण ।मकराक्षाचा घेतला प्राण । विंधोन बाण ...अजून वाचा

165

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 37

अध्याय 37 इंद्रजिताचा निकुंबिला प्रवेश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजिताने भीतीने निकुंभिलेत गमन केले : हनुमंताचा पर्वतघात । चुकवावया ।स्वयें पळाला बिळा आंत । धुकधुकित अति धाकें ॥ १ ॥मायिकसीतेचा पैं घात । जाणोनियां हनुमंत ।माझा करील प्राणांत । भेणें धाकत इंद्रजित ॥ २ ॥सांगावया रणवृत्तांत । श्रीरामापासीं गेला हनुमंत ।तेव्हा इंद्रजित भयभीत । गेला पळत निकुंबळे ॥ ३ ॥ निकुंभिलामथासाद्य जुहुबेग्निमथेंद्रजित् ।यज्ञभूभौ तु विधिना पावकस्तेन रक्षसा ॥१॥हूयमानः प्रजज्वाल जपहोमपरिष्कृतः ।सार्चिः पिनद्धो ददृशे पूयशोणिततर्पितः ॥२॥सन्ध्यागत इवादित्यः परिवेषसमन्वितः ।जुहोति यत्र विधिवद्रक्तोष्णीषं वरस्त्रियः ॥३॥शस्त्राण्यलाबुपत्राणि समिधश्च बिभीतकः ।अस्थि कृष्णमृगस्याथ रक्तं जग्राह जीवतः ॥४॥लोहितानि च वासांसि स्रुंव कार्ष्णायसं तथा ।सर्वतोग्निं समास्तीर्य शनैः पात्रैः ...अजून वाचा

166

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 38

अध्याय 38 इंद्रजिताचे मेघपृष्ठावर गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ निकुंबिळेत वानरप्रवेश झाला तरी इंद्रजित ध्यानमग्न : वानर बिळीं प्रवेशोन जालें इंद्रजितदर्शन ।बैसला आहे धरुन ध्यान । जपावदान होमनिष्ठा ॥ १ ॥वानरीं आंसुडितांचि जाण । तो न सांडी प्रेतासन ।त्यांचें भंगेना तें ध्यान । जपावदान होमनिष्ठा ॥ २ ॥घाय हाणितां दारुण । इंद्रजिताचें भंगेना ध्यान ।हातींचें न राहे अवदान । होमविधान जपनिष्ठा ॥ ३ ॥वानरवीरांचिया श्रेणी । शंख करिती दोनी कानीं ।इंद्रजित डंडळीना ध्यानीं । होमविधानीं सादर ॥ ४ ॥कष्टतांही वानरगण । ध्याना भंगेना अणुप्रमाण ।हातींचें न राहे अवदान । होमविधान खुंटेना ॥ ५ ॥तये काळीं बिभीषण । त्याचें भंगावया ...अजून वाचा

167

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 39

अध्याय 39 इंद्रजिताचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण व वानरसैन्यासह हनुमंत मेघपृष्ठी गेला : इंद्रजित जातां मेघपृष्ठी । त्याची न सांडी पाठी ।निर्दळावया महाकपटी । उठाउठी पावला ॥ १ ॥करावया इंद्रजिताचा घात । लक्ष्मण घेवोनियां हातांत ।वेगें वाढला हनुमंत । मेघापर्यंत साटोपें ॥ २ ॥वानरसैन्यासमवेत । तळीं असतां शरणागत ।छळणें इंद्रजित करी घात । रक्षणार्थ कपि योजी ॥ ३ ॥बिभीषण लक्ष्मण । आणि समस्त वानरगण ।लोम तुटों नेदीं जाण । आंगवण पहा माझी ॥ ४ ॥पुच्छाचिया आंकोड्याआंत । वानर आणि शरणागत ।बैसवोनियां समस्त । वज्रकवचात राखिले ॥ ५ ॥येरीकडे हनुमंत । करावया इंद्रजिताचा घात ।खवळला रणाआंत । तोही ...अजून वाचा

168

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 40

अध्याय 40 लक्ष्मणाला सावध केले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजित वधाने वानर सैन्याला व देवादिकांना हर्ष : रणीं पाडूनि शूर । विजयी झाला सौ‍मित्र ।हर्षे उपरमती वानर । जयजयकार करोनी ॥ १ ॥इंद्रजित पडतांचि रणपाडीं । तेचि काळीं तेचि घडी ।बिभीषणा हर्षकोडी । जोडिला जोडी आल्हाद ॥ २॥ पतितं रावणिं ज्ञात्वा सा राक्षसमहाचमूः ।वध्यमाना प्रदुद्राव हरिभिर्जितकाशिभिः ॥१॥केचिल्लंकामभिमुखं प्रविष्टा वानरार्दिताः ।समुद्रे पतिताः केचित्केचिच्छैलान्समाश्रिताः ॥२॥हतमिन्द्रजितं दृष्ट्वा शयानं धरणीतले ।जहर्ष शक्रो भगवान्सह सर्वैर्महर्षिभिः ॥३॥जगाम निहते तस्मिन्‍राक्षसे पापकर्मणि ॥४॥ रणीं पडतां इंद्रजित वीर । राक्षसांचे महाभार ।वानरीं त्रासितां अपार । निशाचर पैं पळती ॥ ३ ॥धाकें धाकें राक्षसकोडी । धरिली समुद्राची थडी ।एक ...अजून वाचा

169

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 41

अध्याय 41 सुलोचनेचा अग्निप्रवेश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रणीं मारोनि इंद्रजित । सौ‍मित्र झाला विजयान्वित ।तेणें सुखावला रघुनाथ । स्वानंदे ॥ १ ॥हटी नष्टी कोटिकपटी । येणें इंद्रजित दुर्धर सृष्टीं ।तो मारितां शस्त्रवृष्टीं । सुखानुकोटी सर्वांसी ॥ २ ॥सुखी झाले नरवानर । सुखी झाले ऋषीश्वर ।दैत्य दानव सुरवर । सुखी समग्र सौ‍मित्रें ॥ ३ ॥ इंद्रजिताची पत्‍नी ध्यानस्थ असता इंद्रजिताचा भुजदंडपात : येरीकडे लंकेमाझारी । इंद्रजिताची भुजा थोरी ।पडली सुलोचनामंदिरीं । खड्गधारी सायुध ॥४ ॥सुलोचना निजमंदिरीं । शिवस्वरुप आणोनि अंतरी ।शिवस्मरणीं निरंतरीं । ध्यान करीत शिवाचें न् ॥ ५ ॥जवळी असतां सखिया बहुत । शिवपूजा करीत अद्‍भुत ।तंव अंगणीं ...अजून वाचा

170

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 42

अध्याय 42 रावणाच्या रथाचा भंग ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजित वधाने रावणाचा क्रोध : इंद्रजिताचा करोनि घात । सौ‍मित्र ।तें ऐकोनि लंकानाथ । दुःखाभिभूत अति दुःखी ॥ १ ॥निकुंबळे विवराआंत । लक्ष्मणें जावोनि तेथ ।केला इंद्रजिताचा घात । प्रधान सांगत लंकेशा ॥ २ ॥लक्ष्मणा साह्य हनुमंत । प्रतापें रिघोनि विवरांत ।बाहेर काढितां इंद्रजित । मेघपृष्ठपर्यत वाढला ॥ ३ ॥इंद्रजित मेघपृष्ठीं गर्जत । लक्ष्मण नेवोनि स्वहस्तें तेथ ।मेघनादाचा केला घात । साह्य हनुमंत सर्वार्थी ॥ ४ ॥ऐकोनि इंद्रजिताचा घात । अरावण महामोहान्वित ।सिंहासनातळीं मूर्च्छित । पडे अकस्मात विसंज्ञ ॥ ५ ॥संज्ञा पावोनिया रावण । दहाही मुखीं करी शंखस्फुरण ।दीर्घस्वरें करी ...अजून वाचा

171

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 43

अध्याय 43 लक्ष्मणाकडून रावणशक्तीचा भेद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाने क्रोधाने बिभीषणावर शक्ती सोडली : लक्ष्मणें रणाआंत । ध्वज छेदून रथ ।रावण केला हताहत । संग्रामांत साटोपें ॥ १ ॥रणीं लक्ष्मणें केला विरथ । तो राग न मानी लंकानाथ ।बिभीषणें केला अश्वघात । त्यासी टपत मारावया ॥ २ ॥लक्ष्मण झालिया परता । करीन बिभीषणाच्या घाता ।तो सोडीना शरणागता । क्षणार्धता न विंसबे ॥ ३ ॥धीर न धरीच रावण । परता नव्हेचि लक्ष्मण ।बिभीषणावरी आपण । अति निर्वाण मांडिलें ॥ ४ ॥घोडे मारितां । वेगीं रथ सांडूनि जाण ।मारावया बिभीषण । करुनि उड्डाण धांविन्नला ॥ ५ ॥बिभीषण देखोनियां दृष्टीं । ...अजून वाचा

172

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 44

अध्याय 44 औषधी आणण्याची हनुमंताला प्रार्थना ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रणीं दंडोनि रावणासी । सावध करावें सौ‍मित्रासी ।राम आला स्नेहेंसी । जीवीं जीवासीं जीवन ॥ १ ॥राम जगाचें जीवन । राम जीवाचें चिद्धन ।सखा आत्माराम आपण । राम परिपूर्ण परब्रह्म ॥ २ ॥तोचि राम स्वयें आपण । वांचवावया लक्ष्मण ।कृपाळु संतुष्टला संपूर्ण । त्यासीं कल्पांती मरण असेना ॥ ३ ॥राम निजज्ञानें अति समर्थ । तोही वानरांचे विचारांत ।अनुसरला स्वयें वर्तत । अनुचरित लक्षूनी ॥ ४ ॥ विश्रम्य स्वस्थमालोक्य सुषेणं राघवोऽब्रवीत् ।एष रावणवेगेन लक्ष्मणः पतितो भुवि ॥१॥सर्पवच्चेष्टते वीरो मम शोकमुदिरयन् ॥२॥ लक्ष्मणाला मूर्च्छा आणि रामांचा शोक : भूत भविष्य वर्तमान ...अजून वाचा

173

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 45

अध्याय 45 अप्सरेचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऐसें बोलतां हनुमंत । संतोषला श्रीरघुनाथ ।स्वानंदसुखें डुल्लत । पाठी थापटित ॥ १ ॥ राघवः पुनरेवेदमुवाच पवनात्मजम् ।त्वरं वीर त्वयावश्यमानेतव्या महौषधि ॥१॥स्वस्ति तेऽस्तु महासत्व गच्छ यात्रां प्रसादतः ।एवमुक्तस्तु रामेण सुग्रीवेणांगदेन च ॥२॥सुवेलमभिसंरुह्य संपीड्याप्लुत्य वानरः ।जगाम सत्वरं श्रीमानुपर्युपरि सागरे ॥३॥ श्रीरामांचा हनुमंताला आशीर्वाद व आज्ञा : सवेंचि बोले रघुराजा । सवेग उठीं पवनात्मजा ।शीघ्र करोनि यावें काजा । बंधुराजा उठवावें ॥ २ ॥स्वस्थ असो तुझें चित्त । स्वस्थ असो जीवित ।अंग प्रत्यंग समस्त । कपिनाथ निजविजयी ॥ ३ ॥स्वस्ति असो तुजलागीं । कल्याण असो सर्वांगीं ।सर्वदा विजयी जगीं । तनु सर्वांगीं सदृढ ...अजून वाचा

174

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 46

अध्याय 46 हनुमंताचे नंदिग्रामाला प्रयाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अप्सरेने हनुमंताला राक्षसी मायेची कल्पन दिली : उद्धरोनियां ते खेचरी विजयी झाला कपिकेसरी ।येरी राहोनि गगनांतरी । मधुर स्वरी अनुवादे ॥ १ ॥तुझिया उपकारा हनुमंता । काय म्यां उतरायी व्हावें आतां ।कांहि विनवीत तत्वतां । सावधानता परिसावें ॥ २ ॥तूं अदट दाटुगा वीर होसी । कळिकाळातें दृष्टी नाणिसी ।त्याहीवरी रामस्मरणेंसीं । अहर्निशीं डुल्लत ॥ ३ ॥रामनाम स्मरणापुढें । विघ्न कायसें बापुडें ।आश्चर्य देखिलें वाडेंकोंडें । तुजपुढें सांगेन ॥ ४ ॥तूं भावार्थी श्रीरामभक्त । नेणसी कपटाची मात ।निष्कपट तूं कपिनाथ । राम देखत सर्वत्र ॥ ५ ॥विनवीत असें मी तुजप्रती । ...अजून वाचा

175

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 47

अध्याय 47 भरत – हनुमान भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरताची राममय स्थिती : हनुमान अत्यंत विश्वासी । अनुसरोनि ।आला नंदिग्रामासीं । जेथें भरतासीं निवास ॥ १ ॥भरत श्रीरामाचा निजभक्त । भरतें भक्ति उल्लासित ।आचार्य भक्तीचा भरत । भरतें निर्मुक्त चराचर ॥ २ ॥भरते भक्ति विस्तारली । भरतें भक्ति प्रकाशिली ।भरतें पाल्हाळिली निजभक्ती ॥ ३ ॥भरत भक्तीचा निजठेवा । भरत भक्तीचा विसावा ।भरत भक्तीचा ओलावा । भक्तीच्या गांवा रिगम भरता ॥ ४ ॥भरतें सत्य सद्‌भावो । भरतें साचार अनुभवो ।भरतें प्रकट रामरावो । सर्वत्र पहा हो सर्वांसी ॥ ५ ॥भरतें आपंगिली भक्ती । भरतें वाढविली विरक्ती ।भरतें पाहिली निजशांती ...अजून वाचा

176

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 48

अध्याय 48 श्रीरामांच्या क्रोधाचे शमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरतास वंदन करुन हनुमंताचे वृत्तांत-कथन : देखोनि भरतप्रेमासी । नमन वेगेंसीं ।सांगावया रामकथेसी । प्रेम कपीसीं अनिवार ॥ १ ॥आम्हां निश्चयमनें । स्वयें राम अनुभवणें ।जगीं रामरुप देखणें । भरतोल्लंघन केंवी घडे ॥ २ ॥बंधु धाकटा रामाचा । तोही आम्हां राम साचा ।केंवी उल्लंघूं याची वाचा । लावीन कथेचा अन्वय ॥ ३ ॥भरता ऐकें सावधान । चित्रकुटीं रघुनंदन ।देवोनि तुम्हांसी समाधान । पुढारें गमन मांडिलें ॥ ४ ॥घेवोनि अगस्तीची भेटी । सांगोनियां गुह्य गोष्टी ।शरभंगऋषि जगजेठी । उठाउठीं उद्धरिला ॥ ५ ॥विराध येवोनि आडवा । सीता उचलोनि निघे तेधवां ।रामें ...अजून वाचा

177

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 49

अध्याय 49 लक्ष्मण शुद्धीवर आला ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम शांत होतात : श्रीराम प्रार्थितां वानरगण । शरणागत बिभीषण कळवळोन । केलें उपशमन क्रोधाचें ॥ १ ॥शांत करोनि कोपासी । आविष्टोनि मोहावेशीं ।काय बोलत सुग्रीवासी । सावकाशीं परियेसा ॥ २ ॥ प्रशांतिमगमत्कोपो राघवस्य महात्मनः ।भूयः शोकसमाविष्टो रामो दशरथात्मजः ॥१॥अब्रवीद्राघवो दीनः सुग्रीवं वानरेश्वरम् ।सुग्रीव गच्छ किष्किंधां सहवानरसेनया ॥२॥कृतं मित्रसहायं तु यदन्यैर्भुवि दुष्करम् ।अहं चाद्य महाबाहो यत्करिष्यामि तच्छृणु ॥३॥ श्रीरामांची सुग्रीवाकडे निर्वाणीची भाषा : पुढे घेवोनि लक्ष्मण । सुग्रीवातें बोलावोन ।अदीन परी दीनवचन । दशरथनंदन बोलत ॥ ३ ॥सुग्रीवा परीस विनंती । तूं अवंचक मित्रकार्यार्थीं ।तुझे उपकार किती । म्यां वचनोक्तीं ...अजून वाचा

178

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 50

अध्याय 50 हनुमंत पर्वत पूर्वस्थळी ठेवतो ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाचे श्रीरामांना आणि सर्वाना वंदन : रामस्मरणें लक्ष्मण । उठोनियां जाण ।नमियेला रघुनंदन । बिभीषण नमियेला ॥ १ ॥नमस्कारिलें सुग्रीवासी । नमन केलें अंगदासी ।नमन सकळ वानरांसी । सौ‍मित्रें सकळांसी नमियेलें ॥ २ ॥ साधु साध्विति सुप्रीतः सुषेणं प्रत्यपूजयत् ।उत्थितं भ्रातरं दृष्टवा रामो हर्षसमन्वितः ॥१॥परिष्वज्य च सौ‍मित्रिं सबाष्पस्वेदमब्रवीत् ॥२॥ श्रीरामानां आनंद : उठिला देखोनि लक्ष्मण । उल्लासे रघुनंदन ।आलिंगोन सुषेण । काय आपण बोलत ॥ ३ ॥तुझिया उपकारा उत्तीर्ण । सर्वथा न होईजे गा आपण ।सौ‍मित्रासी जीवदान । दाता तूं सुषेण झालासी ॥ ४ ॥ऐसा विनवोनि सुषेण । आलिंगिला ...अजून वाचा

179

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 51

अध्याय 51 अहिरावण – महिरावण यांचा संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पर्वस्थानी पर्वत ठेवून हनुमंताचे आगमन : स्वस्थानीं ठेवोनि । विजयी झाला कपिनाथ ।श्रीराम आनंदें डुल्लत । हरिखें नाचत कपिसैन्य ॥ १ ॥शरणागत बिभीषण । राजा सुग्रीव आपण ।सौ‍मित्रातें जीवदान । हनुमंतें जाण दीधलें ॥ २ ॥ वानरसैन्याची रामांना रावणावर चालून जाण्याची विनंती : काळें तोंड लंकानाथा । ब्रह्मशक्ति झाली वृथा ।पळोनि गेला न झुंजतां । तोंड मागुता न दाखवी ॥ ३ ॥जरी येता झुंजासीं । क्षणें मारितो रावणासी ।वानर उडती आवेशीं । लंकेशासी मारावया ॥ ४ ॥आज्ञा पुसती रामासी । वेगें निरोपे दे आम्हांसी ।अद्यापि याची भीड कायसी ...अजून वाचा

180

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 52

अध्याय 52 हनुमंत – मकरध्वज भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अहिरावण – महिरावण यांच्याकडून वानरसैन्याची टेहळणी : अहिरावण महिरावण धराया रघुनंदन ।करिते झाले विवंचन । सावधान अवधारा ॥ १ ॥पाताळ सांडोनि त्वरित । जाले रणभूमीसीं प्राप्त ।धरोनि न्यावया संधि पाहत । अहोरात्र सावध ॥ २ ॥ हनुमंताची प्रतिकारार्थ सिद्धता : येरीकडे वानरभारीं । दळ सज्जी कपिकेसरी ।सन्नद्धबद्ध द्रुमकरी । निजगजरीं हरिनामें ॥ ३ ॥हनुमान वीर निजभक्त । रामभजनीं सावचित्त ।करोनियां कुरवंडी जीवित । स्वामीस राखित अहर्निशीं ॥ ४ ॥राक्षस मायावी निश्चितीं । युद्धीं पावले उपहती ।धूर चोरिती अतर्क्यगती । म्हणोनि कपिपती राखित ॥ ५ ॥न म्हणे वेळ अवेळ । ...अजून वाचा

181

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 53

अध्याय 53 महिरावणाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंत स्वतःची चिंता व्यक्त करुन मकरध्वजाचे साहाय्य मागतो : ऐकतां मगरीचें । झालें हनुमंता समाधान ।देवोनि पुत्रासीं आलिंगन । निजविवंचन सांगत ॥ १ ॥आमुचा स्वामी श्रीरघुनाथ । निद्राकांत कटकांत ।वानर मेळिकारी निद्रिस्थ । राक्षसीं मत्त पैं केले ॥ २ ॥मोहनास्त्र सावधानता । घालोनियां तत्वतां ।मोहन केलें समस्तां । सुषुप्ति अवस्था लागली ॥ ३ ॥कपतयोद्धे राक्षस । संमुख न येतीच संग्रामास ।चोरोनियां श्रीरामास । पाताळास आणिलें ॥ ४ ॥पृथ्वी पाहतां समस्ता । न सांपडती सर्वथा ।पाताळासी आलों आतां । श्रीरघुनाथा पहावया ॥ ५ ॥तंव येथें शुद्धि लागली । तुम्हांसी भेटी झाली ।श्रीरामप्राप्तीची ...अजून वाचा

182

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 54

अध्याय 54 अहिरावणाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वप्रसंगीं निरुपण । श्रीहनुमंते महिरावण ।रणीं मारिला देखोन । अहिरावण क्षोभला १ ॥हनुमंताच्या पुच्छावर्ती । राक्षस पडीले नेणों किती ।निधडे निधडे वीर पुढती । बळें लोटती संग्रामा ॥ २ ॥आम्ही निधडे महावीर । राक्षसांचे भार अपार ।एक वानर दोघे नर । करुं चकचूर क्षणार्धे ॥ ३ ॥ हनुमंत रामाना आज्ञा देण्याची विनंती करितो : ऐकोनि राक्षसांच्या युक्ती । विनवी श्रीरामासी मारुती ।मज आज्ञापीं श्रीरघुपती । यांची शांती करीन ॥ ४ ॥श्रीराम म्हणे गा पवनात्मजा । सदा यशस्वी तुझिया भुजा ।प्राणदात तूं रघुराजा । कीर्तिध्वजा ब्रह्मांडी ॥ ५ ॥जानकीमनोरथाची वल्ली । प्रतापजीवनें ...अजून वाचा

183

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 55

अध्याय 55 सीता – मंदोदरी संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम नाहीसे झाल्याबद्दल वानरांचा प्रश्न : आनंद झाला सर्वांसी श्रीराम आला निजमेळिकारांसी ।लागले श्रीरामचरणांसी । रामें हृदयेंसीं आलिंगिले ॥ १ ॥परियेसीं स्वामी श्रीरामा । दीन अनाथां प्लंवगमां।सांडोनि गेलासि आम्हां । सर्वोत्तमा काय केलें ॥ २ ॥तुझ्या पोटीं होतें जाणें । एकासी तरी होतें सांगणे ।न पुसतां घडलें जाणें । उचित करणें हें नव्हे ॥ ३ ॥ मारुतीकडून राममहातीचे कथन : तंव बोलिला हनुमंत । तुम्हां वानरां न कळे मात ।पूर्णावतार रघुनाथ । त्यासीं सांगता काय करी ॥ ४ ॥जो दुजियाची वाट पाहे । त्याचें कार्य कधीं न होये ।यश ...अजून वाचा

184

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 56

अध्याय 56 लक्ष्मण व बिभीषण यांची श्रीरामांना विनंती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दूतांकडून अहिरावणवध ऐकून रावणाला चिंता : दूतवचनें । अहिरावणाचा निजघात ।ऐकोनियां लंकानाथ । तळमळित अति दुःखी ॥ १ ॥मंदोदरी सीतेजवळी । पाठविली अति कुशळी ।अतियुक्तीं प्रबोधिली । कांही केलें तरी वश नव्हे ॥ २ ॥जरी युद्ध करुं समरांगणीं । तरी राम नाटोपे रणीं ।मस्तक पिटितां दशाननीं । कांही करणी चालेना ॥ ३ ॥ऐसा झाला चिंतातुर । काय करुं मी विचार ।तंव आठवला महामंत्र । झाला शंकर प्रसन्न ॥ ४ ॥पूर्वी रावणांसीं वरद । शिवें दिधला प्रसिद्ध ।तें आठवलें विशुद्ध । होम अगाध मांडिला ॥ ५ ॥करोनि शुद्ध ...अजून वाचा

185

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 57

अध्याय 57 राक्षसांच्या आवरणाचा भेद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मण व बिभीषणाच्या भाषणाने श्रीरामांनाक्रोध व बिभीषणाला रावणाच्या शोधाची आज्ञा बहुतांपरी लक्ष्मण । विनविता झाला रघुनंदन ।तैसेचि बिभीषणही जाण । करी विनवण बहुतांपरी ॥ १ ॥विनविला वानरीं । महावीर कपिकेरी ।ऐकतां तिखट उत्तरीं । कोप रघुवीरीं पैं आला ॥ २ ॥त्रिपुरवधालागीं झडकरीं । क्रोध आला त्रिपुरारी ।त्याहूनि क्रोध रघुविरीं । दशशिरा वधावया ॥ ३ ॥मुरु दैत्य दुर्धर भारी । त्यालागीं खवळे मुरारी ।त्याहूनियां कोप रघुवीरीं । दशशिरा मारावया ॥ ४ ॥सृष्टिप्रळयाचे वेळे । संहारकाळ अति खवळे ।तेंवी छेदावया रावणशिसाळें । क्रोध खवळें श्रीरामीं ॥ ५ ॥ज्याची विक्षेपभृकुटी । क्षणें विध्वंसी ...अजून वाचा

186

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 58

अध्याय 58 रावणाच्या यज्ञाचा विध्वंस ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वानरांनी संकल्प मोडला ; पण ते महामोहाच्या आवरणामध्ये अडकून पडले अति दुस्तर संकल्पावरण । जेणें व्यापिलें त्रिभुवन ।तें निरसोनि हरिगण । करीत किराण चालिले ॥ १ ॥सद्‌गुरुचे कृपेपुढें । संकल्प कायसें बापुडें ।जेंवी रवीपुढें मेहुढें । तेंवी उडे अभावत्वें ॥ २ ॥निरसून दुस्तर आवरण । करीत रामनामगर्जन ।अति बळियाढे वानगण । देत किराण चालिले ॥ ३ ॥केउता आहे लंकापती । काळमुखा त्रिजगतीं ।चोरोनि आणिली सीता सती । तेणेंचि शांती झाली त्याची ॥ ४ ॥भस्म झालिया आवरणें । आतां काय करावें रावणें ।जीव घेवोन पळोन जाणें । अन्यथा जिणें दिसेना ॥ ...अजून वाचा

187

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 59

अध्याय 59 रावणाचे युद्धार्थ आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावण सावध होऊन मंदोदरीला धीर देतो, सांत्वन करितो : निजमूर्च्छा । सावध झाला रावण ।तंव पुढें विझालें हवन । रावणें आपण देखिलें ॥ १ ॥सखळ यज्ञसामग्री । वानरीं केली बोहरी ।तें देखोनि दशशिरीं । क्रोध शरीरीं चढिन्निला ॥ २ ॥मंदोदरी स्वयें रडत । देखोनियां लंकानाथ ।स्वयें तीस शांतवीत । निजपुरुषार्थ बोलोन ॥ ३ ॥ साभिमानैर्वचोभिस्तां सांत्वयन्निदमब्रवीत् ।कींरोदिषि शुभे दीनं मायि जीवति मानिनि ॥१॥न मे किश्चित्समो युद्धे त्रिषु लोकेषु भामिनि ।सेंद्राः सुरगणाःसर्वे तिष्ठंति हि वशे मम ॥२॥किमल्पसारैः शक्योऽहं जेतुं वानरमानुषै ॥३॥ निजाभिमानें दशानन । मंदोदरीप्रति वचन ।करोनि तिचें शांतवन । स्वयें ...अजून वाचा

188

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 60

अध्याय 60 रावणाने रामांचा ध्वज तोडला ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मातलीचे रथासह आगमन व श्रीरामांना वंदन : मातलि सारथि । घातलें इंद्रा लोटांगण ।येरें देतां आज्ञापन । करी संयोजन रथाचें ॥ १ ॥रावण दुरात्मा चांडाळ । बंदी घातले सुर सकळ ।तेणें अत्यंत तळमळ । लागली प्रबळ मातलीसीं ॥ २ ॥आपुला स्वामी सुरपती । सेवा घेतो त्याचे हातीं ।तेथें येराची कवण गती । लंकापति भला नव्हे ॥ ३ ॥तेणें क्रोधें करोनि जाण । केलें रथसंयोजन ।शस्त्रास्त्रें सकळ भरुन । सामग्री दारुण घातली ॥ ४ ॥कवचें खड्गें अत्य्द्‍भुत । मंत्र तंत्र क्रियायुक्त ।रणसामग्री समस्त । रथ त्वरित सिद्ध केला ॥ ५ ...अजून वाचा

189

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 61

अध्याय 61 राम – रावण – युद्धवर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची गर्वोक्ती व गर्जना : परिघें नमिलें रघुपतीं तें न देखेच लंकापती ।अति गर्वाची गर्वोन्मती । अंधवृत्ती होवोनि ठेली ॥ १ ॥गर्वे गर्जत रावण । श्रीरामातें लक्षून ।झणें करिसी पलायन । दशानन देखोनी ॥ २ ॥वानरांचा आश्रय धरून । मजसीं करुं आलासि रण ।त्यांसहित तुज निवटीन । अर्धक्षण न लागतां ॥ ३ ॥आम्हां राक्षसांचें भक्ष । देखा मनुष्य प्रत्यक्ष ।वानरभार सावकाश । कोशिंबिरीस न पुरती ॥ ४ ॥ते तुम्ही आज मजसीं । रणीं भिडलां रणमारेंसीं ।तैं उबगलेती जगासी । पाहूं आतां पुरुषार्था ॥ ५ ॥स्त्रिये मारिलें ताटकेसी । ...अजून वाचा

190

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 62

अध्याय 62 रावणाचा शिरच्छेद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची स्थिती व श्रीरामस्वरुपावलोकन : सोहंभावाचा मेढा सुलक्षण । अनुसंधानाचा तीक्ष्ण ।लक्षूनियां रघुनंदन । स्वयें रावण विंधो पाहे ॥ १ ॥तंव अवघा ब्रह्मांडगोळ । रामें व्यापिला दिसे सकळ ।तेथें कायसें जगतीतळ । रामें प्रबळ वाढिन्नला ॥ २ ॥सत्पपाताळातळीं चरण । श्रीरामाचे देखे रावण ।ऐका तयाचें लक्षण । सुलक्षण सुचिन्हीं ॥ ३ ॥निजधैर्यशेषफडीवरी । श्रीरामचरण निर्धारीं ।सुचिन्हें शोभती कवणेपरी । नवलपरी तेथींची ॥ ४ ॥अनुपम चरणपंकज । शोभे सायुज्याचा ध्वज ।उर्ध्वरेखा ते सहज । दावी वोज उर्ध्वगतीची ॥ ५ ॥वज्र आणि अंकुश दोन्ही । भक्तसाह्यालागोनी ।विपक्षीं अंकुश ओढोनी । भक्तरक्षणीं छेदी वज्रें ...अजून वाचा

191

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 63

अध्याय 63 रावणाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ उभय सैन्याला उद्देशून रावणाने केलेली श्रीरामांची स्तुती : श्रीरामें रावण जाण निजबोधबाणेंकरुन ।निवटिंतांचि संपूर्ण । काय दशानन बोलत ॥ १ ॥ऐका गा हे सेनास्थित । नर वानर राक्षस बहुत ।उभय सेनेचे समस्त । माझा वचनार्थ परिसावा ॥ २ ॥ऐकोत देव दानव । यक्ष आणि गंधर्व ।सिद्धचारणादि सर्व । श्रीरामवैभव परिसत ॥ ३ ॥श्रीराम माणूस नव्हे जाण । राम सर्वांतर्यामी पूर्ण ।राम सर्वातीत सनातन । राम चिद्धन चिन्मूर्ति ॥ ४ ॥राम सकळलोककर्ता । राम ब्रह्मादिकां पाळिता ।राम काळाचा आकळिता । सकळांचे माथां श्रीराम ॥ ५ ॥श्रीराम आदिहेतु उत्पत्ती । राम स्थितीची निजस्थिती ...अजून वाचा

192

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 64

अध्याय 64 रावणस्त्रियांचा विलाप ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणवधानंतर सैन्याची दाणादाण व पळापळ : करोनिया रणकंदन । ससैन्य रणीं ।स्वयें पाडिला आपण । उरलें सैन्य देशोधडी ॥ १ ॥एकीं दिगंतर लंघिलें । एकां कंठीं प्राण उरले ।एकां गात्रां कंप सुटले । एक निमाले आपधाकें ॥ २ ॥एकें झालीं भ्रमित । एकां सुटला अधोवात ।एकां मूत्रवृष्टि होत । प्राण सांडित उभ्यांउभ्यां ॥ ३ ॥एक होवोनि कासाविसी । रडत रडत रणभूमीसीं ।बोंब घेवोनि वेगेंसीं । आलीं लंकेसीं सांगत ॥ ४ ॥एक सांडिती लेणीं लुगडीं । एक तृण धरिती तोंडीं ।एकांचि वळली बोबडी । पडली मुरकुंडी एकांची ॥ ५ ॥ अनेकांची दीनवाणीने ...अजून वाचा

193

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 65

अध्याय 65 मंदोदरी सहगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऐसा रावणाच्या वनिता । अतिशोकाकुळिता ।विलाप करिती समस्ता । दुःखाक्रांता रणरंगीं १ ॥मंदोदरी आली तेथ । अति दुःखें दुःखार्दित ।पडिला देखोनि निजकांत । विलाप करीत आक्रोशें ॥ २ ॥ तासां विलपमानानां तदा रावणयोषिताम् ।ज्येष्ठपत्‍नी प्रिया दीना भर्तारं समुदैक्षत ॥१॥दशग्रीवं हतं दृष्ट्वा रामेणाक्लिष्टकर्मणा ।पतिं मंदोदरी तत्र कृपणं पर्यदेवयत् ॥२॥ मंदोदरीकृत रावणशची स्तुती व शोक – विलाप : विष्णुसंभूत जे स्वयें । रचिली स्वहस्तें देवें ।चराचर मोहातें पावे । रुप स्वभावें देखतां ॥ ३ ॥जो त्रिकाळ आत्मज्ञानी । तो मोहला शूळपाणी ।ओळखवेना निजपत्‍नी । शंकर मनीं वेडावला ॥ ४ ॥अकळ भगवंताची माया । ...अजून वाचा

194

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 66

अध्याय 66 बिभीषणाला राज्याभिषेक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जो सकळलोकघातक । सकळधर्मावरोधक ।सत्कर्मविच्छेदक । तो रामें दशमुख निवटिला ॥ ॥शेतीं केली वाफधांवणी । जेंवी कृषीवल सुखावे मनीं ।तेंवी निवटून दशाननी । रघुनंदनीं उल्लास ॥ २ ॥दीक्षित याग आचरती । दुःसाध्य यज्ञ संपादिती ।साधोनि केली पूर्णाहुती । पावती विश्रांती निजसुखें ॥ ३ ॥तेंवी रामें करोनि ख्याती । सेतु बांधोनि अपांपती ।राक्षसांची करोनि शांती । लंकापती निवटिला ॥ ४ ॥श्रीराम याज्ञिक चोखत । रणभूमि तेचि यज्ञवाट ।काळानळ अति श्रेष्ठ । हव्यवाट आव्हानिला ॥ ५ ॥सुग्रीवादि हनुमंत । ऋत्विज सेनापति समस्त ।बिभीषण साक्षी तेथ । कर्म सांगत चुकलें तें ॥ ६ ॥परिसमूहन ...अजून वाचा

195

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 67

अध्याय 67 जानकीचे आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा सर्वत्र जयजयकार : बिभीषण राज्यधर । देखोनि वानर निशाचर ।अवघीं जयजयकार । नामें अपार गर्जती ॥ १ ॥नामें कोंदलें पाताळ । नामें व्यापिलें जगतीतळ ।नामें कोंदलें नभोमंडळ । ब्रह्मांडगोळ व्यापिला ॥ २ ॥नामें गर्जती माकडें । वर्णिती रामाचे पवाडे ।नाचती प्रेमें वाडेंकोडें । बिभीषणापुढें अति प्रीतीं ॥ ३ ॥श्रीराम दत्त तेजाकार । रावणमुकुट परिकर ।आणोनि बाणें सुग्रीव वीर । धरिलें छत्र रामदत्त ॥ ४ ॥तेणें शोभा अत्यद्‍भुत । बिभीषण राज्यमंडित ।ते देखोनि सुर समस्त । सुमनें वर्षत अति प्रीतीं ॥ ५ ॥करोनियां जयजयकार । नामें गर्जती सुरवर ।नभीं सिद्धांचा जयजयकार ...अजून वाचा

196

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 68

अध्याय 68 सीतेचे दिव्य ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ततो वैश्रवणे राजा यमश्च पितृभिः सह ।सहस्त्राक्षश्च देवेशो वरुणश्च जलेश्वरः ॥१॥त्रिशूलपाणिर्विश्वेशो वृषध्वजः ।कर्ता सर्वस्य लोकस्य ब्रह्मा च भगवान्प्रभुः ॥२॥स च राजा दशरथो विमानेनांतरिक्षगः ।अभ्याजगाम तं देशं देवराजसमद्युतिः ॥३॥एते सर्वे समागम्य विमानैः सूर्यसंनिभैः ।अभ्यभाषंत काकुत्स्थं मधुरं वाक्यगौरवात ॥४॥ कुबेर, यम, वरुणादि देवांसह दशरथांचे त्या ठिकाणी आगमन : वैश्रवण जो कुबेर । धनवंताचा राजा सधर ।भगवंताचा भांडारघर । तेथें सत्वर पातला ॥ १ ॥अर्यमा पितरसमवेत । यम पातला प्रेतनाथ ।सहस्राक्ष देवनाथ । मरुद्‌गणेंसहित पातला ॥ २ ॥अपांपती अति वोजा । वरुण आला अमृतराजा ।विनवावया रघुराजा । सीताकाजा पैं आले ॥ ३ ॥त्रिशूळपाणी वृषभध्वज ...अजून वाचा

197

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 69

अध्याय 69 दशरथाचे समाधान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम व जानकी यांची युती कशी दिसली : जेंवी सुवर्ण आणि । प्रभा आणि दिप्ती ।तेंवी सीता आणि रघुपती । स्वयें शोभती निजतेजे ॥ १ ॥कापूर आणि दृती । प्रकाश आणि ज्योती ।भानु आणि दिप्ती । तेंवी भासती एकरुप ॥ २ ॥साकरेमाजी गोडी देखा । सागरीं लहरींच्या झुळुका ।तेवी माजी रघुकुळटिळका । जनकदुहिता शोभत ॥ ३ ॥धात्याआंगी सावित्री । उमा शंकरजानूवरी ।रमा समीप मुरारी । तेंवी रावणारीजवळी जनकत्मजा ॥ ४ ॥जानकीयुक्त रघुनाथ । देखोनियां अति मंडित ।सदैव त्रैलोक्यीं समस्त । आनंदभरित पैं जाले ॥ ५ ॥ दिव्याच्या परिक्षेत सीता उत्तीर्ण झाल्यामुळे ...अजून वाचा

198

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 70

अध्याय 70 देवभक्तांची आनंदस्थिती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामें विनवितां दशरथ । निश्चियें बाणला वचनार्थ ।स्वयें मानोनि कृतार्थ । विरक्त सर्वस्वा ॥ १ ॥राज्यलोभ स्वर्गलोभ । पुत्रलोभ विषयलोभ ।सांडूनि भुवनभोगलोभ । जाला निर्लोभ दशरथ ॥ २ ॥अहंता आणि ममता । लोकलोकांतरवार्ता ।गमनागमन पै तत्वता । राया दशरथा पैं नाठवे ॥ ३ ॥नामरूपातीत । वर्णाश्रमधर्मातीत ।जातिकुळगोत्रातीत । स्वयें रघुनाथ जाणितला ॥४ ॥श्रुति शास्त्रातीत । पूर्ण ब्रह्म रघुनाथ ।राये करितांचि इत्यर्थ । स्वयें तो अर्थ ठसावला ॥ ५ ॥लक्षूं जातां गुणातीतता । स्वयें ठसावे ते अवस्था ।लाभे आपुली निजमुक्तता । गुणातीतता गुणांमाजी ॥ ६ ॥यालागीं मुमुक्षु सकळ । साधक जिज्ञासु प्रबळ ...अजून वाचा

199

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 71

अध्याय 71 त्रिजटेचे दर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रतिगृह्णिष्व तत्सर्वं मदनुग्रहकांक्षया ।मुनिवेष्ठं समुत्सृज्य राज्यार्थमनुभूयताम् ॥ १ ॥एवमुक्तस्तु काकुत्स्थः प्रत्युवाच ।धर्मज्ञं धर्मविद्वाक्य ज्यायज्ञो न्यायकोविदम् ॥ २ ॥ लोटांगणीं बिभीषणें । विचित्रालंकार भूषणें ।विचित्र रत्‍नें विचित्र वसने । आणिलीं आपण पूजेसीं ॥ १ ॥विचित्र पूजेची सामग्री । घेवानि बिभीषण विनंतीकरी ।सहित जानकी सुंदरी । पूजा अंगीकारीं मत्प्रीतीं ॥ २ ॥मजवरी अनुग्रह पूर्ण । त्याचें फळ हेंचि जाण ।यथासामर्थ्यें पूजाविधान । आणिलें प्रीतीने अंगीकारीं ॥ ३ ॥सांडोनि मुनिवेषासी । अंगीकारीं राजचिन्हांसी ।जेणें सुख होय आम्हांसी । तें प्रीतीसीं आचरावे ॥ ४ ॥निजभक्ताचें मनोगत । संरक्षावें यथातथ्य ।हेंचि तुझें निजव्रत । तें साद्यंत ...अजून वाचा

200

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 72

अध्याय 72 लक्ष्मण – सीतेचे समाधान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ त्रिगुणांची जटा शिरीं । सर्वथा युगाचे सुरासुरीं ।स्वयें त्याची बोहरी । भजनेंकरी रामाच्या ॥ ॥लागोनियां भजनवाटा । सोडिला त्रिगुणांचा कुरुठा ।नांवें साचार त्रिजटा । भजननिष्ठा उगवली ॥ २ ॥ऐसी त्रिजटेची ख्याती । चरित्र पावन त्रिजगतीं ।बिभीषणें करोनि विनंती । विमान रघुपती अर्पिलें ॥ ३ ॥तें न घेच रघुनाथ । तेणें बिभीषण सचिंत ।विमाना न शिवे रघुनाथ । भाग्यहत मी करंटा ॥ ४ ॥विमानेंकरोनि तत्वतां । कांहीं सेवा रघुनाथा ।माझी पावेल अल्पता । सकळ वृथा तें झालें ॥ ५ ॥ बाह्म उपचारांनी राम वश होणें नाही : तरीं ऐसें केंवी ...अजून वाचा

201

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 73

अध्याय 73 श्रीरामांचे पुष्पक विमानांत आरोहण – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पुढें ठेवोनि विमान । विश्वकर्मा आणि बिभीषण ।लोटांगण पूर्ण । संमुख रघुनंदनु राहिले ॥ १ ॥कर जोडोनिर्यां देख । विमानेंसहित सेवक ।पुढें देखतां रघुकुळटिळक । अनत सुखा पावला ॥ २ ॥ तत्पुष्पकं कामगमं विमानमुपस्थितं प्रेक्ष्य हि दिव्यरूपम् ।गम: प्रहष्ट: सह लहमणेन पुरा यथा वृत्रवथे महेंद्र ॥ १ ॥ श्रीरामांची तेजस्विता : दिव्य तेजांचिया कोटी । अनंतसूर्य कोट्यनुकोटी ।पडतां श्रीरामाची दृष्टी । प्रकाश उठी विमान ॥ ३ ॥दिव्यतेजें देदीप्यमान । लखलखीत अवघें गगन ।देखतांचि रघुनदन । सुखसंपन्न पै झाला ॥ ४ ॥आच्छादोनि निजप्रकाशासी । विमानद्वारा तो प्रकाशी ।स्वयें देखोनि ...अजून वाचा

202

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 74

अध्याय 74 श्री शंकर – हनुमंत भेट – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामाचें निजचरित्र गहन । सांगतां सौमित्र विचक्षण जानकी सावधान । सर्वांगश्रवण करोनी ॥ १ ॥धन्य श्रवणार्थीं सादर सीता । धन्य धन्य तो सौमित्र वक्ता ।धन्य चरित्र रामकथा । अनागतवक्ता वाल्मीकी ॥ २ ॥कलियुगीं धन्य जन ते । अखंड गाती रामचरित्रातें ।धन्य धन्य ते सादर श्रोते । कथामृत सेविती ॥ ३ ॥श्रवणद्वारें कथामृत । सेवितां अंतर निर्वृत ।प्रकटोनियां रघुनाथ । उद्धरीत जडजीवां ॥ ४ ॥श्रीरामाचें चरित्र गहन । क्रमें संपलें सेतुबंधन ।पुढे रामेश्वराचे आख्यान । वर्णी कोण साकल्यें ॥ ५ ॥अनंत कथा सेतुमाहात्म्यीं असती । तितुकी आकळावया कैंची ...अजून वाचा

203

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 75

अध्याय 75 शिवलिंगासह मारुतीचे आगमन – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मुक्त करोनि जनस्थान । ब्राह्मणां दिधलें दान ।सुग्रीवासी किष्किंधाभुवन सेतुबंधन सागरीं ॥ १ ॥अगाधबोध रघुनाथा । हें हनुमंतवचन ऐकतां ।संतोष झाला उमाकांता । होय सांगता पूर्ववृत्त ॥ २ ॥ श्रीशंकर मारुतीला विंध्याद्रीची कथा सांगतात : ब्रह्मपुत्र श्रीनारद । सर्वेंद्रियब्रह्मबोध ।ब्रह्मवीणासुस्वरनाद । नित्य आनंद ब्रह्मपदीं ॥ ३ ॥ब्रह्मानंदें डुल्लतु । ब्रह्मसृष्टीं विचरत ।भुवनें भुवन हिंडत । अधिकारियां देत परब्रह्म ॥ ४ ॥उन्मत्तांसीं करोनि दंड । स्वेच्छा विचरत ब्रह्मांड ।देखोनि विंध्याद्रि प्रचंड । आला नारद भेटीसीं ॥ ५ ॥येरू उठोनि अति प्रीतीं । लोटांगण घातलें क्षितीं ।पूजा करोनि नम्रवृत्तीं । स्वयें ...अजून वाचा

204

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 76

अध्याय 76 श्रीरामेश्वरमहिमावर्णन – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मारुतीस परतण्यास वेळ लागल्याने श्रीराम सचिंत : विश्वेश्वरदत्त लिंग । हनुमान सवेग ।उड्डान केलें अति चांग । गगन सांग आक्रमिलें ॥ १ ॥येरीकडे रघुनंदन । झाला अत्यंत उद्विग्न ।कां पां नयेचि वायुनंदन । काय विघ्न पडिलेंसे ॥ २ ॥उपवासी वानरवीर । खेद क्षीण क्षुधातुर ।आम्हांसीं न घेतां फळाहार । वानर आहार न सेविती ॥ ३ ॥बापुडे हे गोळांगूळ । आहारेवीण झाले विकळ ।गात्रें जाहली बेंबळ’ । भ्रमती डोळे गरगरां ॥ ४ ॥यांसी आहार न देतां । सकळां होईल प्राणांत व्यथा ।रामाचा नेम आम्हां भोंवता । वानरां समस्तां मारिलें क्षुधा ॥ ५ ...अजून वाचा

205

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 77

अध्याय 77 श्रीरामांना अयोध्यादर्शन – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जानकीची प्रेमावस्था । देखोनियां रघुनाथा ।हर्ष दाटला निजचित्ता । उचलोनि आलिंगिली ॥ १ ॥उठवोनियां जानकीसी । रामेश्वरदर्शन घ्यावयासी ।राम चालिला अतिप्रीतीसीं । विमान भूमीसीं उतरलें ॥ २ ॥ श्रीरामाचें विमान रामेश्वरी उतरताच ऋषीचे रामदर्शनार्थ आगमन : भूमीं उतरतां विमान । रामदर्शनालागून ।आली ऋषिमंडळी धांवोन । केलें नमन अति प्रीतीं ॥ ३ ॥अगस्तिलोपामुद्रासमवेत । ऋषी पातले समस्त ।त्यांते दोखोनियां रघुनाथा । नमन करीत लोटांगणीं ॥ ४ ॥भूमीं उतरतां विमान । श्रीरामदर्शनालागून ।तिहीं करोनियां उठवण । रघुनंदन नमियेला ॥ ५ ॥तेथे ऋषींचा जयजयकार । वानरवीरांचा भुभुःकार ।नादें कोंदलें अंबर । दिशा समग्र ...अजून वाचा

206

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 78

अध्याय 78 हनुमंत नंदिग्रामास गेला – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥भरद्वाज ऋषींनी श्रीरामांचे विमान पाहिले : विमानीं बैसोनी रघुनाथा । त्वरान्वित जातां ।तळी भरद्वाज अवचितां । आश्रमीं असतां देखिला ॥ १ ॥आश्रमी असतां भरद्वाज ऋषी । आश्चर्य देखिलें आकाशीं ।हेमच्छाया दशदिशीं । चौपासीं पसरली ॥ २ ॥रविचंद्रांतें लाजवीत । प्रकाश शीतोष्णातीत ।गगनीं काय असे जात । ऋषि मनांत विचारी ॥ ३ ॥निर्धारोनि पाहे नयनीं । तंव परिवारला वानरगणीं ।श्रीराम देखिला विमानीं । जनकनंदिनी अंकावरी ॥ ४ ॥सौमित्रासहित राम होये । सवें वानर कैचे हो हे ।राक्षसगणही दिसती पाहें । श्रीराम होये सर्वथा ॥ ५ ॥माझ्या श्रीगुरूच्या अनागता । श्रीराम न ...अजून वाचा

207

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 79

अध्याय 79 हनुमंत- भरत भेट – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥क्रिशमात्रमयोध्यायाश्चीरकृष्णाजिनाम्बरम् ।ददर्श भरतं दीनमृषिभिः सह वासिनम् ॥ १ ॥जटिलं मलदिग्धांगं ॥ २ ॥ हनुमंताला भरत कसा दिसला ? : अयोध्येहूनि क्रोशमात्र’ । नंदिग्राम भरतनगर ।तेथें येवोनि कपिकुंजर । पातला घर भरताचें ॥ १ ॥तंव वसिष्ठादि ऋषीश्वर । भरतासमीप थोर थोर ।व्रतस्थ झाले समग्र । वल्कलांबर कृष्णाजिनीं ॥ २ ॥तापसवेषी वनचर । कंदमूळफळाहार ।व्रतें धरियेलीं दुर्धर । कृशोदर पैं भरत ॥ ३ ॥अस्थि चर्म झालें एक । मांस आटलें सकळिक ।रुधिर शोषिलें निःशेख । पंजर देख उरलासे ॥ ४ ॥श्रीरामाचेनि स्मरणें जाण । भरतदेह वांचला पूर्ण ।तेणें भासे देदीप्यमान । जीवन ...अजून वाचा

208

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 80

अध्याय 80 गुहकाला श्रीरामांचे दर्शन – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामदर्शनाला जाण्यासाठी सैन्य सिद्धकरण्याची सुमंतांची सेनापतींना आज्ञा : सुमंता मारुती । शीघ्र संजोग सैन्यसंपत्ती ।येरें ऐकतां अति प्रीतीं । आनंद चित्ती उथळला ॥ १ ॥तेणें आनंदेकरोनि जाण । घातलें मारुतीसीं लोटांगण ।सेनापतीसी आज्ञापन । केले आपण सुमंतें ॥ २ ॥आपुलाले दळभार । सिद्ध करा अति सत्वर ।भरत निघाला वेगवत्तर । श्रीरघुवीरदर्शना ॥ ३ ॥तंव भरतें करोनियां दान । सुखी केलें दीनजन ।आनंदमय प्रसन्नवदन । काय गर्जोन बोलत ॥ ४ ॥ भरताची नगर शृंगारण्याची शत्रुघ्नाला आला : भवशत्रुविनाशना । ऐकें सुबंधो शत्रुघ्ना |सेनापतीसी करोनि आज्ञा । सहित प्रधानां सिद्ध करवीं ...अजून वाचा

209

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 81

अध्याय 81 श्रीराम- भरतभेट – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ गुहकाचा भाव पूर्ण । भावे भेटला रघुनंदन ।भाव तेथें तिथे । विज्ञानेसी जाण सर्वदा ॥ १ ॥ न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न च मृण्मये ।भावे हि विद्यते देवस्तस्माद्‌भावो हि कारणनम् ॥ १ ॥ भावार्थाचा महिमा : भावार्थी प्रेम आगळे । भावार्थे तत्व आकळे ।वैकुंठीचे-भाव बळे । सर्वकाळें भेटती ॥ २ ॥भावावीण व्यर्थ श्रवण । भावावीण व्यर्थ कीर्तन ।अर्थावबोध नाही पूर्ण । चित्त वळघे रान विषयाचें ॥ ३ ॥भावार्थावीण व्यर्थ ज्ञान । भावार्थावीण व्यर्थ ध्यान ।अंतरीं विकल्प नांदतां पूर्ण । ज्ञान ध्यान लटिकेंचि ॥ ४ ॥भावार्थावीण वृथा भक्ती । ...अजून वाचा

210

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 82

अध्याय 82 श्रीरामांना राज्याभिषेकाचा निर्णय – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरताची श्रीरामांना प्रार्थना : भेटोनियां सकळांसी । भरत आला ।करोनि साष्टांग नमनासी । लोटांगणेंसीं राम वंदिला ॥ १ ॥बद्धांजलि विनयवृत्ती । भरत सत्यें सत्वमूर्तीं ।विनविता झाला श्रीरघुपती । मधुरोक्तीं नम्रत्वे ॥ २ ॥श्रीरामा तुजवीण । झालों होतों अति दीन ।मृतप्राय कळाहीन । जीवनेंवीण जेंवी धान्य ॥ ३ ॥भ्रतारेंवीण जेंवी कांता । उपहत२ जैसी सर्वथा ।शुंगारभोग सकळ वृथा । तेंवी रघुनाथा तुजवीण ॥ ४ ॥मातृहीन पै बाळक । मृतप्राय दिसे देख ।नाहीं बाळसें कैंचें सुख । स्तनपान निःशेख असेना ॥ ५ ॥तुजवांचोनियां रघुनंदन । तैसी आमची दशा पूर्ण ।केवळ भूमिभार ...अजून वाचा

211

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 83

अध्याय 83 श्रीरामांना राज्याभिषेक – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ धन्य तो वाल्मीकिमुनिजन । धन्य धन्य त्याचें वचन ।अनागत रामायण केलें-निरूपण शतकोटी ॥ १ ॥धन्य तें अयोध्याभुवन । धन्य धन्य तेथींचे जन ।धन्य तयांचे नयन । नित्य रघुनंदन देखती ॥ २ ॥धन्य भाग्य त्या भरताचें । नित्य चिंतन श्रीरामाचें ।प्रेम देखोनि निष्कर्षाचें । झालें स्वामीचें आगमन ॥ ३ ॥ रामराज्याभिषेकासाठी आलेल्यांची नामावली : त्याच्या राज्याचा उत्साहो । अभिषेकी कळवळलाहो ।भरतें मांडिला पहा हो । ऋषिसमुदावो मेळवोनी ॥ ४ ॥श्रीरामराज्याभिषिंचन । पाहूं आले सुरगण ।मरुद्‌गणेंसी पाकशासन । स्वयें आपण तेथें आला ॥ ५ ॥देवगुरु बृहस्पती । तेथे आला शीघ्रगतीं ।सनकादिक मुनिपंक्ती ...अजून वाचा

212

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 84

अध्याय 84 श्रीरामस्वरूपवर्णन – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जयजयाजी श्रीजनार्दना । एकानेका परिपूर्णा ।जनीं असोनि अभिन्ना । अलिप्त जगासी १ ॥जनीं आहेसी तत्वतां । म्हणोनि तेथें भाव धरितां ।ते तुझी माया गा अच्युता । तेथें सर्वथा तूं नससी ॥ २ ॥जेंवी उदकाचा निखळ फेन । तो केन पितो नवचे तहान ।तेंवी तुजपासून जहाले जन । ते जनां जाणी भेटसी ॥ ३ ॥फेन निरसोनि उदक घेणें । जन निरसोनि तूतें देखणें ।सोनटकाहूनि सोनें पहाणें । अन्यथा शिणणे वायांचि ॥ ४ ॥हे अभेददर्शनहातवटी । तूंचि गुरूचे कृपादृष्टीं ।अवलोकिसी संवसाटी । तै दिठी पैठी तुजमाजी ॥ ५ ॥त्या तुझें स्वरूप चिद्धन । ...अजून वाचा

213

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 85

अध्याय 85 राज्याविषयी लक्ष्मणाची विरक्ती – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा आनंदसोहळा : श्रीरामाचें अभिषिंचन । आनंदमय त्रिभुवन ।भक्तवृंद । आनंदें पूर्ण गर्जती ॥ १ ॥भद्रीं बैसला रघुनाथ । ब्रह्मांड सुखें दुमदुमित ।विनोदें श्रीरामाचे भक्त । रामसुखार्थ दाविती क्रिया ॥ २ ॥श्रीरामसुखें संपन्न । संतोषावया रघुनंदन ।अग्निक्रीडा मांडिली पूर्ण । औषध भरून रज तम ॥ ३ ॥ दारूकामाचे रूपकात्मक अनुपम सुंदर वर्णन : तीव्ररजतमांची औषधे । करोनि अग्नियंत्रें सन्नद्धें ।श्रीरामभक्तिआनंदें । क्रीडा विनोर्दे मांडिली ॥४ ॥सूक्ष्म ममतेची हवाई । पहिली आणियेली पाही ।वैराग्यवाती लावितां ठायीं । चिद्‌गगनीं तेही उसळली ॥ ५ ॥गुरुवाक्यें प्रज्याळिली । सद्विवेकें आंबुथिली ।लागतां हवाई जळाली ...अजून वाचा

214

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 86

अध्याय 86 भरताला अभिषेक – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामें प्रार्थितां बहुत रीतीं । राज्य न घेचि ऊर्मिलापती ।तेणें सुरपंक्ती । वानर चित्तीं विस्मित ॥ १ ॥ सर्वात्मना पर्यनुनीयमानो यदा न सौमित्रिरुपैति योगम् ।नियुज्यमाजो भुवि यौवराज्ये ततोऽभ्यषिंचत्‌भरतं महात्मा ॥ १ ॥ यौवराज्यपद स्वीकारण्याची भरताला सर्वांची विनंती : भरत शत्रुघ्न बिभीषण । सुग्रीवादि वानरगण ।इंद्रब्रह्मादि सुरगण । प्रार्थितां लक्ष्मण राज्य न घे ॥ २ ॥वसिष्ठादि रघुपती । तिही प्रार्थिला बहुत रीतीं ।राज्य न घे ऊर्मिलापती । विस्मित चित्तीं सुरसिद्ध ॥ ३ ॥तेणें काळें भरतासी । सकळीं प्राथिलें प्रीतीसीं ।सौमित्र न घे यौवराज्यासी । तूं विनंतीसी अंगीकारीं ॥ ४ ॥ त्यामुळे ...अजून वाचा

215

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 87

अध्याय 87 हनुमंताचे लीलाचरित्र – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांकडून सर्वांचा सन्मान : ब्रह्मादि लोकपाळांसी । रामें गौरविले सकळांसी बिभीषण सुग्रीवादिकांसी । राम निजगणांसी पूजित ॥ १ ॥निजगणांची प्रीति पूर्ण । आवडी त्याचें पूजाविधान ।स्वयें करीत रघुनंदन । ऐका विवंचन तयाचे ॥ २ ॥देवभक्तांचें प्रेम गहन । त्यांचें पूजेचें विधान ।वदावयामज कैचें वदन । हीन दीन मतिमंद ॥ ३ ॥तथापि श्रीरामकृपेची ख्याती । वनचर मर्कट हाती ।धरोनियां अपांपती । बांधिला निश्चिती पाषार्णी ॥४ ॥निरायुधें माकडें । ती पाडिती लंकेचे हुडे ।दशमुख केलें वेडें । घेतलें कैवाडें त्रिकूट क्षणें ॥ ५ ॥सागरी दगड तरती । पालेखाईर सुरकार्यार्थी ।तिही राक्षय नेले ...अजून वाचा

216

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 88

अध्याय 88 सर्वांना नैवेद्य-प्रसादाचा लाभ – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंताची प्रार्थना : पूर्वप्रसंगी हनुमंतें । विनविलें श्रीरामातें ।सारोनि । प्रसाद आमुतें द्यावा स्वामी ॥ १ ॥सौमित्र आणि भरत । जानकीमातेसमवेत ।पारणे सारोनि निश्चित । करावें तृप्त सकळांसी ॥ २ ॥ब्रह्मादि सुरपंक्ती । प्रसादाची वाट पाहती ।निजसेनेचे सेनापती । आकांक्षिती सुमंतादिक ॥ ३ ॥बिभीषणसुग्रीवादि जाण । अंगद युवराजा आपण ।नळनीळादि कपिगण । प्रसाद पूर्ण वांछिती ॥ ४ ॥जांबवंत सुषेण दधिमुख । श्रीरामप्रसादा सकळिक ।अवघे असती साकांक्ष । त्यांसी आवश्यक सुखावीं ॥ ५ ॥म्हणोनि घातलें लोटांगण । तें देखोनि सकळ जन ।स्वयें झाले सुखैकघन । हनुमंतें विंदान साधिलें ॥ ६ ...अजून वाचा

217

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 89

अध्याय 89 हनुमंताचे रामप्रेमाचे वर्णन – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांनी हनुमंताची स्तुती करून त्याला वरदान देण्याची इच्छा दर्शविली धन्य हनुम्याचा भावार्थ । धन्य हनुम्याचा पुरुषार्थ ।धन्य हनुम्याचा सिद्धार्थ । जेणें रघुनाथ वोळला ॥ १ ॥न मागतांही निश्चयेंसीं । माग म्हणे आवडीसीं ।निजदासीं कृपा ऐसी । हर्षे त्यासी मग म्हणे ॥ २ ॥ प्रसन्नो हि हतूमंतमुवाच रघुनन्दनः ।वरं वृणीष्व चाद्य त्वं महत्कार्य कृतं त्वयां ॥ १ ॥ तुझिया महत्कार्याची कथा । वाचे न बोलवे सर्वथा ।तुझा ऋणी मी हनुमंता । जाण तत्वतां निश्चये ॥ ३ ॥काय अपेक्षी तुझें चित्त । जें दुष्प्राष्य त्रैलोक्यांत ।तें तें मागावें निश्चित । कृपा ...अजून वाचा

218

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 90

अध्याय 90 बिभीषणाचे लंकेला प्रयाण – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामांनी बिभीषणाला लंकेत जाण्यास सांगितले : तदुपरी दुसरे दिवशीं सारोनिया नित्यकर्मासी ।बैसोनि अंतरसभेसी । बिभीषणासी बोलाविले ॥ १ ॥सीता आणि त्रिवर्गबंधु । उभे राहिले अति स्तब्धु ।मग मांडिला उब्दोधु । बिभीषणालागूनी ॥ २ ॥बिभीषणासी म्हणे श्रीरघुपती । मज कळली तुझी मनोवृत्ती ।आतां असावें अयोध्येप्रती । माझ्या स्नेहा लागोनियां ॥ ३ ॥ वचन पाळण्याची परंपरा : तरी लौकिकीं माझी वार्ता । लंका दिधली शरणागता ।ते हिरोनि सलोभता । बिभीषण अयोध्ये ठेविला ॥ ४ ॥तरी हें थोर जधन्य । सूर्यवंशा येईन ऊन ।स्वगी हरिश्चंद्रादि आपण । अधःपतन पावतील ॥ ५ ॥म्हणोनि ...अजून वाचा

219

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 91

अध्याय 91 वानरांचे स्वस्थानी निर्याण – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सिंहासनांधीश श्रीरामांचे वर्णन : तदुपरी दुसरें दिवशीं । करोनियां ।वंदोनियां महेशासी । भद्रपीठासी श्रीराम आला ॥ १ ॥सभा झाली घनदाट । प्रत्यया न ये वैकुंठ ।येथींचा महिमा उद्‌भट । डोळा स्पष्ट विश्व देखे ॥ २ ॥अंकीं बैसवोनि जानकीसी । आपण बैसला सिंहासनासीं ।घेवोनि भरत प्रधानासी । बंधुत्रयेंसीं नमिता झाला ॥ ३ ॥सुमंत धरी छत्रातें । राष्ट्रवर्धन धरी व्यजनातें ।धर्मपाळ आतपत्रातें । धरितां झाला ते काळीं ॥ ४ ॥भरत चरणीं निकट । यौवराज्य लाहोनि उत्कृष्ट ।नम्रपणे बोले चोखट । राजनीतिलागूनी ॥ ५ ॥धनुष्य खड्‌ग हातीं धरून । सव्यभागीं लक्ष्मण ।उभा ...अजून वाचा

220

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 92

अध्याय 92 श्रीरामचरित्र – ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामसभेचे वर्णन : यानंतरें दुसरे दिवशी । करोनियां प्रातःस्नानासी ।वंदोनियां महर्षींसी भद्रपीठासीं श्रीराम आला ॥ १ ॥सभा बैसली घनदाट । दुजे उपमेसी वैकुंठ ।तेथींचा महिमा उत्कट । अति श्रेष्ठ रामसभा ॥ २ ॥अंकीं घेवोनि जनकनंदिनी । श्रीराम बैसला सिंहासनीं ।येवोनि भरतादि प्रधानीं । लोटांगणी वंदिला ॥ ३ ॥छत्र धरिलें सुमंतें । अकोपन घरी चामरातें ।राष्ट्रवर्धन धरी व्यजनातें । आतपत्रातें धर्मपाळ ॥ ४ ॥रामचरणांनिकट भरत । उभा राहे जोडोनि हात ।तो युवराजा अति विख्यात । नम्र विनीत भावार्थी ॥ ५ ॥हाती धरोनि धनुष्यबाण । सव्य भागीं लक्ष्मण ।उभा राहोनि विचक्षण । श्रीरामचरण ...अजून वाचा

221

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 1

उत्तरकांड अध्याय 1 हनुमंताला स्त्रीराज्याला पाठविणे ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सद्‌गुरूमहिमा : ॐ नमो सद् गुरो जनार्दना । जनीं समान परिपूर्णा ।सच्चिदानंदा चिद्धना । सेव्य सज्जनां सुरवर्या ॥१॥तूतें गुरूत्वें वंदूं जाता । तंव जनीं वनीं देखें तद्रूपता ।कार्यकारणकर्तृत्वता । तेही तत्वतां न देखें ॥२॥ऐसें निजस्वरूप अगाध । शंकले उपनिषदादि वेद ।शेष श्रमला करिता वाद । शास्त्रानुवाद खुंटला ॥३॥परादि वाचा चारी । शिणोनि थोकल्या दुरी ।तेथें मंदमति नरीं । कवणे परी वर्णावें ॥ ४॥तुझ्या स्वरूपा नाहीं अंत । अनंत म्हणतां मति भीत ।द्वैतस्थानीं मुख्य अद्वैत । बोल बोलत सज्ञान ॥ ५॥जैसें धर्म करितां जनीं । प्रतिष्ठेच्या पारडां बैसोनी ।परलोक पावावा ...अजून वाचा

222

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 2

अध्याय 2 पुलस्त्यांचे आख्यान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भद्रासनीं दशरथकुमर । बैसलासे करूणाकर ।दक्षिणे शेषावतार । वामे भरतशत्रुघ्न ॥१॥कुळगुरू सन्मुख । परिवेष्टित प्रधान लोक ।चर्चा करिती धर्मकर्मादिक । तर्कवितर्क बोलती ॥२॥एक सांगती पुराण । एक करिता रामकीर्तन ।एक करिती गायन । होऊन लीन स्वात्मपदीं ॥३॥एक पढती चतुर्वेद । एक म्हणती प्रबंध ।एक करिती विवाद । गद्यपद्य शास्त्रांचे ॥४॥ऐसी सभा प्रसन्नवदन । देखोनि वंदिती बंदिजन ।एक म्हणती हा रघुनंदन । ब्रह्मीं जीवन मूर्तिमंत ॥५॥एक म्हणती हा रघुनंदन । अवतार धरावया एक कारण ।एक म्हाणती धरा भारें पीडोन । श्रीरामा शरण गेली ते ॥६॥तिचिया कैवारा राघव । सगुण होवोनि सावयव ।मारोनियां ...अजून वाचा

223

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 3

अध्याय 3 विश्रव्याची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विश्रव्याची तपःसाधना : मग तो पुलस्त्यनंदन । विराम परम पावन ।तेजें सहस्त्रकिरण । धर्मपरायण पवित्र ॥१॥कर्माचरणीं अति प्रसन्न । चहूं वेदांचे अध्ययन ।शास्त्रांविषयीं महाप्रवीण । भगवद्भजन अहर्निशीं ॥२॥शांति दया सुशीळव्रत । गुरूसेवेसी रतचिता ।परोपकारीं वेची जीवीत । पितृभक्त अतिशयें ॥३॥सर्वभूतीं समता देखे । साधुजनां आत्मवें ओळखे ।पराचा गुण दोष न देखे । ऐसा सुखें तो असे ॥४॥अष्टांगयोग साधूनी । प्राणापान जिणोनीं ।मुद्रा खेच्री अगोचरी तिन्ही । लघूनी ब्रह्मस्थानीं पावला ॥५॥ऐसा योगनिष्ठ तपोनिष्ठ धर्मनिष्ठ ऋषी । आचरे आश्रमविहित कर्मासी ।नुल्लंघी मातृपितृवचनासी । द्वेष तयासीं असेना ॥६॥ त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भरद्वाजाने आपली ...अजून वाचा

224

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 4

अध्याय 4 सुकेशाची जन्मकथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीविष्णूंनी रावणाचा वध का केला असा रामांचा अगस्तिमुनींना प्रश्न : ऐकोनि वचन । कर जोडोनि रघुनंदन ।विनीतवृत्तीं करोनि नमन । काय आपण बोलत ॥१॥अगा ये अगस्ति महामुनी । पूर्वी लंकादुर्गभवनीं ।राक्षस वसती हें तुमच्या वचनीं । आजि म्यां श्रवणीं ऐकिलें ॥२॥ब्रह्मादिकांचा नियंता । चराचर वर्ते ज्याचिये सत्ता ।यज्ञरूप जो अयोनिजेचा भर्ता । डोलवी माथा ऋषिवाक्यें ॥३॥कुंभोद्भवाच्या वचनासी । ऐकोनि विस्मय श्रीरामासी ।म्हणे स्वामी मांसभक्षक कपटवेषी । राक्षस लंकेसीं वर्तती ॥४॥पुलस्तिवंशीं राक्षस झाले । हें तुमचेनि मुखें ऐकिलें ।रावणकुंभकर्ण जन्मले । प्रहस्तादि विकटादिक ॥५॥आणि रावणाचे सुत । होते पराक्रमवंत ।याहूनि ते राक्षस ...अजून वाचा

225

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 5

अध्याय 5 सुमाली, माल्यवंत व माली यांची जन्मकथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणारि म्हणे अगस्ती । तुझेनि मुखें सुकेश ।वर लाधला शैलजात्मजापती । महादेवें प्रीतीं पाळिला ॥१॥तयाकारणें वस्तीसी । गंधर्व लोक यमपुरासीं ।राज्यीं स्थापोनि तयासी । पुढें काय ऋषी वर्तलें ॥२॥तें सांगावें आम्हांप्रती । तूं कृपाळु कृपामूर्ती ।तुजसमान नाहीं त्रिजगतीं । तुझी कीर्तीं न वर्णवे ॥३॥तुवां प्रशिला अपांपती । तुझेनि विंध्याद्रीसी निद्रास्थिती ।तुझेनि सूर्यास मार्गप्राप्ती । तुवां इल्वकवातापी मारिला ॥४॥ऐसा तुझा अगाध महिमा । वाचा वर्णूं व शके ब्रह्मा ।परादि वाचा शिणल्या मज रामा । वर्णिले तुम्हां न वचे ॥५॥ राक्षसवंशासंबंधी रामांचा अगस्तींना प्रश्न : यालगीं जी ऋषिवर्या । ...अजून वाचा

226

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 6

अध्याय 6 राक्षस व विष्णूचे युद्ध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इल्वलारी म्हणे जामदाग्निजिता । कमलोद्भवजनका ऐकें पूर्वकथा ।वर देता सृष्टीकर्ता । त्यासही तत्वतां न गणिती ॥१॥वरदें उन्मत्त होवोन । करिते झाले अन्योन्य ।ऋषींस दुःख देऊन । यागविध्वंसन पैं करिती ॥२॥ राक्षसांच्या उन्मत्तपणामुळे त्रस्त होऊनऋषिमंडळी शंकराकडे आली, शंकराची प्रार्थना : ऐसे राक्षसभयेंकरीं । विप्रीं कडे कुमर हातीं क्कारी ।यज्ञपात्रें स्त्रियांचे शिरीं । कैलासपुरी ठाकिली ॥३॥आले वृद्ध थोर थोर । सपत्नीक अपत्नीक विधुर ।तपें जर्जर झाले शरीर । ब्रह्मचारी थोर तेथें आले ॥४॥आले मौनी दिगंबर । माथां जटा वल्कलांबर ।तपोधन थोर थोर । भगवी कापडी येते झाले ॥५॥राक्षसभयेंकरोनि ऋषी । येते ...अजून वाचा

227

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 7

अध्याय 7 माळी राक्षसाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वसंगीं रजनीचरीं । वेढियला तो श्रीहरी ।पुढें वर्तलें तें चतुरीं सावधान ऐकावें ॥१॥श्रीहरि पर्वतासमान । राक्षस तेथें मेहुडे जाण ।श्रीहरी सुटलिया प्रभंजन । दणादाण राक्षसमेघां ॥२॥अवकाळींचा पर्जन्य । बळेंविण करी गर्जन ।तैसे राक्षस बळहीन । संग्रामा जाण प्रवर्तले ॥३॥जैसे टोळ आकाशीं । पसरती दशदिशीं ।ते टोळ वृक्ष देखोनि मानसीं । उल्लासेंसी वेढिती ॥४॥जेंवी मशक पर्वतमाथां । असंख्य बैसती तत्वतां ।परी तो भार पर्वतचित्ता । अणुमात्र उपजेना ॥५॥जैसे मत्स्य सागरीं । क्रीडताती सहपरिवारीं ।ते पारधी आकळी जाळियाभीतरीं । तैसें श्रीहरि करूं पाहे ॥६॥ परस्परांचे तुंबळ युद्ध : त्या राक्षसांचे अमोघ बाण ...अजून वाचा

228

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 8

अध्याय 8 भीतीने राक्षसांचे पातालगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अवनिजापति रघुनंदन । जोडून पाणी करी प्रश्न ।अग्स्ति तुझेनि मुखें । माळीमरण आयकिलें ॥१॥पुढें उरले दोघे बंधु । त्यांचा कैसा जाहला वधु ।त्यांतें वधिता गोविंदु । किंवा आणिक पैं असे ॥२॥अगस्ति म्हण श्रीरघुपती । तयां राक्षसां मृत्यु विष्णुहातीं ।विष्णुहातें ते मरती । आणिकाप्रती नाटोपती ॥३॥माळी मारिला ऐकोन । राक्षस मोडले देखोन ।माल्यवंत क्रोधायमान । गिरा गर्जोन चालिला ॥४॥अग्निकुंडासारिखे नेत्र । रागें धनुष्या गुण चढवित ।जैसा समुद्र वेळी लंघित । तैसा धांवत राक्षस ॥५॥ माल्यवंताकडून विष्णूंचा उपहास : दूरी देखोनि विष्णूसी । रागें फोडी आरोळीसी ।जेवीं कां मेघ आकाशीं । वर्षाकाळीं ...अजून वाचा

229

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 9

अध्याय 9 रावण – कुंभकर्णादिंची उत्पत्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम म्हणे मुनिवरा । माल्यवंत सुमाळी पाताळविवरा ।प्रवेशले तयावरी । कथा पुढारां सांगावी ॥१॥अगस्ति विनवी श्रीरामा । तूं अंतर्यामी साक्षी आम्हां ।ऐसें असोनि हा महिमा । आमचा थोर वाढविसी ॥२॥पुढें ते रजनीचर । पाताळीं प्रवेशले सहपरिवार ।लपोनि राहिले धाक थोर । भय दुस्तर देवांचें ॥३॥कोणे एके समयीं । राक्षस विचरती महीं ।रसातळमृत्यु लोकीं पाहीं । स्व इच्छेनें हिंडती ॥४॥अंगकांति अति सुंदर । शोभा शोभे शशिचक्र ।सुवर्णकुंडलें मकराकार । विशाल नेत्र आकर्ण ॥५॥ऐसा सुमाळी राक्षस । मही विचरत सावकाश ।तंव एके समयीं कुबेरास । देखता झाला दुरोनी ॥६॥कुबेर पुष्पकविमानीं । ...अजून वाचा

230

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 10

अध्याय 10 रावणाला ब्रह्मदेवाचे वरदान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामांचा प्रश्न : तदनंतरें अयोध्यापती । ऐकोनि रावणकुंभकर्ण उत्पत्ती ।अत्यंत चित्तीं । मुनीप्रती पुसता झाला ॥१॥ऐकें स्वामी अगस्तिमुनी । तुवां समुद्र प्राशिला आचमनीं ।दंडकारण्य वसे तुझेनी । विंध्याद्रि धरणी निजविला ॥२॥वातापी इल्वल महाराक्षस । मारोनि ऋषी केलें ससंतोष ।ऐसे तुझे उपकार बहुवस । तूं महापुरूष ईश्वरु ॥३॥कृपा करोनि मज दीनावरी । कथा सांगावी पुढारीं ।गोकर्णाश्रमीं रावण घटश्रोत्री । काय करिते पैं झाले ॥४॥कोण तप तयांचे फळलें । काय नेम करिते झाले ।कोण व्रत आचरले । कैसेनि पावले ऐश्वर्या ॥५॥आधींच कथा रामायण । त्यावरी तुमच्या मुखें निरुपण ।आजि शवणाचें भाग्य गहन ...अजून वाचा

231

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 11

अध्याय 11 रावणाला लंकेची प्राप्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुमाळी व इतर प्रमुख राक्षसची रावणाला प्रार्थना : पूर्वप्रसंगीं श्रीरघुपती रावणासी झाली वरदोक्ती ।तें जाणोनि सुमाळी निश्चितीं । अभय चित्तीं समाधान ॥१॥उठोनि समस्त रजनीचर । मारीच प्रहस्त विरुपाक्ष महोदर ।आणिक प्रधान थोर थोर । येते झाले समस्तही ॥२॥सुमाळी समस्त राक्षसेंसीं । येता झाला रावणापसीं ।काय बोलिला तयासी । सावधानेंसीं अवधारा ॥३॥अगा दशग्रीवा महावीरा । तपोबळेंकरुनि चतुरा ।पावलासी प्रकारा । परमोदरा रावणा ॥४॥तूं त्रिभुवनीं श्रेष्ठ राक्षस । पावलासी उत्तम वरास ।विष्णुभय पावलों त्रास । लंका त्यजूनि रसातळा देलों ॥५॥महाबहो तेह्तें गेलों । तेथें असतां विष्णुभय पावलों ।थोर संग्रामीं भग्न झालों । ...अजून वाचा

232

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 12

अध्याय 12 रावणादिकांचा विवाह व इंद्रजिताचा जन्म ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ शूर्पणखा – विद्युज्जिव्ह यांचा विवाह : तिघां बंधूंसमवेत दशग्रीवा लंकाराज्य प्राप्त ।नांदत असतां सुखस्वस्थ । पुढील कथार्थ अवधारा ॥१॥तदनंतरें शूर्पणखा भगिनी । देखिली यौवनेंकरोनी ।रावणासि चिंता मनीं । हे कोणास पैं द्यावी ॥२॥ते शूर्पणखा कैसी । सुपासारिखीं नखें जीसी ।म्हणोनि शूर्पणखा नांव तियेसी । श्रीरामा ऐसी जाणिजे ॥३॥दनूपासूनि संभव । यालागीं तो दानव ।विद्युज्जिव्ह ऐसें नांव । रावण तयाअ भगिनी देता झाला ॥३॥जेंवी विद्यल्लता अंबरीं । तैसी जिव्हा मुखाबाहेरी ।म्हणोनि विद्युज्जिव्ह नामाधिकारी । महाभयंकर दानव ॥५॥विधिपूर्वक कन्यादानासीं । शूर्पणखा दिधली त्यासी ।दशग्रीव आपण पारधीसी । मृगें मारावयासी हिंडता ...अजून वाचा

233

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 13

अध्याय 13 रावणाचे अलकावतीस गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तदनंतरें ब्रह्मलोकगुरू । रावणासि देवोन वरू ।केला लंकेचा ईश्वरू । बंधूसमवेत ॥१॥तिघांसि पाणिग्रहण झालें । रावणासी राज्य लाधलें ।मेघनादाचें जनन सांगितलें । पुढील कथा अवधारा ॥२॥राज्य करितां विबुधारिजनक । प्रजालोक स्वस्थ सकळिक ।कोणी एके काळीं घटश्रोत्र देख । विनविता झाला बंधूसी ॥३॥अहो जी नृपति अवधारीं । तुम्हीं ज्येष्ठ बंधू आहां शिरीं ।मज निद्रा बाधी भारी । काळकूटासमान ॥४॥ मागणीप्रमाणे कुंभकर्णाला झोपण्यासठी रावणाने मंदिर बांधून दिले : निद्रा बाधीतसे राजेंद्रा । आवडी नाहीं भोगापचारां ।मजकारणें धाम करा । सुखशयन करावया ॥५॥ऐकोनि अनुजाचें वचन । रावण हांसिला खदखदून ।विश्वकर्मा मग पाचारोन । ...अजून वाचा

234

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 14

अध्याय 14 रावणसैन्याचा विध्वंस ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावण आपल्या चतुरंग सैन्यासह अलकावती नगरीला पोचला : पूर्वप्रसंगीं रावण । आरूढोन ।सवें सेना प्रधान । जेथें वैश्रवण तेथें आला ॥१॥तदनंतरें विबुधारीं । चालिला अतिक्रोधेंकरीं ।समवेत प्रधान साही भारी । ब्रह्मांड उलथिती पैं ऐसे ॥२॥तयांची नांवे कोण कोण । मारीच महादेव प्रहस्त शुक सारण ।सहावा धुम्राक्ष ऐसे जाण । संग्रामीं बळ दारूण ज्यांचें ॥३॥जयांच्या पुरूषार्थापुढें । रावण कोणासी नातुडे ।जैसे साही ऋतु गाढे । आपुलेनि काळे शोभती॥४॥तेही साही प्रधान कैसे । क्रोधें सृष्टि जाळिती ऐसे ।चालिले अति आवेशें । नद्या पर्वत उल्लंघिती ॥५॥पुरें पाटणें ग्राम नगरें । लंघित वने उपवनें थोरें ...अजून वाचा

235

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 15

अध्याय 15 कुबेराचा पराभव ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तदनंतर अवनिजापती । प्रीतीं सांगतसे अगस्ती।म्हणे स्वामी ब्रह्मंडाच्या पंक्ती । उतरिसी हेळामात्रें ॥१॥तूं ईश्वराचा ईश्वर । तू सुरवरांचा आदिइंद्र।तूंचि नटनाट्यलीलावतार । दावितोसी विनोदें ॥२॥तूंचि प्रकृति आणि पुरुष । तूं ब्रह्मादिकांचा ईश ।तूं अवतार अयोध्याधीश । तूं कथा आम्हांला पुसतोसी ॥३॥आमच वाढवोनि मान ।आम्हंप्रती करितोसि प्रश्न ।हेंचि आम्हं थोर भूशण । तूं परब्रह्म वंदिसी॥४॥आतां अवधारीं धरणिजारमणा । यक्षेसीं संग्राम करतां रावणा ।रक्षोगण आणिले रणांगणा। मग रावणा कय झालें॥५॥द्वारपाळें तोरणावरी । झोडिलां रावणा पळे दूरी ।तदनंतरे श्रीरामा अवधारीं । कथेचिया निरुपणा ॥६॥यक्षगण मोडिले रणीं । शतसहस्त्र पाडिले मेदिनीं ।धनाघक्षें देखोनि नयनीं। आपण संग्रामा ...अजून वाचा

236

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 16

अध्याय 16 शंकराचे रावणाला वरदान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मागिले प्रसंगीं वैश्रवण । रणभूमीस झाला भग्न ।मागें रावणें पुष्पक । वरी आरूढोन निघाला ॥१॥सवें प्रधान थोर थोर । मारीच प्रहस्त महावीर ।विमानीं आरूढोन वनें घोर । लंघिते झाले ते काळीं ॥२॥षडाननाचें जन्मस्थान । ते देखिलें शरवण वन ।तेथें शर होती उत्पन्न । यालागीं शरवण बोलिजे ॥३॥तदनंतरे पौलिस्तिकुमर । देता झाला वन सुंदर ।वृक्ष वल्ली अपार । अति मनोहर देखिलें ॥४॥तेजें अत्यंत साजिरें । सुवर्णमयचि साकारें ।उपमा देतां भास्करें । किरणाजाळ सोडिलें ॥५॥तया वनप्रदेशीं कैलासगिरी । असे जैसा मेरू धरित्रीं ।त्याच भागीं शोभा साजिरी । पुष्पक तेथें येतें झालें ॥६॥ ...अजून वाचा

237

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 17

अध्याय 17 वेदवतीचे आख्यान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अगस्ति जो महामुनी । कथा सांगे श्रीरामा लागूनी ।ते कथा सुरस । सावधान श्रवणीं ऐकावी ॥१॥रावण विचरतां महीतळीं । हिमाद्रीच्या वनस्थळीं ।समवेत प्रधान बळी । राक्षस न्याहाळी भूमंडळ ॥२॥ लंकेला जाताना रावणाला सुकुमार कन्येचे दर्शन : प्रधानांसमवेत दशानन । पुष्पकावरी आरूढोन ।उल्लंघितां वनोपवन । हिमवंतासमीप आला ॥३॥पुढें देखिलें कन्यारत्न । सुरस सुकुमार कमलनयन ।मस्तकीं जटा कृष्णाजिन । तापसवेषें शोभली ॥४॥विधिपूर्वक अनुष्ठान । जैसें करिती ऋषि देवगण ।तैसी ते सुंदरी पूर्ण । तपें दारूण तपतसे ॥५॥रावणें देखतां कन्यारत्न । सुशील सुव्रत गूनसंपन्न ।काममोहित भ्रांत होऊन । हास्यवदनें पुसता झाला ॥६॥अवो भद्रें अवधारीं ...अजून वाचा

238

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 18

अध्याय 18 रावणाचे राजा मरूत्ताच्या यज्ञाला जाणे ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मरूत्त राजाच्या यज्ञाला रावणाचे आगमन : वेदवतीचें अग्निप्रवेशन तें देखोनि दशानन ।पुष्पकीं आरूढोन पर्यटन । करिता झाला मेदनीतें ॥१॥तदनंतरें मरूत्त भूपती । यज्ञ करीत होता उशीरपर्वतीं ।मिळाले ऋषि देवपंक्तीं । मंत्राहुती घालीत होते ॥२॥देवगुरूचा बंधु जाण । संवर्तनामें तो ब्राह्मण ।जयाचें ज्ञान बृहस्पतिसमान । आचार्य पूर्ण यज्ञींचा ॥३॥समस्त द्विजांसहित । होम करी राजा मरूत्त ।तंव रावण देखिला येत । वरदोन्मत्त होवोनी ॥४॥वरदानाचेंनि बळें । त्रैलोक्य जिंतीत चालिला सकळें ।तें देखोनि द्विजदेवकुळें । अत्यंत भय पावलीं ॥५॥ रावणभयाने देवांनी निराळ्या योनींत प्रवेश केला : तदनंतरे श्रीरघुपती । देव आणिक ...अजून वाचा

239

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 19

अध्याय 19 अनरण्य स्वर्गात गेला ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पृथ्वीवरील अनेक राजांकडून अजिंक्यपत्रेस्वीकारीत रावण विजयोन्मादाने अयोध्येस आला : मागील संपतेअंतीं । मरुत्ताते जिंकोन लंकापती ।पुढें येतां अनेक भूपती । पृथ्वीचे जिंतित ॥१॥दृष्टात्मा तो रावण । जिंतित निघाला आपण ।इंद्रासारिखी जयांची आंगवण । तयां रायांप्रति येता झाला ॥२॥रावण क्रोधें म्हणे तयांसी । मी मागतों संग्रामासी ।जरी बळ असेल तुम्हांसी । तरी युद्धासी पैं यावें ॥३॥नाहीं तरी पराभविलें म्हणोन । वदावें मजप्रति वचन ।वृथा बोलाल गा झणें । सुटका नाहीं तुम्हांसी ॥४॥लंकेश्वराचें ऐकोनि वचन । राजे मनांत जाणोन ।म्हणती यासी सदाशिव प्रसन्न । दिधलें वरदान जिंतावे ना ॥५॥ऐसा करोनि विचार । ...अजून वाचा

240

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 20

अध्याय 20 रावणाचे नर्मदातीरावर आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तदनंतरें श्रावणारिनंदन । अगस्तीप्रति कर जोडून ।म्हणता झाला स्वामीनें निरुपण रावणाचें सांगितलें ॥१॥दशानन विचरत क्षितीं । पृथ्वीचे भूप शरण येती ।तयांतें जिंकोनि लंकापती । पुढारां चाले जिंतित ॥२॥ऐसें जिंतिलें भूमंडळ । राजे जिंतिले ज्यांचा पराक्रम प्रबळ ।ऐसा दशानन अति सबळ । कोठे नाहीं पराभविला ॥३॥निर्वीर होती तैं सृष्टी । ऐसें गमतें माझे पोटीं ।यदर्थी आशंका थोर मोठी । माझे जीवीं वाटतसे ॥४॥बलाढ्य राजे अवनीं नव्हते । ऐसें वाटतें माझेनि मतें ।तैं पाशुपतादिक होतीं शस्त्रें । त्याचें काहीं न चलेचि ॥५॥ऐसें श्रीरामाचे वचन । ऐकोनियां हास्यवदन ।बोलता झाला तूं ब्रह्म पूर्ण ...अजून वाचा

241

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 21

अध्याय 21 सहस्रार्जुनाने रावणाला बांधून नेले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रम्य नर्मदेचा तीरीं । राक्षसेंद्र पंचद्वयशिरी ।पूष्पोपहारें अर्चिता त्रिपुरारी काय तेथें वर्तलें ॥ १ ॥येरीकडे सहस्रार्जुन भूपाळ । महिष्मतीचा नृपशार्दूळ ।श्रीरेवेमाजि स्त्रियांसहित केवळ । क्रीडा जळीं करीत होता ॥ २ ॥स्त्रियांसहित अर्जुन । क्रीडतसे आनंदें पूर्ण ।सहस्रहस्तीनींसीं एकला जाण । ऐरावती खेळे जैसा ॥ ३ ॥ सहस्राजुनाने क्रीडेच्या वेळी आपल्या बाहूंनी नर्मदाअडविल्यामुळे तिचे पाणी सर्वत्र पसरून रावणाची शिवपूजा मोडली : जाणावया भुजबळाची थोरी । स्वभुजा पसरोनि भीतरीं ।अवरोधूनि रेवातीरीं । स्तब्धता झाली ते काळीं ॥४॥सहस्त्रबाहूंच्या बळीं । नर्मदा रोधन झालें ।समुद्रासारिखी ते काळीं । चढती झाली उदकेसीं ॥५॥देखोनियां आत्मजातें ...अजून वाचा

242

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 22

अध्याय 22 रावणाची सुटका ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची दुर्दशा : माहिष्मतीनामें नगरी । तेथें सहस्त्रार्जुन राज्य करी ।तयाचे श्रीराघवारी । कित्येक दिवस पडियेला ॥१॥श्वानावाणी शूकरावाणी । जाई मार्गे खरावाणी ।दाही शिरीं वाहे पाणी । अनालागोनी रावण ॥२॥ऐसा कित्येक दिवसपर्यंत । माहिष्मतीनगरी भीक मागत ।विसांहातीं कांती सूत । उदरार्थ दशानन ॥३॥तंव येरीकडे प्रहस्त प्रधान । पौलस्तिमुनीसी स्वर्गीं जाऊन ।सांगितलें स्वामी रावणालागून । सहस्त्रार्जुने बंधन केलें ॥४॥माहिष्मतीनगराआंत । रावण असे भीक मागत ।नगराबाहेर येवों नेदित । कोंडोनि तेथ राखिला ॥५॥ रावणाचा पिता माहिष्मतीला निघाला : ऐकोनि रावणासि बंधन । कोपें खवळला ब्रह्मनंदन ।पुत्रस्नेहें कळवळोन । वायुवेगें चालिला ॥६॥मनोवेग सांडोनि मागें ...अजून वाचा

243

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 23

अध्याय 23 वाली- रावणाचे सख्य ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रणी धरोनि रावण । सहस्त्रार्जुनें केलें बंधन ।तेथें पुलस्ति मुनि । मागोनि दशानन सोडविला ॥१॥पुलस्ति गेला स्वर्गासी । मागें रावण विचरे अवनीसीं ।जे जे राजे जे जे देशीं । त्या त्या स्थाळासी आपण जाये ॥२॥तयांते जिंती रावण । राक्षस अथवा राजे जाण ।अथवा देव सिद्ध चारण । अधिक बळ ऐकोन संग्राम करी ॥३॥ रावणाचे किष्किंधेला आगमन : तदनंतरे लंकानाथ । हिंडत असतां प्रधानांसमवेत ।तंव पुढें किष्किंधेचा प्रांत । देखोनि त्वरित तेथे आला ॥४॥तें किष्किंधा नगरी कैसी । दुसरी अमरावती ऐसी ।पुरंदरात्मज पाळी जियेसी । वर्णना तिसी न करवे ॥५॥भोंवती नाना ...अजून वाचा

244

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 24

अध्याय 24 नारदांचे यमपुरीला आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाला नारदाचे दर्शन : गत कथा झाली ऐसी । जे कलिकमल्ष नाशी ।तदनंतरें विचारतां नारदासीं । राक्षसेश्वरें देखिलें ॥१॥नारद जातां गगनीं । रावणें देखिला दुरोनी ।म्हणे देवऋषि कृपा करुनी । नावेक येथवरी येइजे ॥२॥म्हणोनि केलें नमन । दोन्ही कर जोडोन ।स्वामी क्षेम कुशळ कल्याण । हें तुम्हांस पुसणें न लगे ॥३॥तुमचेनि भूतमात्र प्राणी । स्वानंदें वर्तती निजस्थानीं ।तुम्हीं विचंरां परोपकारालागोनी । तुमच्या दर्शनीं मी धन्य ॥४॥ऐकोनि विबुधारिजनकाचें वचन । मग बोले नारद भगवान ।म्हणे राया तुझें वैभव देखोन । आनंदें पूर्ण निवालों ॥५॥ नारदांकडून रावणाची स्तुती : तुज पुष्पकासारिखें विमान ...अजून वाचा

245

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 25

अध्याय 25 यमाच्या सैन्याचा विध्वंस ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ नारदांचे यमलोकी आगमन : ऐसें विचारोनि ब्रह्मकुमर । प्रेतपुरीस आला ।जेथे प्रेतराज सहपरिवार । परिवेष्टित बैसलासे ॥१॥नारदें यम देखिला । जैसा हुताशन प्रज्वळिला ।आपण मध्यें मिरवला । खमंडळीं कश्यपसुत ॥२॥प्राणियांचें जैसें कर्म देखे । तयां दंड करी कर्मासारिखे ।ऐसें करितां आकस्मात देखे । पातला विरंचिसुत नारद ॥३॥आला देखोनि नारदमुनी । यमराव हरिखेला मनीं ।षोडशोपचारीं पूजनी । मधुरवाणी बोलिला ॥४॥अहो जी मुनिचक्रचूडामणी । क्षेम असे तुम्हांलागोनी ।स्वधर्म रक्षितसा अनुदिनीं । किंप्रयोजनीं आगमन ॥५॥सकळ सुर आणि सुरपती । देव गंधर्व ऋषिपंक्ती ।आणि असुरही सेविती । तो तूं आलासि कोणें अर्थी ॥६॥कोणा कार्याचे ...अजून वाचा

246

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 26

अध्याय 26 यम व ब्रह्मदेव यांचा संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मागिले प्रसंगीं पाशुपतास्त्र । रावणें सोडून भस्मीभूत ।यमराजसैन्या अंत । तेणें हर्षें गर्जत राक्षस ॥१॥विजयो पावला दशानन । म्हणोनि करिती गर्जन ।तें वैवस्वत ऐकोन । क्रोधें दारुण उचंबळत ॥२॥ यम युद्धाला निघाला : नेत्रा आरक्त करोन । आपुलें सैन्य पडिलें जाणोन ।सारथियासि म्हणे शीघ्र स्यंदन । आणीं युद्धा जावया ॥३॥सारथियानें आणिला दिव्य रथ । वरी आरुढला प्रेतराज रणपंडित ।त्या रथाच्या घडघडाटश्रवणांत । दिग्गजांची टाळीं बैसलीं ॥४॥हातीं घेतला मुद्गर । मृत्यसारिखा तो उग्र ।काळदंड घेवोनि कठोर । जानों संहार करील ब्रह्मांडाचा ॥५॥ऐसा तो विवस्वतात्मज । रथीं आरुढला वीरराज ।परिवेष्टित ...अजून वाचा

247

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 27

अध्याय 27 रावणाचे मुंडन करुन विटंबना ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वकथानुसंधान । धर्मराजा शीघ्र स्वर्गगमन ।समागमें नारद भगवान । पावला ॥१॥येरीकडे पुरंदरारिजनक । राक्षासांमाजि श्रेष्ठ नायक ।पुष्पकीं आरुढोन लोकालोक । क्रमूनि रमातळा येता झाला ॥२॥घायीं राक्षस जर्जरीभूत । मार्गी एकमेकां उपचारित ।देवांमाजि बळी प्रेतनाथ । जिंतोनि त्यातें चालिला ॥३॥सवें प्रधान शुकसारण । मारीच अकंपन प्रहस्त जाण ।आणिकही बळियाढे गहन । देवदर्पहरण राक्षस ॥४॥ रावणाचे पाताळांतील भोगावती नगरीला आगमन : ऐसे प्रधानांसहित । पुष्पकारुढ लंकानाथ ।तंव पुढें रसातळ लोकांतें । देखते झाले राक्षस ॥५॥तया रसातळामाझारीं । वरुण नाग सहपरिवारीं ।आणिक दैत्य नानापरी । वसती तया नगरीं हो ॥६॥तया नगरीचें अभिधान ...अजून वाचा

248

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 28

अध्याय 28 शूर्पणखेचे दंडकारण्यात गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दाशरथि वीरचूडमणी । कथा पुसे कुंभोद्भवालागूनी ।म्हणे वरुणपुत्रातें जिंतोनी । पुढें काय केलें ॥१॥अगस्ति म्हणे वीरशार्दूळा । जमकमाता अयोध्याभूपाळा ।पूर्णब्रह्म अवतारखेळा । खेळतोसी नटनाट्यें ॥२॥निर्विकल्प ब्रह्म तूं सनातन । विरंचि हा तुझा नंदन ।जयानें सृष्टि केली निर्माण । ब्रह्मसृष्टि जाण म्हणिजे ते ॥३॥तुझी आज्ञा वंदी कळिकाळ । तुझी माया हे लोकां सबळ ।तो तूं आम्हाप्रति कुशळ । कथा ऐकों इच्छिसी ॥४॥तरी ऐकें गा श्रीरामचंद्रा । निर्गुणा जी गुणसमुद्रा ।तुझिये आज्ञेनें नरेंद्रा । वाचा चारी वदती शब्द ॥५॥ रावणाकडून वरुणस्त्रियांचें अपहरण : पुढें त्या पौलस्तिनंदनें । वरुणलोक जिंतोनि तेणें ।महावीर मारोनि ...अजून वाचा

249

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 29

अध्याय 29 मधुदैत्य व रावणाची भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ राक्षसाधीश रावण । खरदूषणांसह जनस्थान ।जें घोर अति दारुण शूर्पणखेलागून दिधलें ॥१॥मग पाहतांचि निजमंदिर । प्रवेशला दशशिर ।कनकप्रभा तेज अपार । रत्नवैदुर्य खांबोखांबीं ॥२॥सुवर्णभित्ती अति कुसरी । चित्रें लिहिलीं नानापरी ।माजि देवांगने सारिखी मंदोदरी । देखोन सुख पावला ॥३॥देवकन्या गंधर्वकन्या जिच्या दासी । अष्टनायिका लाजती देखोनि रुपासी ।ऐसी मंदोदरी देखोनि मानसीं । रावण सुखासी पावला ॥४॥कनकाचिया मंचकावरी । शेज रचली सुमनेंकरीं ।विंजणा वीजती एकी नारी । एकी विडिया पैं देती ॥५॥एकी चरण प्रक्षाळिती । एकी संवाहन करिती ।एकी अंगी चंदन चर्चिती । एकी दाविती दर्पण ॥६॥ऐसें मयासुराचें दुहितारत्न । ...अजून वाचा

250

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 30

अध्याय 30 रावणाला नलकुबेराचा शाप ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचे कैलासावरील उपवनांत आगमन : पौलस्तितनयचूडामणी । निशी मधुपुरीस क्रमोनी कैलासाचे उपवनीं । अलकावतीसमीप आला ॥१॥देखोनि अग्रजाचें नगर । तेथें राहिला सहित निशाचर ।तंव अस्तमाना गेला भास्कर । प्रकट झाली शर्वरी ॥२॥क्षीराब्धिसुतें उदय केलियावरी । चांदणें प्रकटले अंबरीं ।दिशा धवळिल्या तेजेंकरीं । कैलासगिरी शोभला ॥३॥राक्षसवीर आतुर्बळी । शस्त्रें उसां घालोनि निद्रासमेळीं ।तंववरी सुरारि इकडे ते काळीं । वन न्याहाळीत पैं होता ॥४॥ चंदण्यात दिसणारे वनसौंदर्य : शैलपाठारींचे उपवन । आनंदवनाहूनि गहन ।चैत्रगहन अशोकवन । त्या समान पैं नव्हती ॥५॥नाना तरूंच्या याती । कण्हेर नाना वर्णांचें शोभती ।कदंब कुसुमें लागले असती ...अजून वाचा

251

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 31

अध्याय 31 सुमाळीचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाचे अमरावतीला आगमन : निशी क्रमितां कैलासीं । रंभासंयोगें शाप रावणासी नलकुबरें त्यासी । पुढें कथा कैसी वर्तली ॥१॥राक्षसें सांडोनि कैलास । ससैन्य सपुत्रबंधु स्वर्गास ।चालिला मार्गी अमरपुरास । ठाकोनि आला ते वेळीं ॥२॥येवोनि अमरपुरा बाहेरी । राक्षस गर्जना करिती थोरी ।घोष ऐकोनि वृत्रारी । कंपायमान पैं झाला ॥३॥ इंद्राने चतुरंग सैन्य सिद्ध केले : आला ऐकोनि रावण । इंद्र झाला चलितासन ।बोले देवांप्रति आपण । सिद्ध सैन्य करा वेगीं ॥४॥आदित्य बारा वसु आठ । अकरा रुद्र व्हावे एकवट ।सिद्ध विश्वदेव मरुग्दण सगट । करा उद्धट युद्धातें ॥५॥सन्नद्ध करा सैन्यसंपत्ती । ...अजून वाचा

252

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 32

अध्याय 32 इंद्र रावण युद्धाला प्रारंभ ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजिताचे युद्धार्थ आगमन : सवित्रवसूनें सुमाळी । मारिलासे रणकल्लोळीं झाली होळी । मेळविला धुळी राक्षसांहित ॥१॥ऐकोनि रावणाचा ज्येष्ठ सुत । क्रोधा चढलासे बहुत ।नेत्र करोनि आरक्त । युद्धा प्रवर्तत ते समसीं ॥२॥पळत्या देवोनि नाभीकार । आपण रणांगणीं राहिला स्थिर ।कनकरथीं जडित धुर । पोंवळ्यांचीं चाकें हो ॥३॥रथीं जुंपिलें वारू । पवनातें म्हणती स्थिरू ।स्वइच्छेनें चराचरू । चरणातळीं दडपिती ॥४॥आधींच ते श्यामकर्ण । पाखरिले भूषणेंकरून ।पताकीं झाकोळलें गगन । तेजें लोपोन जाय हो ॥५॥ऐसिया कनकदिव्यरथीं । आरुढला सुलोचनापती ।दिव्य शस्त्रें घेवोनि हातीं । गर्जना करित निघाला ॥६॥ऐसा देखोनि रिपुकुमर । ...अजून वाचा

253

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 33

अध्याय 33 रावणाची सुटका व इंद्रबंधन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाची प्रतिज्ञा : राक्षसां देवा संग्राम घोर । हा तुझ्या मायेचा बडिवार ।राक्षसदेवांच्या शरीं अंबर । भरुनी अंधकार दाटला ॥१॥कोणा कोणी न दिसे स्पष्ट । तम दाटलें अति उत्कृष्ट ।वीरें वीर पावले कष्ट । तयांत तिघे सावध ॥२॥एक राक्षस दुजा राजकुमर । तिजा इंद्र धनुर्वाडा दुर्धर ।परस्परें करिती रणमार । घाय दुर्धर हाणिती ॥३॥सारथिया म्हणे रावण । ऐकें गा तूं एक वचन ।माझे सकळ राक्षसगण । विबुधीं रणीं पाडिले ॥४॥आजि माझ्या क्रोधेंकरून । करीन त्रैलोक्याचें दहन ।सारथिया शीघ्र स्यंदन । नेईं सैन्याचे आदिअंतवरी ॥५॥शीघ्र आजि समरांगणीं । शत्रूंची धडें ...अजून वाचा

254

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 34

अध्याय 34 ब्रह्मदेवाचे लंकेला आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पूर्वप्रसंगीं दशाननपुत्रें । धरोनि नेले इंद्रातें ।तें देखोनि सुरवर दुःखाते पावले बहुत संग्रामीं ॥१॥समस्त सुरवर मिळोन । येवोनि प्रार्थिला चतुरानन ।म्हणती भ्रष्ट झालें अमरसदन । इंद्र धरून नेला लंकेसीं ॥२॥तुझिये वरदें राक्षस । उन्मत्त झाले बहुवस ।तेणें मेघनादें आम्हांसि देवोनि त्रास । लंके अमरेश शरून नेला ॥३॥ऐकोनि देवांचें वचन । आश्चर्य पावला चतुरानन ।मग समस्त देव मिळोन । लंकाभवन पावले ॥४॥ब्रह्मा आला ऐकोन वाणी । राक्षसराज सामोरा येवोनि ।पूजा अभिवंदने करोनि । मग ब्रह्मा मंदिरासी नेला ॥५॥रावण म्हणे जी स्वाभिनाथा । कोणीकडे आलेती समर्था ।येरू म्हणॆ तुझ्या पुत्राची प्रशंसता । ...अजून वाचा

255

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 35

अध्याय 35 हनुमंताचा प्रताप ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मागिले प्रसंगी शक्रजितें । मैत्री करोनि सोडिलें इंद्रातें ।तदनंतरे सीताकांतें । विनविलें ॥१॥श्रीराम दोनी कर जोडून । अगस्तीस विनवी नम्र होऊन ।म्हणे स्वामी वाळिरावणांचे बळासमान । भूमंडळीं आन असेना ॥२॥या दोघांच्या बळाहूनि अधिक । वायुपुत्र असे देख ।तयाचा पराक्रम सम्यक । जम ठाऊक असे जी ॥३॥ श्रीरामांची मारुतीबद्दलची कृतज्ञता : हनुमंताच्या प्रसादेंकरून । प्राप्र्त लंका सीता लक्ष्मण ।येणें सुग्रीवेंसी सख्य जाण । अगणित बळ पैं याचें ॥४॥शुद्धीस जातां सहित वानरेंसीं । समुद्र देखोनि कपि चिंतातुर मानसीं ।तो शत योजनें येणॆं पराक्रमेंसीं । उतरोनि लंका पावला ॥५॥सीतेसी करोनि एकांत । व्न उपडोनि ...अजून वाचा

256

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 36

अध्याय 36 हनुमंताला वरदान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्राणनिरोधामुळे सर्वांना पीडा : समस्तदेवऋषिपंक्ती । प्राणरोधें तळमळती ।येवोनि प्रार्थिला प्रजापती देव विनंती करिते झाले ॥१॥प्राणनिरोधाचे कष्ट । ऋषी सांगती श्रेष्ठ श्रेष्ठ ।तंव ब्रह्मयाचें फ़ुगलें पोट । अति संकट देवांसी ॥२॥गगनीं लागलें पोट । बोल बोलतां होती कश्त्ःअ ।मळमूत्रा तेथें कैंची वाट । अति संकट देवांसी ॥३॥ब्रह्मा स्वयें सांगे समस्तां । इंद्रे हाणोनि वज्राघाता ।मुर्च्छित पाडिलें हनुमंता वायु पुत्रार्था क्षौभला ॥४॥राहूचे कैवारें अमरनाथें । वज्र हाणिलें वायुसुतातें ।पुत्र पडताचि चाळिता वायु । तो तंव जगाचा जगदायु ।पुत्रलोभें क्षोभोन बहु । भूतां आकांत मांडिला ॥६॥ प्राणवायूचे महत्त्व : प्राणपानीं नित्य सुख । ...अजून वाचा

257

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 37

अध्याय 37 श्रीरामगुण संकीर्तन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सुखनिद्रित भास्करवंशभूषण । जेंवी शेषशयनीं नाराय़ण ।तृतीयभाग निशी क्रमोनि भृगुनंदन । आगमन पैं केलें ॥१॥सद्गुरु मावळला । तृतीयभाग रात्रीचा क्रमिला ।पुण्यपुरुषां चेवो झाल ।प्रातःस्मरामि करिते झाले ॥२॥सकळ जनां चेडरें झालें । रतिसुखांपासोनि सुटले ।मार्गस्थ मार्गीं लागले । तीर्थयात्रा करावया ॥३॥विप्रवेदाध्ययन करिती । गाई घरोघरीं दुभती ।एकी त्या दधिमथनीं प्रवर्तती । सारासार निवडोनि ॥४॥कागपक्षी चेडरे झाले । तमेंसी निशीणें प्रयाण केलें ।ऐसें जाणॊनि गंधर्व आले । श्रीरामांतें उठवावया ॥५॥करिती सुस्वरें गायन । वीणा वेणु वाद्यें गहन ।आलाप मूर्च्चना तान मान । सुरस गायन मांडिलें ॥६॥सर्व किन्नरांची गायनध्वनी । ऐकिली श्रीरामें शयनस्थानीं ।अति ...अजून वाचा

258

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 38

अध्याय 38 राजांचे रामदर्शनार्थ आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ याप्रकारें अयोनिजारमण । भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मण ।सद्गुरु वसिष्ठाचें करोनि । राज्यकार्य चालविती ॥१॥करितां श्रीरघुनाथा । कोणा नाहीं दैन्यवार्ता ।कोणा नाहीं दैन्य चिंता । राज्यीं असतां श्रीराम ॥२॥ जनकांचे श्रीरामांकडे आगमन : राज्यकार्य प्रजापाळण । रात्रंदिवस करी रघुनंदन ।तंव कोणें काळीं विदेह पूर्ण । श्रीरामदर्शना पैं आला ॥३॥नामविदेही रूपविदेही । देहीं पाहतां तोही विदेही ।विदेहासि देहचि नाहीं । विअदेहीं पाहीं कन्या ज्याची ॥४॥ऐसा तो विदेही जनक । आला ऐकोनि वैदेहीनायक ।पुढे येवोनि नमस्कार सम्यक । अति आदरें श्रीरामें केला ॥५॥श्रीराम म्हणॆ जी विदेहनृपती । तुमचेनि आम्हां यश कीर्ति ।तुमचेनि उप्रतेजें ...अजून वाचा

259

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 39

अध्याय 39 वानर-राक्षसांना आनंद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम सच्चिदानंदघन । लीलावतार परम पावन ।खेळ खेळे विचित्र विंदान । महिमान न कळे ज्याचें ॥१॥ऐसा तो रघुपती । भद्रासनीं अयोध्येप्रती ।बैसला जैसा नक्षत्रें भोवतीं । मध्यें चंद्र विराजे ॥२॥भोवतें राजे तपोधन । तेणें सभा प्रसन्नवदन ।बंदीजन करिती गुणवर्धन । गंधर्व गायन करिताती ॥३॥तदनंतर पूर्वी भरतें । राजे बोलाविले होते रणसाह्यार्थे ।ते विनविते झाले रघुपतीतें । स्वदेशातें जावया ॥४॥श्रीराम म्हणे रायांसी । तुम्हांसि भरतें रणसाह्यासी ।पाचारिलें परी तुमच्या प्रसादेंसी । आधींच रावण मारिला ॥५॥तरी आतां स्वदेशा जावें । मज मनीं आठवावें ।म्हणोनि प्रीतिपूर्वक गौरवें । राजयांची पूजा केली ॥६॥ऐशी करोनियां पूजा ...अजून वाचा

260

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 40

अध्याय 40 वानरांचे स्वदेशी गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामांकडून सुग्रीवाची प्रशंसा व त्याची पाठवणी : तदनंतर ऋक्ष वानर-राक्षस अयोध्येसीं आनंदें बहुवस ।क्रमिला तेथें एक मास । सुखउल्हास सर्वांसी ॥१॥वानररावो जो भूपती । तयाप्रति बोले श्रीरघुपती ।तुझे उपकार आठवितां चित्तीं । थोर सुख होतसे ॥२॥तुझेनि संगें वानर । मिळाले गा अपरंपार ।तुझेनि मज सीता सुंदर । प्राप्त झाली किष्किंधेशा ॥३॥तरी आतां आपुले नगरासी । वेगीं जावें किष्किंधेसी ।जे कां अटक देवां दैत्यांसी । काळाचें तिसी न चले कांहीं ॥४॥ऐसिया किष्किंधेप्रती । राज्य करीं गा वानरपती ।पाळीं प्रधान सेना संपत्तीं । निष्कंटक राज्य करीं ॥५॥ सुग्रीवाला उपदेश : महाबहो किष्किंधानाथा ...अजून वाचा

261

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 41

अध्याय 41 भरतकृत श्रीरामस्तुती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ गेले ऋक्ष राक्षस वानर । मागें बंधूंसहित श्रीरघुवीर ।बसले असती सुखें । आनंदें निर्भर ते समयीं ॥१॥तेव्हां माध्यान्हकाळ प्रवर्तला । स्नानसंध्या विधी सर्व केला ।भोजन सारोनि ऋषि सकळां । बंधूंसहित राघवें ॥२॥तंव अकस्मात मधुर वाणी । आकाशींहूनि श्रीरामश्रवणीं ।पडली तये सभास्थानी । पाहें गगनीं मज श्रीरामा ॥३॥ कुबेराचे पुष्पक विमान पुनः श्रीरामांजवळ त्यांच्या सेवेसाठी आले : कृपेंकरोनि राघवा । मज पाहें कृपार्णवा ।मी पुष्पक कैलासाहूनि देवा । धनेशें मज पाठविलें ॥४॥बोलिलें मंजुळ उत्तरें । तें अवधारावें राजीवनेत्रें ।म्हणे पुष्पकावरी श्रीरामचंद्रें । पूर्वी आरोहण पैं केलें ॥५॥मी तुझे आज्ञेनें रघुपती । गेलों ...अजून वाचा

262

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 42

अध्याय 42 अशोकवाटिकेचे वर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ गतकथा झाली ऐसी । जे राजे जावोनि स्वदेशासी ।मागें श्रीराम बंधूसहपरिवारेंसीं राज्य करित अयोध्ये ॥१॥भरतें करोनियां स्तवन । संतोषला रघुनंदन ।देवोनि क्षेम आलिंगन । दोघे सुखसंपन्न पैं असती ॥२॥तयाउपरी जनकजामात । जानकीसहित सुखें वर्तत ।इच्छा उपजली वनवाटिकेंत । सीतायुक्त क्रीडा करणें ॥३॥धरणिजेसहवर्तमान । राजीवनेत्र श्रीरघुनंदन ।तयाचें करावया वर्णन । मी अपुरतें दीन काय वर्णू ॥४॥ अशोकवनाचे वर्णन : अत्यंत सुंदर तें वन । क्रीडा करावया वाटिके जाण ।सेवकांसहित श्रीरघुनंदन । येता झाला वनातें ॥५॥तया वनीं वृक्ष जाती । नानापरींच्या अनुपम्य असती ।तितुक्या सांगतां विस्ताराप्रती । कथा निगुतीं जाईल ॥६॥तरी सांगों संकळित ...अजून वाचा

263

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 43

अध्याय 43 श्रीराम-भद्र-संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तत्रौपविष्टं राजानमुपासंते विचक्षणाः ।कथयतः कथा नानाहास्यकाराः समंततः ॥१॥विजयो मधुमंतश्च कश्यपो मंगलाकुलः ।पुराजित्कालियो दंतवक्त्रः सिमागधः ॥२॥एते कथा बहुविधाः परिहाससन्विताः ॥३॥ भद्रासनीं चापशरपाणी । तेथें बैसलें संत चतुर ज्ञानी ।पंडित ऋषी महामुनी । श्रीरामातें उपासिती ॥१॥नानापरींच्या कथा पुराणें । धर्मचर्चा हरिकीर्तनें ।विनोद हास्य गीत गायनें । सकळ मिळोन तेथें करिती ॥२॥कोण कोण ते सभेप्रती । श्रीरामसन्निध तेथें असती ।तयांची नामें संकळितीं । यथानिगुतीं सांगेन ॥३॥विजयो दुसरा मधुमंत । कश्यप मंगळ चौथा तेथ ।पुराजित् काळियो दंतवक्त्र । भद्र जाण आठवा ॥४॥नवमाचें सुमागध नाम । हे नवविध सभानायक परम ।यांचा विश्वास मानी श्रीराम । अति चतुर ...अजून वाचा

264

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 44

अध्याय 44 श्रीरामांची बंधूंशी भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरत,शत्रुघ्न व लक्ष्मणांना बोलावून आणण्याची रामांची आज्ञा : विसर्जून सभेचे । बुद्धिनिश्चित श्रीरघुनंदन ।समीप द्वारपाळासी जाण । आज्ञा करिता पैं झाला ॥१॥अगा द्वारपाळा सज्ञाना । लक्ष्मणभरतशत्रुघ्नां ।वेगीं पाचारीं मम दर्शना । कार्याकारण पैं असे ॥२॥येरे प्राणिपात करोनि स्वामीसी । निघाला सौमित्रभवनासी ।मार्गीं न करोनि वलंबासी । अति त्वरेंसीं चालिला ॥३॥ दूताच्या सांगण्यावरुन तिघेही रामभेटीसाठी निघाले : वेगीं प्रवेशला सौमित्रमंदिरी । तंव संमुख लक्ष्मण ते अवसरीं ।देखोनियां जोडले करीं । नमस्कार पैं केला ॥४॥तुमचिया भेटीकारणें । बोलावूं पाठविलें रघुनंदनें ।ऐसें ऐकतां लक्ष्मणें । रथारुढ पैं झाला ॥५॥रत्नजडित स्यंदनावरी । आरुढोनि सौमित्र ...अजून वाचा

265

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 45

अध्याय 45 श्रीराम व बंधूंचा विचारविनिमय ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ समीप करोनि तिघे बंधु । तयांप्रति बोले कृपासिंधु ।मुख नयनीं बिंदु । अंबकाचे पडताती ॥१॥अंग चळचळां कांपत । आकुळ व्याकुळ होय चित्त ।बोलता तोंड कोरडें पडत । अवस्था आकळित राघवा ॥२॥अंतरीं राम चैतन्यघन । बाह्य चिंतातुर दीन ।अंतरीं राम सुखसंपन्न । बाह्य उद्वेगें मन व्यापिलें दिसे ॥३॥अंतरीं राम नैराश्य । बाह्य दाखवी आशापाश ।अंतरीं श्रीराम सर्वज्ञ परेश । बाह्य विचार पुसतसे ॥४॥अंतरीं श्रीराम सुखसागरु । बाह्य दिसे व्यवहारी अति चतुरु ।अंतरीं श्रीराम सद्गुरू । बाह्य नरावतारू भासत ॥५॥ऐसा श्रीराम लीलाविग्रही । नानावतार धरी पैं देहीं ।देहबुद्धि तया नाहीं । ...अजून वाचा

266

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 46

अध्याय 46 सीतेचे वनांत गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तदनंतर सुमित्रात्मज । रजनी क्रमोनी गभस्ती तेजःपुंज ।उदयो होतां जे अग्रज । तया कार्या करितसे ॥१॥सुमंताप्रति बोले वचन । मुख कोमाईलें दिसे विवर्ण ।सारथियासहित रथ उत्तम जाण । येथें शीघ्र आणावा ॥२॥श्रीरामाची आज्ञा ऐसी । रथीं वाहोन जानकीसी ।सीतेचेही आवडी मानसीं । ऋषिआश्रम पहावे ॥३॥मी नेतो वैदेहीतें । पहावया ऋषिआश्रम पुण्यतीर्थे ।तरी सुमंता शीघ्र रथातें । आणावें आज्ञेकरोनी ॥४॥ लक्ष्मणाच्या आज्ञेप्रमाणे सुमंताने रथ आणलाः ऐकोनि लक्ष्मणाचे वचन । तत्काळ सुमंतें उठोन ।रथ आणिला रत्नखचित सुवर्णवर्ण । देदीप्यमान तेजस्वी ॥५॥सुमंत म्हणे सुमित्रात्मजा । रथ आणिला कुलजा ।आतां करावें योजिलें काजा । ...अजून वाचा

267

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 47

अध्याय 47 सीतेचे वनाभिगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ परतीला पोहोचली : अयोनिजेच्या मुखकमळें । ऎसं वदतां सुमित्रेच्या बाळें ।नावाडी कुशळें । सुंदर नौका आणविली ॥१॥कैवर्ते नौका सुंदर पूर्ण । आणोनि म्हणे करा जी आरोहण ।धरणिजेसहित ऊर्मिलारमण । नावेवरी बैसला ॥२॥रथसहित तेधवां सूत । ऎलतीरीं राहोन त्वरीत ।पैलतीरीं दोघे उतरोनि तेथ । स्नानसंध्या सारिली ॥३॥ लक्ष्मणाचा दुखाःवेग : शोकें संतप्त लक्ष्मण । बोले जानकीप्रति सद्रद वचन ।म्हणे माते निमित्तधारी जाण । जनासारिखें श्रीराम आचरला ॥४॥मज जी जेथें येतें मरण । तरी पावतो कॄतकल्याण ।हें माझेनि दुःख न देखवे जाण । काय आपण करावें ॥५॥जरी मज मरण येतें । तरी मी ...अजून वाचा

268

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 48

अध्याय 48 सीतेचा आक्रोश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लक्ष्मणाचे निष्ठुर वचन । ऎकोनि जानकी खेदें खिन्न ।थोर विषाद पावोन मूर्छागत पैं झाली ॥१॥सुकुमार जैसी कर्पूरजननी । अनिळ झगटें येवोनी ।मग ती डोले हादरोनी । तैसें अवनिजेसि जाहलें ॥२॥ते पडे धरणीं मूर्छागत । भ्रमें व्याकुळ झालें चित्त ।क्षण एक होवोनि सावचित्त । लक्ष्मणा बोले दीन वचनें ॥३॥जनकात्मजा म्हणे सुमित्रासुता । माझें शरीर दुःखाते तत्वतां ।ऎसें जाणोनि कीं विधाता । दुःखासी पात्र मज केलें ॥४॥पूर्वी जैसें आपण केलें । कोणां स्त्रीपुरूषां असे विघडलें ।तरी मज हें प्राप्त झालें । वनवासासी सांडीलें श्रीरामें ॥५॥ऎसा जाणोनियां वृत्तांत । वनी मज त्यागी श्रीरघुनाथ ।माझे ...अजून वाचा

269

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 49

अध्याय 49 सीता व वाल्मीकी भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऋषिपुत्रांकडून सीता दृष्टीस पडल्याची वाल्मीकींना वार्ता कळते : सीता हिंडतां ऐकली । शोक करितीं ऋषिपुत्रीं देखिली ।ते समस्त येवोनि वाल्मीकाजवळी । नमस्कार करिते पैं झाले ॥१॥ते समस्तही मधुरवचनीं । अहो जी ब्रह्मात्मजशिष्या वाल्मीकमुनी ।अपूर्व एक देखिलें नयनीं । एक स्त्री रुदन करितसे ॥२॥रुपें तरी मन्मथजननी । सुंदर सुकुमार दीर्घस्वनीं ।रुदन करितसे वनीं । अभिप्राय मुनि न कळे तिचा ॥३॥ नैव देवी न गंधर्वी नासुरी नच किन्नरी ॥एवं रुपा मया नारी दृष्टपूर्वा महीतले ॥१॥ नव्हे देवांची देवता । नव्हे गंधर्वांची कांता ।नव्हे असुरांची वनिता । किन्नरयोषिता ते नव्हे ॥४॥नव्हे जळींची ...अजून वाचा

270

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 50

अध्याय 50 लक्ष्मण-सुमंत-संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ येरीकडे कथासंबंधु । रावणारीचा कनिष्ठ बंधु ।नामें लक्ष्मण प्रतापी प्रसिद्ध । राक्षसांचा छेदक ॥१॥ऋषिआश्रमीं मैथिली । प्रवेशली दुःखित ते काळीं ।तिचेनि शोकें आतुर्बळी । महा दुःख पावला ॥२॥हीन दीन मुखकमळ । कोमाइलें जैसें कर्दळीफळ ।सीतेचा देखोनि शोक सबळ । अति तळमळ करीतसे ॥३॥ सुमंताजवळ लक्ष्मणाने जानकीवियोगाचे दुःख सांगितले : श्रीरामसारथ्या पाहें येथ । श्रीरामासी हे दुःख होईल प्रप्त ।सीता पतिव्रता जाण निश्चित । वृथा ज्येष्ठें त्यागिली ॥४॥श्रीराम येथें असता । तयासी सीतेचा शोक कळता ।राघवावीण एवढ्या अनर्था । आजि म्यां दृष्टीं देखिलें ॥५॥सुमंता प्रारब्धाचा महिमा । यासी अन्यथा करुं न शके ब्रह्मा ...अजून वाचा

271

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 51

अध्याय 51 लक्ष्मण-सुमंत-संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ तदनंतर सारथि सुमंत । सौमित्राप्रति ऋषिभाषित ।सांगता झाला आनंदित । जें ऐकिलें होतें ॥१॥ दुर्वासांचे दशरथाकडे आगमन : पूर्वी दुर्वास महाऋषी । अत्रिपुत्र अनसूयेच्या कुसीं ।जन्म पावला तपःसामर्थ्येसीं । तो दशरथभेटीसी अयोध्ये आला ॥२॥राजा वसिष्ठ सामोरे गेले । अति सन्मानें दुर्वासा आणिलें ।अर्घ्यपाद्यादिकीं पूजन केलें । भोजन झालें तयावरी ॥३॥वसिष्ठाचा आश्रम पुनीत । तेथें ऋषी वसावयार्थ ।ठाव दिधला हर्षयुक्त । मुनींसमीप राहविला ॥४॥जो दुर्वास महामुनी । तापसांमाजि शिरोमणी ।जयाच्या शापें शाड्.र्गपाणी । निजस्त्रियेसीं दुरावला ॥५॥ऐसा तो दुर्वास ऋषी । वसिष्ठाश्रमीं एक वर्षीं ।राहिला असतां दशरथ सूर्यवंशी । वसिष्ठगृहासि पैं आला ॥६॥श्रीगुरूसी नमस्कार ...अजून वाचा

272

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 52

अध्याय 52 हनुमंत नंदिग्रामास गेला ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ प्रभाते उठोनि सौमित्र । समवेत सुमंत सारथी ।रथासहित अयोध्येप्रती । वदन होवोनि आले ॥१॥भद्रासनीं जनकजामात । प्रधानलोक परिवेष्टित ।कैसी सभा दिसे तेथ । हृष्ट पुष्ट जनेंसीं ॥२॥ दुःखित लक्ष्मणाने घडलेला वृत्तांत रामांना निवेदन केला : सौमित्र होवोनि परम दीन । मुख कोमाइलें कळाहीन ।श्रीरामसमीप येवोन । साष्टांग नमन पैं केलें ॥३॥नेत्रीं अश्रूंचिया धारा । अंग कांपतसे थराथरां ।अधोमुख होवोनि श्रीरामचंद्रा । सर्व वृत्तांत जाणविला ॥४॥स्वामीची आज्ञा घेऊन । प्रवेशलों तिघे जण ।गंगातीरीं जानकी विसर्जून । पुढील कथन अवधारा ॥५॥गंगेच्या पैलतीरीं । दुःखित सीता सांडोनी दुरी ।आम्ही उतरलों ऐलतीरीं । मग ...अजून वाचा

273

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 53

अध्याय 53 नृगराजाची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम धरणिजाकांत । लक्ष्मणवचनें हर्षयुक्त ।होवोनि स्वानंदे डुल्लत । कथा सांगत ॥१॥श्रीराम म्हणे लक्ष्मणा । तुज गेलें असतां वना ।मागें चार दिवस राजकारणा । मन नाहीं प्रवर्तलें ॥२॥तरी आतां नगरीचे जन । बोलावी शेटे महाजन ।आणि पुरोहित प्रधान । राजकारणालागूनी ॥३॥जो देशींचा भूपती । होवोनि न करी राजनीती ।तो जाईल अधःपातीं । नृगरायासारिखें होईल ॥४॥लक्ष्मण म्हणे श्रीरघुनाथा । नृग हा कोण कां अधःपाता ।गेला काय कारण सर्वथा । तें मजप्रति सांगिजे ॥५॥नृग कोण देशींचा भूपती । कोणाचा पुत्र रघुपती ।काय चुकला म्हणोनि अधःपातीं । कोणे कर्मे जी गेला ॥६॥ऐकोनि लक्ष्मणाचें वचन ...अजून वाचा

274

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 54

अध्याय 54 नृगराजाचे शापसमयीचे वर्तन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऐसा पवित्र आणि परिकर । रामायणी कथा सार ।एकैक श्रवणीं उत्तर । भवदोषां वेगळें होईजे ॥१॥ऐसें श्रीरामाचें चरित्र । धन्य गाती तयांचें वक्त्र ।धन्य ऐकोनि घेती त्यांचे श्रोत्र । परम पवित्र ते नर ॥२॥श्रीराममुखींची ऐकोनि कथा । बोलता झाला जाहला शक्रारिहंता ।पुढें नृगरायाची समूळ कथा । ते मजप्रति सांगिजे ॥३॥श्रीराम म्हणे लक्ष्मणा । पुढें नृगरायाचे आख्याना ।मी सांगतों सावधान । श्रवणीं अवधारिजे ॥४॥येरीकडे नृगराजभूपती । जाणोनि ब्राह्मणाची शापोक्ती ।थोर दुःखी झाला चित्तीं । ब्राह्मणाप्रती न चले कांहीं ॥५॥मंत्री पुरोहित नगरजन । थोर थोर बोलवोनि ब्राह्मण ।शिल्पकार गृहकर्ते जाण । तेथें ...अजून वाचा

275

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 55

अध्याय 55 निमिराजाला वसिष्ठांचा शाप ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मागिलें प्रसंगीं नृगकथन । श्रीरामें लक्ष्मणासि सांगोन ।पुढें लक्ष्मण कर । अभिवंदन करिता झाला ॥१॥स्वामींनीं कथा सांगतां । तृप्ति नव्हे माझिया चित्ता ।आश्चर्य वाटे धरणिजाकांता । पुनरपि कथा ऐकावी ॥२॥ऐसें लक्ष्मणाचें देखोनि आर्त । पुनरपि जनकजामात ।कथा सांगावया उपक्रम करित । त्वरित श्रीराम ॥३॥पूर्वी राजा इक्ष्वाकुनंदन । तयाचा सुत निमि जाण ।अति धर्मिष्ठ प्रजापाळण । बरवेवरी करितसे ॥४॥तयासि झाले बारा पुत्र । तेही पितयासारखे पवित्र ।तयांमध्ये कनिष्ठ गुणवंत । पित्या आवडत बहुसाळ ॥५॥निमि राजा धर्मपरायण । अति पराक्रमी पुरुषार्थी जाण ।अमरपुरीसारिखें पाटन । पुत्राकारणें करुं पाहे ॥६॥पुत्र वसावयालागून । गौतमाश्रमासमीप ...अजून वाचा

276

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 56

अध्याय 56 ययातीची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वसिष्ठनिमिचें कथन । ऐकोनियां लक्ष्मण ।पुढें कैसे शापमोचन । झालें जी ॥१॥श्रीराम म्हणे गा सौमित्रा । पुढील अपूर्व रसाळ कथा ।ते सांगेन सावधान श्रोता । दृढ चित्ता देइजे ॥२॥वसिष्ठनिमींचें आख्यान । अतिहास पुरातन ।वरुणवीर्य अति दारुण । घटामाजी निक्षेपिलें ॥३॥दिवसेंदिवस वाढोन । तयाचा झाला मैत्रावरुण ।तयासि अगस्ति ऐसें अभिधान । कुंभोद्भव म्हणती पंडित ॥४॥आतां निमिरायाची स्थिती । सावधान ऐकें उर्मिलापती ।शाप झाला कैसा मागुती । उःशापातें पावला ॥५॥वसिष्ठाचे शापेंकरुन । निमीनें देह न सांडितां जाण ।आणिक देहीं प्रवेशोन । नयनीं प्राण ठेविले ॥६॥वंशाचें करावया हित । काय करी प्रतापवंत ।यज्ञ करोनि ...अजून वाचा

277

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 57

अध्याय 57 लवणासुराचे आख्यान ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामचंद्र राजीवनयन । कथा सांगतां लक्ष्मणा ।थोर आश्चर्य पावला मना । डुल्लत ॥१॥आधींच कथा रामायणी । जे कां वदला वाल्मीक मुनी ।सुरस आणि जगतारिणी । प्रवेशतां श्रवणीं भवदोष खंडी ॥२॥ऐसे श्रीरामलक्ष्मण । चर्चा करितां निशी क्रमोन ।प्रभात होय रविकिरण । सर्वत्र अवनीं प्रगटले ॥३॥दोघे बंधु श्रीरामलक्ष्मण । करोनियां संध्यास्नान ।भद्रासनीं येवोनि जाण । राजनीती करिते झाले ॥४॥ ऋषिसमुदाय श्रीरामांच्या दर्शनार्थ आला : तंव सुमंत प्रधान आला । श्रीरामा नमस्कार केला ।म्हणे स्वामी ऋषींचा मेळा । द्वारी उभा दर्शनार्थी ॥५॥यमुनातीरींचें ऋषीश्वर । भर्गवच्यवनादि थोर थोर ।तुमचे भेटीलागीं द्वार । धरोनि उभे असतीं ...अजून वाचा

278

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 58

अध्याय 58 शत्रुघ्नाला राज्याभिषेक ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम म्हणे भार्गवासी । मधूचा पुत्र लवणासूर नामेंसीं ।कोण कर्म करी क्रीडेसीं । कोणें देशीं विचरतसे ॥१॥ऐकोनि श्रीरामाचें वचन । आनंदयुक्त समस्त जन ।तयांत भार्गव समूळ कथन । सांगता होय ते समयीं ॥२॥ सर्व प्राण्यांना भक्षण करणारा लवणासुर : लवणासुराची समूळ विवंचना । ऐकें गां पद्माक्षीरमणा ।मधुकुळीं जन्मोनि जाण । नाना प्राणी भक्षितो ॥३॥विशेषेंकरोनि तापस । लवणासुर भक्षितो सावकाश ।रुद्रकर्म तोचि आचार त्यास । नित्य क्रीडेसी मधुवचन ॥४॥सहस्त्रें सहस्त्र मारोनी । व्याघ्रमृगादिक प्राणी ।मानवें भक्षोनि आव्हानी । कर्मक्रिया करितसे ॥५॥जैसा प्रळयकाळींचा काळ । भक्षितसे जीवजाळ ।तैसा लवणासुर केवळ । प्राणिमात्रां अंतक ...अजून वाचा

279

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 59

अध्याय 59 शत्रुघ्नाचा लवणपुरीत प्रवेश ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ मागिलें प्रसंगीं शत्रुघ्नासी । अभिषेकोनि मधुपुरीसीं ।पाठवितसे लवणासुरासी । वधावयाकरणें शत्रुघ्नाला युद्धनीतीची शिकवण : श्रीराम म्हणे शत्रुघ्ना । सवें घेईं असंख्य धना ।धान्याचा संग्रह करोनि जाणा । मार्गक्रमण करावी ॥२॥अश्व उत्तम अनेक । सर्वे घेईं असंख्य ।रथ कुंजर सेना सेवक । नृत्यकारक तेही नेईं ॥३॥जे मार्गीं चालतां श्रमलियासी । गीत विनोद करिती संतोषीं ।आप्तवर्गसेवकांसीं । धन बहुत पैं द्यावें ॥४॥मार्गीं वैरियासी कळों न द्यावें । हळू हळू सैन्य पाठवावें ।आपण स्थिर होवोनि जावें । उत्तम मार्ग पाहोनी ॥५॥एकाएकीं मधुपुरीस जाण । धाडी घालोनि आपण ।करीं लवणासुराचें निर्दळण । अन्यहस्तें मरण ...अजून वाचा

280

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 60

अध्याय 60 लवणासुराचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ शत्रुघ्न-लवणासुराचे द्वंद्वयुद्ध : दाशरथि युद्धा प्रवर्तला । हें देखोनि लवण क्रोधें ।दंतदाढा रगडूं लागला । हात चुरी कटकटा करुनी ॥१॥लवणासुर म्हणे शत्रुघ्नासी । आतां मजपसोनि कोठे जासी ।कोणे मायेचे पोटीं रिघसी । केउता पळसी मंदबुद्धि ॥२॥द्विजारीचें ऐकोनि वचन । मग तो दाशरथ वीर दारुण ।काय करिता झाला आपण । शत्रुघ्न लक्षोनि ते काळीं ॥३॥माझ्या भुजांचा पराक्रम गहन । आणि वज्रासारिखा बाण ।घायें तुझा घेईन प्राण । तंव राक्षसें ताळ घेतला ॥४॥तो टाकिला शत्रुघ्नावरी । ताळ येतां देखोनि अंबरीं ।दाशरथी वीर धनुर्धारी । बाणें शतखंड वृक्ष केला ॥५॥सवेंचि दुसरा पादप घेतला । ...अजून वाचा

281

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 61

अध्याय 61 श्रीरामाचे अगस्त्याश्रमांत गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ शत्रुघ्न गेला मधुपुरीसी । मागें श्रीराम भरत लक्ष्मणेसीं ।राज्य करितां । पुढें काय वर्तलें ॥१॥ रामांच्या अधर्मचरणानेच आपला लहानमुलगा मृत्यु पावला अशी एका ब्राह्मणाची शंका : कोणी एक द्विज पुण्य पवित्र । अग्निहोत्री महापंडित ।चारी वेद मुखोद्गत । धर्मीं तत्पर स्वधर्में ॥२॥ऐसा तो गुणसंपन्न । तयाचें बाळक पांचसात वर्षांचे जाण ।ते अकाळीं पावलें मरण । दुःख दारुण विप्रासी ॥३॥तेणें द्विजें घेवोनि बाळक । महाद्वारा आला करीत शोक ।स्नेहें रुदन करी देख । नाना विलापें कपाळपिटी ॥४॥म्हणे मी नाहीं आचरलों अधर्म । म्यां नाहीं केलें निंद्य कर्म ।वादीं छळिले नाहींत ब्राह्मण ...अजून वाचा

282

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 62

अध्याय 62 अगस्ति – श्रीराम संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कुंभोद्भव म्हणे जामदग्नजेत्यासी । पूर्वी त्रेतायुगाची कथा ऐसी ।जे ते तुजपासीं । विस्तारेंसीं सांगेन ॥१॥पूर्वी त्रेतायुगामाझारीं । शतयोजनें वनविस्तारीं ।पशु पक्षी नाहीं त्या वनांतरीं । त्यजोनि दुरी गेले मानव ॥२॥तया वनाभीतरीं । एक तापस उत्तम तप करी ।मीही रामा हिंडत तेथवरी । तया वना प्रवेशलों ॥३॥फळें मुळें सुस्वादिष्ट । भक्षितां प्राणी होय संतुष्ट ।मार्गीं रमलियाचे कष्ट । तया वनीं निवारती ॥४॥अनेक वृक्ष बहुत जातींचे जाण । तयांचे कोण करील वर्णन ।तयांमध्ये एक सरोवर विस्तीर्ण । एकयोजनपर्यंत ॥५॥तया सरोवराभीतरीं । नानापरींच्या कमळिणी भ्रमरी ।रुणझुण करिती नाना स्वरीं । मंजुळ शब्देंकरोनी ...अजून वाचा

283

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 63

अध्याय 63 वृत्रासुरवधाची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऋषीची संज्ञा जाणोन । श्रीरामें स्नानसंध्या सारुन ।नंतर करावया भोजन । राम प्रवर्तले ॥१॥श्रीरामभोजनाकारणें । नानापरींचीं फळें तेणें ।उत्तम शाका अगस्तीनें । श्रीरामालागीं आणिल्या ॥२॥उत्तम फळें रुचकर । भोजनीं प्रवर्तला राजेश्वर ।भोजन करोनि श्रीरघुवीर । निजासनीं बैसला ॥३॥तृणपर्णकुटिकेमाझारी । श्रीरामें निद्रा करोनि तमारी ।उदय होतां नृपकेसरी । स्नानसंध्या संपादिली ॥४॥ऋषींस करोनि नमस्कार । हात जोडोनि श्रीरघुवीर ।म्हणता झाला आजि भाग्य अपार । चरण तुमचे देखिले ॥५॥आजि धन्य माझें कुळ । धन्य माझें भाग्य सफळ ।जन्मोजन्मींचें तपाचें फळ । चरणयुगुल देखिलें ॥६॥आतां निजनगरा जावयासी । आज्ञा दिधली पाहिजे ऋषी ।ऐसें श्रीराममधुरवचनासी । ...अजून वाचा

284

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 64

अध्याय 64 ऐल राजाची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऐसी शक्रारिहत्यांची कथा । अति आश्चर्य अपूर्वता ।ऐकोनियां समस्तां । बोलता श्रीराम ॥१॥होवोनि आनंदभरित । बोलावयाचा उपक्रम करित ।पूर्वी कर्दम प्रजापतीचा सुत । ऐलनामें प्रसिद्ध ॥२॥तेणें भुजबळेंकरुन । पृथ्वीचें नृप जिंतोन ।स्वधर्मे राज्य करी जाण । प्रजापाळण पुत्रापरी ॥३॥आंगवण सुरेशाहुनि आगळी । उदारते न तुळती कर्ण बळी ।दैत्य दानवें भेणें पाताळीं । लंघोनि गेली तळातळा ॥४॥नाना गंधर्व असुर । भेणें पूजिती नृपेश्वर ।रायाचा पराक्रम देखोनि थोर । चरणा शरण अरी येती ॥५॥तो कोणे एकेकाळीं पारधीलागून । ससैन अटवी प्रवेशोन ।मृगां मारोनि लक्षावधि जाण । आणी श्वापदें नेणों किती ॥६॥जिकडे जाय ...अजून वाचा

285

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 65

अध्याय 65 अश्वमेध यज्ञ व लवकुशांचे गायन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम म्हणे लक्ष्मणभरतांसी । कर्दमपुत्रकथा ऐसी ।पुढें वर्तले सावकाशीं । अवधानेंसी अवधारा ॥१॥ऐलाबुधांपासून । पुरुरवा पुत्र झाला जनन ।तदनंतर बुध सज्ञान । काय करिता पैं झाला ॥२॥पाचोरोनि सर्व मुनी । च्यवन भृगु तपोधनी ।पुलस्त्यादि श्रेष्ठ ब्राह्मणीं । ॐकार वषट्कार पैं आले ॥३॥सोमसुत म्हणे ऋषींसी । परिसा कर्दमऋषीच्या पुत्रकथेसी ।ऐलनामें स्वधर्मेसीं । राज्य करित पराक्रमें ॥४॥तो आला या वना पारधीसी । सैन्येसहित महादेवें शाप त्यासी ।दिधला असतां त्याच्या हितासी । तुम्ही समस्तीं विचारा ॥५॥ऐकोनि सोमसुताचें वचन । ऋषीश्वरां संतोष अति गहन ।समस्त एकवट मिळोन । बोलावया उपक्रम करिते झाले ...अजून वाचा

286

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 66

अध्याय 66 लवाला पकडले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ येरीकडे श्रीरामाचा वारू । निघाला भूमीवरी नव्हे स्थिरू ।चालतां हेलावे सागरू तेजें दिनकरु लोपला ॥१॥तेजें हीन दशेचा प्रांत । वारुतेजें लखलखित ।अंगभारें गजगती चालत । जेंवी आदित्य पूर्वेसी ॥२॥मागे दळभार अगणित । सांगातें वीर अपरिमित ।शत्रुघ्न आणि भरत । समवेत निघाले ॥३॥मार्गीं राखितां ठायीं ठायीं । उल्लंघिले देश नाना पाहीं ।ऐसें क्रमोनि वनें घोर महीं । वाल्मीकाश्रमा वारु आला ॥४॥तेथें झाला चमत्कार । वना गेला होता कुश कुमर ।आश्रमीं लहु परम शूर । मातेजवळी खेळत असे ॥५॥ लवाने अश्वमेधाचा घोडा पकडला : तेथें जाहली नवलपरी । लहु खेळतां निघाला बाहेरी ।तंव ...अजून वाचा

287

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 67

अध्याय 67 भरत-शत्रुघ्न ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ लहूला पकडून नेल्यामुळे जानकीचा खेद : शत्रुघ्न घेवोनि गेला लहुया । बांधोनि कनिष्ठ तनया ।ऐसें ऐकोनि जनकतनया । शोकार्णवीं बुडाली ॥१॥ऋषिकुमर सांगती सीते । लहूनें युद्ध केलें पुरुषार्थे ।संतोषविलें पितृव्यातें । आपुलेनि भुजबळें ॥२॥शेवटीं बंधन पावूनी । आम्हांदेखता रथीं वाहूनी ।पुत्र नेला वो सुलक्षणी । ऐकोनि विकळ सुंदरी ॥३॥मूर्च्छा सांवरोनि ते अवसरीं । जानकी शोकातें आदरी ।कपाळ पिटी निजकरीं । धावें त्रिपुरारी आकांतीं ये ॥४॥धरणिजा म्हणे ऋषि ताता । मी काय करुं जी आतां ।वेगीं सोडवा माझ्या सुता । पुत्रदानता करावी ॥५॥माझा वनवासींचा सांगती । याचेनि होतें वनाप्रती ।काय कोपला शैलजापती । ...अजून वाचा

288

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 68

अध्याय 68 लक्ष्मण-हनुमंताला पकडून नेले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ उरलेल्या सैन्याने रामांना वृत्तांत सांगितला : गतप्रसंगीं अनुसंधान । ऐसें निरुपण ।भरत शत्रुघ्नासी बांधोन । कुशें जाण युद्ध केलें ॥१॥उरल्या सैन्या करोनि मार । विजयी दोघे राजकुमर ।भरतशत्रुघ्न बांधोनि वीर । अश्वापासीं राखिलें ॥२॥येरीकडे रणीं पडिले । ते सावध होवोनि बैसले ।मागें पुढें पाहात ठेले । तंव कोणी नाहीं युद्ध करित ॥३॥ऐसें देखोनि घायाळ वीरीं । कण्हत कुंथत साकेतपुरीं ।प्रवेशतां मार्गीं एके पुरीं । करिती गजरीं महाशब्द ॥४॥एकांचें फुटलें शिर । एकांचे उखळले कर ।एक सर्वांगें जर्जर । एक अशुद्धें डवरिले ॥५॥एक रडत पडत । एक कटिभंगें येती लोळत ।एकांची ...अजून वाचा

289

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 69

अध्याय 69 श्रीरामांना जानकी व पुत्रांची भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दूषणारिपुत्रीं दोघीं जणी । नर वानर समरांगणीं ।जीत कित्येक मेदिनीं । गतप्राण होवोनि ठेलें ॥१॥अश्व गज वना आले । तेही गतप्राण होवोनि ठेले ।किंचित घायाळ उरले । ते प्रवेशले अयोध्यापुरीं ॥२॥भद्रासनीं जनकजामात । जैसा नभीं शोभे भास्वत ।भोंवते ऋषी परम ज्ञानवंत । सुमंतादिक प्रधान ॥३॥बैसले सभानायक । नगरपंडित पुराणिक ।चहूं वेदांचे वेदपाठक । ज्योतिषी गायक गंधर्व ॥४॥ऐसी सभा प्रसन्नवदन । एक करिती गायन ।एक करिती शास्त्रव्याख्यान । एक जन रंजविती ॥५॥ घायाळ सैनिकांनी त्या कुमारांविषयी श्रीरामांन निवेदन केले : येरीकडे रणींचे वीर । अशुद्धें डवरिलें जैसे गिरिवर ।येवोनि ...अजून वाचा

290

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 70

अध्याय 70 कैकेयीला लंकादर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जानकीसहित श्रीरघुपती । सुखस्वानंदें अयोध्येप्रती ।राज्य करितां स्वधर्मस्थिती । पापवदंती राज्यीं ॥१॥देशींचे लोक पुण्यशील । स्वधर्मीं रत द्विज सकळ ।अग्निहोत्रें करोनियां काळ । श्रीरामनामीं कंठिती ॥२॥घरोघरीं तुळसीवृंदावनें । नित्य करिती हरिकीर्तनें ।ठायीं ठायीं होती पुराणें । शास्त्रव्याख्यानें घरोघरीं ॥३॥आणिक जे इतर लोक । तेही नगरीं स्वधर्मरक्षक ।भूतदयासुत दीनपाळक । उपकारीं अत्यंत पुढिलांसी ॥४॥भरतशत्रुघ्न कैकेयीनंदन । सुमित्रेचा लक्ष्मण ।श्रीरामसेवे अनुदिन आसक्त । जाण मन त्यांचें ॥५॥प्रधानवर्ग सकळिक । नगरींचे नगरलोक ।बंदिजन सर्व सेवक । श्रीराम‍उपासक अनुदिनीं ॥६॥अष्टदळकमळकळिकेमाझारीं । जनकीसमवेत कनकमृगारी ।नीळवर्ण छत्र शोभे शिरीं । बंधु परिवारी उभे तेथें ॥७॥ऐसा सुंदर राजीवलोचन ...अजून वाचा

291

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 71

अध्याय 71 मूळकासुराला लंकेची प्राप्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वज्रसारेकडून मूळकासुराचा धिःकार : येरीकडे अनुसंधान । रम्य रामायण पावन भवदोषखंडण । श्रवणमात्र केलिया ॥१॥कैकेयीनें प्रबोधोनि कुंभकर्णपत्नीतें । आपण गेली अयोध्येतें ।मागें वर्तलें तें सावचित्तें । श्रोतृजनीं अवधारिजे ॥२॥वज्रसारानामें कुंभकर्णजाया । निखंदोनि बोले निजतनया ।म्हणे पुत्रा तुझा जन्म वायां । भूमिभार झालासी ॥३॥मूळीं लागोनि सर्व शांती । केली आपुल्या पित्याचे संपत्ती ।अभाग्यें उरलासि क्षितीं । आम्हां दुःख दावावया ॥४॥जरी जन्मलासी पाषाण । तरी सार्थक होतें जाण ।तुज विवोनि वंध्यापण । माझें न चुके पापिष्ठा ॥५॥जाय शिरीं घालीं पर्वत । नातरी करीं पर्वतपात ।विष भक्षोनि प्राण निश्चित । सोडोनि देई पापिष्ठा ...अजून वाचा

292

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 72

अध्याय 72 मूळकासुराचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामभेटीला बिभीषण निघाला, अयोध्येचे वर्णन : रणीं बिभीषण पडिला । तो सावध केला ।जैसा नदीस बुडतां काढिला । थडीचिया जनीं हो ॥१॥रावणानुज होवोनि सावधान । प्रधानांप्रति बोले वचन ।आतां कर्तव्य काय आपण । इये समयीं करावें ॥२॥प्रधान म्हणती राजाधिराजा । शरण जावें श्रीरघुराजा ।सिंहाचे प्रसादें अजा । गजमस्तकीं आरुढली ॥३॥गदापाणि म्हणे धन्य जिणें । आजि राघवासि भेटणें ।हाचि निश्चय करोनी मनें । प्रधानांसीं निघाला ॥४॥चवघांचिया समवेत । बिभीषण मार्गी जात ।म्हणे आजि भेटेल गरुडध्वज । क्षेम देईल उचलोनि भुज ।सांगेन जीवींचें निजगुण । अधोक्षज देखिलिया ॥६॥नेत्रां होईल पारणें । धणीवरी सुख ...अजून वाचा

293

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 73

अध्याय 73 सीतेचे पाताळात आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वानरसेनेसीं श्रीरघुनाथ । विजयी झाला आनंदभरित ।अयोध्ये येवोनि कार्यार्थ । काय वर्तला ॥१॥मारोनियां कुंभकर्णपुत्र । विजयी झाला श्रीराम जानकीसहित ।ऐसें ऐकोनि महंत । थोर थोर येते झाले ॥२॥आले विबुध सुधापानी । आला अगस्ति ज्याची जननी ।उर्वशी नामें प्रसिद्ध ॥३॥ऐसिये शरयूतीरपुराभीतरी । सभासदनीं पौलस्त्यारी ।बंधुपुत्रवेष्टित ऋषीश्वरीं । बैसजेल निजस्थानीं ॥४॥कौसल्यादि माता जाण । पूरवासी नागरिक प्रधान ।श्रीगुरू वसिष्ठ पावन । यांहीं विराजमान शोभत ॥५॥जेंवी इंदुमंडळा पुढें मागें । परिवेष्टित तारागणें अनेगें ।तैसें समस्तांसहित श्रीरंगें । सभासदानीं शोभिजे ॥६॥जेंवी मानससरोवरीं । पक्षिये मुक्ताफळाहारी ।जेंवी सुधापानियांमाजी शैलारी । तैसा राजेश्वरीं शोभे श्रीराम ॥७॥कुळाचळामध्ये ...अजून वाचा

294

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 74

अध्याय 74 भरताकडूण गंधर्वाचा पराजय ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ आकाशवाणीचें उत्तर । ऐकोनियां श्रीरघुवीर ।करी धरोनियां कुमर । यज्ञशाळॆ ॥१॥क्रमोनियां तेथे शर्वरी । प्रातःकाळीं दूषणारी ।स्नानसंध्या करोनि ते अव्सारी । ऋषींसहित बैसला ॥२॥सभामंडळीं थोर थोर । मिळाले राक्षस वानर ।प्रधान सेनानायक ऋषिष्वर । नगरींचें नागरिक लोक ॥३॥आज्ञा देवोनि लहुकुशांतें । श्रीरामें आरंभिलें रामकथेंतें ।ऐकतां सुख व वाटे चित्तें । परम व्याकुळ पैं झाला ॥४॥पाहूं लागला चहूंकडे । न देखे जानकीचें रूपडें ।म्हणे दिशा दृष्टी उद्वस पडे । अंधकार दाटूनी ॥५॥माझिये जानकीवीण । उद्वस अवघे विरंचिभुवन ।मज राज्याची चाड कोण । सभा विसर्जून ऊठिला ॥६॥नावडे राज्यभोगोपचार । नावडे छत्रचामर ।नावडे ...अजून वाचा

295

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 75

अध्याय 75 लक्ष्मणाचे पाताललोकी गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ निजपुत्रांसि स्थापोनि सिंधुप्रदेशीं । भरत निघाला श्रीरामभेटीसी ।येवोनियां अयोध्येसी । वंदिलें ॥१॥सांगितला सविस्तर वृत्तांत । एइकोनि संतोषला श्रीरघुनाथ ।चंद्रा देखोनि उचंबळत । क्षीरार्णव जैसा हा ॥२॥उदित होतां दिनकर । कुमुदिनी उल्हासे थोर ।भरत भेटलिया श्रीरघुवीर । आनंदातें पावला ॥३॥अरुणानुजें अमरावतिये । अमृतहरणीं पावला जय ।तेणें वंदिली विनता माय । तैसा भरत भेटला ॥४॥याउपरी काय वर्तलें । तें श्रोतीं पाहिजे परिसिलें ।तेंचि आतां वक्तियां वहिलें । सांगों आदरिलें श्रीरामकथे ॥५॥ उभौ कुमारौ सौमित्रे तव धर्मविशारदौ ।अंगदश्चंद्रकेतुश्च समर्थौ दृढध्न्विनौ ॥१॥इमौ राज्येऽभिषेक्ष्यामि देशः साधु विधीयताम् ।रमणीयो ह्यसंबाधो रमेतां यत्र धन्विनौ ॥२॥न राज्ञां यत्र ...अजून वाचा

296

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 76

अध्याय 76 श्रीरामांचे शरयू नदीवर आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विसृज्य लक्ष्मणं रामस्तीव्रशोकसमन्वितः ।वसिष्ठं मंत्रिणं चैव नैगमांश्चेदमब्रवीत् ॥१॥अद्य राज्येऽभिषेक्ष्यामि भ्रातृवत्सलम् ।अयोध्यायाः पतिं वीरं ततो यास्याम्यहं वनम् ॥२॥ लक्ष्मणाविषयी रामांचा शोकावेग : लक्ष्मणें सांडोनि इहलोक । पाताळ सेविता झाला देख ।तें देखोनि रघुनायक । शोकार्णवीं बुडाला ॥१॥श्रीराम म्हणे लक्ष्मणा । मज सांडोनि गेलासी गुणनिधाना ।काय अपराध देखोनी मना । माजी निष्ठुर झालासी ॥२॥लक्ष्मणा काय मी चुकलों । कोण अपराध आचरलों ।किंवा निष्ठुर बोलिलों । म्हणोनि रुसलासी सौ‍मित्रा ॥३॥मजबरोबरी वनांतरीं । हिंडतां श्रमलासी बा भारी ।द्वादश वर्षे निराहारी । अन्न उदक त्यजियेलें ॥४॥म्हणोनि कोपलासी वेल्हाळा । सुमित्रेच्या लघु बाळा ।आतां मुख ...अजून वाचा

297

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 77 - (अंतिम भाग)

अध्याय 77 श्रीरामांचे सर्वांसह वैकुंठगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अयोध्या सांडोनि अर्ध योजन । पुढें निघाला श्रीरघुनंदन ।देखोनि तीर पावन । तेथें वस्तीसी राहिला ॥१॥त्या शरयूचा महिमा कैसा । जो देवांसी अगम्य सहसा ।जातें वर्णितां महेशा । पार न कळें निर्धारीं ॥२॥मानससरोवरीं जन्मली । उत्तरेची दक्षिणें चालिली ।भागीरथीसी मिळती झालीं । आपुलेनि पूर्वपुण्यें ॥३॥ऐसें शरयूतीर मनोहर । स्नानें निष्पाप होती नर ।तया तीरीं श्रीरघुवीर । प्रस्थानासी उतरला ॥४॥तंव येरीकडे चतुरानन । समस्त देवांसीं परिवारोन ।दिव्य विमानीं सुरगण । आपुल्याला बैसले ॥५॥जैसे हंस आपुल्याला मेळीं । उडोनि बैसती तडागाचे पाळीं ।तैसे देव तये काळीं । परिवारेसीं मिरवले ॥६॥गगनीं विमानांची दाटी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय